विझलेली पणती

संपलेल्या दिवाळीचे कवित्व अजून बाकी आहे
आहे पणती अजुनी वात तिची विझली आहे
दारातील आकाशदिवा अजूनही तसाच आहे
दिवा त्यात कोण लावील आता तो बेकार आहे ।

पाडवा आणी भाऊबीजेचे कोणास कौतुक आहे
कसले ऊटणे कसले तेल मोतीसाबण व्यर्थ आहे
आता आपला नेहमीचा हमाम साबण खरा आहे
गरम पाणी मिळणे आता नशीबाचा भाग आहे ।

दिवाळी संपली महत्त्व संपले हे असेच सुरु आहे
माणूस काय पणती काय नशिबी भोग तोच आहे
ऊपयोग संपून गेल्यावर किंमत त्याची शून्य आहे
घरातील एखादा कोपऱा हीच खरी जागा आहे ।

-- सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
१२ नोव्हेंबर २०१८



संपलेल्या दिवाळीचे कवित्व अजून बाकी आहे
आहे पणती अजुनी वात तिची विझली आहे
दारातील आकाशदिवा अजूनही तसाच आहे
दिवा त्यात कोण लावील आता तो बेकार आहे ।

पाडवा आणी भाऊबीजेचे कोणास कौतुक आहे
कसले ऊटणे कसले तेल मोतीसाबण व्यर्थ आहे
आता आपला नेहमीचा हमाम साबण खरा आहे
गरम पाणी मिळणे आता नशीबाचा भाग आहे ।

दिवाळी संपली महत्त्व संपले हे असेच सुरु आहे
माणूस काय पणती काय नशिबी भोग तोच आहे
ऊपयोग संपून गेल्यावर किंमत त्याची शून्य आहे
घरातील एखादा कोपऱा हीच खरी जागा आहे ।

— सुरेश काळे
मो. 9860307752
सातारा.
१२ नोव्हेंबर २०१८

Author