कोठे चाललो आम्ही, जसे वाहती वारे,
दिशा नसे आम्हाला, जसे फिरती भोवरे ।।१।।
धावत सुटला एकसारखा, प्रत्येकाचा वेग निराळा,
कोठे चाललास? विचारतां हासत राहतो बावळा ।।२।।
नाही कुणा ध्येय निश्चित असे एक,
परिस्थितीच्या ओघांत, वाहत चाललो अनेक ।।३।।
जीवन कशासाठीं कळले नाही कुणां
जन्मलो म्हणून जगावे हेच वाटते सर्वांना ।।४।।
तशातच तरले कांहीं उध्दरुन ही गेले
मार्ग त्यांचे अनुसरुनी तसेंच मिळवा सगळे ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
९७- १७०१८४
मज नाही अजुनही कळले
नाते, तुझे नी माझे कसले...
परी नित्य ध्यास तुझा अंतरी
हेच सत्य, निरागस मनातले...
श्वासा श्वासात तूच सांगाती
सावलीत रूप तुझे सांडलेले...
बैचन करते हे गूढ अनामिक
सांगु कुणास, मी हे मनातले...
तुही अशीच निःशब्द अबोली
मौनातच मन घट्टघट्ट बांधलेले...
तुझ्या लोचनीच्या प्रीतभावनां
सहजी सांगुनी जाती मनातले...
पुण्यपावनी दान, दैवी प्रीतीचे
जन्मी, ऋणानुबंधी लाभलेले...
जे आहे,जे घडले ईछ्या त्याची
ते सुख, मी ओंजळीत झेललेले...
–वि.ग.सातपुते.( भावकवी )
9766544908
रचना क्र.२०६
१८/८/२०२२
आत्म्याला ओढ असते ईश्वराच्या मिलनाची
जाण सदैव राहते प्रभुमय स्वरुपाची ।।१।।
अंशात्मक भाग असे आत्मा हा परमात्म्याचा
उत्कंठ ते आकर्षण गुणस्वभाव तो त्याचा ।।२।।
आत्म्यास पडले असे बंधन ते शरीराचे
जीवन कार्ये करुनी प्रयत्न करी मुक्तीचे ।।३।।
मुक्त होई त्या क्षणीं अनंतात समावतो
परमेश्वरि रुपांत विलीन होऊन जातो ।।४।।
आत्मा मुक्त होत असे देहकर्म फळावर
चांगले कर्म नसता नविन देह घेणार ।।५।।
दोन प्रकारांनी आत्मा प्रभू समर्पण होतो
देह मृत वा सजीव असतांना हे साधतो ।।६।।
ध्यान साधना करणारे उतरती समाधीत
त्याच क्षणी शरिराला आत्मा असे सोडीत ।।७।।
देह सोडूनी भुवरी आत्मा येई बाहेरी
क्षणिक काळा करितां मिलन होई ईश्वरी ।।८।।
समाधी असे साधन प्रभू मिलन होण्याचे
देह समाधीत जाणें सार असते जिवनाचे ।।९।।
जिवंतपणीच तुम्हीं प्रभूमय होत असे
आनंदी नितांत क्षण खराखुरा तोच असे ।।१०।।
आत्म चिंतन करुनी आत्म ज्ञान प्राप्त होई
तोच ईश्वर असूनी दुजा ठिकाणीं तो नाहीं ।।११।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
(गुरुदेव रवीन्द्रनाथ ठाकुर यांच्या एका कवितेचा स्वैर भावानुवाद )
अहो सुरांच्या गुरुराया, द्या मला तुम्ही दीक्षा ।।
बनुन सुरांचा दीन भिकारी,
गुरुराया, आलो मी दारीं
सरितेच्या लाटांना तुम्ही शिकवलेत जें गान
स्वरलहरींचें कोकिळास जें दिलेत तुम्ही ज्ञान
त्या ज्ञानाची घाला माझ्या झोळीमधिं भिक्षा ।।
द्या मला तुम्ही दीक्षा ।।
पसरवीन मी तुमचे सूर
जगीं अशान्ती करीन दूर
सूरज्ञान देउन, संगें मज घेउनिया, स्वामी,
असेल कोलाहलच निरंकुश, तिथें चला तुम्ही
तेथें नेउन घ्या माझ्या ज्ञानाची पुरी परीक्षा ।।
द्या मला तुम्ही दीक्षा ।।
- - -
( पु.ल. देशपांडे यांनी केलेल्या गद्य भाषांतरावर आधारित )
-
- सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik.com
कोणते दुःख तुला छळते
अकारण कां व्यथित होते ।।धृ।।
प्रेमळ छत्र पित्याचे असतां
गेले जीवन तुझे बागडतां
लाड पुरविले आईने तव
शिकवीत असतां आनंदी भाव
आठव सारे याच क्षणीं ते ।।१।। अकारण तूं कां व्यथित होते
बांधून घेतां राखी हातीं
आश्वासन तुजला मिळती
पाठीराखा भाऊ असूनी
येईल तुजसाठीं धावूनी
कसली शंका मनांत येते ।।२।। अकारण तूं कां व्यथित होते
संसार भरला सुख-दुःखानी
घे शिरावर तुझ्याच समजूनी
जीवन मार्गी होता बदल
नको होऊस वेडे चंचल
सावध असूं दे चित्र तुझे ते ।।३।। अकारण तूं कां व्यथित होते
नाते गोते वाढवीत जावे
सर्वामध्यें प्रेमळ व्हावे
छत्राखालती होती आजवर
छत्रचि बनावे तूं इतःपर
संस्काराचे मधूर फळ येते ।।४।। अकारण तूं कां व्यथित होते
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रे चंद्रा तू कसा दिसतो,
अवचित ह्या वेळीं,
भास्कराच्या ह्या साम्राज्यीं,
दूर अशा त्या स्थळीं ।।१।।
कोठे आहेत असंख्य सैनिक,
जे तुला साथ देती,
कां असा तूं एकटाच आहे,
दिवसा आकाशांती ।।२।।
शांत असूनी तुझा स्वभाव,
फिरे त्याच्या राज्यांत,
एकटाच बघूनी तुजला,
लक्ष्य न जाई त्यात ।।३।।
कडक स्वभाव तो भास्कराचा,
नियमानें चालतो,
चुकून देखील तुझ्या राज्यीं,
कधी येत नसतो ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
जरी मी संपलो इथे
प्रवास संपणार नाही
चार लाकडांसोबत
माझा ध्यास जळणार नाही
राख निजेल मातीच्या कुशीत
स्वप्ने निजणार नाही
राहतील रेंगाळत येथेच
पण सावली दिसणार नाही...
मायमराठीचे काव्यरत्न
कविवर्य मंगेश पाडगावकर
प्रथम पुण्यस्मरण
३० डिसेंबर २०१६
स्नान करूनी निर्मळ मनीं, दर्पणापुढे येऊन बसला ।
जटा साऱ्या एकत्र बांधूनी, भस्म लाविले सर्वांगाला ।।
ओंकाराचा शब्द कोरला, चंदन लावूनी भाळावरती ।
रूद्राक्षाच्या माळा बांधल्या, गळा हात नि शिरावरती ।।
वेळेचे भान विसरूनी, तन्मय झाला रूप रंगविण्या ।
प्रभू नाम घेत मुखानें, नयन आतूर छबी टिपण्यां ।।
पवित्र आणि मंगलमय, वाटत होते स्वरूप बघूनी ।
सजविला होता देह त्यानें, प्रभूचेच एक रूप समजूनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
पाऊस कधी मला समजलाच नाही.
किचकीचणाऱ्या डबक्यात,
मिचमीचणाऱ्या दिव्यात
कडाडणाऱ्या ढगात
कसला आलाय रोमांच.
पण
झुलणाऱ्या पानांत
मातीच्या तहानलेल्या सुवासात
निरागस टपोऱ्या थेंबांत
पाऊस कधी मी बघितलाच नाही.
आणि जेव्हा उधळली बरसात
गहिऱ्या प्रेमात
अबोल स्पर्शात
मनातल्या वादळात
गच्च डोळ्यांत,
पाऊस तेवढा चांगला पुन्हा कधी मला समजलाच नाही.
-- कल्याणी
Copyright © 2025 | Marathisrushti