(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • प्रभू मिळण्याचे साधन

    ध्येय मिळण्या तुमचे योग्य लागते साधन
    कष्ट होतील व्यर्थचे चूक मार्ग अनुसरुन ।।

    अंतराळातील शोध महान बुद्धीचे प्रतीक
    घेण्या अचूक वेध अवकाशयान असे एक ।।

    अनंत दूरचे तारे न दिसती डोळ्यानी
    दुर्बिणीच्या नजरें बघती सर्व कौतूकानी ।।

    सूक्ष्म जंतूंचे अवलोकन, चक्षु घेण्या असमर्थ
    त्याचे मिळण्या ज्ञान लागते सूक्ष्मदर्शक यंत्र ।।

    यंत्र असे साधन जाणण्या कांहीं गोष्टी
    इंद्रियाना मर्यादा असून न बघे सारी सृष्टी ।।

    तसेंच आहे प्रभूचे जाणण्या त्याचे आस्तित्व
    साधन पाहिजे तपाचे देऊनी परीक्षा सत्व ।।

    दया क्षमा शांति ठरे श्रेष्ठ गुण
    सत्य तप भक्ती, प्रभू मिळण्याचे साधन ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • मानवी आठवण

    चकचक करती चांदनी । लकलक करतात डोळे । आयुष्य संपूण फक्त राहते । जोडीने फिरलेले नदिनाल्यांचे ओढे (वडा) !

    जन्माला आलो तेव्हा । देवाने टाकले कोड़े । कधी नाही सुटले म्हणून । जाता जाता रचले वाळलेले झाड़े !

    मी जेव्हा गेलो । तेव्हा मातीवर ठेवले कंदी पेड़े । जिवंत असताना कधी मुकात ठेवले नाही थोड़े !

    जाता जाता ठेवून गेलो कायमची आठवण , फक्त मुला –मुलींची । जो पर्यंत सृष्टि आहे , रंग भी रंगी फुलांची !

    ।। कवी ।। सचिन जाधव

    sachinrjadhav1992@gmail.com.
    Viravade(dattanagar),tal-karad,dist-satara .
    Mobile no-8459493123

  • कुंकू

    नातिचरामि” चा मंत्र जपत,

    त्याच्या पाठोपाठ घरात

    आलेल्या कुंकवाच्या पावलांना

    त्याच्याच पावलावर पाऊल टाकण्याची

    दीक्षा अग्नीच्या साक्षीने मिळालेली ।

  • निरोप द्या आतां (राघवाची गाथा)

    राम : ( दशरथाला) –
    शोक आवरा अपुला, आणिक निरोप द्या आतां
    करील तुमची वचनपूर्ति हा सुत मोदें, ताता ।। १

    ब्रीद हेंच आपुल्या कुळाचें –
    ‘वचन दिलेलें पाळायाचें’
    माझ्या प्रेमापोटीं कां कर्तव्याला चुकतां ? २

    वचनपूर्तता तुमची व्हाया
    सिद्ध असे मी वनात ज़ाया
    भाग्य म्हणूनच मला लाभला तुम्हांसमान पिता ।। ३

    पुत्रनीति जी आहे सक्षम
    पितृसुखा ती देइ अग्रक्रम
    गुरुजन, ज्ञानी, मुनी दुजोरा देती याच मता ।। ४

    लोभ नसे राज्याचा मजला
    पहा मुगुट हा लगेच त्यजला
    राहो आनंदात त्यामुळे कैकेयी माता ।। ५

    नको रडूं कौसल्या-माते
    तात विनंती, पुसा नयन ते
    राज्य अयोध्यानगरीचें भोगो माझा भ्राता ।। ६

    द्या भरताला हें सिंहासन
    वराप्रमाणें, द्या मजला वन
    यत्न फोल हा थांबविण्यांचा मज जातां-जातां ।। ७

    दिनरातीं मज नका आठवूं
    कुणां भेटण्यां नका पाठवूं
    चौदा वर्षें झाल्यानंतर येइन मीच स्वत: ।। ८

    आशिष गुरुजन-आप्तेष्टांचे
    चरण वंदुनी निजमातांचे
    निघतो मी तात्काळ काननीं, क्षणहि न घालवितां ।। ९

    ही मज वाटत नाहीं शिक्षा
    सुतधर्माची आज परीक्षा
    लागल्यास अर्पीन प्राण, राज्याची काय कथा !! १०

    - सुभाष स. नाईक

  • सुवासिनीचा पाडवा

    दिवाळीच्या पाडव्याचा दिस आज आला बाई
    घालते सडा अंगणात धन्याची मी वाट पाही ।
    लावीते पणती मी दारी केली बघा रोषणाई
    फुलला दारीचा मोगरा फुलली हो जाई जुई ।
    किती दिस झाले बघा धन्याची माझ्या भेट नाही
    करण्या रक्षण देशाचे धनी माझा सैनिक होई ।
    ऊन वारा पाऊस तर कधी बर्फ वृष्टी होई
    नाही विश्रांती कधी त्यास मन कासावीस होई ।
    वाट पाहता धन्याची डोळे माझे ओले होई
    लावता सुगंधी तेल शीण त्याचा जाईल बाई ।
    लाऊनी ऊटणे सुवासीक त्यासी न्हाऊ घालीन मी
    घालता अंघोळ माझ्या राया जीव वेडावून जाई ।
    दोन डोळ्यांची निरांजने करती ग औक्षण बाई
    करी रक्षण कुंकवाचे हेच मागणे ग अंबाबाई ।
    व्हावे कल्याण सर्वांचे नाही मागणे माझे काही
    घरधनी व्हावा सुखी हीच ओवाळणी मला देई ।

    सुरेश काळे
    मो.9860307752
    सातारा.
    ८ नोव्हेंबर २०१८

  • येईल मागे मागे

    नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे ।
    येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे ।।

    निराशूनी जावू नकोस रागें रागें ।
    हिंमत बांधूनी जावेस आगे आगे ।।

    विणाविस यशाची शाल धागे धागे ।
    सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे ।।

    सतत रहावे जीवनी जागे जागे ।
    तेव्हाच यश येत असते भागे भागे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • झिम्मड माती

    https://youtu.be/akw4ciQSbtg

  • ग्रह परिणाम

    वळून बघता पूर्व आयुष्यी, प्रखरतेने हेची जाणले

    घडले नाही कधीही ते ते, हवे असूनी मनी योजीले....१

    सभोवतालची देखूनी स्थिती, आखती योजना कल्पकतेने

    खेळामधली चाल नियतीची, ध्यानी न येते दुर्दैवाने.....२

    मार्ग तिचे हे ठरले असूनी, बांधलेले इतर जीवांशी

    अपूर्व योजना निसर्गाची, कळेल कुणाला सहज कशी....३

    जाळीतल्या धाग्याची टोके, गुंतली असती ग्रह गोलाशी

    फिरता फिरता खेच पडे, वा ढीली होवून जाती कशी.....४

    सुख दु:खाचे परिणाम हे, असेच दिसून येती मग

    अनपेक्षीत हे जेव्हा घडते, म्हणती त्यासी दैवी अंग....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • कवीची श्रीमंती

    खंत वाटली मनास कळला नसे व्यवहार ।

    शिकला सवरला परि न जाणला संसार ।।

    पुढेच गेले सगे सोयरे आणिक सारी मित्रमंडळी ।

    घरे बांघूनी धन कमविले श्रीमंत झाली सगळी ।।

    वेड्यापरी बसून कोपरी रचित होता कविता ।

    कुटुंबीय म्हणती त्याला कां फुका हा वेळ दवडीता ।।

    सग्यांच्या उंच महाली बैठक जमली सर्व जणांची ।

    श्रेष्ठ पदीचा मान देवूनी कौतूके झाली कवितांची ।।

    व्यवहारी निर्धन जरी तो विराजमान मनीं दुजांचे ।

    ईश्वरी चैत्यन्न स्फुरले जे जे गुंफूनी ठेविले हार तयांचे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • आत्मानंद

    जीवनात अचानक कधी
    असा क्षण येतो ।
    सारे स्तब्ध नीरव शांत होते ।
    ब्रम्हांड गोठल्याचा भास होतो ।

    साऱ्याच संवेदना संपुष्टात येतात ।
    उरतात फक्त निर्विकार स्पंदने ।
    हा जन्म अन मृत्यु मधील
    अंतीम थांबा असतो ।

    हाच शून्यावस्थेतील अचेतन
    अखेरचा जीवन सूर्यास्त ।
    जो शाश्वत मृत्यु, अंत!
    जीवनातील अंतीम अटळ कटुसत्य ।

    जन्मताच मृत्युचही वरदान
    भगवंताच दान असतं ।
    प्रत्येक जीवाला लाभलेलं असतं ।
    सर्वानाच स्विकारावच लागतं ।

    यालाच जीवन असं म्हणतात!
    म्हणून प्रत्येकानं सतर्कतेंन
    विवेके आत्ममुख व्हावं ।
    सातत्यानं सत्कर्म करत रहावं!

    सहृदयतेने निर्मळ निर्व्याज
    निर्मोही प्रेम करीत मने जपावीत!
    त्यामुळे आत्मानंद होतो!
    त्या अनामिकचे स्मरण ठेवावे!
    ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे!

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.११८

    १७ - ४ - २०२२