विसर म्हणणे सोपे, विसरता येत नसते,
मनातले गाव कधी सोडता येत नसते.
ज्यांच्यासाठी आयुष्य वणव्यात जाळले आपण,
त्यांनाच नाव आपले आठवता येत नसते.
चेहऱ्यांवर हास्याचे मुखवटे लाख असतात,
डोळ्यांतले सत्य मात्र लपवता येत नसते.
सावलीही सोडून जाते, ऊन कलायला लागले की,
माणसांना माणूसपण जपता येत नसते.
म्हणून आता कुणाकडून अपेक्षा नकोच ठेवू,
या जगाला कुणाचे दुःख पेलता येत नसते.
कुणासाठी कितीही जगलात, शेवट एकटाच असतो.
चार दिवस अश्रू वाहतात... आणि पाचव्या दिवशी जग पुन्हा हसतं.
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
बोललो जेव्हा मनीचे
ते न त्यांनी ऐकले ।
आज म्हणती बोल काही
मौन जेव्हा घेतले ।।
...मी मानसी
सुमनांजली या काव्यसंग्रहातून…..
आपल्या मनीच्या भावनांचा।।
चित्रपट असावा अक्षरांचा।।
शब्दांतुनी तो रेखाटायचा।।
हलाकासा काव्यसडा शिंपायचा
-- सौ.माणिक शूरजोशी
जाग येता पहिल्या प्रहरी
हळुवार डोळे उघडावे... १
मग पाहून हातांकडे
कुलदेवतेला स्मरावे... २
अंथरुणातून उठताक्षणी
धरतीला नमावे... ३
ध्यानस्थ होऊ भगवंताला
आठवावे... ४
सर्व आन्हिके झाल्यावर
देवाचरणी बसावे... ५
काही न मागता
त्यालाच सर्व अर्पावे... ६
घरांतून निघता बाहेर
आई वडिलांना नमावे... ७
येतो असा निरोप घेऊन
मगच घर सोडावे... ८
क्षणभर दाराबाहेर थांबून
वास्तूला स्मरावे... ९
समाधानाचे भाव आणून
मगच मार्गस्थ व्हावे... १०
चेहऱ्यावर स्मित हास्य
नेहमी बाळगून चालावे..११
येणाऱ्या जाणाऱ्यांकडे
आनंदाने पहावे... १२
जगात खूप भांडण तंटे
आपण शांत राहावे... १३
सतत तोंडात मध आणि
मस्तकी बर्फ धरावे... १४
जीवन हे मर्त्य आहे
नेहमी लक्षात असावे... १५
प्रत्येक क्षण हेच जीवन
हेच मनी ठसवावे... १६
सत्याने वागून नेहमी
जीवन आपुले जगावे... १७
मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे
खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।।
लुटालूट करुनी देह वाढविला
राम नाम जपूनी पावन तो झाला ।।२।।
प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला
वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला ।।३।।
वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत
धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत ।।४।।
वाईट घटना घडते त्यास भोग म्हणावे
उद्धरुनी त्यांत जाणे ह्यास योग समजावे ।।५।।
जर होत असेल माझा वाल्मिकी ऋषि
मान्य मजला सजा जी प्रभूं तूं देशी ।।६।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
हे कसले जगणे …
मीपण छळते क्षणाक्षणाला
विझेल का हे
तिच्या स्तनाच्या मऊ उशीला
लयबद्ध चमचमाट अग्निशिखांचा।।
रात्रीच्या गर्भातला प्रकाशित फुलांचा।।
लोभसवाणी उतरली तारकादळे।।
सोहळा फुलविती अंधाऱ्या अवसेचा।।१।।
चंदेरी दुनिया लखलख तेजाची।।
भूवरी भंडारदऱ्यास शोभा स्वर्गाची।।
चला पाहूया मौज सरत्या वैशाखाची।।
ही विलोभनिय दृश्य प्रकाशफुलांची।।२।।
किर्र रात्री,धडपड निसर्ग प्रेमींची।।
इवल्या काजव्यांचे नर्तन बघण्याची।।
वाढताच संख्या अशा सोन किटकांची।।
सांगता मान्सून येताच मयसभेची।।३।।
-- सौ.माणिक शुरजोशी
Copyright © 2025 | Marathisrushti