वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
प्रशासनाच्या दफ्तर दिरंगाईचा समाचार घेणाऱ्या मागील ‘प्रहार’ला वाचकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. खूप एसएमएस आले, बऱ्याच लोकांनी प्रत्यक्ष फोनवर अभिनंदन केले. काही फोन तर जिथे देशोन्नतीचे अंक पोहचत नाहीत, अशा भागातून आले.
January 20, 2008
नमोऽस्तु नालीकनिभाननायै नमोऽस्तु दुग्धौदधिजन्मभूम्यै ।
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै
नमोऽस्तु नारायणवल्लभायै।।१२।।
आई जगदंबा महालक्ष्मीला वंदन करताना जगद्गुरु श्री आदि शंकराचार्य स्वामी महाराज विविध विशेषणांचा उपयोग करीत आहेत.
त्यातून आई जगदंबेच्या विविध गुणांचे वैभव विशद करीत आहेत.
आचार्य श्री म्हणतात,
नमोऽस्तु नालीकनिभाननायै- नालीक शब्दाचा अर्थ आहे कमळ. नाल म्हणजे पोकळ दांड्यावर ते फुलत असल्यामुळे त्याला नालीक असे म्हणतात. निभ अर्थात प्रमाणे, सारखे तर आनन म्हणजे मुख.
अर्थात जिचे मुख कमळाप्रमाणे अतीव आकर्षक आहे अशी.
तिला नमोऽस्तु अर्थात नमस्कार असो.
नमोऽस्तु दुग्धौदधिजन्मभूम्यै- दुग्ध म्हणजे दूध. उदधि म्हणजे सागर. दुधाचा सागर अर्थात क्षीरसमुद्र ही जिची जन्मभूमी आहे अशी.
समुद्रमंथन कथेचा संदर्भ यात घेतलेला आहे. उद म्हणजे पाणी आणि धी म्हणजे साठा या अर्थाने सागराला उदधी म्हणतात. पृथ्वीवर आढळणाऱ्या सामान्य पाण्याच्या समुद्राप्रमाणे पुराणात दुग्धसागर,दधिसागर इक्षुसागर,मधुसागर यांचेही वर्णन आहे.
यापैकी क्षीर म्हणजे दुधाच्या सागरातून समुद्रमंथन प्रसंगी महालक्ष्मी प्रगटली आहे. त्यामुळे सागर ही तिची जन्मभूमी.
नमोऽस्तु सोमामृतसोदरायै- याच सागर मंथनातून सोम म्हणजे चंद्र आणि अमृत निघाले असल्याने त्यांची सोदरा अर्थात एकाच उदरातून जन्माला आलेली, बहीण.
नमोऽस्तु नारायणवल्लभायै- भगवान श्री नारायण यांची वल्लभा अर्थात प्रियतमा असणाऱ्या आई महालक्ष्मीला नमस्कार असो.
-- विद्यावाचस्पती प्रा. स्वानंद गजानन पुंड
March 21, 2020
हल्ली “data” असा शब्द ऐकला की पटकन डोळ्यासमोर software किंवा माहिती तंत्रज्ञान हे जग डोळ्यासमोर येते. प्रत्यक्षात मात्र डेटा म्हणजे कुठलीही संकलित केलेली माहिती जिच्यावर कुठलेही संस्कार / विश्लेषण झालेले नसते. असा डेटा विश्लेषण करण्यासाठी वापरण्यासाठी उपयुक्त ठरतो, ज्यातून पुढे कृती करून अपेक्षित परिणाम घडवून आणता येतात. बहुतेक कंपन्या समस्या सोडविण्याच्या वेगवेगळ्या कौशल्यांचे प्रशिक्षण त्यांच्या कर्मचाऱ्यांना सतत देत असतात. पण त्या शिक्षणाचा पुरेसा उपयोग करून घेतांना दिसत नाहीत. प्रत्यक्षात असे आढळून येते की अगदी क्वचितच डेटाचा उपयोग विश्लेषण करण्यासाठी वापरला जातो.
August 7, 2026
जगात अब्जावधी लोक आहेत, परंतु तरीसुद्धा एका व्यक्तीसारखी हुबेहूब दुसरी व्यक्ती असणे शक्य नाही. अगदी जुळ्या मुलांमध्ये देखील सूक्ष्मसा फरक असतोच. सांगायचे तात्पर्य, प्रत्येक व्यक्तीची एक स्वतंत्र ओळख असते.
August 27, 2006
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक अकरा
जे जे देवासाठी ते ते देहासाठी-भाग 9
वस्त्र हे लज्जा रक्षणासाठी असते, असा मंत्र आहे.
सर्वभूषाधिके सौम्यं लोकलज्जानिवारणे.
सर्व भूषणामधे श्रेष्ठ असलेली, लज्जा निवारण करणारी वस्त्रे मी तुला अर्पण करीत आहे. असा उपचार म्हणून सांगितला आहे.
वस्त्र ही फॅशन असली तरी एकवेळ चालेल, पण लोकांनी फक्त माझ्याचकडे पाहिले पाहिजे असे कपडे नकोत. जैन दिगंबर साधू देखील कपड्यांशिवाय वावरतात, त्यांचे वावरणे कुठेही किळसवाणे वाटत नाही, उलट, मला टीचभर कपड्यांची पण गरज नाही, एवढा परित्याग मी माझ्या मनात मान्य केला आहे, असे समजून येते.
मनामधे लाज वाटणारे, भावना चाळवणारे, कपडे परिधान करताना आपण सामाजिक आरोग्य बिघडवीत आहोत, हे पण लक्षात येत नाही. बरे झाले, जागतिक आरोग्य संघटनेच्या निरोगीपणाच्या व्याख्येत सामाजिक हा आणखीन एक स्वतंत्र मुद्दा घेतला आहे. हे सामाजिक आरोग्य म्हणजे फक्त साथीच्या रोगापुरते मर्यादित नाही, हे पण लक्षात घेतले पाहिजे. अर्थात शरीराकडे पहाण्याची पाश्चात्य दृष्टी वेगळी आणि भारतीय दृष्टीकोन वेगळा आहे, हे मान्य केलेच पाहिजे.
भारतीय संस्कृती मधे कपडे थोडे ढगळ, सैल, हवेशीर असतात. याचे कारण येथील हवामान आणि तापमान. पाश्चात्य वकील काळा कोट घालतात, म्हणून भारतातील वकील देखील काळा कोट घालतात, ही अजून शिल्लक राहिलेली गुलामगिरी नव्हे काय ? भारतात पांढरा सदरा आणि सैलसर पायजमा असा भारतीय पोशाख का होऊ शकत नाही? वस्त्र ही देशातील वातावरणाला अनुकुल असावीत. बंद गळ्याचा काळा कोट, टाय, साॅक्स, ग्लोव्हज, बूट हा अति थंड हवेतील योग्य पोशाख आहे. पण असाच पोशाख हट्टाने भारतात घातला तर चालेल का ? नाही ना ! तरीसुद्वा आज भारतात असाच पोशाख हवा असे वाटणे ही मानसिक गुलामगिरी आहे, असे वाटते.
यंत्राच्या जवळ काम करताना कपडे सैल ढगळ असून चालणारच नाही. तिथे अंगाबरोबर बसणारेच कपडे आवश्यक आहेत.
थंडी, ऊन पाऊस वारा यांच्यापासून संरक्षण मिळणारे कपडे असावेत. लोकांच्या विकृत नजरापासून संरक्षण मिळणारे कपडे असावेत. केवळ महिलांचेच कपडे असे असावेत असे नाही तर पुरूषांना देखील कपडे घालून सौंदर्य खुलवता आले पाहिजे.
कायदा करून आणि सेन्साॅर बोर्ड स्थापन करून हा प्रश्न मिटणारा नाही. माझी मुले कशी दिसावीत, माझी बहिण माझा भाऊ कसा दिसावा, त्याच्याकडे इतरांनी कोणत्याही विकृत नजरेने पाहू नये, असे कपडे त्यांनी घालावेत, हा किमान नियम प्रत्येकाने आपल्या घरापुरता पाळला तरी सामाजिक आरोग्य सांभाळले जाईल.
मी माझ्या दवाखान्यात तरी हा नियम म्हणून केला आहे. माझ्याकडे येणाऱ्या रूग्णांनी अंग प्रदर्शन होईल असे कपडे घालू नये, असा फलक दर्शनी भागावर लावला आहे. आणि त्याची कडक अंमलबजावणी करतो. काहींनी याचा राग येतो, पण माझ्या रुग्णांनी माझ्याकडे कसे यावे हे ठरवण्याचा अधिकार घटनेने मला दिलेला आहे. तो अधिकार मी पूर्णपणे वापरतो.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
03.06.2017
June 3, 2017
उत्तर भारतातील काशी ऊर्फ वाराणसीत हे दिव्य ज्योतिर्लिंग असून यालाच श्री काशी विश्वेश्वर असे म्हणतात.
August 13, 2013
श्रावण महिना लवकरच सुरु होतोय. या महिन्यात अनेकांना मद्यपान-मांसाहार वर्ज्य असतो. त्यांच्यासाठी हा खास लेख…
July 25, 2022
व्याधिक्षमत्व म्हणजे शरीराची व्याधीपासून संरक्षण करण्याची शरीराची क्षमता . यालाच Immunity किंवा प्रतिकारशक्ती आपण म्हणू शकतो . एखादा आजार होऊ नये म्हणून शरीर स्वाभाविकपणे नैसर्गिक तत्त्वांनुसार स्वतःची काळजी घेत असते .
November 15, 2022
मी स्वतः एक सोडून पाच महाविद्यालयांमध्ये नोकरी केली पण तेथेही असले प्रकार नव्हते. अनिवार ओढीने माजी विद्यार्थी यायचे, आम्ही त्यांच्याबरोबर मस्त व्यक्तिगत वेळ घालवायचो आणि “स्नेह “जपायचो- तो आजही टिकून आहे. त्याला असल्या “मेळाव्यांची” गरज नसते.
December 12, 2021
घरामध्ये लग्न,मुंज असो किंवा वास्तुशांत वा धार्मिक कार्य असो. घराच्या दरवाज्याला तोरण बांधण्याचा कुळाचार पूर्वीपासून चालत आला आहे.
एका सुतळीला सोनेरी नक्षीचे पताका सारखे कागद लावून त्याच्या मध्यभागी सोनेरी कागद चिटकवलेला नारळ असतो यालाच तोरण असे म्हणतात. आंब्याच्या डहाळ्यांचे किंवा पानाफुलांचेही तोरण शुभ म्हणून समजले जाते.
दरवाज्याला तोरण बांधल्याने दृष्ट प्रवृत्तीचा वावर घरात होऊ शकत नाही. उलटपक्षी धार्मिक कार्ये यशस्विरीत्या पार पाडली जातात.
आजकाल गणपतीच्या मंदीरात नारळाचे तोरण बांधल्यास गणपती नवसाला पावतो अशी श्रध्दा रुढ झाली आहे. नवर्यामुलाला व मुलीला त्यांच्या विवाह प्रसंगी बाशिंग बांधले जाते हे सुध्दा एक प्रकारचे तोरण असून त्यामुळे त्या दोघांना कुणाचीही दृष्ट लागत नाही अथवा बाधा येत नाही.
तारण या शब्दाचा अपभ्रंश तोरण झाला असून तारण म्हणजे संकटापासून तारणे असा अर्थ गृहीत धरला जातो.
January 16, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti