(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • तूच माझा ईश्वर

    मनांत ठसले रूप तुझे, येते नयना पुढे ।

    रात्रंदिन मज चैन ना पडे.....।।धृ।।

    शरीर जरी सुंदर मिळे ।

    प्रयत्नांनी तूंच कमविले ।।

    चपलता ही छाप पाडीते ।

    लक्ष्य खेचूनी तुझ्याकडे

    मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे ।१।

    हासणे खेळणें आणि चालणें ।

    'ढंगदार' तुझे बोलणे ।।

    शरीरामधल्या हालचालींना ।

    सहजपणाचे वळण पडे

    मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे....।२।

    स्वभाव आहे जरी मृदू तो ।

    प्रसंग पडतां कठीण भासतो ।।

    सज्जना पुढती नम्र दिसूनी ।

    दुर्जना शिरीं वज्र पडे

    मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे ....।३।

    हृदयीं माझ्या घर करूनी ।

    तव प्रतिमा दिली ठेवूनी ।।

    ईश्वर तूंच खरा तो ।

    पूजन सदैव करीते

    मनी ठसविले रूप तुझे येत नयना पुढे ....।४।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • श्री विठ्ठल

    विठ्ठलाचा गजर होई
    गाता-मनातून
    विठ्ठलाचे रुप दिसे
    माझ्या माय-बापातून
    पायावर डोई ठेवी
    राहो जन्मभरी संग
    कधी वाचली ती पोथी
    कधी गायला अभंग
    पुंडलिका भेटी उभा
    युगे-युगे राहिशी
    तुकारामासाठी म्हणे
    विमान धाडिशी
    सर्व शांती देई
    नको चित्त सवंग
    माझ्या डोळ्यांचे पारणे
    कधी फिटे पांडुरंग
    नव्हे कंदी पूजा
    नाही कधी वारी
    ना कौतुके साठी
    मी वारकरी
    डोळ्यांतून वाहे
    तूझ्या भक्तीचा झरा
    सोडीव सोडीव आता
    नको जन्म फेरा

    - सौरभ दिघे

  • भाषा जिला गौरवते

    भाषा जिला गौरवते,त्या मातीचेच गान ,
    मातेहूनही ती मोठी,
    भाषा देत असे dअधिक वेलांटी,--!

    ती आहे सृजनांत ,
    सर्वांची काळी आई,
    तिच्या कुशीतून जन्म घेतो,
    आपण सारे, पक्षी, प्राणी, --!

    ती करते जसे संगोपन,
    जिवांचे नित्य जतन,
    म्हणूनच तिला रोज करावा,
    नेमाने आपण प्रणाम,---!

    काय तिची महती वर्णावी, कणातही आहे सत्व,
    जीवनातील संजीवनी,
    तिच्याविना सृष्टी निर्जीव,--!

    जोडीदार आभाळाची,
    विशाल त्यांचा संसार
    लेकुरे उदंड जाहली,
    गोकुळ सगळा परिवार,--!

    माती पोटी जन्मते बीज,
    आणि विशाल वृक्ष होती,
    कित्येक वर्षानंतर पुन्हा बिजे,
    हीच बिजे मातीत रुजती,--!

    फळे-फुले रसरशीत,
    कधी पिकून पडती,
    त्यातूनच पुन्हा जन्मती
    मातीतून परत वरती,--!

    मानवी शरीर पार्थिव,
    मातीतच शेवट अंत,
    तिच्यातून असे जन्म,
    तिच्यात एकरूप परत,---!!

    हिमगौरी कर्वे.©

  • आठवणींची पिसं

    आठवणींचा डोह भासतो वरकरणी शांत नि:संग
    मात्र डुचमळता उठतात भावकल्लोळाचे अनंत तरंग
    वरवर वाटतात साऱ्या एका कुळीच्या एक जशा
    होतात बोलक्या जेव्हा, जाणवे एकमेकींचा अलग ठसा

    काहींचा केवळ नुसताच भास
    जवळून काहींचे जाणवतात श्वास
    काही रांगत्या काही रांगड्या
    मुकाट काही, काही अखंड बडबड्या

    काही गोड बोबड्या दुडदुडताना
    रुणझुणतात मनोपटलावर पुन:पुन्हा
    काही नव्हाळ, गव्हाळ रंगसाजिऱ्या
    कुजबुजती अस्पष्ट लाजऱ्याबुजऱ्या

    काही वृध्द, रुध्द काही विद्ध
    काहीच सुसंगत बाकी असंबद्ध
    लावून पंख काही जाती उडून
    काही शांत करिती संथ रवंथ

    काही निद्रिस्त काही सतत भयग्रस्त
    आनंदमयी मस्त काही संत्रस्त त्रस्त
    नुसतेच काही अवशेष, खंड
    काही धगधगती, तेवती अग्निकुंड

    काही दटावणाऱ्या काही दाटलेल्या
    काही शुष्क, कोरड्या आटलेल्या
    एकलेपणात गुंग शापित काही
    अतिआवेगाने उरी फुटलेल्या

    काही बिचाऱ्या दुखऱ्या हळव्या
    अश्वत्थामाच्या भाळी मिळाव्या
    काही त्रोटक, तुटक हवेत विराव्या
    ऋणबंधाईत काही उरी उराव्या

    काही लाजाळू असतात काही मायाळू
    काही ठुसठुसतात सदैव बनून गळू
    काहींचा सल सतत रुततो मना
    शिकवि काही पोरक्या बापुड्या केविलवाण्या

    काही मानी त्यांचा ताठर बाणा
    लपविती चेहेरा काही लाजिरवाण्या

    चालूनही काळासोबत नाही कालबाह्य
    येऊनही वयात त्या नाही होत वयस्क
    आठवणींच्या वाढतात केवळ सावल्या
    मनाच्या मेणावरच्या अस्पष्ट पाऊलखुणा

    आठवणीच्या पक्ष्याची पिसे विस्कटावी किती
    काहीच पसरतात, विखुरतात, काही गळती
    झाडून पंख, पुन्हा सावरुन झेपावतो जेव्हा
    हाती न आपल्या काही, केवळ गळक्या वेणा

    - यतीन सामंत

  • स्मृति

    जीवनाचा प्रवाह हा
    भरला आहे घटनांनीं
    विसरुनी जातो काहीं
    काहीं राहती आठवणी ।।१।।

    बिजे ज्यांची खोलवर
    रुतुनी जाई त्या घटना
    देह आणि मनावर
    बिंबवूनी जाई भावना ।।२।।

    काळाचा असे महिमा
    आच्छादन टाकी त्यावरती
    परि काहीं काळासाठी
    विसरुनी जातात स्मृति ।।३।।

    प्रसंगी त्या अवचित
    जागृत होती आठवणी
    पुनरपि यत्न होतो
    जाण्यासाठीं त्या विसरुनी ।।४।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • येईल मागे मागे

    नको लागूस प्रसिद्धीच्या मागें मागे ।
    येईल स्वयं ती तुझ्याच संगे संगे ।।

    निराशूनी जावू नकोस रागें रागें ।
    हिंमत बांधूनी जावेस आगे आगे ।।

    विणाविस यशाची शाल धागे धागे ।
    सुखाच्या छटा चमकूनी रंगे रंगे ।।

    सतत रहावे जीवनी जागे जागे ।
    तेव्हाच यश येत असते भागे भागे ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • मानवी आठवण

    चकचक करती चांदनी । लकलक करतात डोळे । आयुष्य संपूण फक्त राहते । जोडीने फिरलेले नदिनाल्यांचे ओढे (वडा) !

    जन्माला आलो तेव्हा । देवाने टाकले कोड़े । कधी नाही सुटले म्हणून । जाता जाता रचले वाळलेले झाड़े !

    मी जेव्हा गेलो । तेव्हा मातीवर ठेवले कंदी पेड़े । जिवंत असताना कधी मुकात ठेवले नाही थोड़े !

    जाता जाता ठेवून गेलो कायमची आठवण , फक्त मुला –मुलींची । जो पर्यंत सृष्टि आहे , रंग भी रंगी फुलांची !

    ।। कवी ।। सचिन जाधव

    sachinrjadhav1992@gmail.com.
    Viravade(dattanagar),tal-karad,dist-satara .
    Mobile no-8459493123

  • सागरमाया

    नितळ लोचनी नीरव शांत चराचर..
    ब्रह्ममुहूर्ती ऐकू येते सागराची गाज..
    एकांती उसळते आर्त भावनांचे गुज..
    बिलगता पवन , रुणझुण ती प्रीतीची..।। १ ।।

    माहोल , सारा सर्वांतरा दीपविणारा..
    प्राचीवरी अलवार उमले बिंब केशरी..
    प्रतिबिंब लालगे ते लाघवी मनोहर..
    ऐकू येते सुरावट मंगलमयी प्रीतीची..।। २।।

    महाकाय , अथांग महासागर हृदयी..
    भावनांच्याच बेभान लाटा गगनभेदी..
    निरवतेत , घोंगावती अंतरी गतस्मृती..
    उलघाल विकल मनी निष्पाप प्रीतीची..।। ३ ।।

    खुणावते जीवा ती अवीट सागरमाया..
    किनारी साक्ष , रुतल्या प्रीतपाऊलांची..
    भरती , ओहोटीतही , प्रतीक्षेत किनारा..
    आसक्ती स्पंदना , केवळ तव प्रीतीची.।। ४ ।।

    वि.ग.सातपुते.(भावकवी)

    रचना क्र.४२.

    दिनांक:- १७ - ३ - २०२१.

  • तृप्तीचे आभाळ

    गुलमुसलेली सांज केशरी...
    गतआठवांचे थवे नभाळी...
    भावनांचे अंतरंग लाघवी...
    शब्दांचे प्रतिध्वनी नभाळी...
    स्वरगंगेत नाहता भावप्रिती...
    गोधुलीची ही सांज आगळी..
    मनस्पर्श तुझा गं स्वर्गानंदी...
    प्रीतभारली तू कोमलकळी...
    सत्यप्रीती , हे दान भाळीचे...
    मकरंद , अमृती हा मधाळी...
    तृप्तीचे आभाळ अलौकिक...
    घुमते पावरी हरिची नभाळी..
    सांजाळलेल्या केशरी उदरी..
    उमलणारी प्रभात सोनसळी..
    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)
    रचना क्र. 61 / ६ - ५ - २०२१
    ( मुक्तरचना)
    ?9766544908
  • विसरण्यातील आनंद

    विसरण्यातच लपला आहे, आनंद जीवनाचा
    आठवणीचे द्वार उघडता, डोंगर दिसे दु:खाचा...१

    दृष्य वस्तूचे मिळता ज्ञान, असे जे बाह्य जगीं
    आकर्षण त्याचे वाटत असते, सदैव आम्हां लागी....२

    वस्तूच्या त्या होवूनी आठवणी, सुख देई आम्हांला
    क्षणिक असती सारे सुख, दु:ख उभे पाठीला...३

    उपाय त्यावरी एकची आहे, विसरून जाणे आठवणी
    विसरूनी जातां त्या सुखाला, दु:खी होई न कुणी...४

    एकाग्र मनाची स्थिती म्हणजे, दुसरे काही नसे
    जाता विसरूनी स्वत:लाही, जगास विसरत असे ... ५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०