(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • पक्षीपरिचय २०

      October 8, 2015


  • प्रमुख आहारसूत्र – प्रमेह भाग २३

    पाणी जिथे जास्ती काळ साठून राहते, तो प्रदेश म्हणजे आनूप. या प्रदेशात निर्माण होणारे सर्व अन्नधान्य, पालेभाज्या, फळे ही कफाच्या आधिक्यातील असतात. म्हणून यांचा अतिवापर नको, असे शास्त्रकार सांगतात. या अन्नधान्यादि पासून शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढते आणि अग्निमांद्य होते, तसे होऊ नये. स्पष्ट उदाहरण द्यायचे झाल्यास कोकणातील लोकांनी सफरचंद खाणे. बर्फाळ प्रदेशातील हे फळ समुद्राजवळ रहाणाऱ्या लोकांनी खाल्ले तर पचन बिघडते. आणि क्लेद वाढतो.

    आधीच जमिनीमध्ये, वातावरणात पाण्याचे प्रमाण जास्त अशा प्रदेशातील एखादे फळ आणि तेही रसरशीत असेल तर प्रमेहाला आणखीन पूरक. जसे ऊस. ऊसाचा रस,त्यापासूनची काकवी, गुळ, साखर आणि हे पदार्थ ज्यामधे आहेत, अशा सर्व मिठाया जर खाऊन पचवता आल्या नाहीत तर प्रमेह ठरलेला.

    रसदार फळे नकोतच, त्याचा ज्युस काढून पिणे हे आणखीनच खतरनाक. याविषयी सविस्तर आपण वाचले आहेच.

    आयुर्वेदातील आणखीन एक संकल्पना म्हणजे नवे धान्य आणि जुने धान्य. आजच्या विज्ञानाला कदाचित हे रूचणार नाही, पटणार नाही, पण जेवढे धान्य नवीन तेवढे ते पचायला जड. जेवढे जुने तेवढे पचायला हलके. धान्य सूर्याच्या किरणांनी संरक्षित करून ठेवायची पद्धत भारतीयच ! किमान एक वर्ष जुने तांदुळ वापरले तर भात मोकळा होतो, हे व्यवहारात आपण बघतोच. मोकळा होणे म्हणजे त्यातील चिकटपणा कमी होणे. दही जसे प्रमेहामधे नको, तसेच दह्याप्रमाणे आंबलेले अन्य पदार्थ देखील क्लेद निर्माण करतात. जसे, आंबोळी, इडली, दहिवडा, मेदूवडा, ढोकळा. या पदार्थांमधे केवळ साखर नाही म्हणजे मधुमेहात चालतील असे नाही. तर आयुर्वेदीय पद्धतीने विचार केला तर चिकटणारे, चिकट असणारे आणि चिकटपणा वाढवणारे जे जे पदार्थ आहेत, ते ते सर्व क्लेद वाढवणारे, प्रमेहाचे कारण जाणावे.

    म्हणजे आंबवलेले सर्व पदार्थ बंदच करायचे का ? कधीच खायचे नाही का ?
    नाही. एवढं टोकाला जाऊन अर्थ काढण्याची आवश्यकता नाही.

    आपल्याला चिकटपणा कमी करायचा आहे. पीठ जरी आंबवलेले असले तरी त्या पीठापासून तयार झालेल्या इडली, दहीवडा, ऑम्लेट, या फुगलेल्या पदार्थापेक्षा, डोसा प्रकार जो खमंग खरपूस भाजलेला असतो, त्यामुळे त्यातील जलीय अंश बऱ्यापैकी कमी करून घेतलेला असतो, त्यातील पोकळपणा तुलनेने कमी असतो, तव्याच्या म्हणजे अग्निच्या जास्ती जवळ असतो, म्हणजेच डोसा, पेपरडोसा, मसाला डोसा, हे पदार्थ इतर आंबवलेल्या पदार्थांच्या तुलनेत, पचायला हलके असतील. जेव्हा आंबवलेलेच पदार्थ खाण्याशिवाय अन्य कोणतेही पर्याय उपलब्ध नसतील तेव्हा हे डोसा आयटम आपल्याला नक्कीच मदत करतील!!!!

    चिकटपणा युक्तीने कमी करावा, जेवढा चिकटपणा कमी तेवढे पदार्थ पचायला हलके, चिकटपणा म्हणजे क्लेद. ही सर्व साखळी लक्षात ठेवली तर आपणच ठरवू शकतो, क्लेद कशाने कमी करता येतो ते !
    यासाठी शास्त्रकार अनेक प्रकाराने समजावून सांगताहेत, इथे पाणी आहे, इथे चिकटपणा आहे, इथे ओलावा आहे, इथे हवेत आर्द्रता जास्ती आहे, इथे गती कमी आहे, इथे इथे प्रमेहाचा धोका आहे.

    तेवढी दृष्टी तयार झाली की, झाले. प्रमेह गेलाच म्हणून समजा !

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    08.02.2017

      February 8, 2017


  • अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली

    ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत कारसेवकांनी बाबरी मशिद पाडली आणि देशाच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी मिळाली.
    या महत्वपूर्ण आणि संवेदनशील प्रकरणाचा थोडक्यात इतिहास.
    १५२८: मुघल शासक सम्राट बाबरने अयोध्येत ही मशीद बांधली होती. त्यामुळे या मशिदीला बाबरी मशीद असे म्हटले जाते.
    १८५३: इंग्रजांच्या काळात पहिल्यांदा अयोध्येत जातीय दंगल झाली.
    १८५९: इंग्रजांनी वादग्रस्त परिसरात आतील भागात मुसलमान तर बाहेरील भागात हिंदूंना प्रार्थना करण्याची परवानगी दिली.
    १९४७: वाद झाल्यानंतर सरकारने मुसलमानांना या स्थळावर जाण्यास बंदी घातली. हिंदुंना जाण्याची परवानगी होती.
    १९४९: येथे राम ललाची मुर्ती मिळाली. हिंदूंनी त्या मुर्ती तेथे ठेवल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे नंतर आंदोलन सुरू झाले. दोन्ही गटांकडून खटला दाखल करण्यात आला. मुस्लिम समुदायाकडून हाशिम अन्सारी तर हिंदूंकडून महंत परमहंस रामचंद्र दास हे याचिकाकर्ते झाले.
    १९५०: राम जन्मभूमी न्यासाचे प्रमुख रामचंद्र दास आणि गोपालसिंह विशारद यांनी फैजाबादमध्ये खटला दाखल करून हिंदुंना पुजा करण्याची परवानगी मागितली होती.
    १९६१: सुन्नी केंद्रीय मंडळाने खटला दाखल करून परिसरातील सर्व भाग हा कब्रस्तान (दफनभूमी) असल्याचा दावा केला.
    १९८४: विश्व हिेंदू परिषदेने लालकृष्ण अडवाणी यांच्या नेतृत्वाखाली एक गट बनवला.
    १९८६: फैजाबाद न्यायालयाने दरवाजा उघडण्याची परवानगी दिली आणि हिंदुंना पुजा करण्याची संधी मिळाली.
    १९८९: तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी वादग्रस्त ठिकाणी शिलान्यास करण्याची परवानगी दिली.
    १९९०: लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा सुरू केली. त्यांना देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला. त्यांनी समस्तीपूर येथून अटक करण्यात आली. त्यानंतर भाजपने व्ही.पी. सिंह सरकारचा पाठिंबा काढून घेतला. त्यानंतरच्या निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाले.
    ६ डिसेंबर १९९२: कारसेवकांनी वादग्रस्त वास्तू पाडली आणि तात्पुरते मंदिर बनवले. पी.व्ही.नरसिंहराव सरकारने उच्च न्यायालयात धाव घेऊन येथील बांधकाम ‘जैसे थे’ ठेवण्याची मागणी केली.
    २००३: अलाहाबाद उच्च न्यायालयाने वादग्रस्त स्थळाची खोदाई करून तेथे मंदिर होते किंवा नाही, याचा शोध घेण्याचे आदेश दिले. पुरातत्व विभागाने आपल्या अहवालात मशिदीच्या खाली दहाव्या शतकातील मंदिराचे अवशेष मिळाल्याचे म्हटले.
    २०१०: पहिल्यांदा सरकारने निर्णय बदलत दोन्ही पक्षांनी हे प्रकरण परस्पर मिटवण्यास सांगितले.
    ३० सप्टेंबर २०१०: अलाहाबाद उच्च न्यायालयाने ऐतिहासिक निकाल देत जमिनीचे तीन हिस्से करण्यास सांगितले.
    २०१६: भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन मंदिराच्या निर्मितीची याचिका दाखल केली.
    १८ एप्रिल २०१७: सर्वोच्च न्यायालयाने लालकृष्ण अडवाणी, मुरलीमनोहर जोशी, उमा भारतींसह १७ जणांवर बाबरी मशीद पाडण्याचा कट रचल्याबद्दल खटला चालवण्याची परवानगी दिली.
    ९ नोव्हेंबर २०१९ : रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादावर सर्वोच्च न्यायालयाने रोजी ऐतिहासिक निकाल दिला. अयोध्येतील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यात यावे तर मशीद बांधण्यासाठी वेगळी ५ एकर जमीन देण्यात येणार आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिला.
    गेल्या अनेक वर्षांपासून याप्रकरणी न्यायालयात वाद सुरू होता. मध्यंतरी न्यायालया बाहेर या प्रकरणी तोडगा काढण्याचे निर्देश न्यायालयाने दिले. यासाठी न्यायालयाकडून मध्यस्थीचेही संकेत देण्यात आले होते. पण ९ नोव्हेंबर २०१९ रोजी लागलेल्या या निकालाचे सर्वत्र स्वागत करण्यात आले होते.
    ५ ऑगस्ट २०२० : अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजन सोहळा पार पडला. व श्री रामजन्मभूमी मंदिराच्या टपाल तिकिटाचं पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते प्रकाशन झाले.

    संकलन: संजीव वेलणकर.

    ९४२२३०१७३३

    पुणे.

      December 6, 2021


  • निरोगी राहाण्यासाठी काय करावे-भाग तेरा

    जगण्याची साधी सोप्पी तत्वे-भाग एकशे एकोणीस

    आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे-क्रमांक •बारा•

    नित्यं हिताहारविहारसेवी
    समीक्ष्यकारी विषयेषु असक्तः ।
    दाता समः सत्यपरः क्षमावान
    आप्तोपसेवी च भवति अरोगः ।।

    शास्त्रकारांनी निरोगी राहण्यासाठी कसं वागायचं हे सांगितले. व्यवहारात देखील आपले आईवडील आपल्याला काही उपदेशपर गोष्टी सांगत असतात. ते हितोपदेश म्हणजे आरोग्याचा बटवा असतो.

    मुलीला आई चार गोष्टी दररोज सुनावत असते.
    "अस्सं वाग, अस्स कर. अस्स करू नकोस, तू ना, आमची अगदी इज्जतच काढणार आहेस." वगैरे वगैरे.
    आणि मुलींनाच जास्त ओरडा खावा लागतो. तेव्हा आई हा प्राणी तिचा जगातला एक नंबरचा शत्रू असतो.
    " तू सारखं सारखं तेच तेच तेच तेच सांगत राहू नकोस, झाली कटकट सुरू, तू मला सांगतेस, त्या दाद्याला का सांगत नाहीस, सगळ्या चुका काय माझ्याच असतात काय,"
    आणि हे भांडण शेवटी...
    " मी मुलगी आहे, म्हणून काहीही ऐकून घ्यायचं काय ? "
    या वाक्यावर येऊन थांबत असतं.
    प्रत्येक घरात अगदी हे असंच चाललेलं असतं.

    हे खरं पण आहे. "मुलीवर लग्नानंतर लक्ष ठेवण्यासाठी तिथे मी नसणार, मुलाचं काही चुकलं, तर जे काही होईल, ते माझ्या डोळ्यासमोर होईल. मुलगी म्हणजे परक्याचं धन वगैरे, मी माझ्या मुलाला कधीही बदलवू शकते" अशा सरासर खोट्या आणि भ्रामक विश्वातून आई कधीच बाहेर येत नाही.

    आणि नंतर जे व्हायचं तेच होतं. जी आई कधीकाळी शत्रू नंबर वन होती, मुलीला ती लग्नानंतर मात्र सद्गुणांचा पुतळा वगैरे भासू लागते. ( मला कुणाच्या भावना दुखवायच्या नाहीत, पण जे अवतीभवती दिसतं ते सांगतोय, एवढंच. )

    सांगायचंय काय तर,
    लग्नानंतर मुलीला, आईनं केलेले हितोपदेश आठवू लागतात.
    सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आईची सुरू असलेली बडबड आठवून डोळ्यातून गंगाजमुना वाहू लागतात.

    मनात म्हटलं जातं,
    "तू त्यावेळी सांगितले होतेस,
    तेव्हा मला तुझा राग येत होता,
    जीवाचा अगदी त्रागा होत होता.

    तू सांगायचीस,

    उतू नये मातू नये,
    घेतला वसा कधी टाकू नये.

    एकमेकांचे उष्टे खाऊ नये.
    घटाघट पाणी पिऊ नये.
    उगाच आरश्यात पाहू नये.
    केसांना हात लावू नये.
    पदार्थ उघडा ठेऊ नये.
    दुधावर फुंकर घालू नये.
    पिंपात तांब्या बुडवू नये.
    पातेलं खरडून वाढू नये.
    ताटाच्या बाहेर सांडू नये.
    पंगतीत ढेकर देऊ नये.
    मधेच पंगतीतून उठू नये.
    शिरा ताणून बोलू नये.
    उगाच वाद ओढवू नये.
    शब्दाने शब्द वाढवू नये.
    उंबऱ्याच्या मर्यादा विसरू नये.
    माहेरचे कौतुक सांगू नये.
    कुणाचे वर्म काढू नये.
    वर्मावर बोट ठेऊ नये.
    मोठ्यांचा मान मोडू नये
    लहानाशी खेळणं सोडू नये
    दुसऱ्याचे दोष पाहू नये
    दिलेले दान कळू नये.
    धर्मशाळेत जेवू नये.
    अंथरूणातून सूर्य पाहू नये.
    गादीवर जास्त लोळू नये.
    आळस मोठ्ठा देऊ नये.
    तोंडाचा आऽ करू नये.
    पाय पसरून बसू नये.
    पाचकळ बाचकळ बोलू नये.
    फिदीफिदी उगा हसू नये
    भोकाड मोठे पसरू नये.
    हट्टीपणा बरा नव्हे.
    फुकाचे बोल बोलू नये.
    कर्मकांड टाकू नये.
    प्रयत्न कधी सोडू नये.
    मनात विकल्प आणू नये.
    भूतकाळा आठवू नये.
    भविष्याचा विचार करू नये.
    वर्तमानाशिवाय राहू नये.

    विसरू नये देवाला
    विसरू नये कर्माला
    विसरू नये संस्काराला
    विसरू नये राष्ट्राला

    पण आता हे पटायला लागलंय,
    तू सांगत होतीस, ते बरोबर असं आता वाटायला लागलंय.
    तू मला तेव्हापासून बडवत होतीस,
    ताईला नाही तर एका आईला घडवत होतीस.

    तुझा एकेक शब्द आता मला आठवू लागलाय.
    माझ्या मुलीच्या कानात तो रोज जाऊ लागलाय.

    माझ्या मुलीबरोबर तेच भांडण मी करायला लागलीय.
    तुझ्या नातीला आता मी तेच सांगायला लागलीय.

    अगदी तुझा ठेका मला जमायला लागलाय.
    'ह्यांना' सुद्धा तो जाणवायला लागलाय.

    तू सांगितलेला प्रत्येक शब्द काळजात रुतून बसलाय.
    आता माझ्या जीभेतून बाहेर येऊ लागलाय.

    हितोपदेश तुझा आता आठवू लागलाय
    मला "आई" बनवू लागलाय.

    वैद्य सुविनय दामले.
    कुडाळ सिंधुदुर्ग.
    9673938021
    02362-223423.
    ०८.०८.२०१७

      August 8, 2017


  • काल, आज आणि उद्या !

    आंबेडकरी साहित्यासमोरील आव्हान!
    परिवर्तन हा जगाचा स्थायीभाव आहे. संपूर्ण जग सतत बदलत असते.

      February 12, 2006


  • श्रीहरी स्तुति – ४३

    प्रस्तुत स्तोत्राचा समारोप करतांना आचार्यश्रींनी पारंपरिक पद्धतीची फलश्रुती मांडलेली नाही. याच नव्हे तर कोणत्याही स्तोत्राची जी अंतिम अपेक्षा आहे, थेट तिचेच प्रतिपादन करीत आचार्य श्री स्तोत्राचे समापन करतात. त्या परमेश्वराला प्रार्थना करतात,

      December 3, 2020


  • आरोग्यदायी सप्तरंगी स्वस्तिके

    आपल्याकडे कुंकवाने दारावर, भिंतीवर लाल स्वस्तिक काढायची पद्धत आहे. मात्र स्वस्तिके वापरून आरोग्य सुधारता येते याबद्दल कोणतीही माहिती शास्त्रीय ग्रंथात उपलब्ध झाली नाही. मी एका लेखात वाचले की स्वस्तिकात खूप पॉवर असते. त्यावरून कल्पना सुचून मी इंद्रधनुष्याच्या सात रंगाची स्वस्तिके तयार केली. आणि असे लक्षात आले की, रंग किरण चिकित्सा आणि रंगीत स्वस्तिकाचे गुण साधारणतः सारखे आहेत.

    ठराविक आकाराचे व रंगाचे स्वस्तिक शरीरावर योग्य ठिकाणी लावल्यास आरोग्य सुधारते असे अनुभव आले. लाल स्वस्तिक छातीवर ठेवले असता कफ कमी होतो. थंडीच्या दिवसांत लाल स्वस्तिकावर बसले असता थंडी कमी वाजते. पिवळे स्वस्तिक माकाहाडला लावले असता संडासला साफ होते आणि वात कमी होतो. फिक्यानिळ्या रंगाचे स्वस्तिक बेंबीवर लावले असता अॅसिडीटी, पित्ताचा त्रास कमी होतो. गर्द निळे स्वस्तिक बेंबीवर लावले असता पचन शक्ती वाढते. हिरवे स्वस्तिक उन्हाळ्यात टोपीमध्ये ठेवले असता उन्हाचा त्रास कमी होतो. अशा प्रकारे अभ्यास करवून घेऊन "आरोग्यदायी सप्तरंगी स्वस्तिके" असे पुस्तक २००७ साली परमेश्वराने माझ्याकडून लिहून घेतले. ते वाचून अनेकांनी स्वतः स्वस्तिके तयार करून वापरली तर अनेकांनी माझ्याकडून स्वस्तिकाचे सेट नेऊन ती स्वस्तिके वापरली आणि त्यांना फायदा झाला.

    स्वस्तिके शरीरातील सात चक्रांना किंवा अवयवांना आजाराप्रमाणे किमान दोन तास ते दिवसभर लावावीत. स्वस्तिकाची रंगीत बाजू शरीराला लागली पाहिजे.

    स्वस्तिकाला जे अधिकचे चिन्ह आहे. त्याची लांबी विषम संख्येत असावी. म्हणजे एक इंच, तीन इंच, सात इंच इ. स्वस्तिकांच्या भुजांची रुंदी लांबीच्या १० ते १२ टक्के असावी. स्वस्तिकाचे रंग इंद्रदानुष्याच्या रंगाशी मिळते हवेत. सध्या बाजारात उपलब्ध व्हायोलेट रंगात तांबडा रंग कमी आहे.तो जांभळा हवा. स्वस्तिक हे कागदावर (शक्यतो पांढरा), सफेद कापडावर, थार्मोकोलवर, पांढर्या प्लास्टिक शीटवर काढले तरी चालते. स्वस्तिक निट आखून घेऊन काढणे चांगले. यासाठी वाॅटर कलर, ऑईल पेंट, बाटिक पेंट, छपाई चे रंग व कोणत्याही प्रकारचे रंग चालतात. माझेकडे कार्ड पेपरवर छापून व लॅमिनेट करून घेतलेली स्वस्तिके तयार आहेत व ती चांगली उपयोगी पडत आहेत.

    स्वस्तिक तयार करणे
    स्वस्तिकाची लांबी व रुंदी पाच इंच पाहिजे. रेषांची जाडी अर्धा इंच. पांढरे कागदावर स्वस्तिक वाँटर कलरने काढून पुठ्याला चिकटवावे. नंतर प्लँस्टिकच्या पिशवी ठेवून वापरावे.लाल स्वस्तिक कुंकवात पाणी व थोडा डिंक किंवा फेवीकाँल घालून काढावे . तसेच पिवळे हळद वापरून काढावे.नंतर पुठ्यावर चिकटवून प्लँस्टिकच्या पिशवीत ठेवून वापरावे

    अरविंद जोशी B.Sc.
    ९४२१९४८८९४

      June 22, 2017


  • विविध प्रकारच्या मुद्रण यंत्रांचे काम कसे चालते?

    फाऊंड्रीमध्ये धातुंचे ओतकाम करताना ज्याप्रमाणे प्रथम पॅटर्न तयार करुन नंतर साचा करतात व त्यातून हजारो नग बनवतात. त्याप्रमाणे जे छापायचे त्याच्या प्रतिमेसाठी माध्यम तयार करुन त्याला छपाई यंत्रावर लावून हजारो प्रती छापता येतात.इतिहासजमा झालेल्या रिलीफ छपाई पद्धतीतील लेटर प्रेसवर चित्रे आणि छायाचित्रांसाठी ब्लॉक्स आणि मजकूरासाठी खिळे वापरत.

      May 23, 2023


  • डाकूंचे राज्य

    ‘राज्याच्या तिजोरीत ठणठणाट आहे’, सत्ताधाऱ्यांकडून अगदी नेमाने आळवले जाणारे हे पालूपद. शेतकऱ्यांना पैसा द्यायचा तर तिजोरीत ठणठणाट, सिंचन प्रकल्प पूर्ण करायचे तर तिजोरीत ठणठणाट, विजेची समस्या दूर करता येत नाही, कारण तिजोरीत ठणठणाट. सगळ्या प्रश्नांना एकच उत्तर तिजोरीत ठणठणाट.

      May 13, 2007


  • टेनिस एल्बो आजार

    टेनिस खेळल्यास हा आजार होतो म्हणून त्याचे नाव 'टेनिस एल्बो' असे पडले असले तरी हा आजार कोणालाही होऊ शकतो. टेनिस एल्बो म्हणजे दुखरा कोपरा. मनगटाला दंडाशी जोडणाऱ्या सांध्यावर ताण पडल्यावर कोपरा सुजतो. या आजारात कोपराच्या बाह्य भागाला वेदना होतात.

    कसा होतो? : हात सतत पूर्ण ताठ ठेवून काम केल्याने किंवा एकाच प्रकारे हातांची हालचाल होत असल्यास त्याचा भार कोपरावर पडून हा आजार होऊ शकतो. यामध्ये वयाचाही प्रभाव पडतो. टेनिस एल्बो झालेल्या बहुतांश व्यक्तींचे वय ३५ ते ५० यादरम्यान असते.

    टेनिस एल्बोची लक्षणे कोपराच्या बाह्य भागात वेदना होतात., कोपरावर बाहेर आलेल्या हाडाचे टोक दुखरे होते. वस्तू पकडताना किंवा हालचाल केल्यास मनगटात वेदना होतात, हाताच्या स्नायूंवर ताण देणाऱ्या हालचाली केल्यास (वजनदार वस्तू उचलणे इ.) वेदना होतात. सकाळी झोपेतून उठल्यावर हाताची हालचाल नीट होत नाही. हाताला मुंग्या येतात.

    टेनिस एल्बो वर उपचार

    आराम : त्रास होत असलेल्या हाताने स्क्रू ड्रायव्हर, हातोडी किंवा अन्य वजनदार वस्तू पकडणे काही काळासाठी बंद करावे. खरे तर आदर्श उपचारपद्धतीत कोपराला सहा आठवडे आराम देणे हे योग्य असते. पण दैनंदिन जीवनात हाताने करण्याची सर्व कामे बंद करणे शक्य होत नाही, म्हणून जड वस्तू न उचलण्याची खबरदारी घ्यावी.

    बर्फ : त्रास होत असलेल्या ठिकाणी बर्फाचा शेक द्यावा.

    व्यायाम : नुसता आराम केला तरी स्नायू कमजोर होतात व काम सुरू केल्यावर पुन्हा दुखू लागतात. त्यामुळे दंडाचे तसेच मनगटाचे स्नायू मजबूत करण्यासाठी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली व्यायाम करावा.
    टेनिस एल्बो वरील औषधे हातावरची सूज कमी करण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
    आजार बळावल्यास काहीवेळा शस्त्रक्रियेचा पर्याय अवलंबला जातो.

    प्रतिबंधात्मक उपाय : स्नायू मजबूत राहिल्यास कोपराजवळचे सांधे ही मजबूत राहतील.
    हाताचे दंड, कोपरा, मनगट मजबूत होण्यासाठी व्यायाम करावा.

    संजीव वेलणकर पुणे.
    ९४२२३०७१३३
    संदर्भ.डॉ. रामप्रभू, अस्थिरोगतज्ज्ञ,

      January 18, 2017