(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • श्री गणपती अथर्वशीर्ष मराठी भाषांतर आणि पद्यरूपांतर

    श्री सुभाष नाईक यांनी अथर्वशीर्षाचें ‘सम-लय मराठी भाषांतर’  व सरल मराठी पद्यरूपांतर’ असें दोन प्रकारें अनुवाद केले आहेत. म्हणजे, ज्या व्यक्तीला ज्या पद्धतीचें वाचन/पठण करणें आवडेल, ती व्यक्ती त्या पद्धतीचें भाषांतर वापरूं शकेल.

  • नैवेद्य का दाखवावा ??

    देवाला नैवेद्य दाखवणे हा पूर्ण भक्तीयोग आहे. त्यातील विज्ञान योग कोणता ते पाहू.

    गणपतीचा नैवेद्य ठरलेला.

    मोदक. मोदकच का ?
    गणेशांना आवडतो म्हणून !!! का आवडतो ?
    गणेश हा बुद्धीदाता आहे.

    आणि मोदकातील पुरण म्हणजे गुळ खोबरे आणि वर तूप हे काॅम्बिनेशन म्हणजे साक्षात बुद्धिवर्धक योग आहे.

    बूस्ट बोर्नव्हीटा, माल्टोव्हा, काॅम्प्लान इ. म्हणजे फक्त टीनचे डब्बे. बाकी त्यात सोयाबीनची टरफले, नारळाची भुशी आणि शेंगदाण्याचा चोथाच असतो.

    जर्रा जाहीरात दाखवायची खोटी, पडले तुटून त्या डब्यावर.
    हे जाहिरात तंत्र या कंपन्यांना बरोब्बर माहिती आहे, त्यामुळे जाहिरातींचा मारा करून, सचीन, कपील इ. ब्रॅण्डचा वापर केला की, आपले प्राॅडक्ट खपते.

    चोथा खाऊनच जर वजन वाढणार असेल तर मग असली नारळ आणि शेंगदाणेच का नकोत ?
    नारळ आणि शेंगदाणे खाऊन तब्येत सुधारत होती. घरच्या घरी बारा बारा बाळंतपणे होत होती.

    टाॅनिक म्हणून काय होते ? गुळ आणि शेंगदाणे. नारळ आणि गुळ. जो आपल्याकडे नैवेद्य म्हणून दाखवला जात होता।
    आणि आमच्याच घरातील बाल हनुमान आणि बाल गणेशांना प्रसाद म्हणून मिळत होता.
    भक्तीपूर्ण नैवेद्याला, कोलेस्टेरॉलच्या भीतीने बदनाम केले गेले आणि जाणीवपूर्वक आरोग्याचा व्यापार सुरू झाला.

    देवीला पुरणाचाच नैवेद्य लागतो.

    पुरण म्हणजे चणे. हरभरे डाळ शिजवून गुळ घालून केलेले मनगणे असो वा कडबू असोत, पुरणाची पोळी असो वा नुसते पुरण असो, आणि या सर्व नाजूक नैवेद्यावर साजूक तूपाची धार......

    फक्त ताकद वाढत होती. वेगळ्या टाॅनिकची गरज नव्हती. घोड्याला काय खाद्य दिले जाते ? हरभरेच ना ?
    घोड्यासारखी गती आणि वाजीकर शक्ती मिळवण्यासाठी तसेच तेच खाद्य आपल्याला मिळण्याची व्यवस्था आपल्या देवांच्या नैवेद्यामधून केलेली होती.

    गॅस वाढतो, पित्त वाढते, जाडी वाढते म्हणून जेवणातून चणाडाळच हद्दपार केली आणि प्रोटीन पावडरचे डब्बे मात्र जिममधे खपवले जाऊ लागले. हे कधी लक्षातच आले नाही.

    नागपंचमीला
    नागोबाला लाह्या, हळदीच्या पानात लपेटलेल्या पातोळ्या, पानगे, गोकुळाष्टमीला शेवग्याच्या पाल्याची भाजी, कोजागिरीला आटीव दूध, गुढीला श्रीखंड, हे नैवेद्य आरोग्य रक्षण करणारेच होते.

    नारळीपौर्णिमेला नारळीभात ठरलेलाच. नारळावरूनच ओळखली जाणारी ही पौर्णिमा!

    वेगवेगळ्या ऋतुमधे येणारे वेगवेगळे सण, आणि या निमित्ताने होणारे नैवेद्य हे जणु काही आरोग्याचे बूस्टर डोसच होते. दरवर्षी नियमाने घ्यायचे आणि आरोग्य सांभाळायचे !

  • पुण्ण्याची गणना करू नका ! 

    सकाळी पंधरा मिनिटात पूजा करून टाकतात आणि दिवसभर मौजमजा. संचितातले पुण्य भसाभस संपत जाते. काही पापही हातून घडत असते. पण मनात सतत अहंकार असतो की मी सकाळी पूजा केली आहे. एक हजार रुपये पगारावर उत्तम संसार होऊ शकतो का?

  • कृपा’ म्हणजे काय?

    कृपा ही जाणून घेण्याची गोष्ट आहे! उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या अवस्थेतून प्रत्येक जीव वाटचाल करत असतो. दासबोधात रामदास स्वामीनी जन्म हेच दुःख आहे असे म्हटले आहे, तुला जन्म मरणाच्या फेऱ्यातून ह्या भाव सागरातून मुक्त व्हायचे आहे,तू सद्गुरुंना शरण जा! हे सद्गुरू म्हणजे कोण? व्यक्ती का नाही! हे एक तत्व आहे ह्या आधी होते आत्ता ही आहे आणि पुढे ही राहणार आहे!

  • शारदीय नवरात्र – पहिली माळ

    पहिल्या माळेला आजच्या बुधवारी सर्वसाधारणपणे निळे वस्र, साडी वगैरे पेहराव हा निळ्या रंगाचा असतो. बुधवार या वाराचा आणि बुधब्रहस्पतींचा आवडता रंग निळा आहे. म्हणून आज भाविकांनीही निळ्या रंगांचे कपडे परिधान केलेत तर त्या देवतेच्या चैतन्यापर्यंत पोहोचण्यास “बायपास” मिळतो.

  • ब्रह्मचारिणी – दुसरी माळ

    काल आपण माता दुर्गेच्या नवरात्रींपैकी पहिल्या दिवसाच्या पर्वकालातील माहिती पाहिली.आज या कुलोत्पन्न ऊत्सवाचा दुसरा दिवस.दुसरी माळ.आज गुरुवार.गुरु म्हणजे पिवळ्या रंगाचा प्रभाव.आज मातेने पिवळी वस्र परिधान केलेली आहेत अशी श्रध्ददा आहे.दुसर्या माळेला देवी भागवतात अनंत,मोगरा,चमेली,तमर अशा पांढर्या फुलांची माळ घटापर्यंत अर्पण करायची आहे.

    जपः-दधाना करपद्माभ्याम् क्षमालाकमण्डलू।
    देवी प्सीदतु मणि ब्रह्मचारिण्यनुत्तमा ।।

    या जपाने ब्रह्मचारिणी मातेची आळवणी करुन जी पूजा मांडली आहे त्या पुजास्थानी स्थीर होण्याचं आवाहन करायचं.यशा मिलीतोपचार द्रव्यांसह पुष्पांनी मातेची मनोभावे पुजा करावी.आजच्या दुसर्या दिवशी.

    साक्षात महादेव आपणांस पती लाभावेत अशी इच्छा तिने निश्चित केली होती.त्यासाठी म्हणजे महादेवाला प्राप्त करण्याच्या इराद्याने तीने घोर तपश्चर्या केली.म्हणून तीला “तपश्चारिणी”किंवा ब्रह्मचारिणी ” या नामाभिदानाने ओळखले जाते.

    अत्यंत कठीण प्रसंगी ब्रह्मचारिणी मातेची आराधना केली तर ती तिच्या भक्तांना ती पावते अशो श्भाविकांची श्रध्दा आहे.तिचे रुप अत्यंत भव्य असून पूर्ण ज्योतिर्मय आहे.डाव्या हातात जपमाला असुन ऊजव्या हातात कमंडलु धारण केले आहे.ज्ञान आणि वैराग्य यांची प्राप्ती ब्रह्मचारिणी च्या पूजेने होते.शरद ऋतुमध्ये हा ऊत्सव सुरु होतो.वसंताच्या सृजना प्रमाणे जसे वृक्षराजी नवीनतम पालवी फुटून नव्याने सृष्टीला सुशोभित करु लागतात त्याच प्रमाणे या ऊत्सवात नेहमीपेक्षा एक हजार पट अधिक प्रमाणात देवी तत्व पृथ्वीवर कार्यरत असते.म्हणून या कालावधीत “श्री दूर्गादेव्यै नमः”हा जप जितका जास्त करता येईल तितका तो सिध्द होत जातो.

    पहिल्या माळेला माता स्वरुप हे “कुमारीके”प्रमाणे आसतं.दोन वर्षाच्या कन्येचं आणि मातेचं निरागस रुप...त्याची आराधना ऐश्वर्यप्राप्ती देते तर दुसर्या माळेची मातेची छबी ही तिन वर्षाच्या कन्ये प्रमाणे असते.त्रिमूर्तिनी हे नाव धारण केलेले आहे.तिच्या पूजनाने भोग आणि मोक्ष प्राप्ती होते.

    आज पिवळ्या रंगांचे पदार्थ आहारामध्ये असावेत.पिवळ्या रंगांसह पिवळ्याच्या जवळच्या रंगमालेतील सहरंग देखिल याच प्रकारात येतात.

    -- गजानन सिताराम शेपाळ

  • कुष्मांडामाता – चौथीमाळ

    सुरासम्पुर्णकलशंरुधिराप्लुतमेवच।
    दधानाहस्तपद्माभ्यांकुष्मांडाशुभदास्तुमे।।
    पूर्वी अवकाशात अंधार होता. काहीच दिसत नव्हते. अशावेळी मंद, हलकं स्मितहास्य करित मातादेवीने ब्रह्मांडाची निर्मीती केली. म्हणून सृष्टीचे आदीस्वरुप दुर्गामातेला मानले जाते. कुष्मांडा या नावाने तिची पुजा करतात. दाहीदिशांवर मातेचा प्रभाव आहे. सूर्याप्रमाणे तिचे तेज असल्याने ब्रह्मांडातील सर्वजीवमात्रांबर, प्रत्येक वस्तुंवर कुष्मांडामातेचे तेज पडते. तिच्या पुजनाने रोगमुक्ती होते. यश,बळ,शोकमुक्तता,आरोग्य प्राप्त होते. या मातेच्या रुपात मातृत्व ओसंडून वाहते. म्हणूनच अत्यल्प साधनेतूनही कुष्मांडा माता प्रसन्न होते.

    आष्टभुजा धारण केलेल्या मातेने सातपैकी एका हातामध्ये कमंडलु,मगधनुष्य,बाण,अमृतपूर्णकलश,चक्र,गदा आणि आठव्या हातात जपमाळ आहे. शुक्रवारी चौथी माळ आली. अबोली,तेरडा,अशोक,तिळाची फुले या पासून बनविलेली माळही घटाला अर्पण केली जाते. वास्तविक शुक्राचा रंग तसा पांढरा आहे.पण हा रंग आपण सोमवारी ऊपयोगात आणतो. शुक्र हा प्रेमाचा आणि भोग-विलासाचा कारक असून शुक्राचा प्रभाव आपल्या जीवनसाथीवर असतो. प्रेमाचा रंग आणि शुक्राचा रंग अनुक्रमे लाल अधिक पांढरा यांपासून गुलाबी रंग बनतो. ह्यादिवशी हा रंग कपड्यांच्या माध्यमातून वापरल्यास शुक्राची कृपा होऊन माणसाचे जीवन ऐश-आरामात व्यतीत होते. संपत्तीची वृध्दी होते. गुप्तरोगादीसमस्या दूर होण्यास मदत होते.
    यादिवशी ५ वर्षाच्या कन्येच्या रुपात माता असते. तिला रोहिणी असे नामा भिदान आहे. अशा कन्येची देवी स्वरुप मानून पूजा केल्या सराज्य पदप्राप्ती होते. यादिवशी तिला लोण्याचा नैवेद्य दाखविला जातो.

    -शुभंभवतु
    -- प्रा.गजाननशेपाळ

  • स्कंदमाता – पांचवी माळ

    स्कंदमातेने तिच्या भक्तांना विद्या प्राप्तीचं वरदान दिलेलं आहे. सहा वर्गांच्या कन्येचं स्वरुप मानून अशा कन्येला पूजा करवून गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखविला जातो. स्कंदमातेने ती शिवस्वरुप असलेने या दिवशी तिला बेलपत्रांची माळ अर्पण केल्यास ती प्रसन्न राहते. तिला कालीमाता म्हणूनही ओळखतात.

  • दुर्गुण

    आपण नेहमीच दुस-या व्‍यक्तीचे दुर्गुण बघतो, त्‍यावर टीका-टिपण्णी करतो, मात्र आपण आपल्‍यातील दुर्गुणांवर दुर्लक्ष करतो. आपल्यामधील दुर्गुणांकडे आपले कधीच लक्ष जात नाही, नव्हे आपण ते पाहण्याचा प्रयत्नदेखील करीत नाही. माणसाचा स्वभावच असा आहे की त्याला दुसऱ्याचा चांगुलपणा एकवेळ दिसणार नाही, परंतु दुसऱ्यातील दुर्गुण लगेच दिसतील. स्वतःमध्ये कितीही दुर्गुण असले तरी त्याला फक्त स्वतःचा चांगुलपणा आणि दुसऱ्यांचे दुर्गुण नेहमीच दिसतात.

  • भोग

    मनुष्याच्या आयुष्यात सुखाचा भोग असो किंवा दुःखाचा भोग ! तो मनुष्याला संचित पाप कर्म व पुण्यकर्म यामुळेच भोगावा लागतो. संतश्रेष्ठ जगतगुरु संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात प्रमाण देतात की,

    भोगें घडे त्याग । त्यागें अंगा येती भोग ||
    ऐसें उफराटें वर्म । धर्मा अंगीं च अधर्म ||
    देव अंतरे तें पाप । खोटे उगवा संकल्प ||
    तुका म्हणे भीड खोटी । लाभ विचारावा पोटीं ||

    संतश्रेष्ठ संत शिरोमणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा गाथ्यातील अभंग आहे. संत तुकोबाराय या अभंगात असे सांगत आहेत की, एखादा मनुष्य प्रपंचातील विषय भोग घेत असेल आणि त्याला काही काळानंतर त्याचा त्याग करावा वाटला आणि त्याने त्या विषयांचा त्याग केला कि, त्याला लगेच त्या सर्व संचित पाप आणि पुण्य कर्माचा भोग भोगावा लागतो. म्हणजे एखाद्या वाईट व्यक्तीने वाईट कर्म करीत असताना तो करीत राहिला परंतु त्याने तो वाईट कर्म न करण्याचा संकल्प केला आणि त्याने ते वाईट करने सोडून दिले. परंतु त्याने वाईट कर्म सोडून देताच त्याच्यावर दुःखाचा डोंगर किंवा मोठा संकटांचा डोंगर कोसळतो. याचाच अर्थ असा की, त्याने वाईट कर्माचा त्याग करताच त्याच्या पूर्व कर्माचा भोग समोर उभा राहतो.

    संत श्रेष्ठ जगद्गुरू तुकोबाराय असेही सांगतात की, हे असे उफराटे वर्म म्हणजे उलटे वर्म आहे. आणि धर्मा अंगीच अधर्म आहे. ज्या कर्मामुळे देवात आणि भक्तामध्ये अंतर पडते ते कर्म म्हणजे पाप कर्म ! आणि देवाचे कर्म म्हणजेच सत्कर्म ! हे लक्षात घेऊनच भक्ताने नीतीने आणि न्यायाने जगायला शिकले पाहिजे. खोटे व्यर्थ संकल्प चांगल्या व्यक्तीने कायमचे सोडून द्यावे.

    तुकोबाराय शेवटच्या चरणात असे सांगत आहेत की खोटे संकल्प, व्यर्थ संकल्प, खोटी भीड न धरता जिथे आपला लाभ असेल, जिथे आपला परमार्थ असेल तेथे आपण आपला लाभ बघावा. आणि आपण नीती न्यायाने कर्म करीत जगत राहावे.

    *विठोबासी शरण जावे |*
    *निजनिष्ठे नाम घ्यावे ||*

    विठोबाचे शरण जाऊन त्याचे नाम घेत अखंड चिंतन करत राहण्यातच खरा धर्म आहे, खरा स्वार्थ आहे आणि खरा लाभ आहे. कारण विठोबाचे नामस्मरण हे फक्त निमित्तमात्र आहे, परंतु त्यामुळे आपल्या मनात नकारात्मक विचार येत नाहीत. आपण सकात्मक विचाराने पुढील कार्य करायला लागतो, ज्याचे भोग आपणास सकारात्मकच मिळते.

    -- डॉ. शांताराम कारंडे