धडाडणाऱ्या तोफेवरुनी मिठमोहरी उतरते
दृष्ट न लागो सैनिक शौर्या हेच मी मागते //धृ//
गेला विसरुनी सगेसोयरे
भाऊ बहीण आईबाप बिचारे
ह्रदयावरी ठेवून अंगारे
दृष्टी दूर सारी प्रेमळ नाते //१//
दृष्ट न लागो सैनिक शौर्या हेच मी मागते
डोळ्यामध्यें अंजन घालूनी
रक्षण करीतो रात्रंदिनी
लक्ष तयाचे इतर जीवनीं
तोड नसे ह्या त्याग वृत्तीते //२//
दृष्ट न लागो सैनिक शौर्या हेच मी मागते
संकट जेंव्हा अवचित येई
शत्रुवरी तो तुटून जाई
प्रसंग पडता प्राणही देई
शिंपडूनी रक्ताचे ते सडे //३//
दृष्ट न लागो सैनिक शौर्या हेच मी मागते
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जळत होती मेणबत्ती, मंद मंद प्रकाश देवूनी ।
अंधकार भयाण असतां, भोवताली उजेड पाडूनी...१,
बुडत्यासाठी काडीचा आधार, अंधारी भासली तशी प्रकाशीं ।
असूनी ज्योत मिणमिणती, त्या क्षणी वाटला सूर्य आकाशी....२,
वाटत नाहीं मूल्य कुणाला, भरपूर पडल्या प्रकाशाचे ।
मेणबत्तीची ज्योत शिकवी, साधे तत्त्व जीवनाचे....३
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
दिवाळीच्या पदार्थात आधी गोडात हात जाणारे साधारण तुल ,धनु राशीचे .
चकलीवाले मेष,वृश्चिक,सिंह
आधी चहाचा घोट घेणारे कर्क राशीचे
वृषभ प्रत्येकाची थोडी थोडी चव घेतील
मिथुन वाले चिवड्यातील काजू ,शेंगदाणे हळूच फस्त करतील .
कन्यावाले आधी थोडा क्यालरीचा विचार करतील .
मकरवाले चिवडा घेतील पण नेमका पहिलाच दाणा यांना कुजका मिळतो !
कुंभवाले लाडू हवा असताना अनवधानाने कडबोळ चावायला सुरवात करतील .
मीनवाले कायम गोंधळात, यांचा नक्की काय घ्यायचं हे ठरेपर्यंत मेषेच्या चार चकल्या फस्त झालेल्या असतात !
चिंव चिंव करुं नकोस चिमणे, बाळ माझे झोपले
काय हवे तुज सांग मला ग, देईन मी सगळे
कपाट सारे उघडून ठेवले, समोर ओट्यावरी
मेवा समजून लुटून न्यावे, डाळ दाणे पोटभरी
घरटी बांध तूं माळ्यावरती, काडी गवत आणूनी
कचरा म्हणूनी काढणार नाही, ही घे माझी वाणी
नाचून बागडून खेळ येथे, निर्भय आनंदानें
परि शांत न बसलीस तूं तर, जागेल बाळ तान्हें
चिंव चिंव करणे गीत आहे कां ? अंगाई तुमची
गावूनी आपल्या पिल्ला करीतां रमवी मने त्यांची
असे असेल तर चालू ठेव तूं चिंव चिंव ते गाणें
शाहणा माझा बाळ तो ठावे त्याला सोसणे
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
कुणी तरी असावं...
हाकं मारताच परत येणारं
डोळे पुसायला कणीतरी असेल तर ,
रुसायला बरं वाटतं .......
ऐकायला कुणी असेल तर ,
मनातलं बोलायला बरं वाटतं.....
कौतुक करणारं कुणी असेल तर ,
थकेपर्यंत राबायला बरं वाटतं......
नजर काढणारं कुणी असेल तर ,
नटुन मुरडायला बरं वाटतं.....
आशेला लावणारा कुणी असेल तर,
वाटं बघायला बरं वाटतं...
आपल्यावर जीव ओवाळणारं असंल तर,
मरेपर्यंत जगायला बरं वाटतं......
- दिप....
बरसता श्रावणसरी,मन पाखरून जाई,
ओली ओली हिरवळ,मन हारकुन जाई.
आला श्रावण घेऊन,सखे घन काळेभोरं,
त्यांनी बरसुन गेले,देले सुखाचे आंधनं.
आंधनात तिलं आलं,नच पाणी ते जिवनं,
धरू घटाघटा पिई,मिटे व्याकुळ तहानं.
पशु-पक्षी,झाडं वेली,डौल डौलती डौलातं,
नक्षी शोभे फुलं वेलं,शोभे कोंदनं गोंदनं.
लेणं आहेव हिरवं,काळी करे हिरवा तालं
तिचा आहेव शृंगार,भाळी शोभे फुल लालं.
आहेव काळी धरूमायं,तिनं लेला हिरवा चुडा,
ओटी पाण्यानं भरली,फुटे काळी पोटी खडा.
खळखळ पाणी वाहे,वाहती नदी,नाले,पाटं
कोकीळ झाडावुनं गायी,राग निसर्गाचा थाटं.
वसुमायच्या सासरी,बरसले माहेरचे घनं,
अवघी श्रुष्टी महकली,आले आंनंदा उधानं.
वसु मायचा संसार,उनं पावसाचा कहर,
कधी रापतं भिजतं,ओढी नेटानं संसार..!!!
©गोडाती बबनराव काळे
9405807079
कष्ट करुनी घाम गाळीतो,
शेतामध्यें शेतकरी,
समाधानाने मिळते तेंव्हा,
त्यास एक भाकरी ।।१।।
त्याच भाकरीसाठी धडपडे,
नोकर चाकर,
कष्टामधूनच जीवन होते,
तसेच साकार ।।२।।
कष्ट पडती साऱ्यांना,
करण्या जीवन यशदायी,
विद्यार्थी वा शिक्षक असो,
अथवा आमची आई ।।३।।
अभ्यासातील एकाग्रता,
यास लागते कष्ट महान,
त्या कष्टाचे मोल मिळूनी,
यशस्वी होईल जीवन ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कशांत दडले समाधान ते,
शोधत असतो सदैव आम्ही,
धडपड सारी व्यर्थ होऊनी,
प्रयत्न ठरती कुचकामी ।।१।।
बाह्य जगातील वस्तू पासूनी,
देह मिळवितो सदैव सुख,
क्षणीकतेच्या गुणधर्माने,
निराशपणाचे राहते दुःख ।।२।।
'समाधान' ही वृत्ती असूनी,
सुख दुःखातही दिसून येती,
चित्त तुमचे जागृत असतां,
समाधान ते सदैव मिळते ।।३।।
सावधतेने प्रसंग टिपता,
समाधान ते येईल हाती,
सुख दुःखाला दूर सारता,
अंतरभागी समाधान दिसती ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti