आजकाल generation gap जरा कमी झालाय
कालचे अहो बाबा आजचा अरे बाबा झालाय ...
कालचे बाबा रागावणारे guardian असायचे
आज काल समजावणारा friend झालाय
बाबा काल घरातला पोलीस असायचे
आज partner इन crime झालाय
कालचे बाबा शाळेत यायचे तर धडकी भरायची
आज स्कूल मध्ये जाताना hi फाईव्ह देताय
कालचे बाबा हळदीच्या दुधासाठी रागवायचे
आजचा बाबा कोल्ड ड्रिंक share करता झालाय
आजारी मुलीसाठी काल पण
बाबा ३ वेळा फोन करायचेच
आजचा बाबा मीटिंग्स cancel करायला शिकलाय
कालचे बाबा मुलाच्या लग्नानंतर
देव दर्शनाची तयारी करायचे
आज बाबाने मुलासाठी हनिमून package बुक केलाय
काळ बदलतोच पण नातं नाही बदलत
बाबांच्या कठोर वागण्यात काल पण प्रेम दिसायचं
आजचा बाबाही नकळतच जरा जास्त हळवा झालाय
बाबा कालही हिरो होते आजही आहेच
कालपण बाबा great च होते
आजचा बाबा मात्र favourite झालाय ....!!!
-- सौजन्य : अारती गोसावी
निसर्गाचा मानवाशी संघर्ष,
प्राणीमात्रांचा मनुष्याशी संघर्ष !
जीवन जगणे म्हणजेच संघर्ष,
जगण्यातील अर्थ म्हणजेच संघर्ष !
संघर्षाची काही ठोस व्याख्या नाही,
कलियुगात माणसाला संघर्षाशिवाय पर्याय नाही,
संघार्षावाचून माणसाला जगणे शक्य नाही !
संघर्ष जगण्याची आशा दाखवतो,
जीवनातील संघर्षात माणूस शहाणा होतो !
संघर्षात जीवन तावून सुलाखून निघते,
आणि सोन्यासारखे स्वच्छ होते !
संघर्ष म्हणजे स्पर्धा,
स्पर्धा म्हणजेच संघर्ष !
संघर्ष नसेल तर माणसाची प्रगती खुंटेल,
संघर्ष करतांना माणसाला
जीवन जगण्याचा खरा अर्थ कळतो,
अडचणींवर मात करण्यास संघर्षच उपयोगी पडतो,
जीवन जगण्यासाठी संघर्ष हा करावाच लागतो !
जगदीश पटवर्धन
धागा धागा विणून, केली तयार जाळी
गोल आणि बहुकोनी घरे, पडली निर निराळी....१,
स्थिर सुबक घरे, जसा स्थितप्रज्ञ वाटे
सर्व दिशांचा तणाव, न दिसे कुणा कोठे....२,
तुटेल फूटेल तरी, सैलपणा येणे नाही
जर ढिला झालाच तर, जाळी दिसणार नाही....३,
जगे तो अभिमानानें, मान ठेवूनीया ताठ
संसारामधील क्लेश, झेलीत होती त्याची पाठ....४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
वाटत होता शांत मला तो, बघुनी त्याच्या हालचालींना
शिस्तबद्ध ते जीवन असूनी, हास्य उमलते त्याच्या मना....१,
अल्प बोलणें अल्प चालणें, आहार तोहीं अल्पची घेणे
प्रभू नाम ते मुखी असूनी, चिंतन त्याचे सतत करणे....२,
संघर्षाला टाळीत होता, परिस्थितीशी जुळते घेवूनी
वातावरण ते शांत ठेवण्या, प्रयत्न चाले लक्ष देवूनी...३,
अहंकार तो सुप्त असूनी, राग न दाखवी चेहऱ्यावरी
जगण्याचे ते प्रेम बघूनी, मोहाचे वेष्ठन दिसे शरिरी...४,
दाबता साऱ्या षढरिपूंना, बेगडी शांतता बाह्य दिसे
जिंकती त्यांनाच सहजपणे, खरी शांतता चित्तीं वसे...५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
जो तो आपल्या कामात…..
विश्वामित्राची देणगी छम छम बाजे पैंजण माझे मी अप्सरा स्वर्गाची देवलोकींच्या राज्याची ।। धृ ।।
पिंपात मेले ओले उंदीर त्यांचे जहर कडू पिऊन होतील
आत्मे ज्यांचे स्तब्ध शांत मडू ।।१।।
अशाच भाही लहरी येती लहरी घुमून जाती
अशाच काही काव्यकल्पना जीवा घेरुन जाती ।।२।।
परंतु राही अमर जगामधी गाथा तुकारामाची आणि स्मरती
अभंगवाणी नाम्या ऐक्याची ।।३।।
अजुन ऐकवी कुणी वैराणी वाणी मिरेची
ज्ञानदेव तो अमृत पाजी बोधसत्व यासी ।।४।।
--- द्वारकानाथ शंकर (जयंत) वैद्य
दोन थेंब गंगाजळ
मृत्युच्या दारी
स्वर्गाचे तिकीट
रोज पी गंगाजळ
त्वरित मिळेल
स्वर्गाचे तिकीट.
टीप: सरळ नदीचे जीवघेण्या रसायन युक्त प्रदूषित पाणी पिल्यावर विभिन्न रोगराई होऊन माणूस शीघ्र स्वर्गात जाईल.
मी अगदी साधा सामान्य माणूस. आम आदमी कुठच्याही बडेजावाला बुजणारा. आयुष्यातील कृत्रीमता, बेगडीपणा टाकणारा जरा वेगळाच प्राणी! जीवनाचा नैसर्गिक निखळ आनंद, आस्वाद घेण्याची स्वाभाविक ओढ.
शब्दभावनांची जुगलबंदी
Copyright © 2025 | Marathisrushti