महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.
साहित्य:- दोन वाट्या बासमती वा दिल्ली राइस, एक वाटी ते दीड वाटी मटार, पाव वाटी काजू, धने - जिरे पूड, लाल तिखट पाव चमचा हळद, तेल, मीठ, फोडणीचे साहित्य तूप, खोबरे - कोथिंबीर, कढीलिंब, एक चमचा साखर वा गूळ.
कृती:- प्रथम कढईत वा पातेल्यात तेल घालावे. दिल्ली राइस स्वच्छ धुऊन अर्धा तास निथळत ठेवावा. तेलात मोहरी - जिरे - हिंग - हळद घालावी व त्यावर तांदूळ व मटार घालून ४-५ मिनिटे घालून परतून घ्यावे. कढीपत्ता, काजू, तिखट पाव चमचा, धने जिरे पूड १-१चमचा मीठ साखर घालून तांदूळ चांगला परतावा. अंदाजे ५ वाट्या पाणी उकळवून ते तांदळावर घालावे. भात मसालेदार हवा असल्यास 1 चमचा गोडा मसाला घालावा व मंद गॅसवर ढवळून झाकण घालून भात शिजवावा. १-२ चमचे तूप वरतून सोडावे. भात वाढल्यावर वर कोथिंबीर व खोबरे घालून वाढावा. भात मऊ आवडत असल्यास आंबेमोहोर वापरावा. टोमॅटोचे सार वा कढीबरोबर हा भात छान लागतो. आवडत असल्यास जिरे व कोरडे खोबरे भाजून व मिक्सऊरमध्ये बारीक करून तेही मसाले भातात घालावे. अंदाजे एक ते दीड चमचा, त्यामुळे भाताला खमंगपणा येतो. याच पद्धतीने आपल्या आवडीची भाजी घालून मसालेभात करू शकतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
साहित्य : तांदूळ २ वाटय़ा, तेल २ चमचे, काळीमिरी १ चमचा, लवंगा- ५-६, बारीक चिरलेला लसूण १ चमचा, लिंबाचा रस अर्धा चमचा, मीठ, साखर चवीनुसार.
कृती : सर्वप्रथम २ वाटी तांदूळ मंद आचेवर काळपट भाजून घ्या. तो जळायला नको, नंतर गरम पाण्यात टाकून त्याला अर्धा तास भिजवत ठेवा. एका पॅनमध्ये तेल तापवून त्यामध्ये काळीमिरी, लवंग, बारीक चिरलेली लसूण परतून घ्या. नंतर यात १/२ लिंबाचा रस, मीठ, साखर घालून ३ कप पाणी घालून उकळा. पाणी उकळल्यावर भिजवलेला तांदूळ घालून शिजवा व रायत्याबरोबर किंवा तसाही खायला छान लागतो.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
भंडारी भातोडे
हा प्रकार विदर्भातल्या भंडारा जिल्ह्य़ात पाहायला मिळतो.
साहित्य : तयार भात ४ वाटय़ा, भरडलेले धणे २ चमचे, जिरे पावडर १ चमचा, जाडसर कुटलेल्या हिरव्या मिरच्या ४ ते ५, लसूण-आलं २ चमचे, जाडसर कुटलेली सोप २ चमचे, बारीक चिरलेले कांदे ३ वाटय़ा, तांदळाचे पीठ अर्धी वाटी, आमचूर पावडर, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, तेल तळायला, हळद छोटा अर्धा चमचा,
कृती : तांदळाचे पीठ सोडून सर्व जिन्नस एकत्र करा. यानंतर हलक्या हाताने तांदळाच्या पिठीच्या साहाय्याने वडे थापून मंद आचेवर डीप फ्राय करा व दहय़ाच्या चटणीबरोबर खायला द्या.
टीप : वडे तळताना दोनदा तळले तर जास्त खुसखुशीत होतात. जसे वडे झाल्यावर तेलातून अर्धकच्चे काढून घ्या, सव्र्ह करतेवेळी ओल्या हाताने हलकेच दाबून परत तळा. आमचूर घरात नसेल तर त्यात दही, लिंबू, सायट्रिक अॅेसिड घातलं तरी चालू शकेल.
भात कसा शिजवावा?
कुकरमध्ये एकाच भांडय़ात मऊ आणि फडफडीत भात शिजवायचा असेल तर कुकरमध्ये भांडय़ाच्या खाली एक चमचा ठेवा, जेणेकरून ते भांडे कलते होऊन व ज्या भागात पाणी जास्त आहे तो भात मऊ होईल. आणि ज्या भागात पाणी कमी आहे, तो भात फडफडीत होईल.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
तांदळाचे सूप(पेज)
साहित्य : भात शिजवताना थोडे जास्त पाणी घालून त्यावरचे पाणी काढून घ्यावे. (पाणी घट्टसर असावे) तांदळाचं पाणी ५ वाटय़ा, मीठ, साखर चवीनुसार, दही २ चमचे, कोथिंबीर पाव वाटी, फ्रेश क्रीम ४ चमचे, भिजवून तळलेले तांदूळ २ चमचे.
कृती : भातावरचे पाणी उकळायला ठेवून त्यात दही, चवीनुसार मीठ, साखर घालणे, सव्र्ह करते वेळी त्यात वरून फ्रेश क्रीम, तळलेले तांदूळ, कोथिंबीर घालून सव्र्ह करावे.
टीप : दही घालण्याआधी घुसळून घ्यावे. तांदूळ तळल्यानंतर त्याला टीपकागदावर टिपून घ्यावे. त्यामुळे सुपावर तेलाचा तवंग दिसणार.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
गॅसवर एका नॉनस्टिक पॅनमध्ये साजूक तूप गरम करून घेऊन त्यांत डिंकाची पावडर तळून व फुलवून घ्या.नंतर काजू, बदाम यांची तुकडे किंवा काप आणि बेदाणे हेही साजूक तुपात तळून घ्या. गव्हाचे पफ मिक्सरमध्ये फिरवून त्याचीही रव्यासारखी पावडर करून घ्या. साखरेचा एकतारी पाक करून घ्या
अर्धा कप भिजवलेल्या उडीद डाळीचे पीठ, अर्धा कप भिजवलेल्या चणाडाळीचे पीठ, प्रत्येकी एक लहान चमचा कॉर्नफ्लोअर, आल्याचे काप, हिरवी मिरची, जलजिरा पावडर, लाल तिखट व जिरे, मीठ चवीपुरते, दोन कप बेबी कॉर्न उकडून, तळण्यासाठी तेल.
साहित्यः
सव्वा कप भिजवलेला साबुदाणा,२ मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे,२ ते ३ टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट,दीड टीस्पून लाल तिखट,दीड टीस्पून लिंबाचा रस,बारीक चिरलेली कोथिंबीर,चवीनुसार मीठ,तेल.
चटणीसाठी लागणारे साहित्य:
१/२ कप खवलेले ओले खोबरे,२ लहान हिरव्या मिरच्या,३ टेबलस्पून दही,१/२ कप कोथिंबीर.
कृतीः
प्रथम साबुदाणा भिजत घालावा. साबुदाणा भिजविण्यासाठी एका भांड्यात साबुदाणे घ्यावेत. साबुदाणे पूर्णपणे बुडतील इतके पाणी घालावे व लगेच पाणी निथळुन घ्यावे. अगदी थोडेसे पाणी शिल्लक ठेवावे व त्यावर झाकण ठेवावे. साधारण २ तासांनी त्यात लिंबाचा रस घालावा व पुन्हा झाकुन ठेवावे व साधारण १ ते दीड तास थांबावे. उकडलेला बटाटा किसून घेऊन त्यात भिजवलेला साबुदाणा घालून नीट एकजीव करून घ्यावे व त्यात शेंगदाण्याचे कूट, लाल तिखट, लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून हे मिश्रण नीट एकजीव करून घ्यावे. तयार मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे तयार करावेत व त्यांना हलक्या हातानी दाबून चपटा आकार द्यावा व गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावेत. चटणी तयार करण्यसाठी चटणीचे वरील दिलेले सर्व साहित्य मिक्सरमधून एकत्र फिरवून घ्यावे व गरमागरम वडे ओल्या खोबर्याच्या चटणीसोबत सर्व्ह करावेत.
उसाचा रस एक वाटी ( रसात आले, लिंबू घातलेले नसावे ) पाव वाटी नारळाचे दूध, असे एकत्र करावे त्यात ज्वारीचे किंवा तांदळाचे पिठ मिसळावे. मिठाचा कण टाकावा. हे पिठ जरा पातळच भिजवावे. पारंपारीक प्रकारात केळ्याच्या पानावर थापून दशम्या करतात.
कुरमूरे थोडे गार झाले कि आधी त्यात सुके पदार्थ घालावेत. चवीपुरते मिठ, फरसाण, तळलेले शेंगदाणे आणि शेव घालून मिक्स करावे. नंतर मिरच्या, कैरी, कांदा, कोथिंबीर आणि लिंबाचा रस घालून मिक्स करावे. खुप जास्त वेळ मिक्स करू नये. लगेच सर्व्ह करावे. भेळ तयार केल्यावर लगेच खावी. भेळ तयार करून ठेवल्यास ती नरम पडेल.
साहित्य:
सारणासाठी: १ वाटी हिरवी मूगाची डाळ,१ चमचा आले पेस्ट,३ हिरव्या मिरच्या/ लाल तिखट, १ चमचा आमचूर पावडर, १ चमचा बडीशेप
१ चमचा गरम मसाला, दिड चमचा साखर, हिंग, हळद, कढीपत्ता, तेल, मीठ.
आवरणासाठी: २ वाट्या गव्हाचे पिठ,३-४ चमचे तेल,पिठ भिजवण्यासाठी पाणी,चवीपुरते मीठ,तळण्यासाठी तेल.
कृती:
१) मूग डाळ ४-५ तास भिजत ठेवावी. भिजवलेली मूगडाळ जाड बुडाच्या पातेल्यात घेऊन १ वाटी पाण्यात उकळवावी. उकळवताना गॅस मध्यम असावा आणि पातेल्यावर झाकण ठेवावे. मूगडाळ अगदी नरम शिजवू नये. सर्व पाणी निघून जाऊ द्यावे. नंतर मूगडाळ थोडी चेचून घ्यावी.
२) गव्हाचे पिठाची कणिक भिजवावी. अगदी घट्ट किंवा अगदी सैल भिजवू नये. कणिक झाकून ठेवावी.
३) कढईत २ चमचे तेल गरम करावे. त्यात हिंग, हळद, आले पेस्ट, मिरच्या/लाल तिखट, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यानंतर मूगडाळ, गरम मसाला, बडीशेप, आमचूर पावडर, मीठ, साखर घालून ढवळावे. सारण थंड होवू द्यावे. हाताने एकत्र करावे म्हणजे ते मिळून येईल.
४) कणकेचे दोन-दोन इंचाचे गोळे करावे. गोल पुरीसारखे लाटावे. पुरी डाव्या हातात घेऊन उजव्या हाताने त्यात एक चमचा सारण घालावे आणि सर्व कडा एकत्र आणून व्यवस्थित बंद करावे. हे करत असतानाच तळणासाठी कढईत तेल गरम करत ठेवावे. मिडीयम हाय हिटवर कचोर्या गोल्डन ब्राउन होईस्तोवर तळून काढाव्यात. या कचोर्या गरम असतानाच खाव्यात. थंड झाल्यावर चव फार चांगली लागत नाही.
या कचोर्या कोथिंबीर-पुदीना मिरचीच्या चटणीबरोबर किंवा चिंच खजूराच्या चटणीबरोबर अगदी झकास लागतात.
टीप:
१) गरम मसाल्याबरोबर २ चमचे गोडा मसाला (काळा मसाला) वापरल्यास चव छान येते.
२) आवडत असल्यास सारण परतताना काळ्या मनुका किंवा बेदाणे घालू शकतो.
द्राक्षे अर्धा तास थोडे मीठ घातलेल्या पाण्यात घालून ठेवा. पुन्हा स्वच्छ पाण्याने धुऊन त्याची देठे काढून टाका. त्याचा रस काढा. गाळून ठेवा. पातेल्यात साखर पाणी एकत्र करुन उकळा. उकळी आल्यावर त्यात सायट्रिक अॅसिड घालून मिश्रण खाली करा. स्वच्छ फडक्याने गाळून घ्या.
दसऱ्याचे दुसरं नाव आहे विजयादशमी. अज्ञानावर ज्ञानाने, शत्रूवर पराक्रमाने, वैऱ्यावर प्रेमाने विजय मिळवायचा. आंनद, समाधान आणि सोबत संपदा मिळवून आणायची. यश किर्ती प्राप्त करायची धनसंपदा लुटायची आणि लुटवायची हा दिवस. दसरा ह्या सणांचं मोठ्या उत्साहाने स्वागत होते. हा साडेतीन मुहुर्तातला एक मुहुर्त म्हणूनच दसऱ्याच्या मुहुर्तावर नवी खरेदी, नवे करार, नव्या योजनांच्या प्रारंभ इ. चांगल्या गोष्टी केल्या जातात. घर, गाडी, बंगला, खरेदी केला जातो. सोन्या - चांदीचे दागिने केले जातात.
नवे व्यवसाय चालू केले जातात. ह्या दिवशी घरोघरी मिष्टान्नाचा बेत केला जातो. संध्याकाळी आपट्याची पाने सोनं म्हणून लहानांनी मोठ्यांना द्यायची. त्यांच्या पाया पडायचे आणि लाख मोलाचे आशिर्वाद घ्यायचे ते ही ह्याच दिवशी.
आपट्याच्या पानाला सोन्याचं मोल का आणि कसं आलं ह्याबद्दल जी एक कथा सांगितली जाते, ती अशी की
फार फार वर्षापूर्वी वरतंतू नावाचे एक गुरू आपल्या आश्रमात शिष्यांना ज्ञानदान करत होते. बराच मोठा शिष्यवर्ग त्यांचेकडे वेदाभ्यास, शास्त्राभ्यास करीत होता. एकदा काय झालं. गुरू वरतंतू ह्यांचेकडे शिकणाऱ्या त्यांच्या एका कौत्स नावाच्या शिष्याने त्यांना विचारले – गुरूजी!
तुम्ही आम्हाला एवढे ज्ञान दिले. शहाणे केले, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला कोणती गुरुदक्षिणा द्यावी? त्यावर गुरु वरतंतू म्हणाले, “बाळ कौत्सा, अरे ज्ञान हे दान करायचे असते. त्याचा बाजार किंवा सौदा करायचा नसतो. अरे तुम्ही शहाणे झालात, ज्ञानी झालात, हीच माझी गुरुदक्षिणा !” पण कौत्स मात्र ऐकेनाच, सारखा मी काय देऊ? असे विचारू लागला मग गुरु म्हणाले, “मी तुला चौदा विद्या शिकवल्या म्हणून तू मला चौदा कोटी सुवर्ण मोहरा दे.”
कौत्साला वाटलं की आपण एवढं धन सहज कमवू पण प्रत्यक्षात ते जमेना. मग कौत्स रघुराजाकडे गेला आणि त्यांना चौदा कोटी सुवर्ण मोहरांची मागणी केली. पण रघुराजाने त्या आधीच आपली सर्व संपत्ती दान केली होती. दारी आलेल्या याचकाला परत पाठवायचं नाही म्हणून राजानं कौत्साला ‘तू तीन दिवसांनी ये’ असं सांगितलं. रघुराजानं कुबेराकडे वसुलीसाठी निरोप पाठवला. धन येईना, मग रघुराजाने युद्धाची तयारी केली. ही वार्ता इंद्राला कळली. इंद्र घाबरला, त्यानं कुबेराला रघुराजाच्या नगरीच्या वेशीवर असणाऱ्या आपट्याच्या वृक्षांवर सुवर्णमुद्रांचा पाऊस पाडायची आज्ञा दिली.
दुसरे दिवशी रघुराजाला त्या सुवर्ण मुद्रांच्या पावसाची गोष्ट कळली. त्यानं स्वतः त्या मुद्रांचा ढीग पहिला. दारी आलेल्या कौत्साला ‘हवं तेवढं धन घे’ म्हटलं पण त्याने गुरुदक्षिणे पुरतेच धन घेतले. बाकीच्या सर्व सुवर्णमुद्रा राजानं प्रजेला वाटल्या. लोकांना आपट्याच्या झाडाखाली ते धन मिळालं तो दिवस दसऱ्याचा होता.
नऊरात्री अंबेचा जागर झाल्यानंतर दहावा दिवस असतो विजयादशमीचा. सोने लुटण्याचा. दस-याच्या दिवशी लोक एकत्र येतात. आपटा व शमीच्या पानांमुळे अर्जुन योग येतो. आपल्याला विजय मिळावा आणि तो जीवनात कायम राहावा यासाठी दस-याला सोने लुटले जाते. आपण दसऱ्याला नेहमीच श्रीखंड पुरी हा मेनु करतो. या वेळी जरा वेगळा मेनु करू या.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
कॅप्सिकम राईस
साहित्य:- दोन मोठ्या पिवळ्या रंगाच्या ढोबळ्या सिमला मिरच्या,१ कांदा, अर्धी वाटी बासमती तांदूळ
फोडणीसाठी. आले-लसून, मेथीचे दाणे, मोहरी, उडीदाची डाळ, तीळ, जिरे, बडीशेफ, कढीपत्ता, हळद.
कृती:- सर्वात प्रथम तांदूळ धुवून १५ ते २० मिनिट भिजात टाका. दोन मोठ्या पिवळ्या ढोबळ्या सिमला मिरचीच्या मध्यम आकाराच्या फोडी चिरुन घ्यायच्या, नंतर कांदा, आले-लसून, मेथीचे दाणे, मोहरी, उडीदाची डाळ, तीळ, जिरे, बडीशेफ, कढीपत्ता, हळद यांची नेहमीप्रमाणे खमंग फोडणी करुन घ्यायची. पांच मिनिटे परतून घेऊन मग चिरलेल्या सिमला मिरचीच्या फोडी फोडणीत घालायच्या आणि नीट एकजीव करुन घायच्या. गॅसची आच शक्य होईल तेवढी मंद करुन घ्यायची. पातेल्यावर एका ताटात पाणी घालून ते ताट झाकण ठेवावे. शिजून या भाजीला पाणी सुटले की त्यात फक्त तांदूळ वैरावेत. पाणी घालायचे नाही. खरे तर भाजीच्या पाण्यात तांदूळ बसतील इतकेच तांदूळ अंदाजे भिजवायचे. आता झाकण न ठेवता मंद आचेवर हा भात शिजू द्यायचा. भात शिजत आला की कडेकडेने साजूक तूप सोडायचे. हा भात चवीला तर छान होतोच, शिवाय रंग वगैरे पण एकदम छान दिसतो आणि पाणी घातले नाही म्हणून भाताला एक वेगळीच चव येते.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Copyright © 2025 | Marathisrushti