(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • कृतार्थ जीवन

    क्षणक्षण येते तुझीच आठवण
    देवा सत्य तुची ब्रह्मांडी दिगंतर

    जगव्यवहारी मी जगत रहातो
    त्या जगण्यावीण नाही गत्यंतर

    जगता जगताच कळूनी चुकते
    आणि मीच येतो त्वरी भानावर

    दिल्या घेतल्याचेच हे जग सारे
    अनुभवांती उलगडती प्रीतपदर

    सुख दुःख जन्मता सदा सोबती
    भाळी प्रारब्धाचे भोगणे निरंतर

    हा जन्म विवेकी जगण्यासाठी
    खुणगाठ मनी माझिया निरंतर

    मुक्तीमोक्ष जरी कुतार्थ जीवन
    भगवंता मी तुज स्मरतो निरंतर
    *********
    --वि.ग.सातपुते. (भावकवी)
    (9766544908)

    रचना क्र. ३१९

    ४/१२/ २०२२

  • ऋतू

    किती रात्री अशाच जागवल्या, राजसा तुझ्या स्मृतींमध्ये,
    वाट पाहताना जीव थकला,
    मन चिंतातूर आतमध्ये,---

    सारखे हे काळीज उले,
    चंद्र उगवे हा डोईवरी,---
    का सवतीने वाट अडवली,
    मोहात पाडत तुला सत्वरी,--!!!

    कितीक दिन होऊन गेले,
    ना निरोप कसला संदेश,
    तू गेल्यावर भोवताली,
    वाटे हा परकाच प्रदेश ,--!!!

    भोवती आहेत नाती सारी,
    आवडते ही मज सासुरवाडी,
    राम नाही पण त्यात कुठला ,
    एकली भासते मी संसारी,--!!!

    रामरगाडा अवती असता,
    सांगाया कोणास जावे ,
    दुःख तुझ्या विरहाचे रे,
    कोणापाशी मोकळे बोलावे,--!!!

    आता येईल जीवा बेचैनी,
    कसे त्यास रमवावे,
    डोळे लावून बसू किती,
    दूर तू त्या परागणी,--!!!

    नसते तुला कधीच चिंता,
    घरच्या आपल्या माणसांची,
    ते सगळे मात्र जीव टाकती,
    कशी तुझी बेपर्वा वृत्ती,--!!!

    मनमोर माझा नाचेल खरा,
    जेव्हा कधी येशील तू ,--
    इतरांसाठी असेल ग्रीष्म, माझ्यासाठी फुलेल ऋतू --!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • संकटातील चिमणी

    शांत होती रात्र सारी, आणि निद्रे मध्ये सारे

    खिडकी मधूनी वाहे, मंद मंद ते वारे....१

    तोच अचानक तेथे, चिमणी एक ती आली

    मध्य रात्रीचे समयी ओरड करू लागली....२

    जाग येता निद्रेतूनी, बत्ती दिवा पेटविला

    काय घडले भोवती, कानोसा तो घेतला....३

    माळावरती बसूनी, चिव् चिव् चालू होती

    बघू लागलो दूरूनी धडधडणारी छाती....४

    मध्येच उडूनी जाई, दारावरती बसे

    तगमग देखूनी तीची, कांहीं न कळत असे....५

    भाषा न कळली जरी, धडकन सांगत होती

    ‘संकटात आहे हो मी, ह्या भयाण मध्यरात्री’....६

    केवीलवाणी बघूनी, भूतदया ही आली

    काय हवे तिजला, या अवचित वेळी....७

    जेंव्हां बसे माळावरी, ओरड वाढत होती

    हालचालीतील बैचेनी, काही सूचवित होती....८

    आधार घेवूनी कसला, माळावरती चढलो

    विखूरलेल्या सामानी, निरखूनी बघू लागलो...९

    धस्स झाले मन बघूनी, एक लांब त्या सर्पाला

    छोट्या घरट्या पुढती, विळका घालूनी बसला..१०

    जीभल्या चाटीत होता, समोर बघूनी भक्ष्य

    चिव चिवणारी पिल्ले, होती त्याचे लक्ष्य....११

    चाहूल माझी लागता, सावध परि झाला

    छलांग मारीत वेगे, झरोक्यामधूनी गेला...१२

    काळसर्प तो बघूनी, उडाली होती चिमणी

    घुटमळला जीव परि, पिल्लामध्ये अडकूनी....१३

    आघाद होता हृदयी, कळवळूनी ती गेली

    मातृत्वातील ओढीने, गहीवरूनी ती आली...१४

    भयाण असूनी संकट, चिमणीची बघता शक्ती

    यश मिळविले तिने, योजूनी केवळ युक्ती....१५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • दुष्काळ

    दुष्काळ

  • गायक आणि पेय

    कौशल ईनामदार एक प्रसिद्ध संगीतकार म्हणतात..
    एकदा एक विचार मनात आला.
    कुणाला वायफळही वाटू शकतो. गायक आणि पेयांमध्ये साधर्म्य शोधायचा प्रयत्न तर कुठला गायक कुठलं पेय असेल..?

    मुकेश हे लिंबू सरबत आहेत.
    जरा आंबटसर चव आहे त्यांच्या अनुनासिक आवाजाची. पण ताज्या लिंबू सरबताची चव इतर कशालाही येणे केवळ अशक्य..!

    मन्ना डे हे दूध आहेत.
    पौष्टिक आणि शक्तिवर्धक.
    पण ब-याचजणांना नुसते दूध पचत नाही !

    गीता दत्त कडक फिल्टर कॉफी आहेत.
    येवू घातलेली झोप उडवतात.

    आशा भोसले या अतिशय उंची वाइन आहेत. जिभेवर आवाज रेंगाळत ठेवावा आणि फक्त नशा अनुभवावी.

    महम्मद रफ़ी हे स्कॉच व्हिस्की आहेत.
    सोनेरी, उत्तम दर्जा आणि ...!

    तलत मेहमूद...म्हणजे उसाचा रस..!
    एकदम गोड आणि थंड पण एक किंवा
    जास्तीत जास्त दोन ग्लास बस्स.
    जास्त घेवू शकणे अशक्य...!

    महेन्द्रकपूर..म्हणजे ताक..!
    जमलं तर एकदम फक्कड नाहीतर जावू दे.

    किशोर कुमार चहा आहेत.
    कधीही, कसाही आणि कितीही अनुभवावा.
    दुधात, दुधाशिवाय, तल्ल्फ येते म्हणून,
    जाग येते म्हणून, सवय म्हणून, तजेला येतो
    म्हणून, कामात, रिकाम्या वेळात, घरचा,
    इराण्याचा, टपरीवरचा. कुठल्याही रुपात तो मस्तचं वाटतो.
    शिवाय माझंही ते आवडतं पेय आहे..!

    आणि शेवटी....

    लता मंगेशकर. त्या पाणी आहेत..!
    नितळ,पारदर्शक, स्वच्छ,शुद्ध..!
    तहान लागली तर ती इतर कुठल्याही पेयाने भागत नाही. प्राण वाचवू शकणारं हे एकमेव पेय..!

    धन्यवाद

  • तुला लाभलेली निसर्ग देणगी

    खळी पडून गालावरी सुंदर तूं दिसते

    आनंदाचे भाव दर्शनी मधूर तूं हांसते

    इवले इवले ओठ फूलपाकळ्यांपरि

    लांब लांब केस काळे भुर भुर उडती मानेवरी

    मोत्यासारखे दांत भासे कुंदकळ्या

    बदामाचा आकार मिळे तुझ्या डोळ्या

    इंद्रधनुष्याचा बाक दिसे भुवयाला

    चाफेकळीची शोभा मिळाली नाकाला

    चमकते अंगकांती फाटलेल्या झग्यातूनी

    दिसते निसर्गाची देणगी तुझ्या गरीबीतूनी

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    Bknagapurkar”Gmail.com

  • स्वामिनी

    हातातल्या कंकणाचे
    कपाळावरील कुंकवाचे
    सरणाऱ्या पदराचे
    भान कसे राखावे?

    रोखणाऱ्या नजरांचे
    स्पर्शणाऱ्या हातांचे
    विकृत विचारांचे
    क्षण असे टाळावे?

    आखलेल्या मर्यादांचे
    दिसणाऱ्या सौंदर्याचे
    अस्तित्व हे बंधनांचे
    कुठवर मी पाळावे?

    बाईपण जगण्याचे
    वडे हे गिरवायचे
    तिच्या विवंचनेचे
    कोणीही पाढे वाचावे?

    मोकळ्या श्वासाचे
    तिच्या स्वाभिमानाचे
    मोल तिच्या जगण्याचे
    तिचे तिनेच करावे.

    सौ. प्रतिभा महादेव चौगले

  • शब्दब्रह्म

    असतेस , सामोरी तूं जेंव्हा
    मज काव्य ! प्रसवते तेंव्हा ।।धृ।।

    मम भाळी गं हे दान ईश्वरी
    सत्य , निर्मळी भावप्रीतीचे
    अंतरी उधळीत येते शब्दब्रह्मा ।।१।।

    गगन बरसता भाव कल्लोळांचे
    मनहृदयीचे , अंगण सारे ओले
    शब्द मत्तमयुरी गं नाचती तेंव्हा ।।२।।

    गूढ सारांश , सकल जीवनाचा
    निःशब्द जरी , मनी पाझरतो
    उलगडते चराचरीचे गुपित तेंव्हा ।।३।।

    तव सहवासाचे गं प्रीतचांदणे
    मी माळीत जातो , शब्दांसंगे
    चिरंतर , ते देवत्व भेटते तेंव्हा ।।४।।

    व्योमात लागता , माझी समाधी
    कानी , वेणू वाजवी श्रीरंगमुरारी
    छुमछुमछुम नादती नुपुरे तेंव्हा ।।५।।

    ©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)

    दिनांक:- २२- ५-२०२१

  • सांजवात

    लोचनी सांजवात आठवांची
    झाली व्याकुळ कावरी बावरी...

    तव निर्मली रूपात मी हरवलो
    सांगना कसा परतु मी माघारी...

    तुच लाविलास जीवास जीव
    ओथंबुनी, ओघळतेस अंतरी...

    आत्म्यास जाणवतो स्पर्श तुझा
    हे सत्य मौनी कवटाळीतो उरि...

    हुरहुर ती, हरएक क्षण सोबती
    जगविते लोभस संध्याकिनारी...

    होता नि:शब्द , वादळ अंतरीचे
    मग हॄदयी, घुमते हरिची बासुरी...

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २५४

    १०/१०/२०२२

  • दृष्टी

    व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेली वैभव दळवी यांची हि कविता