(User Level: User is not logged in.)

खाद्ययात्रा

महाराष्ट्रासहित विविध राज्ये आणि देशांमधील खास पाककृतींचा संग्रह.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • http://www.marathisrushti.in/prime/oldsiteimages/sites/20/2016/09/gulkand-modak.jpg

    गुलकंद मोदक

    साहित्य :

    सारणासाठी : १ मध्यम आकाराचा नारळ,
    २ कप दुध, ३/४ कप साखर, २ टे स्पून गुलकंद,१ टी स्पून वेलची पावडर, ५-६ काजू (तुकडे करून), ५-६ बदाम (तुकडे करून)

    पारी साठी : २ कप रवा (बारीक), १ टे स्पून तूप (मोहनसाठी) मीठ चवी प्रमाणे,
    १/२ कप दुध व लागेल तसे पाणी, मोदक तळायला तूप.

    कृती :

    नारळ खवून घ्या, त्यामध्ये साखर व दुध मिक्स करून शिजवायला ठेवा. मिश्रण घट्ट होई परंत शिजवावे मग त्यामध्ये वेलची पावडर गुलकंद, काजू, बदाम घालून मिक्स करावे.

    बारीक रवा थोडा मिक्सरमध्ये थोडा ग्राईड करून घ्या. मग त्यामध्ये मीठ व कडकडीत तुपाचे मोहन घालून मिक्स करा. दुध व पाणी मिक्स करून रवा थोडासा सैल सर भिजवावा. (खूप सैल झाला तर मोदक खूप तुपकट होतील.) रवा भिजवल्यावर १० मिनिट झाकून बाजूला ठेवा. नंतर भिजवलेल्या रव्याचे एकसारखे मोठ्या लिंबा एव्ह्डे गोळे बनवावे. एक एक गोळा पुरी सारखा लाटून त्यामध्ये एक टे स्पून सारण भरून गोळा बंद करावा. आपल्याला पाहिजे तो आकार द्यावा.

    कढई मध्ये तूप गरम करून विविध आकाराचे मोदक गुलाबी रंगावर तळून घ्यावे.

    हे मोदक चवीला उत्कृष्ट लागतात.

    -- संजीव वेलणकर, पुणे
    ९४२२३०१७३३

  • आमरस घालून शेवयाचा शिरा

    आमरस घालून शेवयाचा शिरा

    पाण्याला उकळी आली की त्यात शेवया टाकून जरा उकळू द्यावे. शेवया शिजल्या की लगेच चाळणीवर ओताव्या व वरून गार पाणी घालावे.

  • Kaakdi-kanda-rayate

    काकडी कांदा रायते

    आपल्या रोजच्या जेवणातील कोशिंबिर हा एक नियमित पदार्थ. काकडी आणि कांदा हे तर त्याचे मुख्य घटक..

  • शेवग्याच्या पानाच्या वड्या

    साहित्य:- शेवग्याचा पाला, हरभरा डाळीचे पीठ, तांदूळ पीठ, ओवा, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, हळद, तेल, दही इ.

    कृती:- शेवगा पाला, बेसन, तांदूळ पीठ, ओवा, हिरवी मिरची पेस्ट, मीठ, हळद व तेल एकत्र करावे. दही घालून भिजवून तेलाचा हात लावलेल्या थाळीत थापावे. कुकरमध्ये वाफवून वड्या थंड करून कापाव्यात किंवा तव्यात तेल घालून तळाव्यात किंवा फोडणीत परताव्यात. वरून खोबरे, कोथिंबीर टाकावी.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • मटार पॅटीस

    साहित्य:- ४ ते ५ उकडलेले बटाटे, २ वाट्या उकडलेले मटारचे दाणे, १ कांदा बारीक चिरून, धने - जिरे पूड १ चमचा प्रत्येकी तेल, ४-५ ओल्या मिरच्या, आले, जिरे, पेस्ट, ४-५ ब्रेडचे स्लाइस, मीठ.

    कृती:- प्रथम बटाटे मऊ उकडून घ्यावेत. नीट बारीक कुस्करून त्यात मीठ व 2-3 स्लाइस बारीक कुस्करून घालावेत. मऊ वाटल्यास अजून स्लाइस घालून गोळा करून ठेवावा. तेलावर मटारचे उकडलेले दाणे, बारीक कांदा, आलं-मिरची पेस्ट, मीठ- धने-जिरे पूड घालावी. साखर व लिंबू पिळावे. कोथिंबीर बारीक चिरून घालावी व 3-5 मि. परतून छान सारण करून घ्यावे.

    हाताला किंचित तेलाचा हात लावून बटाट्याचा लिंबाएवढा गोळा घ्या त्याची पातळ पुरी करून त्यात 1 ते दीड चमचा सारण घालून पारी बंद करा व गोल व चपटा पेढ्यासारखा आकार द्या व तव्यावर तेल सोडून हे पॅटीस खरपूस भाजून घ्या (बटाटा चिकटू नये म्हणून बारीक रवा वा ब्रेडक्रम्समध्ये हे पॅटीस घोळवून मग ते तव्यावर परतून घ्या वा तेलात तळून घ्या.)

    कोथिंबीर, मिरची व पुदिन्याच्या हिरव्या चटणीबरोबर व टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • p-1145-veg-biryani

    रविवार स्पेशल व्हेज बिर्याणी

    बिर्याणी हा शब्दप्रयोग "बिरियन' या फारसी शब्दावरून आला आहे. त्याचा अर्थ "शिजवण्याआधी परतलेला पदार्थ' असा आहे. पर्शियामध्ये पूर्वीपासून भात करण्याची एक विशिष्ट पद्धत अवलंबली जाई. तांदूळ मिठाच्या पाण्यात भिजवून मग विस्तवावर ठेवले जात. पाण्याला उकळी आली, की ते पाणी काढून टाकून तो तांदूळ वाफेवर शिजवला जाई. यामुळे भात चिकट न होता मऊ व मोकळा होत असे. काही पर्शियन गावांमध्ये बनवली जाणारी बिरियन "दम पुख्त' म्हणून ओळखली जात असे. दम पुख्तचा शब्दश: अर्थ बघितला, तर वाफेवर शिजवलेला असा होतो. नावाचा अर्थ व पदार्थ बनवण्याची पद्धत यावरून बिर्याणीचा उगम पर्शिया म्हणजेच इराणमधला असेल असे मानले जाते. पर्शियन बिर्याणी बनवताना असा भात व मसाल्यात मुरवून शिजवलेले मटण यांचे एकावर एक थर लावले जात. खालचा व सर्वांत वरचा थर भाताचा असे. ते भांडे घट्ट झाकण लावून विस्तवावर ठेवून मंद आचेवर त्याला चांगली वाफ दिली जाई. पर्शियन बिर्याणीत चिकन किंवा मटणाचा लेग पीस वापरला जाई. तो दही, पुदिना, आले, लसूण अशा ताज्या मसाल्यात व किसलेल्या कच्च्या पपईत मुरवून ठेवत. तयार बिर्याणीवर दुधात मिसळलेले केशर घालण्याची पद्धत पर्शियामधलीच. इराणी व्यापारी व पर्यटकांनी या पदार्थाची इतर देशांतील लोकांना ओळख करून दिली.

    बिर्याणी बहुतेक करून मांसहारी असते. क्वचित शाकाहारी ! बिरयानी किवा बिर्याणी ह्या शब्दावरून हा पदार्थ काहीसा इस्लामी, मुसलमान, किवा मोगलाई संस्कृतीचा असावा असे वाटते आणि ते तसे खरेही आहेच. रमजान ईद, बकरी ईद, इत्यादि मुसलमानी सण बिर्याणी शिवाय साजरेच होत नाही. लखनवी मुसलमानांना विविध प्रकारच्या पुलावाचे खूप कौतुक आहे तर कोकणी मुसलमानाच्या जेवणावळी बिर्याणी शिवाय होणारच नाहीत व त्यांना त्यात प्रतीष्ठाही ही वाटते. कोकणी मुसलमान कोलंबी, पापलेट ह्यांची सुद्धा बिर्याणी करतात. बिर्याणी नेहमी वाफेवरच शिजवली जाते. बिर्याणी असलेल्या पातेल्यावर घट्ट झाकण लावले जाते. वरती,कुठूनही वाफ जाऊ नये. म्हणून सर्व बाजूंनी कणिक लावली जाते. ह्यास “दम” देणे असे म्हणतात. अशी दम वर शिजलेली बिर्याणी ८ ते १० तास चांगली गरम राहते. कारण ती मटणाच्या रसातच शिजते. पण एकदा का झाकण काढली कि बिर्याणी “ उतरते “ म्हणजेच बिघडते,नासते. बिर्याणी म्हणजे एक श्रीमंती पदार्थ आहे. त्यात भरपूर तेल ,तूप असते तसेच दुध, केशर, बदाम, बेदाणे,काजू ,पिस्ते वेगवेगळ्या प्रकारचे रंग ,चीज, लोणी, क्रीम, पनीर, तमालपत्र, लवंग, मिरी, दालचिनी वेलची, आले, लसूण, मिरची, कोथिंबीर, साय, साईचे दही, मावा, अंडी, गुलाब जल, केवडा जल इत्यादि उत्तमोत्तम वस्तूंची खैरात असते. त्यात क्वचीत प्रसंगी सोन्या, चांदीच्या वर्खाची शोभाही असते. अगदी त्यांची लयलूट ही असते. बिर्याणी बनविणारे उत्तम उत्तम आचारी असतात व त्यांना खास अशी मागणी असते. या बिर्याणीची मोठा शाहीखाना असतो.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    आंब्याची बिर्याणी
    साहित्य: २०० ग्रॅम कच्ची कैरी (बारीक काप करा), ३०० ग्रॅम आंबा (बारीक फोडी), २ कप तांदूळ (तीस मिनिटं पाण्यात भिजवून ठेवा), दोन छोटे चमचे तूप, केसर (थोडं केसर कोमट पाण्यात भिजवून ठेवा), तीन चमचे पुदिन्याची पानं (बारीक चिरलेली), मीठ चवीनुसार मसाला तयार करण्यासाठीचे

    साहित्य: ४ चमचे खसखस, २ चमचे खरबुजाच्या बिया, २ चमचे तीळ, अर्धा चमचा बडीशेप, १ चमचा जिरं, १ चमचा धणे, ३ हिरव्या मिरच्या.

    कृती : मसाल्यासाठी लागणारे सर्व साहित्य एकत्र वाटून घ्या आणि बाजूला ठेवा. एका कढईत तूप गरम करा. भिजवून-गाळून ठेवलेले तांदूळ त्या तूपावर दोन ते तीन मिनिटं परतावा. कापून ठेवलेल्या कैऱ्या त्यात घालून मिश्रण अलगद हलवा. त्यात तीन कप पाणी घालून भांड झाकून ठेवा. भात अर्धा शिजेल याची काळजी घ्या. चिरून ठेवलेल्या आंब्यांच्या फोडींना तयार केलेला मसाला अलगद लावा. अर्ध्या शिजलेल्या भातावर हे मिश्रण घाला आणि अलगद हलवा. आता त्यात केसर आणि पुदिना घाला. अर्धा कप पाणी घाला. भांड्यावर झाकण ठेवून हे मिश्रण चांगलं शिजू द्या. गरज पडल्यास सिल्व्हर फॉईलने हे भांडं गच्च झाका. भात संपूर्ण शिजल्यावर ५ - १० मिनिटं थांबून मग ते भांडं उघडा, आंबा बिर्याणी तयार.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    शाही व्हेज बिर्याणी
    साहित्य : २५० ग्रॅम बासमती तांदूळ, अर्धी वाटी मटार, अर्धी वाटी फ्लॉवर, पाव वाटी गाजर, पाव वाटी उभी चिरलेली फरसबी, ३ उभे चिरलेले कांदे, १ बटाटा, २ टॉमेटो, दीड टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, २ टेबलस्पून मिरची पावडर, १ टेबलस्पून गरम मसाला, २ टेबलस्पून बिर्याणी मसाला, अर्धा टेबलस्पून हळद, १ चमचा तूप, लाल, हिरवा खाण्याचा रंग, कोथिंबीर, काजू, तेल, चवीनुसार मीठ.

    कृती : प्रथम चिरलेल्या भाज्या व मटार तळून घ्याव्या. नंतर कांदा तळून घ्याव्या. काजू तळून घ्यावे. ३ चमचे तेलात कांदा परतून घ्यावा. त्यात आले-लसूण पेस्ट, बिर्याणी मसाला, गरम मसाला, मिरची पावडर, हळद टाकून एकजीव करावे. बारीक चिरलेला टॉमेटो टाकून तेल सुटेपर्यंत ढवळावे. मग तळलेल्या भाज्या, काजू टाकून दहा मिनिटे वाफवावे. चवीनुसार मीठ घालावे व बारीक चिरलेली कोथिंबीर पसरावी. दुसºया भांड्यामध्ये तयार झालेली भाजी व शिजवलेला भात यांचे दोन थर लावावे. वरून लाल, हिरवा रंग, खरपूस तळून घेतलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर, काजू व तूप पसरवावे. पाच मिनिटे गॅसवर ठेवून वाफ काढावी. गरमागरम बिर्याणी तयार.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

    व्हेजिटेबल बिर्याणी
    साहित्य: १ कप बासमती तांदूळ, २ मध्यम कांदे पातळ उभे चिरून, १/२ कप मटार, ६-७ फ्लॉवरचे तूरे, १/२ कप गाजराचे चौकोनी तुकडे, १/४ कप फरसबीचे तुकडे (आवडत असलेल्या भाज्यांचे तुकडे सुद्धा घालू शकतो), १ कप टॉमेटोची प्युरी (३-४ मोठे टोमॅटो शिजवून त्याची मिकसरमध्ये २-३ टेस्पून पाणी घालून प्युरी करावी. प्युरी नंतर गाळून घ्यावी ), १०-१५ काजू बी, १ टेस्पून लसूण पेस्ट, १ टेस्पून आले पेस्ट, पाव कप घट्ट दही, ३ ते ४ टेस्पून तूप किंवा बटर, १/२ टिस्पून लाल तिखट किंवा चवीनुसार, अख्खे गरम मसाले - १ इंच दालचिनीची काडी, ४-५ लवंगा, २-३ वेलची, ३-४ तमालपत्र, ४-५ काळी मिरी, १ मसाला वेलची, चवीपुरते मीठ, २ चिमटी केशर + २ टेस्पून गरम दुध.

    कृती: एकूण कांद्यापैकी १/२ कांदा तेलामध्ये कुरकुरीत होईस्तोवर तळून घ्यावा. जर ओव्हन असेल तर बेकिंग ट्रेमध्ये अल्यूमिनीयाम फॉईल ठेवावी. त्यात चिरलेल्या कांद्यापैकी निम्मा कांदा त्यावर पसरवा. १-२ टीस्पून तेल कांद्याला हलकेच चोळून घ्यावे. ४०० F ओव्हन गरम करावा. ट्रे मधल्या रॅकवर ठेवावा. मध्येमध्ये ट्रे बाहेर काढून कांदा थोडा परतावा म्हणजे सर्व ठिकाणी नीट शिजेल. कांद्याच्या कडा जर ब्राउन झाल्या कि ओव्हनचे टेम्परेचर २०० F वर ठेवावे आणि कांदा डार्क ब्राउन होईस्तोवर बेक करावा.

    कढईत १ टेस्पून तूप गरम करावे. त्यात काजू तळून घ्यावे. तळलेले काजू बाजूला काढून ठेवावेत. आता सर्व गरम मसाल्याचे साहित्य घालावे आणि काही सेकंद परतावे. उरलेला कांदा घालावा. आले-लसूण पेस्ट घालावी. कांदा थोडा परतून फरसबी, फ्लॉवरचे तूरे, गाजराचे चौकोनी तुकडे, मटार या भाज्या घालाव्यात. तिखट आणि मीठ घालावे. मिठाचे थोडे जास्त घालावे. मध्यम आचेवर ३-४ मिनिटे वाफ काढावी. वाफ काढली कि टॉमेटोची प्युरी घालावी. मध्यम आचेवर टॉमेटोचा कच्चा वास जाईस्तोवर शिजवावे. टॉमेटो शिजला आणि ग्रेव्ही घट्ट झाली नसेल तर ती होण्यासाठी मोठ्या आचेवर उकळी काढावी. मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झाले पाहिजे. कारण नंतर आपण यात दही घालणार आहोत. ग्रेव्ही पातळ राहिल्यास बिर्याणी बनवताना भात ओलसट होतो आणि मग बिर्याणी मोकळी होत नाही. ग्रेव्ही गार झाली कि त्यात घोटलेले दही मिक्स करावे. बासमती तांदूळ पाण्यात धुवून निथळून घ्यावा.

    १५-२० मिनिटे निथळत ठेवावा. नॉनस्टिक पॅनमध्ये १ टेस्पून तूप गरम करून त्यात १-२ लवंगा, १-२ वेलची आणि १ तमालपत्र घालून त्यांचा सुगंध येईस्तोवर परतावे. यात निथळलेळे तांदूळ घालावेत. मिडीयम हाय हिटवर तांदूळ कोरडे होईपर्यंत सतत परतावे. तांदूळ भाजतानाच दुसऱ्या गॅसवर दीड कप पाणी गरम करावे. तांदूळ चांगले परतले गेले कि त्यात गरम पाणी घालावे आणि गॅस मोठा ठेवावा. मीठ घालावे. पाण्याला उकळी फुटेल आणि भाताच्या पृष्ठभागावर पाणी दिसायचे बंद होईल. या पॉइंटला आच एकदम कमी करावी आणि वर झाकण ठेवावे. मंद आचेवर भात शिजू द्यावा. भात शिजला कि हलकेच एका परातीत काढून ठेवावा आणि हवेवर गार होवू द्यावा. लगेच वापरायचा असल्यास ३-४ मिनिटे फ्रीजरमध्ये ठेवावा.

    बिर्याणी बनवण्यासाठी शक्यतो खोलगट नॉनस्टिक पातेले घ्यावा. तळाला आधी तूप पसरवून घ्यावे. त्यावर एकूण भातापैकी १/४ भाग भात समान पसरवा. त्यावर तळलेल्या कांद्यापैकी थोडा कांदा, थोडे काजू आणि त्यावर थोडी ग्रेव्ही पसरावी. याच प्रकारे ३-४ थर बनवावे. प्रत्येक थरामध्ये चमचाभर तूप घातले तरी चालेल. सर्वात वरचा थर भाताचा असावा त्यावर दुधात कालवलेले केशर, काजू आणि तळलेला कांदा घालून भांड्यावर घट्ट झाकण ठेवावे. मंद आचेवर बिर्याणीला किमान २० मिनिटे तरी वाफ काढावी. बिर्याणी तयार झाली कि गॅस बंद करून झाकण काढावे आणि हलकेच बिर्याणी मिक्स करावी. मिक्स करून थोडावेळ परत नुसतीच झाकून मुरू द्यावी. गरम बिर्याणी काकडी-कांदा-टॉमेटोच्या रायत्याबरोबर सर्व्ह करावे.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • रतलामी शेव

    साहित्य:- २ कप बेसन, २ टी स्पून लाल मिरची पावडर, ७-८ मिरे, १/२ टी स्पून ओवा, १/४ टी स्पून जिरे, १/२ टी स्पून बडीशेप, १” दालचीनी तुकडा, २ लवंग, १ टी स्पून सुंठ पावडर, १/४ टी स्पून हिंग १/४ टी स्पून शेंदेलोण मीठ, १/४ कप तेल (गरम), एक चिमुट सोडा, १ टे स्पून लिंबूरस, मीठ चवीनुसार, तेल शेव तळण्यासाठी.

    कृती:- तवा गरम करून त्यावर मिरे, ओवा, जिरे, बडीशेप, दालचीनी, लवंग थोडेसे गरम करून घेऊन मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर वाटुन घ्या. एका परातीत बेसन, लाल मिरची पावडर, हिंग, मीठ, शेंदेलोण मीठ, घालून चाळून घ्या. मग चाळलेल्या पीठामध्ये कडकडीत तेलाचे मोहन घाला. मिक्स करून वाटलेली मसाला पावडर, सुंठ पावडर, सोडा, लिंबूरस घालून मिक्स करून पाणी वापरून शेवेचे पीठ मळून घ्या. कढईमधे तेल गरम करून घ्या. मग सोरयामध्ये पीठ भरून थोडी मोठ्या भोकाची चकती लाऊन गरम तेलामध्ये शेव घाला. शेव दोनी बाजूनी मंद विस्तवावर तळून घ्या. तळलेली शेव पेपरवर ठेवून थंड झाल्यावर भरून ठेवा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३

  • p-65-surlichya-vadya-300

    सुरळीच्या पाटवड्या

    जाड बुडाच्या पातेल्यात डाळीचे पीठ, ताक, पाणी, तिखट, मीठ, हिंग, हळद घालुन मिश्रण सारखे करावे. गुठळी राहु देऊ नये. नंतर हे पातेले गॅसवर ठेवून मिश्रण डावेने ढवळत रहावे. खाली लागू देऊ नये. मिश्रण दाटसर होत आले की झाकण ठेवून वाफ आणावी. वरील पातेल्यातील १/४ चमचा मिश्रण एका स्टीलच्या थाळीला पसरुन लावून पहावे.

    गार झाल्यावर जर ते उचलले तर चटकन निघाले पाहिजे. ही मिश्रण शिजल्याची खूण आहे. जर असे चटकन निघाले नाही तर पुन्हा एक वाफ आणावी. नंतर मंद गॅसवर मिश्रण ठेवून द्यावे.

  • हादग्याच्या पानाची भजी

    साहित्य:- अगस्ताची कोवळी पानं, फुलांच्या पाकळय़ा, हरभऱ्याचं भाजलेलं पीठ, लाल तिखट, हळद, धणेपूड, ओवा, हिंग. भजी तळण्यासाठी तेल.

    कृती:- अगस्ताची कोवळी पानं आणि फुलांच्या पाकळय़ा निवडून स्वच्छ धुऊन, चिरून त्यांना मीठ लावून ठेवावं. मीठ लावल्यावर पंधरा मिनिटांनी त्यात लाल तिखट, हळद, धणेपूड, ओवा, हिंग असं साहित्य घालावं. नंतर त्यात मावेल इतकंच पीठ घालावं. पानांना आणि फुलांना सुटलेल्या पाण्यातच पीठ कालवावं. गरज पडेल तर पुन्हा एकदा लाल तिखट अॅडड करावं. मिश्रण एकत्र करून लहान गोळे करून तेलात तळावेत.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३

  • p-1175-chakli

    दिवाळी फराळातील एक महत्वाचा पदार्थ चकली

    (चकलीची भाजणीचे प्रमाण हे एक जनरल कृती दिली आहे.आपले सभासद सुगरण आहेत.आपल्या चवी प्रमाणे थोडे बदल करुन घ्यावेत.)
    चकली म्हणजे महाराष्ट्रातील सगळ्यात प्रसिद्ध आणि सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे. दिवाळी ला तर हमखास सगळ्यांच्या घरी चकली केली जाते.
    चकली भाजणी पद्धत १
    साहित्य:- भाजणीसाठी एक किलो तांदूळ, अर्धा किलो मूगडाळ, पाव किलो उडीद डाळ व पाव किलो हरबरा डाळ, धने १०० ग्रॅम, २५ ग्रॅ. जिरे.
    कृती-तांदूळ धुवून घ्यावे. सुकल्यावर गुलाबी रंगावर भाजावे. त्याचा रूचकर वास यावा. तसेच डाळी स्वतंत्र भाजून घ्याव्यात. त्यात धने १०० ग्रॅम, २५ ग्रॅ. जिरे खमंग भाजून मिसळावे. अशी एकत्रित भाजणी दळून आणावी.
    चकली भाजणी पद्धत २
    साहित्य- ४ वाटय़ा तांदूळ, २ वाटय़ा हरभरा डाळ, १ वाटी उडीद डाळ, अर्धा वाटी धने, पाव वाटी जिरे, कृती- धान्ये धुवून भाजावी. त्यात धने, जिरेही घालावे. गार झाल्यावर भाजणी दळून आणावी.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३
    चकलीचे प्रकार
    चकली
    साहित्य:- ५ भांडी चकलीची भाजणी, ३ भांडी पाणी, ५ टीस्पून घरचं लोणी किंवा तेल, २-३ टीस्पून लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, २ टेबलस्पून तीळ, १-२ टीस्पून ओवा, मीठ चवीनुसार. तळण्यासाठी तेल.
    कृती:- एका मोठ्या पातेल्यात पाणी उकळायला ठेवा. पाण्याला खळखळून उकळी आली की त्यात लोणी किंवा तेल, तिखट, मीठ, हळद, तीळ आणि ओवा घाला. गॅस बंद करा. आता त्यात भाजणी घाला आणि चमच्यानं एकत्र करून घ्या. गरम असताना नीट एकत्र होणार नाही तेव्हा जसं जमेल तसं एकत्र करा. झाकून ठेवून द्या. २-३ तासांनी किंवा पीठ थंड झाल्यावर ते परातीत काढून घ्या. चांगलं मळून घ्या. मळताना लागेल तसं साधं पाणी घाला. चकलीचं पीठ भाकरीच्या पिठापेक्षा जरासं घट्ट हवं.
    मळलेलं पीठ चकलीच्या सो-यात घाला. चकल्या पाडा. कढईत तेल कडकडीत गरम करा. नंतर आच मध्यम ठेवा. चकल्या लाल रंगावर तळा. तेलाचं तापमान सतत एकसारखं राह्यला हवं. म्हणून तेल जरा थंड झालंय असं वाटलं तर आच वाढवा. पण गरम झाल्यावर परत मध्यम ठेवा. चकल्या फार लाल करू नका.
    टिप्स:-चकल्यांना हळद कमीच घालावी म्हणजे रंग छान येतो. मसाल्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी-जास्त करा.
    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०१७३३