ब्रम्हांडातील ग्रहगोल तारे,नेहमीच मज खुणावत,
गूंज सांगत अंतरीचे, अनामिक ओढ लावत,--!!!
केवढे त्यांचे गारुड हे,
अंतरीची खूण पटत,
त्यांच्यापुढे आपण केवढे,
सिंधुतील अगदी बिंदूगत,--!!!
प्रखर त्यांचे तेज असे ,
भुरळ पाडे चमचम चमक,
हरेक कर्तव्यकठोर असे,
असे प्रत्येकजण बिनचूक,--!!!
आपली जागा ठाऊक असे,
राहती किती स्थितप्रज्ञ ,
अवकाश केवढे मोठे,
धीराने त्यास तोंड देत,--!!!
प्रवास, दिशा, वेळ, ठरे,
प्रत्येकास मिळे जन्मजात,
तेज:पुंज आभाळी चमकणे,
त्यांचे ध्येय उपजत,--!!!
वेळ, परिस्थिती, काळ बदले,
ते आपुल्या स्थानी अटळ, माणसाने किती शिकावे,
अंतर्यामी लावावी अटकळ,--!!!
निरंतर हा प्रवास असे,
सातत्याने काम करत,
फेरे आपुले पूर्ण करती,
मोक्षाची न अपेक्षा ठेवत,--!!!
कामच त्यांचा देव असे
कसला धर्म, जात-पात,?--
समानतेचे धडे देऊनी,
अद्वितीय ते यात्रा करीत,--!!!
© हिमगौरी कर्वे
गजानना आनंदें धरतीवर येता।
आगमनाचा मोठा आनंद देता!
विद्येची देवता आराध्य तुम्ही देवा!
मखरात बसविता घ्यावा विसावा!
मोदक लाडूंची दिली तुम्हा रास !
भक्तांना सुखदायक तुमचा सहवास!
चौसष्ट कलांचा अधिपती राजा गणराज!
शब्दसुमनांचा कसा चढवावा साज!
निर्गुण रूप सदा भावते लोचनास!
आत्मस्वरूप दिसावे जसे भक्तास!
तुच सख्य आपले जाणून घ्यावे!
भक्तावरी मायेचे कृपाछत्र धरावे!
संकट होते दूर पाप नाशती
महिमा अगाध तुझा मंगलमूर्ती !
काय वर्णावी अजाणतेपणी किर्ती
प्रतिभा प्रदान करावी तुम्ही दोन हाती !
प्रतिभा चौगले यांच्या प्रतिभास या कवितासंग्रहाच्या इ-पुस्तकातील ही कविता.
हे इ-पुस्तक आपण खालील लिंकवर खरेदी करु शकता.
किंमत : रु.८०/-
सवलत किंमत : रु.५०/-
https://marathibooks.com/books/pratibhas-by-pratibha-chougale/
कृष्ण कमळ-
असे जगावे, तसे जगावे,
मला वाटते मुक्त जगावे,
कधीही कुठले बंधन नसावे, ताणतणाव चिंता समस्या,
अगदी त्यांना कोळून प्यावे,--!!!
जीव टाकत स्वच्छंदाने,
मुक्त विहरत मस्त रहावे, फुलपाखरू होऊन सगळे,
जीवनाचे मर्म लुटावे,--!!!
कधी कस्तुरी व्हावे वाटे,
सुगंध फैलावण्या सारे,
वाऱ्याने त्याचेच गान गावे,
घेऊन जग तृप्त व्हावे,--!!!
कधी वाटते डोंगरदरीत,
हरणउड्या मारत हिंडावे,
स्वैर आपुले आभाळचआपण, आपल्या हाते खाली आणावे,--!!!
कधी वाटे गरुड व्हावे,
ऐटदार पंख फैलावत,
साऱ्या पृथेवर राज्य करावे,
कधी वाटे कोकरू व्हावे,
इकडून तिकडे उड्या मारत, पटकन कुणाच्या कुशीत शिरावे,--!
कधी वाटे मधमाशी व्हावे, फुलांफुलातील मध चाखत, साठवण करत करत रहावे,
कधी वाटते राजहंस व्हावे पाणियात डुंबत डुंबत,
दिमाखाने झकास जगावे,--!!!
नकोत सगळे प्रश्न हे,
नकोशी ज्यांची उत्तरे,
माणूसपण सोडून देऊन,
थोडे जगून पहा बरे,--!!!
हिमगौरी कर्वे.©
मोरपिसारा
काव्य कलश
ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा,
उपसतो जरी सतत, होत नसे निचरा....१,
गोड पाणी शब्दांचे, ओठी अमृत वाटे
पेला भरता काठोकाठ, काव्य हृदयी उमटे....२,
पेला पेला जमवूनी, कलश भरून आला
नाहून जाता त्यात, देह भान विसरला....३,
सांडता पाणी वाहे, परसते चोहीकडे
आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे....४
डॉ. भगवान नागापूरकर
४६९- १८०४८५
कशास घेतला जन्म मुली तूं, आमचे पोटीं
समजत नाहीं काय गे लिहीले, तुझ्या ललाटीं
झेप तुझी दिसून आली, जन्मापासूनी
चतूरपणें तूं मान उंचावली, स्व-गुणांनी
तोकडे पडतो सदैव आम्ही, देण्या तुज संधी
खंत वाटते मनांस ह्याची, कधी कधी
उपजत गुण हे जोपासावे, कळते सारे कांहीं
झेप तुझी आणि झेप आमची, विसंगत राही
असे उमलणारे फूल उद्याचे, तूं एक कळी
धन संपत्ती परकिया करतां, आम्हा जवळी
होऊं शकते उणीव त्यांत, कधीं असता आपले
हेच मग दुजाचे समजतां, मन चरकले
प्रयत्न होतील सुखी ठेवण्या, राहून अर्धपोटीं
आशिर्वाद तरी निश्चित असतील, सदैव तव पाठीं
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
वातावरणी वस्तू पडतां, नाश पावते लवकर ती
हवा पाण्याच्या परिणामानें, हलके हलके दूषित होती
ठेवूं नका उघडयावरती, वस्तू टिकते निश्चीतपणे
दूषितपणाला बांध घालता, कसे येई मग त्यात उणे
बाह्य जगातील साऱ्या शक्ति, आघात करती मनावरी
दुषिततेचे थर सांचूनी, मनास सारे दुबळे करी
देहामध्यें बंदीस्त ठेवून, एकाग्रचित्त करा मनाला
कांहीं न करता येते तेव्हां, राग लोभादी बाह्य गुणाला
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
जरी, मी नसलो मनकवडा
तरी मी सारे ओळखून आहे
समोरचे हास्य बेगडी नाटकी
मनभाव सारे ओळखून आहे
सत्य असत्य लोचनी तरळते
सद्भावनां! अंतरास सजविते
मन निर्मळ सुखानंदाचा झरा
सारेच मी शब्दात गुंफतो आहे
कां ? उगाच उणेदुणे उसवावे
जे छळते मनास, ते विसरावे
विवेके! सदा जगुनी जगवावे
एव्हढेच आपुल्या हाती आहे
मैत्र! लाभणे, भाग्य भाळीचे
निर्मळ! सुखाचेच प्रीतीप्रांगण
जीवाजीवा, सहजी बिलगावे
जीवनाची, हीच सांगता आहे
--वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
१४ - १ - २०२२.
सितेसाठीच रामालाही
आज बदनाम केले आहे
श्रीकृष्णाला गोपिकांनीच
आज बदनाम केले आहे
लक्ष्मीनेच तर सरस्वतीस ही
आज बदनाम केले आहे
महाभारता द्रोपदीनेच
आज बदनाम केले आहे
देवांनाही इंद्राने त्या
आज बदनाम केले आहे
कलियुगाने माणसालाच
आज बदनाम केले आहे
कवी – निलेश बामणे
202, ओमकार टॉवर, बी – विंग, गणेश मंदिरा जवळ, श्रीकृष्ण नगर, संतोष नगर, जन.ए.के.वैद्य मार्ग, गोरेगांव ( पूर्व ), मुंबई – 400 065.
मो. 8652065375 / 8692923310
Email- nileshbamne@yahoo.com
nileshbamne10@gmail.com
आभाळीच्या देवराया
कां ? पेरितोस रे माया
अवचित येसी, घेवूनी जासी
कां ? रुजवितोस रे माया
कां ? निर्मिलास रे निसर्ग
उध्वस्त क्षणात सारे व्हाया
निष्ठुर करिसी तू पंचभूते
कुठेच न उरे आसरा जगाया.
कां ? जाळलिस रे लंका
कां? बुडविलिस द्वारका
तूच रे निर्माता अन त्राता
तूच आभाळीचा देवराया
चैतन्य तुझेच रे हे सारे
घाल रे तुझीच पाखरमाया
निर्बुद्ध जरी मी हा पामर
शरणागत येईन तुझिया पाया
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
9766544908
रचना क्र. १०६.
९ - ४ - २०२२
Copyright © 2025 | Marathisrushti