स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज झी मराठी वाहिनीवरील २२ नोव्हेंबरचा भाग अख्या महाराष्ट्रासाठी काळजात हात घालून मनी हंबरडा फोडणारा होता. आज खूप दु: ख झाले एका युग पुरषाचा अंत पहिल्यादा मी अनुभवला... आशा महान युग पुरुषास माझ्या जाणता राज्यास विनम्र अभिवादन..
माझे शब्द रूपी काव्यपुष्प अर्पण करतो... काही चुकल्यास माफी मागतो ..एक शिवप्रेमी मावळा....
चिरून तो काळाचा पदडा
सह्याद्री पुन्हा गहीवरणार
जाणता राजा शिवछत्रपती
अवतार विलीन तो होणार...
केले उभे हे स्वराज्य त्यांनी
लेक जिजाऊ मातेचा तो असा..
मुघली शासन मोडीत धरी
झुंजे वाघ सह्याद्रीचा तो असा..
नथ मस्थक झाली ती युगे
अखंड स्वराज्य श्रीची रे ईच्छा..
हाती धरून एक एक मावळा
केली स्वराज्याची पुर्ण ईच्छा..
सह्याद्री चौफेर पराक्रम त्याचा
दुमदुमली मराठी माती अशी
गड ,बुरुज देहहरवून देई लढा
बलिदानी लाल झाली माती अशी..
चरित्र शिवाजीचे ऐकता
चैतन्य प्रत्येक रे मनी पेटे..
धकधक करुनी धमण्या
अस्मिता ह्दयी, ती दहक पेटे..
असा वाघ जेव्हा गडबडला
काळाचा ओघ तो जणू चढला
अचानक रोग रुपी शुत्रूचा
नकळत हल्ला देवाला अडला..
ओठी एक नाव ते शुंभू शुंभू
एक बाप असा व्याकूळ झाला..
भेद काळाचा नाही कधी कळला
माझ्या राजाचा प्राण आडकला..
शुंभू राजे होते तेव्हा पन्हाळी
रायगडाला लागली हो जिव्हाळी
राजघराण्यातील सगळे दु:खी
राज्य कारभाऱ्याच्या देव जाप मुखी..
लागे मनी चाहूल शुंभू राजास
मन बोले, देई हाक पित्यास..
अस्वस्थ झाले पुत्र युवराज
कुठे काही घडतं ?.. काय ते राज .?
चाले प्रयत्न शरर्थीचे , वैद्य लढे
एक एक अनुभव आज मागेपढे
नाही असर होई जेव्हा ती दवा
सगळ्यांनी मग मागितली दुवा...
नाही कामी आली दवा, दुवा
स्वराज्याचा प्राण तो हरवला
खेळी आज काळाची ही अशी
माझा जाणता राजा हरवला....
उमाकांत कळे
अकोला
९९२२८५५५३९
http://umakantk.blogspot.com
“आम्ही साहित्यिक” फेसबुक ग्रुपवरुन
ललाटी ज्यांच्या जे जे लिहीले
संत जाणती दिव्य दृष्टीने
नियतीच्या ह्या हलचालीना
दिली जाती आवाहने
जाणून घेता भविष्यवाणी
जीवन मार्ग हे ज्याना कळती
तपशक्तीने संत महात्मे
योग्य मार्ग ते दाखवूनी देती
कर्माने जरी भाग्य ठरते
सुख दुखःच्या गुंत्या भोवती
त्या गुंत्यातील धागा शोधुनी
सुसाह्य त्याचे जीवन करीती
कृपा होता संत जनाची
चुकला-मुकला जाई ठिकाणी
घनदाट त्या जंगलामधली
पाऊलवाट ते देई दाखवुनी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कुसुमे कल्पनांची,
तुझ्या चरणी वाहिली,
शब्दांची मांदियाळी,
तुजसाठी मांडली,---!!!
अर्थपूर्ण रचनांचे,
हार तुज घातले,
रसिकांची पावती,
तुज चरणी अर्पियली,---!!!
प्रतिभा देवी तुला वंदिते,
दिनरात कशी मी,
वरदहस्त तुझा राहो,
इतुकी चरणी विनंती,---!!!
हात माझे "थोटेच" की,
तुझ्या "यथासांग" पूजेसाठी,
"चूकभूल' घडता देवी ,
लेकरू" म्हणुनी पदरात घेई,---!!!
काव्याची सर्व बंधने,
दिली मी झुगारूनी,
भावली ती कविता,
प्रांजळ शब्दी मांडली,---!!!
प्रामाणिक भाव त्यात,
नाहीत शब्दांचे खेळ,
अंतरांना स्पर्श करणे,
एवढाच हेतू एक,----!!!!
कृपास्पर्शे, तुझ्या,
होते मी धन्य,
चरणी लीन अशी,
भावनाही अनन्य,---!!!
तुझ्या कारणे,
हृदये जिंकली,
दाद देत कशी,
मने जवळ आली,---!!!
तुझिया प्रसन्नतेने,
कविता माझी झाली,
दुसरे काय मागावे ,
पुण्याई फळास आली,---!!!
भाषाई माझी थोर,
मस्तक तिच्यापुढे झुकवते,
माध्यमातून तिच्याच,
तुज काव्यकुसुमे वाहते,---!!!!
हिमगौरी कर्वे.©
पचास साल हुए जिंदगीके, गोल्डन ज्युबली मनायी गयी
हंगामा और जल्लोष मे, पूरा दिन पूरी रात गयी
सारे बच्चे और रिश्तेदार, जमा हुए इकठ्ठा
फिर पडोसवाले क्यूं रहेंगे पिच्छे, जब खानेको था मिठा
सबने तारिफ की पचास साल, जिंदगी के ऊपर
हम तो बहूत खुष हुए सुनकर, उसे पहीली बार
जीन जीन चिजोंको किसीने आजतक ना जाना
जीन गुणोंको हमनेही ना पहचाना
वो हमारेमे संकरीत है, उसकी दिगयी हमे कल्पना
आदर्शवाद, सच्चाई और प्यार के पूजारी
देखी किसीने हमारे मे थे बाते सारी
आचंबेके साथ सोंच रहे थे गंभीरतासे
के इन गुणोंका पता उन्हे लगा कैसे
जीन गुणोंका अर्थ हमने, आज तक ना जाना
कैसे मिला उनका उन्हे ठिकाना
जो कुवेमेही नही था, वो बालटी मे कैसे आया
और इन बातोंका हमे आश्चर्य हुआ
शायद यह हो सकती है पार्टी की मिठाईयां
नैतीक दबाव उनपर जीस वझेसे आया
खिलानेवाले की कुच तो इज्जत करो
उसके आसलीयत पर मत उतरो
कमसे कम इतनी उमरबाद, होने दोजी खूष उसे
सोचा हुंगा किसीने, मन मे ऐसे
कलतक दे रहे थे जो गालीयां
दिखी आज हमारेमे उनको खुबीयां
चार झुठ एक सच्चे के बराबर, जब रेटकर कहा जाता है
और किसीकी तारीफ, हकीकत बनती
जब आखों मे पानी लाकर कहा जाता है
यह तो पता हुआ उनकी तारीफ से,
के आसलीयत मे जिंदगी होनी चाहीए कैसी
इन ताऱिफ और गुलदस्तोकी चौकटने प्रसन्न किया हमारा चित्त
और ख्यालोंकी दुनीयांने बिती सारी रात
करवटे बदलते बदलते सोचना मजबूर किया
के जो कुछ जिंदगी मे सच्चा हुआ, तुने क्या पाया
जिंदही का मकसद क्या, जरा सोच इन बातों पे
यही विचार झाकने लगा मन मे, उमरके इस मोड पे
रईस बापकी इकलोती आवारा आवलाद
देखी हमने पैसोको करते बरबाद
लक्ष्मी के मोलको वो गधा जानेगा कैसे
वह तो समझताहै पैंसो को पानी जैसे
समयका मोल हमने किया उस आवारा भाती
और खो बैठे वो महान संपत्ती
गया वख्त फिर हात आता नही,
बचपन मे शिक्षकने घोल घोलकर बाते कही
अर्थ उन पक्तीओंका तो हम जान गये थे
पर मतलब से उसके बहूत दूरी पर थे
पचास साल जानेके बाद, पंक्तीओंका दोहरा रहे है करते याद
पर अब तो ये बेफूझूलकी हुई ना बाते
दुनीयांके चक्करको कैसे वापीस फिराते
पेंडीग रखो इन बातोंको, फूरसतसे करेंगे हम उनको
कर दिया इन्ही बेफीकीर आदतोंनो सर्वनाश
और समय खो जाने पर आता था हमे होश
खेल कुद और तंदुरस्ती को जान
विद्यार्थी दशा मे नही हुयी इसकी पहचान
समझते थे खाईंगे पियेंगे बनेगे नवाब,
खेलेंगे पढेंगे बनेंगे खराब
चार बच्चोंका अड्डा जमाए, झाडके तले बैठते थे
और दुसरे दोस्त, जो खेल रहे, उनपर कॉमेट्स करते थे
बगैर खेले मैदान मे, खेलोंपर करते थे मार्गदर्शन
किसीसे कुछ सुना, या अकबारपढा, यही था हमारा ग्यान
बातें बनाना यही कला, हमने सिखी पढाईके जमानेसे
और उमरके हिसाबसे जो मिला ग्यान, निकालते उगालकर दिमागसे
उन बातो मे ना कुछ अनुभव था, ना अभ्यास किया पंक्ती
बकते थे भडाभड जो मुहसे निकल आती
खेल कुद मे रहे पिछए और लिख पढाईमे निचे
इसी कारण जिंदगी मे रहे कच्चे
ग्यानी अनुभवोंकी थी हमारेमे कमतरता,
सिर्फ उमरके अनुभवोंको कोन पुछता
अब आपही सोंचो जरा,
जीसके जिंदगी मे था खाना पिना मौज उडाना
समयको फूकटका माल समझकर बरबाद करना
कैसे इन लोगों ने हमे आदर्शवादी माना
यह तो हुआ जबानी जमाखर्चा, क्या झूठ और क्या सच्चा
पर एक सज्जनने जो कही बात,
उसमे दिखी मुझको जिंदगी की हकीकत
उसने सुनाया हमारे तारीफ का राज
वही बना जिंदगीके तस्सलीका आवाज
ये दुनीया देखनेमे है खूबशूरत, पर काटोंसे भरी हुयी अनगीनत
हर कदमपर जिंदगी के लीए चाहीए झगडा
एक एक दिन गीने इन्सान आगे बडा
सोचना पडता था के गया दिन कैसा
आनेवाले दिन का नही था भरोसा
यह संसार है बेरहेम, बेदर्द औऱ जालीम
इसी जिंदगीमे हम जिये थे ५० साल कमसे कम
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
शोभिवंत घर केले, आधुनिक बनलो मी
विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी
शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी
झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी
काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला
रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला
रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती
नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती
खेळून भूक लागली, हा विचार आला मनी
जीवंत किडे सोडले जली, खाण्यासाठी माशांना
शर्यत किडे माशांची, बघून वाटली गम्मत
भक्ष्ये पकडूनी किड्यांची, मासे असती जिंकत
मनी निराशा आली अवचित, विचार येता ध्यानीं
जीवन मरणाची ही शर्यत, जगे एक दुसऱ्यास मारुनी
परि निसर्गाची रीत निराळी, संधी देई जगण्याते
बंदीत टाकूनी किडे सगळी, वंचित केले त्या संधीते
निराश होऊनी जातां, काढून घेतले माशांना
जलाशांत सोडूनी देतां, आनंद झाला मनां
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
चल, चांदण्यांची सैर करू,
अंबरी, ढगां-ढगांत विहरू,
कडेकडेने मेघांच्या,जाऊ,
हळूच,मऊ मऊ दुलईत शिरू,-!!
मिचकावून डोळे आपुले,
चांदण्यांची वरातच पाहू,
सुंदर चमचमत्या प्रकाशात,
त्यांची आभा नीट न्याहाळू,--!!
काळ्याशार गालिच्यावर नभांत,
वावरते प्रकाश--झोत पाहू,
इकडून तिकडे हलत्या प्रवासी,
चंद्राचीही धांदल बघू,---!!
कोण त्यांच्यात अधिक सुंदर,
मनी मानसी स्पर्धाच लावू,
चंद्राचा मुखडा लोभसवाणा,
पाहून आपण अचंबित होऊ,--!!
धरेवर ती मजा नाही,
ना कुठली दिसे चांदणी,
नकली नको त्या, असली पाहू,
देखणी, नाजूक त्यांची बांधणी,--!!
पृथेवर का कधी चंद्र दिसे,
तोही इतुका जवळून आढळे,-?
थंडगार त्या वातावरणी,
झोपण्यात केवढी मजा असे,-?
अंतराळाचे सुख निराळे,
दु:खाची मुळी बात नसे,
ताण-तणांवा नसेल जागा,
ताणून द्या हो,शरीर सगळे,--!!
ओढाताण नाही कुठली,
जिवां मिळेल विश्रांती,
मानापमानाची कल्पनाही,
तिथे करायाची नाही,--!!!!
हिमगौरी कर्वे.©
क्रिकेट
घटना' जेव्हां घडली अघटित ।
कुणीही नव्हते शेजारी ।।
कां उगाच रुख रुख वाटते ।
दडपण येवूनी उरीं ।।
जाणून बुजून दुर्लक्ष केले ।
नैतिकतेच्या कल्पनेला ।।
एकटाच आहे समजूनी ।
स्वार्थी भाव मनी आला ।।
नीच कृत्य जे घडले हातून ।
कुणीतरी बघत होता ।।
सर्वत्र दिशेनें तो व्यापूनी आहे ।
हेच सारे सुचवित होता ।।
कोण असावा हा गुप्त साक्षीदार ।
नितिमत्ता शिकवी त्याला ।।
बाह्य जगातील द्रष्टा असूनी ।
अंतर्यामीही बसलेला ।।
त्या साक्षीदाराची जाणीव होता ।
कचरुनी जाते मन सदा ।।
अपप्रवृत्तींना आळा बसूनी ।
सत् कर्मे घडती अनेकदा ।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आज लोपले शब्द ओठचे, भावनाच्या आकाशीं
प्रखर बनतां त्याच भावना, विचार जाती तळाशीं....१,
भावनेला व्यक्त करण्या, सांगड लागे शब्दांची
थोटके पडती शब्द सूर ते, गर्दी होता विचारांची...२,
भावनांचे झरे फुटूनी, विचार जलाशय झाले
विचारांचे बनूनी धबधबे, वाहू मग लागले.....३,
आकार देती शब्द भाषा, बांध घालूनी विचाराला
निश्चीत होतो वेग नी मार्ग, आकार देता भावनेला....४,
भाषेमधली शक्ती जावूनी, मूक बनविले तिने
उंचबळणाऱ्या विचार भावना, टिपल्या मात्र चेहऱ्याने....५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जीवनातील वाटे वरती,
कडेकडेने उभे ठाकले,
परि वाटसरूंना सारे ते,
यशातील अडसर वाटले ।।१।।
वाट चालतां क्रमाक्रमानें,
बाधा आणून वेग रोकती,
ध्येयावरल्या उच्च स्थळीं,
पोहचण्या आडकाठी करीती ।।२।।
षडरिपूचे टप्पे असूनी,
भावनेवर आघांत होतो,
सरळ मार्गाच्या विचाराला,
आकर्षणाचा खेंच बसतो ।।३।।
पवित्र निर्मळ भावनेमध्ये,
रंगाच्या त्या छटा उमटती,
गढूळपणाच्या वातावरणीं,
सारे कांहीं गमवूनी बसती ।।४।।
थोडे राहता गाफील तुम्ही,
जाळ्यामध्ये अडकून जातां,
जीवनाचे जे साध्य असते,
स्वकर्माने गमवून बसतां.।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Copyright © 2025 | Marathisrushti