(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • वेगळा विदर्भ का?

    वेगळा विदर्भ का?
    हा कायमच चर्चेचा विषय आहे.
    काही लोकांच्या मनात याबाबत साशंका सुद्धा आहे कि जर वेगळा विदर्भ झाल्यास आपण सक्षम होऊ कि नाही. पण खालील काही बाबींवर कृपया विचार करा आणि सांगा कि फायदा कुणाचा होईल. पण कृपया वाचा एकदा तरी.छत्तीसगड हे राज्य मध्यप्रदेश पासून वेगळे झाले. आता छत्तीसगड चा विकास दर (growth rate) - 9.2% आहे, आणि मध्यप्रदेश चा फक्त 4.2%.
    झारखंड हे राज्य बिहार पासून वेगळे झाले. आता झारखंड चा विकास दर 11.1% आहे, आणि बिहार चा फक्त 4.7%
    उत्तराखंड हे राज्य उत्तरप्रदेश पासून वेगळे झाले. आता उत्तराखंड चा विकास दर 8.8% आहे, आणि उत्तरप्रदेश चा 4.6%
    तेलंगणा हे राज्य आंध्रप्रदेश पासून वेगळे झाले पण तेलंगणा चा विकास दर 9.8% आणि आंध्रप्रदेश चा फक्त 5.5%.
    तर आता तुम्हीच सांगा कि,
    विदर्भात तर महाराष्ट्राच्या 70% वीज तयार होते.
    विदर्भात महाराष्ट्राच्या 70% खनिज आहे.
    विदर्भात तर महाराष्ट्राच्या 70% कापूस उत्पादन होते.
    विदर्भात तर 80% जलसिंचन सुविधा उपलब्ध आहे.
    विदर्भात तर 54% वनसंपदा आहे.
    विदर्भ तर सर्वात जास्त सोयाबीन, कापूस, डाळ, तूर, तांदूळ, संत्री महाराष्ट्राला देतो.
    विदर्भात तर महाराष्ट्राच्या 9 कृषी हवामान पैकी सर्वात निश्चित पावसाचा प्रदेश आहे.
    विदर्भात तर पर्यटनाला खूप वाव आहे.
    विदर्भात तर महाराष्ट्रातील 6 व्याघ्र प्रकल्पापैकी 5 प्रकल्प आहे.
    तर आता सांगा कि विदर्भाचा विकास दर काय असेल.
    कृपया तुम्हीच विचार करा.
    आपण भारतातील सर्व राज्यांना मागे टाकू शकतो इतके निसर्ग देवतेने विदर्भाला भरभरून दिले आहे. फक्त विकास न होण्याचे कारण म्हणजे आपल्याला माहित नसलेली आणि पश्चिम महाराष्ट्राने हेरलेली आपली क्षमता.
    म्हणून विदर्भाविषयीची अस्मिता सर्वांमध्ये निर्माण होऊ द्या, आणि अभिमानाने म्हणा
    जय विदर्भ

    स्वतंत्र विदर्भराज्य चळवळ

    गेल्या काही वर्षात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीने जोर धरला आहे. विदर्भ प्रांत हा पश्चिम महाराष्ट्र व मुंबईच्या मानाने कितीतरी पटीने आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे, तसेच काही प्रमाणातील स्वतंत्र सांस्कृतिक बैठक हे मुद्दे धरुन स्वतंत्र विदर्भाची मागणी गेली कित्येक वर्षे स्वतंत्र राज्याचे पुरस्कर्ते करत आले आहेत. परंतु महाराष्ट्राच्या इतर प्रांतातून होणारा विरोधही पुष्कळ आहे. स्वतंत्र विदर्भात आर्थिक व सामाजिक प्रगती झपाट्याने होइल असा त्यांचा अंदाज आहे तर विरोधक असे मानतात की विदर्भ जर वेगळा झाला तर महाराष्ट्राकडून मिळणार्‍या अनेक आर्थिक सोयीसुविधांना विदर्भातील जनता मुकेल व विदर्भाची प्रगती अजून खुंटेल.

    नागपूर करार

    *विदर्भ हा महाराष्ट्र राज्यात सामिल व्हावा म्हणून नागपूर येथे दि. २८ सप्टेंबर १९५३ रोजी नागपूर येथे एक करार करण्यात आला. या करारास कोणतीच कायदेशीर मान्यता किंवा वैधता नाही.हा एक प्रकारचा समझोताच होता. त्यानुसार विदर्भाला संयुक्त महाराष्ट्रात (एक मराठी भाषिक प्रदेश म्हणून) सामील करून घेण्यात आले. राज्य पुनर्रचना आयोगाचे मत हे वेगळे होते, त्यांना मराठी भाषी प्रदेश एकत्र यायला नको होता..*

    इतिहास विदर्भाचा

    *विपुल प्रमाणात दर्भ उगवणारा प्रदेश तो विदर्भ अशी याच्या नावाची व्युत्पत्ती आहे. नागपूर ही मराठा राज्यसंघातील भोसले घराण्याची राजधानी होती. भोसल्यांचे राज्य जवळजवळ पूर्ण मध्य-पूर्व भारतात पसरलेले होतं. १८१८ च्या तिसर्‍या इंग्रज-मराठा युद्धातील पराभवानंतर भोसल्यांचा प्रभाव फक्त नागपूर विभागातच मर्यादित झाला. १८५३ मध्ये नागपूरच्या राजाचा म्रुत्यू झाला. त्यांच्यामागे कोणी वारस नसल्याने भोसल्यांचे राज्य इंग्रजी साम्राज्यात विलीन करण्यात आले. (१८६१).*

    विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई यांचे माहेर आहे.

    सन १८५३पर्यंत अमरावती आणि आसपासचा प्रदेश, ज्याला पूर्वी वर्‍हाड (बेरार) म्हणून ओळखले जायचे, तो हैदराबाद येथील निजामाच्या अंमलाखाली होता.. त्या वर्षी, निजामाचे अराजक बघून ब्रिटिश वसाहत अधिकरणाने या प्रदेशाचा प्रत्यक्ष ताबा घेतला. सन १९०३ मध्ये वर्‍हाड मध्य प्रांताला (सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस)ला जोडला गेला.

    सन १९४७ मध्ये भारताच्या स्वातंत्र्यानंतर सेन्ट्रल प्रॉव्हिन्सेस व बेरार हे मध्य प्रदेश म्हणून भारतातील एक राज्य झाले. सन १९५६ मध्ये, मराठी बोलल्या जाणार्‍या प्रदेशांच्या एकीकरणासाठी विदर्भ क्षेत्राचा समावेश मुंबई राज्यात करण्यात आला. मुंबई इलाख्याचे सन १९६० मध्ये, भाषेच्या आधारावर महाराष्ट्र व गुजरात यामध्ये विभाजन करण्यात आले, आणि मराठी बोलणारा विदर्भ हा महाराष्ट्र राज्याचा एक भाग झाला. आता याच विदर्भाचे राज्य व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण त्यालाही विरोध होत आहे. त्यामुळे विरोधकांना काय साध्य होणार आहे.

    जनार्दन गव्हाळे,
    खामगाव, जिल्हा बुलढाणा, विदर्भ.

      September 15, 2016


  • स्पर्धाच गुरू

    एकांगी वर्चस्व किंवा ‘मोनोपोली’ ही कोणत्याही क्षेत्रासाठी तशी घातकच असते. केवळ फायद्याच्या दृष्टीने विचार केला तर कदाचित असे एकांगी वर्चस्व घातक ठरणार नाही, उलट चारही बाजूने फायदाच होऊ शकतो. परंतु एकूण विकासाचा विचार केला तर मात्र असे एकांगी वर्चस्व नक्कीच घातक ठरू शकते.

      April 1, 2007


  • मराठी संगीत रंगभूमी

    मराठी संगीत रंगभूमी

    काही वर्षांपूर्वी बंगाली रंगभूमी ही अतिशय प्रगत आणि प्रगल्भ आहे आणि ती भारतात प्रथम क्रमांकावर आहे, असं मानलं जात होतं, परंतु प्रथम क्रमांकाची जागा आता सर्वांगानी बहरलेल्या अशा मराठी रंगभूमीने घेतली आहे, असं मानायला काहीच प्रतिवाद नसावा. व्यावसायिक, प्रायोगिक, हौशी, समांतर रंगभूमी, बाल रंगभूमी, कामगार रंगभूमी, दलित रंगभूमी अशा विविध नाट्यक्षेत्रात नवेनवे प्रयोग चालू आहेत, परंतु मराठी संगीत रंगभूमी, जी महाराष्ट्राने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी अशी मानली जाते, तिची पिछेहाट झालेली दिसते, किंबहुना ती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे, असं म्हटलं जातं.

    ग्रंथाक्षर या दिवाळी २००९ विशेषांकात रामदास कामत ह्यांनी लिहिलेला हा लेख

      June 27, 2025


  • धोरण बदला, देश पळायला लागेल !

    चूक सरकारच्या धोरणामध्ये आहे. दुर्दैवाची बाब ही आहे, की हे चुकीचे धोरण बदलून नवे धोरण कसे असावे हे सांगण्याऐवजी अण्णा हजारे सारखे लोक केवळ भ्रष्टाचार आणि काळा पैशाच्या नावे बोंब ठोकत साप सोडून भुई थोपटत आहेत. नवीन धोरण लागू करण्याची हिंमत कोणतेही सरकार दाखवू शकत नाही. सरकारने ही हिंमत दाखविली, तर आज खुरडत चालणारा हा देश उद्या भरधाव वेगाने पळू लागेल; परंतु असे सरकार या देशाला लाभेल का हाच खरा प्रश्न आहे!

      June 11, 2012


  • अमेरिकतील आमचे फार्मवरचे जीवन – भाग १

    मी पेशाने पशुवैद्यक (Veterinary doctor) आहे. मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयातून १९८६ साली, ‘पशुप्रजनन’ शास्त्रामधे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून, बरीच वर्षं गुजरातमधे नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड (NDDB) ह्या प्रसिद्ध संस्थेच्या, ‘गाई म्हशींमधे कृत्रिम गर्भारोपण’ (Embryo Transfer), ह्या प्रकल्पावर डेप्युटी मॅनेजर म्हणून काम करत होतो. परदेशात जाऊन उच्च शिक्षण घेण्याची मनापासून इच्छा होती, पण प्रयत्न करूनही योग जमत नव्हता. शेवटी २००० सालच्या अखेरीस, युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट मधे Ph.D. करण्यासाठी संधी मिळाली. डॉ. जेरी यॅंग सारखा, ‘क्लोनिंग’च्या क्षेत्रातला नावाजलेला संशोधक, गाईड म्हणून मिळत होता आणि असिस्टंटशिप द्यायलाही तयार होता. अशी संधी परत मिळणार नव्हती. घरच्यांच पाठबळ होतं. मी नोकरीचा राजीनामा दिला आणि ४ जानेवारी २००१ ला, वयाच्या चक्क अडतिसाव्या वर्षी, Ph.D. करण्यासाठी अमेरिकेत येऊन दाखल झालो.

    पहिली सेमीस्टर झाल्यावर, माझ्या संशोधन प्रकल्पासाठी, डॉ यॅंगने मला आयोवा राज्यातल्या, ‘गायींमधे कृत्रिम गर्भधारणा’ करण्याच्या क्षेत्रातल्या, अमेरिकेतील सर्वात मोठया कंपनीत पाठवायचा निर्णय घेतला. अमेरिकेतील बहुतेक भारतीय, पूर्व किंवा पश्चिम किनारपट्टी किंवा दक्षिणेकडच्या मोठमोठया शहरांत रहात असल्यामुळे,‘आयोवा’ म्हटल्यावर त्यांना नकाशाचा आधार घ्यावा लागतो. पूर्व/पश्चिम किनारपट्टीवरच्या प्रगत राज्यांच्या आणि मोठमोठ्या शहरांच्या तुलनेत, अमेरिकेच्या मध्य भागातील (midwest) राज्ये, ही कमी प्रगत आहेत. दक्षिणेला टेक्सास राज्याच्या निमुळत्या मुठीसारख्या (pan handle) भागापासून, उत्तरेला कॅनडापर्यंत आणि पश्चिमेला रॉकी पर्वतराजीपासून पूर्वेकडे इंडियाना राज्याच्या सीमेपर्यंत, अमेरिकेचा प्रचंड मोठा भाग सपाटसा आहे. यात अमेरिकेच्या सोळा राज्यांचा आणि कॅनडाच्या तीन प्रॉव्हीन्सेसचा समावेश होतो. १४९२ साली जेंव्हा कोलंबसची गलबतं या नवीन जगाच्या किनार्‍यावर येऊन थडकली, तेंव्हा युरोपियनांना अनभिज्ञ अशा अमेरिका या प्रचंड भूखंडाचा एक तृतीयांश भाग (सुमारे १० लाख चौरस मैल) -आजचा ‘मिडवेस्ट’ - कुरणांनी आच्छादलेला होता.

    अमेरिकेचं भौगोलिक वैविध्य असं आहे की तिच्या पूर्वेकडच्या निम्या भागाकडे बघून, पश्चिमेकडच्या उरलेल्या निम्या भूभागाची अजिबात कल्पना येत नाही. इंडियाना राज्यामधून आपण पश्चिमेकडे जाऊ लागलो की विस्कॉनसीन, मिनेसोटा, इलिनॉय, आयोवा, मिसुरी, अर्कान्सास ही दक्षिणोत्तर पसरलेली राज्ये लागतात. यांचे भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजे, उंच सळसळणार्‍या गवताळ कुरणांनी आच्छादलेल्या, सर्वदूर पसरलेल्या छोटेखानी टेकडया. हा भूभाग म्हणजे ‘प्रेअरी’. एकेकाळच्या उंच सळसळणार्‍या गवताची जागा, आता तशाच उंच मक्याच्या पिकाने घेतली आहे. त्यामुळे प्रेअरीचं आताचं स्वरूप म्हणजे मका आणि सोयाबीनच्या पिकांनी भरलेली शेतं आणि त्यात मधे मधे विखुरलेले गायी आणि डुकरांचे फार्मस्‌. अशाप्रकारे मका, सोयाबीन, गो-पालन आणि वराह-पालन ह्या चार मजबूत खांबांवर प्रेअरीचा सारा भूभाग तोललेला आहे.

    इथून आणखी पश्चिमेकडे सरकावं आणि नॉर्थ डकोटा, साउथ डकोटा, नेब्रास्का, कान्सास, ओक्लाहोमा आणि टेक्सास अशी पुढची, उत्तर दक्षिण पसरलेली राज्यांची फळी लागते. या राज्यांचा पूर्वेकडील साधारण एक तृतीयांश भाग देखील प्रेअरीमधेच मोडतो. या सार्‍या राज्यांतून, १०० अक्षांश उत्तर दक्षिण जातं आणि या नैसर्गिक भौगोलिक सीमेपाशी, अचानक भूभागात बदल जाणवायला लागतो. या अक्षांशापासून जसजसं पश्चिमेकडे जावं तसतशा छोटेखानी टेकड्या नाहीशा होतात आणि जमीन सपाट होत जाते. सळसळत्या गवताची जागा खुरट्या गवताने घेतली जाते. या राज्यांचा पश्चिमेकडचा भाग आणि त्याही पलीकडची मॉंटेना, वायोमींग, कोलोरॅडो, न्यू-मेक्सिको ही राज्ये म्हणजे ‘ग्रेट प्लेन्स’. पूर्वी या भागात बायसनचे क्षितीजापर्यंत पसरलेले कळप असायचे. आता तिथे मुख्यत्वे बीफ गायींचे मोठमोठे चराऊ रॅंचेस आहेत. त्यामुळे ‘प्रेअरी’च्या भागात मुख्यत्वे शेती आणि ग्रेट प्लेन्सच्या भागात मुख्यत्वे ‘चराऊ कुरणे’ अशी सध्याची विभागणी दिसून येते.

    बदलणार्‍या भूभागानुसार केवळ शेती / पशूपालनाच्या पद्धतीत फरक पडतो असं नाही. जसजसं आपण अधिक पश्चिमेकडे जावं, तसतशा counties (जिल्हे) मोठ्या होत जातात, रस्ते अधिक सरळसोट होत जातात, गावं तुरळक होत जातात. गावकर्‍यांच्या टोप्यांकडे बघून देखील थोडाफार अंदाज बांधता येतो. शेतकरी साधारणपणे शेतकी अवजारांच्या कंपन्यांच्या किंवा जनावरांच्या breeding कंपन्यांच्या बेसबॉल कॅप्स वापरतात. मोठमोठ्या कुरणांचे मालक (ranchers) बहुदा काउबॉय हॅट्स वापरतात. साधारण १०० अक्षांशाच्या आसपास सुरू झालेल्या या अमर्याद सपाट जमिनीचा चढ, पश्चिमेकडे दर मैलामागे १० फुटांनी वाढायला लागतो तो थेट रॉकी पर्वतराजी सुरू होईपर्यंत.

    अमेरिकेच्या अतिप्रगत अशा पूर्व आणि पश्चिम किनार्‍यावरच्या लोकांच्या दृष्टीने, हा सारा भूभाग म्हणजे फक्त विमानात बसून, माना वाकड्या करून खिडक्यांतून खाली बघून पाहाण्यापुरता. त्याच्यावरून ३०,००० फूटांवरून उडत जायचं म्हणून त्याला कुत्सितपणे ‘Fly over country’ असं म्हटलं जातं. उगाच नाही आयोवा किंवा मिडवेस्ट म्हटलं, की इतर अमेरिकन लोकं नाकं मुरडत ! मुंबईच्या खार, पार्ल्याच्या किंवा पुण्याच्या डेक्कन, कर्वे रोडच्या लोकांना इचलकरंजी, वीटा किंवा बुलढाण्याचं नाव ऐकून कसं वाटतं, साधारण तसंच बाकी अमेरिकन्सना मिडवेस्टबद्दल वाटतं.

    आयोवाच्या उत्तर पश्चिम कोपर्‍यात, ‘सू सेंटर’ नावाचं एक छोटंस गाव आहे. बर्‍याचशा नकाशांत त्याचं नामोनिशाणही नसतं. उच्चाराप्रमाणे स्पेलिंग लिहिताना हमखास चुकायला होतं. खरं स्पेलींग आहे Sioux. गोर्‍या लोकांनी अमेरिकेचा कब्जा घेण्यापूर्वी, या भागात Sioux जमातीचे रेड इंडियन लोकं रहात होते. त्यावरून या सर्व भागाला (आयोवाचा उत्तर-पश्चिम भाग, मिनेसोटाचा थोडासा दक्षिण भाग आणि साउथ डाकोटा राज्याचा दक्षिण-पूर्व भाग) Sioux land म्हणतात. त्यामुळे या भागात सू सेंटर, सू सिटी, सू फॉल्स, सू रॅपीड्स अशी बरीच गावं / शहरं आहेत. या भागातून वहाणार्‍या नदीचे नाव देखील big Sioux river असंच आहे. तर अशा या सू सेंटरची वस्ती आहे केवळ सहा हजार. पण या छोट्याशा गावात, गायींमधे कृत्रिम गर्भधारणा आणि तत्सम क्षेत्रामधे संशोधन व काम करणारी, Trans Ova Genetics नावाची, अमेरिकेतील सर्वात मोठी कंपनी आहे. माझ्या प्रकल्पाच्या कामाच्या निमित्ताने, मी या कंपनीत २००१ च्या जुलै महिन्यात दाखल झालो. माझ्य़ा पाठोपाठ दोन आठवडयात, माझी बायको मृणालिनी आणि आमचा ६ वर्षांचा मुलगा सिद्धार्थ, मुंबईहून सरळ सू सेंटरला आले; आणि बघता बघता, १४ दशलक्ष लोकवस्तीच्या मुंबई शहरात आयुष्य काढलेलं, एक मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंब, अमेरिकेच्या मध्यावर, गाईगुरांच्या कुरणांमधे आणि मक्या-सोयाबीनच्या शेतांमधे, सहा हजार लोकवस्तीच्या एका खेडेवजा गावकुसाचं रहिवासी झालं.

      June 29, 2015


  • ग्रेगरीयन कालगणनेनुसार उद्यापासून दिवस मोठा होत जाईल

    पृथ्वीचा अक्ष २३. ४५ अंशाने कललेला असल्याने सूर्याची उगवण्याची आणि मावळण्याची जागा दररोज थोड्या प्रमाणात बदलत असते ह्या सूर्याच्या मार्गाला आपण आयनिकवृत्त असे म्हणतात. सहा महिने सूर्य उत्तर पृथ्वीच्या ध्रृवीय भागात व सहा महिने दक्षिण पृथ्वीच्या ध्रृवीय भागात असतो. अशा प्रकारे वर-खाली सरकताना तो दोन वेळा पृथ्वीच्या विषुववृत्ताच्या समान पातळीत येतो. त्यावेळेस दिवस-रात्र समान १२ तासांचे असतात.

      March 21, 2022


  • आपण निजहस्तें बनवूं भारत परतंत्र ! : भाग ३

    आमचे नेते व बुद्धिवंत या नीतीचं समर्थनच करतात, हाच प्रगतीचा मार्ग आहे असं सांगत असतात. मी सुद्धा तुम्‍हाला हेच सांगतो की, भारताला असंच परतंत्र होऊ दे ! विचित्र वाटलं ? धक्‍का बसला ?  पण खरोखरच सांगतो, आपल्‍या उन्नतीसाठी आपल्‍यापुढे हाच एकमात्र मार्ग आहे.

      March 29, 2019


  • आयुर्वेद व जडी बुटी भाग ७ – दवणा एक सुगंधित वनस्पती

    दवणा (Artemisia pallens) ही एक सुगंधी वनस्पती आहे, जी अ‍ॅस्टेरेसी (Asteraceae)

    कुळातील आहे. याला संस्कृतमध्ये 'दमनक' आणि मराठीमध्ये 'दवणा' असे म्हणतात. ही वनस्पती लहान औषधी वनस्पती किंवा झुडुपांच्या वंशात येते आणि झेरोफिटिक निसर्गात वाढते. जी भारतात तिच्या नाजूक सुगंधासाठी खूप मौल्यवान आहे. देशाच्या बहुतेक भागांमध्ये ती सामान्यतः हार, पुष्पगुच्छ आणि धार्मिक प्रसादांमध्ये वापरली जाते.

    दवणा म्हटलं कि सर्वांना जोतिबाच्या डोंगरावर देवाला वाहायला दिलेली लहान वाळलेली अखंड लहान झाडे आठवतात. दवणा सुगंधी तर आहेच मात्र त्याचे धार्मिक महत्वही तेवढेच आहे ... त्यामुळे दवण्याची संस्कृत मधली सगळी नावे अतिशय सात्विक आणि धार्मिक आहेत उदा. तपस्वीपुत्र, पवित्रक, पुंडरीक, ब्रह्मजटी, वामन इत्यादी.

    दवना (दवन):-हॉट टच.
    कन्नड भाषेतील दवना हे अ‍ॅस्टेरेसी (सूर्यफूल) कुटुंबातील आर्टेमिसिया इंडिका विल्ड या वनस्पतीशी ओळखल्या जाणाऱ्या वनस्पतीचे नाव आहे ज्याचे खालील समानार्थी शब्द आहेत: आर्टेमिसिया इंडिका व्हेर. नेपलेन्सिस, आर्टेमिसिया एशियाटिका.

    हिंदी भाषेत दवना [दवना] हे अ‍ॅस्टेरेसी (सूर्यफूल) कुटुंबातील आर्टेमिसिया निलागिरिका (CB Cl.) पॅम्प. या वनस्पतीशी ओळखले जाणारे एक वनस्पती आहे ज्याचे खालील समानार्थी शब्द आहेत: आर्टेमिसिया वल्गारिस आर्टेमिसिया वल्गारिस वर. निलागिरिका. दवणा सह्याद्रीत सर्वत्र आढळतो. मात्र त्याचा वास कडवट असल्याने हाच दवणा म्हणून त्याकडे लक्ष जात नाही. साधारण कॉंग्रेस या तणाशी अत्यंत साधर्म्य असलेली हि वनस्पती आहे पण दवणा थोडा वेगळा असल्याने ओळखता येतो. कापरासारखे एक उडनशील असे तेल दवण्यात असते त्यामुळे तो वाळवलेला दवणा अत्यंत सुगंधी असतो .

    दवणा/दमनक ह्याचे २-३ मीटर उंच दाट उगवणारे सुगंधी क्षुप असते. फांद्या अंगठ्या एवढ्या जाड असतात.ह्याची पाने १५-१७ सेंमी लांब व रूंद असतात.पानाच्या मागील पृष्ठावर पांढरी लव असते.
    पानांमध्ये आणि फुलांमध्ये आढळणारे आवश्यक (Essential) तेल त्याच्या बारीक आणि नाजूक सुगंधासाठी मौल्यवान आहे आणि उच्च दर्जाच्या सौंदर्यप्रसाधने आणि परफ्यूममध्ये वापरले जाते. एस्टर (६५%), हायड्रोकार्बन्स (दवानाच्या तेलाच्या २०%), आणि ऑक्सिजनयुक्त संयुगे देखील असतात (१५%). दवानाच्या विशिष्ट वासासाठी जबाबदार असलेले मुख्य घटक एस्टर आहेत.

    दवनाचे आवश्यक तेल, जे तपकिरी, चिकट द्रव आहे आणि त्याला समृद्ध, फळांचा वास आहे.
    दवनाच्या सुगंधी तेलाची किंमत रु. २००० प्रति लिटर आहे. त्यामुळे सध्या शेतकरी याची शेती करण्याकडे वळले आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय व्यापारात, विशेषतः अमेरिका आणि जपानमध्ये, जिथे ते केक, पेस्ट्री, तंबाखू आणि पेये चवण्यासाठी वापरले जात आहे, बरीच प्रतिष्ठा मिळवली आहे.

    चैत्र महिन्यात देवांना दवणा का वाहतात याची कथा-
    चैत्र महिन्याच्या पहिल्या पक्षात सर्व देवांना दवणा वाहिला जातो त्या संदर्भात एक कथा सांगितली जाते.
    शिवाच्या क्रोधातून कालभैरव प्रगटला, प्रगट होताच त्यानं ब्रम्हदेवांच पाचवं मस्तक तोडले ते त्याच्याच डाव्या हाताला ब्रम्हहत्या होऊन चिकटलं त्यातून गळणारं रक्त प्यायला कुत्री पिशाचं गोळा झाली तर त्यांचा आणि या उग्र बटूच्या भय निर्माण करणाऱ्या रव म्हणजे आवाजामुळे याला भैरव असं नाव मिळालं. साक्षात पितामहांना शासन झाल्यान सगळी सृष्टी घाबरून गेली. भैरवाला आवर घालण्यासाठी विष्णूंनी त्याला शाप दिला सर्वांच दमन करणारा तू वनस्पती होशील तत्क्षणी तो उग्र भैरव उग्र वासाची वनस्पती झाला तोच दमनक अर्थात दवणा ! असा हा भैरव दवणा झाल्यावर विष्णूंनाच दया आली त्यांनी त्याला मूळ रूपात आणून दवण्याला वर दिला आज पासून तू आम्हाला सर्व देवांना प्रिय होशील चैत्र महिन्यात आम्ही तिथीवार तुला धारण करु( उदा तृतीया गौरी चतुर्थी गणपती पंचमी लक्ष्मी षष्ठी कार्तिक-- पौर्णिमा सर्व देव) चतुर्दशी ही तुझी हक्काची तिथी तेव्हा तू स्वत: आणि एकवीरा हा दवणा धारण करा. याला अनुसरून आजही आपण चैत्र महिन्यात देवाला दवणा अर्पण करतो ज्योतिबाच्या पायथ्याशी पन्हाळा तालुक्याचे वैशिट्य म्हणजे फक्त ह्याच तालुक्यात दवण्याची शेती केली जाते. याचे फुल ज्योतिबाला प्रसन्न करण्यासाठी वापरतात /वाहतात. भाविक लोक जसे गणपतीला दुर्वा,महादेवाला बेल वाहतात तसेच ज्योतिबाला दवणा वाहतात. दवणा वाळवून ठेवता येतो. नंतर पाण्यात ठेवला कि तो फुलतो. दवणा खराब होत नाही. ताजा दवणा मार्च - एप्रिल मद्धे मिळतो. महाराष्ट्रात विदर्भ, शनी शिंगणापूर, पुणे जिल्ह्यातही तो आढळून येतो.

    दवणा वनस्पतीचा वापर अनेक प्रकारे केला जातो:
    धूप आणि सुगंध:
    दवणा पानांचा उपयोग धूप म्हणून केला जातो, तसेच गजरा आणि वेणीमध्येही सुगंधित करण्यासाठी वापरतात. वात,पित्त,कफ या त्रिदोषाचे दमन करणारी ही औषधी वनस्पती आहे. दवणा हा सुगंधी,चवीला कडू आणि तिखट आहे. या वनस्पतीपासून बाष्पनशील तेल मिळते,हे तेल दाट व सुगंधी असून ते उच्च प्रतीच्या अत्तरात मिसळतात. तसेच दवण्याचा वापर पुस्तकांमध्ये ठेवण्यासाठी केला जातो.

    औषधी गुणधर्म:
    दवणा तेलाचा उपयोग सुगंधचिकित्सा (अरोमाथेरपी) मध्ये होतो, तसेच ते आयुर्वेदिक औषध म्हणूनही वापरले जाते.

    अन्न आणि पेय:
    काही ठिकाणी दवणा पानांचा उपयोग चहा किंवा इतर पेये बनवण्यासाठी करतात.

    .


    याचे बरेच औषधी उपयोग आहेत.

    1) अंगावरून कमी जाणे:-
    बऱ्याच भगिनींना अंगावरुन खुप कमी जाते, विटाळ साफ होत नसल्याने, त्यांचा स्वभाव काहीसा चिडचिडा होतो. स्वभावात तापटपणा ही आढळून येतो, तापटपणापाशी हे कारण असेल, याचा विचारही कुणी करत नाही, त्या बि चारा स्त्रीला दोष दिला जातो. काही स्त्री रुग्णात त्याचा अनुभव अशा स्त्रियांना पाळीच्या वेळी अर्धाचमच्या दवना पावडर गरम पाण्याबरोबर दोन वेळा घ्यावी, विटाळ चांगला साफ होतो. सोबत बाकीचे ही औषधे घ्यावी लागतात.

    गर्भाशयाच्या बऱ्याच विकारावर, एक चमचा तीळ तेलात, अर्धा चमचा दवणा पावडर द्यावी. वंध्यत्वाच्या रुग्णात, त्याचा चांगला वापर होतो, पाळी साफ झाल्यामुळे, अंडी चांगल्या पद्धतीने फुटली जातात, व लवकरच Good news ही घरात मिळाली जाते.

    2) झोप येत नाही:-
    उत्तम भूक लागणे, पोट साफ असणे, निद्रा चांगले असणे. या तीन गोष्टी चांगले असल्या तर शरीर चांगले असते. बऱ्याच वयस्कर व्यक्तींना रात्रीची झोप लागत नाही, तऱ्हे तऱ्हेच्या गोळ्या उपयोगी पडत नाहीत. अशांना काही औषधोपचार व सकाळी दवणा पाण्यात भिजवून ते पाणी रात्री घेणे, व रात्री पाण्यात घेऊन सकाळी ते घेणे. दूध खडीसाखर बरोबर घेतले तर छान आराम पडतो.

    3) कडकी :-
    खाण्यापिण्यातील दोषामुळे, शरीरात खूप उष्णता वाढते, ताप आल्यासारखे वाटते, हुशारी वाटत नाही, हात पाय जळजळ करतात. अशा लोकांची कडकी कमी करण्यासाठी दवणा उपयुक्त पडतो, दूध खडीसाखरेबरोबर तो द्यावा, खूप तापट स्वभाव असलेल्या व्यक्तीस त्याची कडकी कमी करण्यासाठी, बाकीच्या औषधाबरोबर दवनाचे डोस दिल्यामुळे तापटपणा कमी होतो.

    4) किरकिर रुग्णाचा अनुभव:-
    एका वैद्याचा अनुभव असा आहे: दुनियाभरचे डॉक्टर झाले तऱ्हे तऱ्हेची इंजेक्शन झाले. दुनियाभरच्या तपासण्या झाल्या, "मी बरा आहे "असा एक व्यक्ती म्हणतच नव्हता, मला खूप मोठा आजार झाला आहे. घडीभरात हात दुखते, पोटात दुखते, लघवी साफ होत नाही, पोट जड वाटते डोकं दुखतंय, ना ना लक्षणे तो सांगायचा. माझ्याकडील एक बरा झालेला रुग्ण यांना घेऊन माझ्याकडे आला, थोड्या चर्चेनंतर, दुखरी नस लक्षात घेऊन त्यांना काही औषधांबरोबरच, दवना पावडरही दूध खडीसाखर यातून घ्यायला सांगितले. थोड्याच दिवसानंतर बरीचशी लक्षणेही बंद झाली, रुग्ण छान पैकी दैनंदिन कामे करू लागला, असा हा आपला आयुर्वेद.

    5) तोंडाचे आजार:-
    बऱ्याच जणांना तोंडात चट्टे पडतात, कधी दातातून रक्त पडते, त्यांनी दवण्या च्या पाण्याने गुळण्या कराव्यात, व दवणा दूध खडीसाखरेबरोबर द्यावा, छान पैकी आराम पडतो. जेव्हा कष्टाचे काम करून माणूस थकतो, तेव्हा दवण्याचा एकदा नक्की प्रयोग करून पहावा.

    देवाला ज्या वनस्पती वाहता त्याचे औषधी उपयोग भरपूर आहेत, दवण्याचा नुसता स्पर्श ही तुम्हाला शांत राहण्यास प्रवृत्त करतो, देवधर्म करायला गेलात तर यांची महती जरूर जाणून घ्या, ज्यांच्या अंगात रक्त ही कमी आहे त्यांना काही औषधाबरोबर दवण्याची पावडरही वापरली तर त्याचा गुण येतो. गुराखी गुरांना जखम झाली की दवण्याच्या पाण्याने जखम धुतो व दवण्या ची पट्टी जखमेवर लावतो.

    6. विदर्भातील प्रचलीत नाव ''दवणा'' ऊन लागने (sun-strok) साठी राम बाण उपाय, तेथील लोक हे अनेक वर्षांपासून याचा उपयोग सनस्ट्रोक साठी करत आहेत.

    7. थोडीशी वनस्पती, बडीशेप,गाठी किंवा खडी साखर पाण्यात भिजत ठेवावे व गाळुन प्यावे. ऊन, हातपाय दुखने, थकवा लगेच जातो.

    दवणा मधील रासायनिक घटक:
    दवणा (Artemisia pallens) या वनस्पतीमध्ये अनेक रासायनिक घटक असतात, ज्यामध्ये दवनोन (Davanone), दवन इथर (Davana ether), दवना फुरान (Davana furan), आणि लिनूल (Linalool) हे प्रमुख आहेत. या घटकांमुळे दवणा तेलाला विशेष सुगंध येतो.

    सेंद्रिय दवना आवश्यक तेलाचे आरोग्य फायदे:
    ऑरगॅनिक दवना आवश्यक तेले (Essential oil), जगभरातील व्यक्तींच्या आरोग्यासाठी उपचारात्मक आणि आरोग्यदायी फायद्यांसाठी प्रसिद्ध आहेत. सेंद्रिय दवाना विविध कारणांसाठी वापरले जाते जसे की जखमा जलद बरे करणे, सामान्य सर्दी बरे करण्यास मदत करणे आणि थकवा, मासिक पाळीतील पेटके, मळमळ आणि दैनंदिन जीवनात सामान्यतः येणाऱ्या इतर समस्यांशी सामना करणे.

    काही प्रमुख आरोग्य फायदे खालीलप्रमाणे आहेत-
    १. अँटीमायक्रोबियल गुणधर्म - सेंद्रिय दवाना एसेंशियल ऑइल, हा एक प्रमुख घटक आहे ज्याने अनेक जीवाणू आणि बुरशींविरुद्ध अँटीमायक्रोबियल क्रियाकलापांसह कार्य करण्यासाठी फायदेशीर क्रिया दर्शविली आहे जे व्यक्तींमध्ये विविध रोगांना कारणीभूत ठरतात.

    २. दाहक-विरोधी प्रभाव - दावनोन आणि दिवान इथर सारखे दावन तेलातील अनेक प्रमुख घटक, सध्याच्या काळात होणाऱ्या काही प्रमुख आजारांविरुद्ध लढण्यासाठी दाहक-विरोधी गुणधर्म प्रदर्शित करण्यात फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे. या आवश्यक तेलाच्या दाहक-विरोधी गुणधर्मामुळे ते स्थानिक आणि सुगंधी दोन्ही परिस्थितीत व्यक्तींच्या दाहक स्थितींना तोंड देण्यासाठी प्रमुख संभाव्य तेलांपैकी एक बनते.

    ३. अँटिऑक्सिडंट क्रियाकलाप - सेंद्रिय तेलात वरील दिलेल्या अँटिऑक्सिडंट्सची उपस्थिती जगभरातील लोकांच्या दैनंदिन जीवनात तणाव आणि थकवा दूर करण्यास मदत करते. या प्रकारचे अँटिऑक्सिडंट्स पेशींच्या आरोग्यात तेलाचे योगदान आणि एखाद्या व्यक्तीला हृदयरोग आणि त्वचेच्या ऍलर्जीचा धोका कमी करण्यास मदत करू शकतात.

    ४. भावनिक कल्याण - अद्वितीय सुगंध आणि अनेक वेगवेगळ्या सुरकुत्या आणि सुगंधांमध्ये मिसळण्याची त्याची क्षमता सर्व परफ्यूम उद्योगांसाठी अद्वितीय बनवते. या प्रकारचे सुगंध आणि सुरकुत्या तणाव, चिंता आणि चिंताग्रस्त ताण हाताळण्यासाठी फायदेशीर आहेत आणि अरोमाथेरपी आणि स्पामध्ये वापरल्यास मूड वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी देखील वापरले जातात. दवाना आवश्यक तेलात उपलब्ध असलेले हे अँटीऑक्सिडंट्स शांत आणि आरामदायी वातावरणाची भावना वाढविण्यासाठी वापरले जातात.

    ५. मासिक पाळीला आधार -
    समृद्ध गुणधर्म असलेले दवाना तेल हे जगभरातील महिलांच्या मासिक पाळीच्या आरोग्याशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी शतकानुशतके पारंपारिकपणे वापरले जात आहे. दवाना हे विविध स्वरूपात प्राचीन काळापासून महिलांच्या मासिक पाळीच्या आरोग्यावर उपचार करण्यासाठी वापरले जात आहे ज्यामुळे त्यांना आरामदायी वातावरण मिळते आणि त्यांना यश मिळते. तेलाचे समृद्ध गुणधर्म मासिक पाळीच्या दरम्यान पेटके बरे करण्यास आणि महिलांना निरोगी राहण्यास मदत करतात.

    ६. कामोत्तेजक गुणधर्म -
    तेलाच्या गोड आणि फळांच्या सुगंधासाठी जबाबदार असलेले हे घटक कामोत्तेजक गुणधर्म असल्याचे मानले जाते, ज्यामुळे वेगवेगळ्या आवडी आणि गरजा असलेल्या व्यक्तींसाठी सुगंध आणि मसाज तेलांच्या विविध नोट्स तयार करण्यासाठी ते सर्वात लोकप्रिय पर्यायांपैकी एक बनते.

    ७. दवण्याचा सुगंधी पदार्थात पुष्कळ उपयोग होतो.
    दवण्याची झाडे घराच्या आसपास लावल्याने घरात सर्प येत नाहीत. दवणा तिखट, शीतळ, कडू, तुरट, व सुगंधी असून कुष्ठ, कंडू, संग्रहणी व ग्रहपीडा यांचा नाश करतो. सर्पाच्या विषावर दवण्याच्या मुळ्या व पाने देतात अगर त्याचा रस काढून देण्यात येतो. गुरांसहि हे औषध दिल्यानें गुण येतो. गर्मीवर दवणा, व मरवा यांचा सर काढून प्याला असतां गुण येतो.

    चंदन व दवणा यांच्यात शीतलता देण्याची क्षमता सारखीच असली, तरी चंदन फक्त ओले असतांनाच शीतलता देऊ शकते, तर दवणा दिवसभर शीतलता देऊ शकतो.

    असा हा दवणा ज्याची माहिती खूप जणांना नसते पण त्याचे अध्यात्मिक व औषधी महत्व निर्विवाद आहे.

    संदर्भ:
    डॉ. विलास जगन्नाथ शिंदे यांचा लेख
    प्रमोद तांबे यांचा लेख
    गुगल वरील अनेक लेख व माहिती.
    सर्व फोटो गुगलच्या सौजन्याने

    डॉ. दिलीप केशव कुलकर्णी
    मोबा: ९८८१२०४९०४
    २८.०५. २०२५

      June 10, 2025


  • ‘चंद्रलेखा’चं ‘‘नटसम्राट’’ नाटक रंगमंचावर आलं

    या नाटकाचा पहिला प्रयोग दि गोवा हिंदूअसोशिएशन, कला विभाग या संस्थेने २३ डिसेंबर १९७० रोजी बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे सादर केला होता.

      May 27, 2022


  • श्री मीनाक्षीस्तोत्रम् – ६

    नादे नारदतुम्बुराद्यविनुते नादान्तनादात्मिके
    नित्ये नीललतात्मिके निरुपमे नीवारशूकोपमे ।
    कान्ते कामकले कदम्बनिलये कामेश्वराङ्कस्थिते
    मद्विद्ये मदभीष्टकल्पलतिके मां पाहि मीनाम्बिके ॥ ६ ॥

    आई जगदंबेच्या वैभवाचे नवनवीन पैलू उलगडून दाखवताना जगद्गुरु शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
    नादे- नाद अर्थात ओंकार स्वरूप असलेली. नारदतुम्बुराद्यविनुते- नारद, तुबरू इ. देवर्षी, गंधर्व इत्यादींच्याद्वारे वंदन केल्या गेलेली.
    नादान्तनादात्मिके- शास्त्रांमध्ये ओंकाराला नाद असे म्हणतात. त्यामध्ये अ,ऊ आणि म अशा तीन मात्र आहेत. त्यातही शेवटी म् चा जो नाद घुमत राहतो त्या अर्ध्या मात्रेला नादान्तनाद असे म्हणतात. ती त्रिगुणातीत निर्गुण स्वरूप असणारी अर्धमात्रा हे जिचे स्वरूप आहे अशी.
    नित्ये - भूत वर्तमान आणि भविष्य या तीनही काळात अविचल असणाऱ्या तत्वाला शास्त्रात नित्य असे म्हणतात. अशी नित्य स्वरूप असणारी.
    नीललतात्मिके- नीलकमलाच्या लते प्रमाणे नाजुक असणारी.
    निरुपमे- जिला कोणत्याच प्रकारची उपमा देता येत नाही अशी. अनुपमेय. एकमेवाद्वितीय.
    नीवारशूकोपमे - निवार म्हणजे भगरीच्या दांड्या प्रमाणे असणारी.
    वर आचार्य म्हणतात आई जगदंबा निरुपम आहे. तर ताबडतोब एक उपमा देतात. हे अजब नाही का ?तर नाही. त्या उपमेतून देखील आई जगदंबेचे स्वयंसिद्धत्वच मांडलेले आहे.
    भगर हे कोणत्याही प्रयत्नाशिवाय येणारे धान्य. अर्थात जिला कोणी निर्माण करत नाही अशी.
    साधू संत महंत अधिकाधिक काळ भगरच भक्षण करतात. अर्थात अशा सगळ्यांच्या उदरभरणाची काळजी घेणारी.
    कान्ते- अतीव प्रिय.
    कामकले- सर्व इच्छांचा स्वरूपाची. कदम्बनिलये- कदंब वनात निवास करणारी. कामेश्वराङ्कस्थिते- कामेश्वर भगवान शंकरांच्या मांडीवर बसलेली.
    मद्विद्ये- माझ्या ज्ञानस्वरूप असणारी. मदभीष्टकल्पलतिके- माझ्या सर्व कामना पूर्ण करणाऱ्या कल्पनेप्रमाणे असणाऱ्या,
    मां पाहि मीनाम्बिके - ही आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.

    - प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 30, 2020