(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • गिरनार यात्रा (भाग – ३)

    6000 पायऱ्यांवर गोरक्षनाथ शिखर!! तिथे गोरक्ष नाथांनी घोर तपश्चर्या केली होती.  त्यांना दत्तगुरुनी प्रसन्न होऊन दर्शन दिले होते. तेंव्हा त्यांनी ‘मला तुमच्या चरण कमालांचे सतत दर्शन होवो’ अशी विनंती केली. तेंव्हापासून गोरक्षनाथचे स्थान वरती आणि त्याच्या थोडे खाली दत्तगुरु चे स्थान आहे.

  • काळ्याशार तमांमध्ये

    काळ्याशार तमांमध्ये,
    पाणीही बनते कुट्ट काळे,
    रंग खेळती मजेत तिथे,
    पंचमीची क्रीडा चाले,--

    पिवळसर, सोनेरी, हिरवटसे,
    विचरती पाण्यात रांगेने,
    बिंदू सारे प्रतिबिंबित कसे,
    पाहती डोकावून,उत्कंठेने,--!!!

    वाकून खाली सगळे जरासे,---
    प्रतिमा आपुलीच न्याहळत,
    घेती धडे एकरुपतेचे,--,
    पुढे पुढे सरकत,सरकत,
    एक दुसऱ्यात असा मिसळे,
    एकत्रीकरण जणू कंगोऱ्यांचे,--!!!

    विविधरंगी त्यांची दुनिया,
    मूळ रंग मात्र एकच असे, विविधतेतून एकता ना,
    सर्वकाळी त्यांच्यात दिसे,--!!!

    मोहक सुंदर जे अतुलनीय,
    बघणारा पाहत राहे, ---
    सौंदर्याची दिसता,खाण
    निसर्ग अशीच लयलूट करे,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • स्वप्नातली अपूरी इच्छा

    दुपारचे भोजन करूनी, आडवा झालो थोडासा
    झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा....१,

    वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे
    स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे.....२,

    पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा
    घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा....३,

    खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी
    खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी....४,

    आई नको, परि तुम्हीच या, माझी शाळा सुटताना
    टाटा करित गोड वदलि, शाळेमध्ये शिरताना....५,

    येत असता घरि परत, दुकानी एका शिरलो
    बराच खावू आणि खेळणी, घेवूनी मी परतलो....६,

    उत्सुकतेने बघत असता, कुणीतरी हालविले
    हाय वेड्या ! हे तर स्वप्न, तिनेच जे तोडले.....७,

    क्षणभर आवक् झालो मनी, स्वप्न भंग पावतां
    खंत वाटली उगाच एक, अपूरी इच्छा राहतां....८

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कुमार गंधर्व

    कुमार गंधर्व म्हटलं की मला हेरॅक्लिटसची आठवण यायची. ”तुम्ही एकाच नदीत पुन्हा पुन्हा पाऊल टाकूच शकत नाही; तुम्ही एकदा पाऊल टाकलं की पुन्हा पाऊल टाकेपर्यंत तिचं स्वरुप बदललेलं असतं” असं हेरॅक्लिटस म्हणे. कुमारांचं तसंच काहीसं होतं. त्यांचा एकदा बागेश्री ऐकला की पुन्हा तो तसाच यायचा नाही. अगदी तीच बंदिश असली तरी! ”टेसूल बन फुले, रंग छाये, भंवर रस लेत फिरत मद भरे” ही कुमारांची बंदिश मी प्रत्यक्ष मैफिलीत कितीतरी वेळा ऐकली असेल.

  • निसर्गाचे ऋतू सहा

    निसर्गाचे
    ऋतू सहा
    हे सोहळे
    आता पहा

    वसंतात
    हा बहर
    सृष्टी फुले
    ही लहर

    ग्रीष्म ऋतू
    त्रासदाई
    दाहकता
    फार बाई

    गेला ग्रीष्म
    वर्षा आली
    ही अवनी
    पाचू ल्याली

    पानगळ
    शरदात
    मजा येई
    चांदण्यात

    थंडी पडे
    हेमंतात
    उब मिळे
    शेकोटीत

    हा गारठा
    असह्य ही
    शिशिराची
    वाट पाही

    ऋतूचक्र
    फिरते हे
    आवडीचे
    सर्वांचे हे

    सौ.माणिक (रुबी)

  • मी स्वतः ला शोधत असतो

    कविता तीही लिहित असते
    कविता मीही लिहित असतो
    ती चंद्र- चांदण्यांची बात करते
    मी स्वतः ला शोधत असतो

    ती जर चंद्र - चांदण्यांतून हटली
    मी जर स्वत:मधून निघालो
    तर तिला मी दिसेल आणि मला ती

    त्यानंतर दोघांच्याही भावना
    उलगडत जातील एकमेकांना
    जे कधीच आजपर्यंत दोघांकडूनही
    बोललं गेलं नाही

    जे तिच्याही मौनप्रेमातून हरवलं
    जे माझ्याही निशब्दतेतून निसटलं
    मग तिचंही प्रेम लख्ख उजळेल
    माझाही प्रेमदीप प्रकाश देईल

    नंतर काय सांगू मी आता
    ती माझी होईल
    अन् मी तिचा होईल

    - ऋषिकेश तेलंगे
    https://www.facebook.com/rushikesh.telange.9

  • वर्षाचे भगिनी प्रेम

    तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला

    प्रफुल्लतेचे झरे फुटती, आंतूनी त्या मातीला.....१,

    जलमय होती नदी नाले, दुथडी भरूनी वाहती

    धबधब्यातील खरी शोभा, वर्षामुळेंच दिसती...२,

    हिरव्या रंगीं शाल पसरते, धरणी माते वरी

    ऊब यावी म्हणून मेघांचे, आच्छादन ती करी....३,

    वर्षा धरती बहिणी असूनी, प्रभूची भावंडे

    उचंबळूनी प्रेम येतां, धावून येते तिजकडे....७

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • रामाची व्याकूळता

    सीतेकरीता व्याकुळ झाला

    अवतारी चक्रपाणी,

    अजब ही रामप्रभू कहाणी ।।धृ।।

    पत्नीहट्ट त्याला सांगे,

    कांचनमृग शोभेल अंगे,

    मृगयेच्या तो गेला मागे

    प्रसंग घेई रावण साधूनी ।।१।।

    अजब ही रामप्रभू कहाणी

    रावण नेई पळवूनी सीता

    दिसेना रामा कोठे आता

    तरुवेलींना पुसत होता

    वाहत होते अश्रू नयनीं ।।२।।

    अजब ही रामप्रभू कहाणी

    वाणी ज्याच्या शक्ती शिवाची

    ह्रदयामाजी दया सागराची

    त्यालाही दिसे नियती खेची

    सामान्यतेच्या मापी तोलूनी ।।३।।

    अजब ही रामप्रभू कहाणी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • गृहनिर्माण संस्था आणि लेखापरीक्षण

    राज्यातील सर्व गृहनिर्माण संस्थांचे प्रतिवर्ष लेखापरीक्षण होणे आवश्यक आहे. तरीही अनेक गृहनिर्माण संस्था लेखापरीक्षण करण्यास टाळाटाळ करतात. ३१ जुलै आधी संस्थेचे पदाधिकारी यांनी गृहनिर्माण संस्थेचे लेखापरीक्षण करणे बंधनकारक आहे. सदर पूर्तता करण्यात निष्काळजीपणा केल्यास अन्यथा ठोस कारण नसल्यास संस्थेचे नोंदणी सुद्धा रद्द होऊ शकते. तसेच लेखापरीक्षण झालेल्या संस्थांनी, दुरुस्त अहवाल ३ महिन्यात दोष पूर्तता करून वैधानिक लेखापारीक्षाकाकडे न पाठविल्यास तसेच लेखापरीक्षण अहवाल सहकार विभागाच्या वेबसाईटवर न टाकल्यास कलम १४६, १४७ आणि १४८ अन्वये कारवाई करण्याची तरतूद अधिनियमात दिली आहे.

  • जीव ( प्राण-आत्मा )

    जीवनातील रगाड्यातून-

    वैद्यकीय शास्त्राचा अभ्यास करीत असताना, प्राथमिक ज्ञान मिळाले. शरीरशास्त्राविषयी , निरनीराळे भाग व त्यांची मुळ रचना, ट्यिश्युचा समुह, त्यांच्या सुक्ष्म अशा सेल्स भागाची योजना जाणली. प्रत्येक आवयव व शेवटी सर्व देह सांघिक मदतीने आपआपले कार्य पूर्ण करीतो. त्याची वाढ कशी होते हे कळले. निसर्गाची एक अप्रतिम योजकता ह्या अभ्यासामुळे दिसून आली. ह्या अभ्यासांत मदत झाली ती विद्वान डॉक्टरांनी लिहीलेल्या पुस्तकांची, व मासिकांची. प्राध्यापकांनी केलेल्या मार्गदर्शनपर नोटसची. आम्ही बघीतलेल्या व स्वताः केलेल्या प्रयोगांमुळे. तशीच मदत झाली ती, शरीर विच्छेदनाची (Dissection ), सुक्ष्म दर्शक यंत्राची, चार्टसची, ग्राफसची, आणि अशाच अनेक साधनांची.

    मला अध्यात्मिक विषयामध्ये रुची आहे. हा जीव (प्राण वा आत्मा ) ज्याला संबोधीले, तो ह्या देहांत कोठे असतो, कसा असतो, ह्याचा मी शोध घेतला. परंतु तो सापडला नाही. कोणत्याही वैद्यकीय पुस्तकांत, मासिकांत, त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाबद्दल नोंद आढळून आली नाही. तरीही जेव्हां शरीरांतील टिश्युंचा वा सेल्सचा रचनात्मक उल्लेख होताना, ज्यामध्ये हलचाल दिसे त्याला जीवन्त असल्याची नोंद ' जीवमय ( प्राणमय ) live cells ' अशी होत असे. हलचाल नसलेल्याना ' मृत dead cells ' संबोधीत.

    हलचालीचा मुख्य स्रोत, शक्ती, वा उर्जा हीच त्याचा जीव वा प्राण म्हणूनच ओळखली जाते.

    यंत्राचे भाग निराळे, परंतु ते कार्यारत होण्यासाठी त्याला उर्जा लागते. ती विद्युत, उष्णता, इलेक्ट्रॉनिक वा दुसऱ्या कोणत्या प्रकारची असेल. जशी उर्जा यंत्रासाठी तसेच प्राण हा देहासाठी असतो. जरी प्राण दिसला नाही, तरी त्याचे अस्तित्व जिवंतपणासाठी गरजेचे. प्राण संपुर्ण देहामध्ये पसरला असतो. देहाचे प्रत्येक सुक्ष्म सेल्स जेव्हां जीवंतपणाचे लक्षण दाखवते, त्याचवेळी तीच्यामध्येंही आत्मा आहे. मेंदूपासून नखापर्यंत जे चैत्यन्य जाणवते. जी जीवंतपणाची लक्षणे दिसतात, ती त्या जीवात्म्यामुळेच. त्या उर्जा शक्तीसाठी, देहामध्ये स्वतंत्र, वेगळे अवयवा सारखे स्थान वा कार्य दिसून आले नाही. संपूर्ण शरीरावर शक्तीरुपाने ताबा ज्याचामुळे असतो, तो जीवात्मा. शरीर मृत होताच त्याच्यातील जीवात्म्याचे अस्तित्व नाहीसे होते. शरीराचे जेव्हां कांही कारणामुळे कार्य बंद पडते, त्याच क्षणी जीवात्म्याचे तेथील अस्तित्व नाहीसे होते. जीवाला शरीरांची एक प्रकारे ओढ असते. तो शरीरांत गुरफटून राहीलेला असतो. संपूर्ण शरीरांत पसरलेला असतो. जीव स्वतः शरीर त्यागीत नसतो. परंतु अवयवातून जे जे सेल्स निकामी होऊ लागतात, तेथून जीवात्मा लोप पावतो. शेवटी शरीराचे कार्य शिथील होता क्षणीच जीवात्मा ते शरीर सोडून देतो. शरीर व जीव दोघेही सदैव एकरुप असतात. फक्त कार्य करणे हे जीवामुळे तर कोणते कार्य करावे हे शरीर ठरवितो. दोन्हीही भिन्न बाबी आहेत. जसे घोडा फक्त घोडेस्वाराला वाहून नेण्याचे कार्य करतो. परंतु कोठे जायचे हे मात्र घोडेस्वारच जाणत असतो. त्याच प्रमाणे देहामधले जे अनेक इंद्रिये आहेत, त्याचे कार्य कसे चालावे हे त्यातील एक इंद्रिय मेंदू वा बुद्धी सतत ठरवित असते. मेंदूची चालक शक्ती जीव ही मेदूला जीवंत ठेवते. मेंदूने कसे व कोणते कार्य करावे हे मेंदूच स्वतंत्रपणे ठरवित असतो.

    नैसर्गिक संसारीक घटनांचे पडसाद मेंदूवर सतत पडतात. त्याला जगाचे ज्ञान होत राहते. क्रियात्मक वा प्रतिक्रियात्मक गोष्टी मेंदू आपल्या देहाच्या अवयवाकडून करुन घेतो. संसाराचे चक्र चालत राहते.

    मेंदूकडून घेतल्या गेलेल्या निर्णयाचे परिणाम सुख वा दुःख ह्या भावनिक अविष्कारांत होतात. त्या प्रमाणे परिस्थितीचा गुंता होत जातो. ह्या सर्व घटनामध्ये मेंदूचा सहभाग असतो. जीवाचा नव्हे. ह्यालाच केलेल्या कर्माचे फळ म्हणतात. कार्य कोणते व परिणाम कोणता ह्याच्याशी जीवाचा संबंध नसतो. म्हणजेच त्या ईश्वराचा संबंध नसतो. ईश्वर देहाशी एक रुप होऊन देखील नामानिराळा असतो. व्यक्ती अर्थात त्याच्या देहाशी संबंधीत त्याचा मेंदू , बुद्धी, मन, विचार, भावना इत्यादी होणाऱ्या कर्मात प्रत्यक्ष सहभागी असतात. जीव वा त्याची उर्जा नव्हे.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    e-mail- bknagapurkar@gmail.com