येतात तुझे आठव, गगनात काळे ढग,
उरांत फक्त पाझर,
शिवाय नुसते रौरव,--||१||
येतात तुझे आठव,
सयींची होते बरसात,
चित्तात उठे तूफांन,
मनात चालते तांडव,--||२||
येतात तुझे आठव,
प्रीतीचे हे संजीवन,
स्मृतींचे मोठे आवर्तन,
त्यांचे लागती न थांग,--||३||
येतात तुझे आठव,
सरींची त्या उधळण,
शब्दांचे पोकळ वाद,
कल्पनांचे नुसते डांव,--||४||
येतात तुझे आठव,
अश्रू असूनही शुष्क,
मन मात्र पांणथळ,
कसानुसा होई जीव,--||५||
येतात तुझे आठव,
भोवती दुःखाची पाचर,
सहवासाचे अमृतथेंब,
कधी बनती विष:कण,--||६||
येतात तुझे आठव,
प्रेमाचे निव्वळ भास,
आत्म्यात फक्त उलघाल, काट्यांची बनते शेज,--||७||
येतात तुझे आठव,
कधी येईल राघववेळ,
कुशीत तुझ्या शिरून,
संपवेन दुर्भाग्याचा खेळ,--||८||
© हिमगौरी कर्वे.
मनाची समजूत कशी घालावी
नेत्री साक्ष तुझ्याच अस्तित्वाची
सांगना मी तुला गं विसरु कसे
हुरहुर मनाला तव प्रीतसुखाची
क्षणाक्षणांच्या झुल्यावर झुलते
निर्मल, प्रीतगंगा गतआठवांची
प्रीतीविना कां? असते जीवन
लाभते प्रीती, संचिती सुखाची
कोवळ्या कळीत मकरंद मधुर
भ्रमरास ओढ़ त्यात मिटण्याची
सत्यप्रीती! अवघे मर्म जन्माचे
त्याविण नसे, प्रचिती सुखाची
भावप्रीतीचेच, निष्पाप चांदणे
कृपा सार्थकी, त्या भगवंताची
-- वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. १५३
२१ - ६ - २०२२.
जुई
पावसाची सर ओसरून जाते, उगाच तुषार भिरभिरती
इवल्या इवल्या फुली भरलेल्या अंगनिथळत्या जुईभवती
आधीच हळवा सुवास कोमल त्यात जळाआत विरघळला
ओल्या झुळकीत भरून वारा नेत असतो अशा वेळेला
तलम ढगांच्या सात घड्यांतून गाळीव पडते सौम्य चांदणे
जाळीच्या पडद्यामधून दिसते जुईचे नितळ रूप देखणे
कवळ्या फांद्यांचा लवचिक बांधा पाचूच्या पानांत झाकून घेत
शुभ्र शुचितेची सौजन्यकांती हिरवे लावण्य लेऊन येत
मादकता जाते मार्दवी विरून, सौंदर्य सोज्ज्वळाआड दडते
सोलीव सुखाचे स्वप्नच एक जीवाला जगतेपणी पडते !
कवी अनिल
-----------------------------------------
पावसा पावसा थांब ना थोडा
पावसा पावसा थांब ना थोडा
पिळून काढुन न्हालेले केस
बांधु दे एकदा सैल अंबाडा
पावसा पावसा लप ढगात
सागफ़ुलांची कशिदा खडीची
घालु दे तंगशी चोळी अंगात
पावसा पावसा ऊन पडु दे
वाळाया घातला हिरवा शालू
चापूनचोपून तिला नेसू दे
पावसा पावसा पाहा ना जरा
जांभळ्या फ़ुलांचा देवबाभळीने
वेणीत घालाया केला गजरा
पावसा पावसा आडोश्यातुन
साजरा शृंगार रानराणीचा
दुरून न्याहाळ डोळे भरून …
कवी अनिल
पुण्यपावन हे दत्तधाम
कृष्णाकाठी, भक्तीचे
त्रैलोकी शाश्वत कृपाळू
स्वर्गद्वार ते मोक्षमुक्तीचे।।
निश्चिन्ततेच्या महासागरी
दर्शन आगळेच पंचत्वाचे
दत्तगुरू, अखंड कृपाळु
माहेर लडिवाळ गुरुकृपेचे।।
तृप्तीचे श्वास तिथे निरंतर
मनी कारंजे श्रद्धाभक्तीचे
जीवास नाही, घोर चिंता
ध्यास मनहृदयी विरक्तीचे।।
मन ब्रह्मानंदी विरुनी जाते
सत्य, दर्शन होते आत्म्याचे
परमात्मा! तो परमकृपाळु
रूप! भवसागरी दत्तकृपेचे।।
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ४३.
११ - २ - २०२२.
"नरेंद्रजीं"चे धरून बोट
"देवेंद्रजी" पळत आहेत
"घड्याळ्या"च्या काट्यांना
ते अधूनमधून लोंबकळत आहेत
विझली "गांधी" नामाची आँधी
उरली थोडी ज"रा हूल" आहे
अखिलत्व गमावलेल्या पक्षास
"अखिलेशी" यशाची भूल आहे
सन्मान बहु पडला पदरात
बारा मती ची ही करामत आहे
कोणत्याही सत्ता-ऋतूत
"शरद" ऋतु ऐन भरात आहे
मज तुजसवे घेऊन टाक रे
अन् मतदारां पुढे उभा "ठाक रे"
धाकट्याची ही टाळी टाळून
मोठा म्हणे तू असाच वाक रे
मंत्रीपदाच्या खुर्चीत
कवी-राम रममाण आहे
कमळाच्या कर्जात आता
सा"री पब्लीक" गहाण आहे
मतमतांच्या या गलबल्यात
जनतेस हे कळले आहे
आळीपाळीने या साऱ्यांनी
लोकशाहीस छळले आहे
------ कवी कोण आहे माहिती नाही
लुळा पांगळा बसूनी एकटा, गाई सुंदर गाणे,
आवाजातील मधूरता, शिकवी त्याला जगणे....१,
जगतो देह कशासाठी, हातपाय असता पांगळे
मरण नसता आपले हाती, जगणे हे आले.....२,
लुळा असला देह जरी, मन सुदृढ होते
जगण्यासाठी सदैव त्याला, उभारी देत होते.....३,
गीत ऐकता जमे भोवती, रसिक जन सारे
नभास भिडता सुरताना, शब्द उमटती वाह ! वा रे ! ....४,
असमान्य ते एकचि मिळता, उणीवतेची खंत कशी
दुबळ्या देही कला श्रेष्ठ ती, वीज चमकते रात्री जशी....५
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
कधी असेही घडावे,
सुखाला परिमाण नसावे,
भरभरून ओंजळीत त्यांस,
घेऊन छान मिरवावे,--!!!
कधी असेही घडावे,
आपुले सगळे आपुलेच राहावे,
परकेपणा सोडून देत,
जिवां-शिवांचे नाते जपावे,--!!!
कधी असेही घडावे,
सुंदरतेला सुगंध यावे,
त्यांना एकदा कडेखांदी,
दिमाखात घेऊन हिंडावे,--!!!
कधी असेही घडावे,
अपेक्षांचे ओझे नसावे,
मुक्त स्वैर आनंदाने,
खुशीचे विशाल पंख ल्यावे,--!!!
कधी असेही घडावे,
ताण-तणावांना निरोप द्यावे,
आपुल्या मस्त जीवनातून,
कायमचे त्यांना घालवावे,--!!!
कधी असेही घडावे,
सगळे विश्र्वच कुटुंब बनावे,
जिकडे जावे तिकडे केवळ,
प्रेममय वातावरण असावे,--!!!
कधी असेही घडावे,
मित्रत्त्वाला जिवापांड जपावे,
स्वार्थी, संकुचित वृत्ती
सोडून जिवांचे मैत्र करावे,--!!!
कधी असेही घडावे,
दु:खांना धरुन बडवावे,
क्षणार्धात संपवून त्यांना,
विजयी होऊन परतावे,!!!
हिमगौरी कर्वे
रूप असे देखणेकाळजां भिडले भारी,
डोळे असती लकाकते,
पाणीदार जसे मोती,
काया कशी तुकतुकीत,
नजर फिरता हाले,
सुंदर तांबूस वर्ण,
त्यावर पांढरे ठिपके,
शिंगांची नक्षी डोई,
दिसते वर शोभुनी,
हिंडते बागडते रानी,
कुणी बालिका की हरणी, --??
चपल चंचल वृत्ती,
अचूक आविर्भाव मुखी,
क्षणोक्षणी मान वेळावी,
भय दाटले नयनी,--!!!
पाय मजेदार हलती,
नाजुकसे ते हडकुळे,
पण त्यात ताकद किती,
खुट्ट वाजता वाऱ्यावरती,--!!!
चरत चरत कुरणी,
हिरव्या गवतावर निवांत,
सारखी ही हले डुले ही,
गोजिरवाणी बघा हरिणी,--!!!
भोवती बाळे करिती घोळका त्यांच्याकडेच ना ध्यान,
हलवून इवली शेपूट,
शिकवे जगण्याचे ज्ञान, --!!!
जागरूक राहून सारखी,
भोवती नजर भिरभिरत राहे,
सभोवती हरणें सगळी,
पाहून मग जीव शांतावे,---!!!!
हिमगौरी कर्वे.©
आज अचानक मी तुला पाहता
भावतरंग मनीचे, उमलुनी आले
निर्माल्याचाही तो गंधाळ सुगंधी
गगन, गतस्मृतींचे दाटुनी आले
सांग सखये, काय काय आठवू
लोचनी, तुझेच भास तरळलेले
खुणा! तुझ्या पावलो, पाऊली
आठव सारेसारे, हृदयी रुतलेले
अजुनही छळतो, तुझा अबोला
मन! अधीर हे तुझ्यात गुंतलेले
लाघवी प्रीती, चैतन्य स्पंदनांचे
मन! तव प्रतीक्षेत घुटमळलेले
आज अचानक मी तुला पाहता
भावतरंग मनीचे, उमलूनी आले
-- वि.ग.सातपुते .(भावकवी)
9766544908
रचना क्र.३८.
७ - २ - २०२२.
ती आल्यावर
बाग बहरली ,घेत उखाणे ती आल्यावर
सुरू जाहले ,नवे तराणे ती आल्यावर
मीच टाळतो,पितही नाही,पाजत नाही
सरले सारे ,जुने बहाणे ती आल्यावर
मुलगा गेला हातामधुनी माय सांगते
चालू झाले हे गाऱ्हाणे ती आल्यावर
पदरी पडले रत्न देखणे तिच्या सारखे
घरही झाले असे शहाणे,ती आल्यावर
किती जाळले सूर्याने मज ती नसताना
नभात जमले मेघ दिवाणे ती आल्यावर
मनात माझ्या गीत हरघडी नवे जन्मते
सहज बोलणे,होते गाणे,ती आल्यावर
ती आली अन सुचू लागली मला शायरी
पंख लाभलेली उड्डाणे,ती आल्यावर
© जयवंत वानखडे,कोरपना
भ्रमणध्वनी ९८२३६४५६५५
Copyright © 2025 | Marathisrushti