(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • तुला पाहताना

    मित्रांनो, "तुला पाहताना " ही मराठी प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे.
    मराठी कविता आवडली तर share करायला विसरू नका.
    "माझी डायरी " या आपल्या youtube चॅनलला अवश्य Subscribe करा.
    "माझी डायरी" आपल्यासाठी आणखी नव्या कविता-गझल-कथा घेऊन येत आहे.

    https://youtu.be/UpXfirUuSHE

  • ओंजळीतली फुले

    कधीतरी दे तुझ्या ओंजळीतली फुले,
    सुगंधाने भरू दे माझ्या अंगणातले झुले
    कधीतरी ये वावटळीच्या वाऱ्याला घेऊन,
    उधळून दे मनातले सगळे पाश सारे तोडून
    कधीतरी ये चिंब ओली बनून माती,
    जीव तळमळेल फक्त त्या वेड्या सुंगंधासाठी
    कधीतरी दे तुझ्या मनातले थोडे जग,
    व्यापून उरेन इतका, कधी देऊन तर बघ...

    -- वर्षा कदम.

  • चंदाराणी

    १९४७ साली एक बालक जन्माला आले
    माय-पित्यांनी त्याचे नाव चंदाराणी ठेवले
    त्याच वेळी मी बिगर राज्याची राणी झाले

    नेहमीच विजय तर कधीतरी हार झाली
    आणि त्या हारेलाच एक वेगळी धार आली
    आयुष्याच्या सुखदु:खांशी मर्दानीपने लढली

    संकटाच्या सार्‍या थव्यांनी आता माघार घेतली
    स्त्री म्हणून सारे चटके मी एकटीनेच घेतले
    या सार्‍या चोथ्याचे राज्य माझे असेच उभे राहिले

    शेवटच्या घटकेला माझे मलाच उमगले
    कुठले राज्य - कुठली राणी.. हे तर अळवावरचे पाणी होते
    येणार्‍या काळाचे मी एक छोटे सावज होते....

    - चंदाराणी कोंडाळकर

  • प्रेम

    कुणीतरी आवडणे हे प्रेम नाही,
    त्याच्याशिवाय दुसरं कोणीच न आवडणे हेच खरं प्रेम आहे.

    नुसत्या नजरा भिडल्या म्हणून प्रेम होत नाही,
    मनाने मनाला अलगद स्पर्श केला की प्रेम फुलतं.

    रोज हजारो चेहरे समोरून जातात,
    पण एकच चेहरा डोळ्यांत कायमचा विसावतो.

    असंख्य आवाज कानावर येतात,
    पण एकाच हाकेने हृदय धडधडू लागतं.

    अंतर कितीही वाढलं तरी,
    आठवणींचा धागा कधी तुटत नाही.
    वेळ कितीही बदलली तरी,
    मनातील ओढ कधी कमी होत नाही.

    रागातही काळजी असते,
    अबोलपणातही प्रेम दडलं असतं.
    स्वार्थाच्या पलीकडे जपणं,
    प्रत्येक दुःखात खंबीरपणे सोबत उभं राहणं,
    आणि प्रत्येक श्वासात तिची चाहूल लागणं,
    यालाच खरं प्रेम म्हणतात.

    कारण...

    प्रेम म्हणजे फक्त "मी तुझ्यावर प्रेम करतो" एवढंच नसतं,
    प्रेम म्हणजे "तू आनंदी असावीस" ही मनापासूनची प्रार्थना असते.

    म्हणूनच...

    कुणीतरी आवडणे हे प्रेम नाही,
    त्याच्याशिवाय दुसरं कोणीच न आवडणे हेच खरं प्रेम आहे.

    •ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
    मो:- 9011841212

  • प्रभू दर्शन

    महिमा कसा प्रभू तुझा आगळा,
    पावन करसी तूं भक्ताला,
    नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला ।।धृ।।

    पुंडलीकाची महान भक्ती,
    माता पित्याचे चरणी होती,
    त्याची सेवा तुजसी खेचती,
    कसा उकलू मी ह्या कोड्याला, ।।१।।
    नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला

    पातिव्रत्य हे दैवत समजूनी,
    पतिसेवेला घेई वाहुनी,
    सावित्रीने दिले दाखवूनी,
    प्रभू वाकती सती शब्दाला, ।।२।।
    नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला

    कांहीं करीती सेवा गुरुची,
    मानव सेवा हीच कुणाची,
    शक्ती वाढवूनी सत्कर्माची,
    पात्र ठरती प्रभू दर्शनाला, ।।३।।
    नाम न घेतां तुझे मुखी, परि भक्त सख्याला भेटून गेला

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • व्योमातुन अवतरला गजमुख

    अंतराळ-यायित्राकासारखा धारुन गणवेश
    व्योमातुन अवतरला गजमुख, देव-गणाधीश ।। १

    सोंडेसम भासतो मुखवटा, ‘प्राणवायु’ पुरवी
    संरक्षक अवकाश-कवच त्या तुंदिलतनु बनवी
    ध्वनिसंवर्धक मुखाजवळ, जणुं हस्तिदंत एक
    शूर्पकर्णसम बशीमधे केंद्रित ध्वनि प्रत्येक
    अश्वहीन रथ मूषक भासे, पुच्छ धूम्ररेष ।।
    व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। २

    प्रकाशगतिनें कुठून आला लक्ष-लोक लांघुनी
    भूवर कधि, कितिदा अवतरला, नच जाणे कोणी
    कोटिकोटि मानव-जन्मांच्या पल्याड कर्तृत्व
    मर्त्य जगाला कालातीतच वाटे अस्तित्व
    निरर्थ भूत-भविष्या करतो, अवकाशा दास ।।
    व्योमातुन अवतरला गजमुख देव-गणाधीश ।। ३

    – सुभाष स. नाईक.

    Subhash S. Naik

  • अंबेस दाखवी काव्य

    पाटीवरती अंक लिहीले, बागडूं लागला आनंदाने

    पित्याचे ते लक्ष वेधण्या, हनुवटी खेची तो हातानें....१,

    प्रथमापासूनी लक्ष पित्याचे, होते अवखळपणाकडे

    अजाणपणा तो दाखवोनी, दुर्लक्ष करी तो मुलाकडे...२,

    शब्दांची ती गुंफन करूनी, कवितेचा तो संग्रह केला

    तोच संग्रह घेवून चाललो, दाखविण्या माहूरी रेणूकेला...३,

    जगदंबा ही आदी शक्ती, सारे तिजला ज्ञात असते

    अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते...४,

    पाटीवरले अंक बघूनी, हृदय पित्याचे गहीवरले

    रेणूका तर जननी विश्वाची, भाव मनीचे आधीच कळले...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • गाण्याच्या कलेची किंमत

    एक भिकारीण तालावरती, गात होती गाणे
    पुढे करुनी एक हात, आळवित होती भजने

    तंद्रित होती गाण्याच्या, एकाग्र चित्त करुनी
    कसा मिळेल आनंद इतरां, हीच काळजी मनीं

    मिळेल ते धन हाती घेऊनी, गेली ती परत
    निराश न होता हास्य मुखाने, आशीर्वाद देत

    भिक नव्हती तिने जमविली, ती तर कदर कलेची
    आनंद मिळे इतरांना, हीच पावती समाधानाचीं

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    Bknagapurkar”gmail.com

  • वारूळ…

    रच रचले वारूळ,
    कण मातीचे येचुन,
    मुंगी संसार थाटते,
    मुंगोबाच्या संगतीनं....!

    मुंग्या कामावरं जाती,
    शिस्तीत परेड काढती,
    वरसाचा अन्नसाठा,
    कण कणं साठवती.

    राणी मुंगीच शासन,
    गजबजेल वारूळं,
    प्रजा सैन्य नी कामगार,
    राणी करते संभाळ.

    तिचा ईलुसाच जिव,
    ईलुसे वारूळाचे जग,
    उन,पाऊस नि वादळं,
    त्यातही धरीते ती तग.

    आपत्ती येती आणि जाती,
    कित्येक सभ्यता संपविती,
    लाखो सालाची सभ्यता,
    वारूळ अखंड जगवीती...!

    @गोडाती बबनराव काळे लातुर
    9405807079

    ...

  • न्याय देवते

    कुठे तु गेलीस न्याय देवते,

    जगास सोडूनी याच क्षणी ।

    अन्यायाची कशी मिळेल मग,

    दाद आम्हाला या जीवनी ।। १ ।।

    परिस्थितीचे पडता फेरे,

    गोंधळूनी गेलीस आज खरी ।

    उघड्या नजरे बघत होती,

    सत्य लपवितो कुणीतरी ।।२।।

    दबाव येता चोहबाजूनी,

    मुस्कटदाबी होती कशी ।

    शब्दांना परि ध्वनी न मिळता,

    मनी विरताती, येती जशी ।।३।।

    बळी कुणाच्या पडली तू गे,

    मार्ग रोखीले तुझे कसे ते ।

    अपयश येता सत्यालाही,

    म्हणू कसा तूज ‘न्याय देवते’ ।।४।।

    आज न आले यश जरी,

    न्याय येईल उफाळूनी ।

    अंतिम विजय हा सत्याचा,

    जाणीव आहे ह्याची मनी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com