(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • जीएंची पत्रवेळा

    येणाऱ्या पिढीलाही जीए कळायला हवेत. काही साहित्य तुमचं भावनिक पोषण करतं. जीएंचं साहित्य त्यापैकीच एक. जीवनाच्या अनेक संचितापैकी जीएंचं असणं हे एक संचित आहे. जीएंचं साहित्य अनेकांच्या दृष्टीने मुदतठेव आहे, ज्याच्यामुळे आपलं आयुष्य सुखद आहे. भावणारे साहित्य लिहिणे आपल्या आवाक्यात जरी नसले तरी वाचण्यात व ऐकण्यात ते आपलंच असतं. माणसं येतात आणि जातात पण त्यांचं साहित्य मनात घर करतं. मनात घर करणाऱ्या गोष्टीच मनात तग धरतात. शब्दांच्यापलीकडे गेल्यानंतरच जीएंचं साहित्य व त्यातील सौंदर्य कळतं. काही गोष्टींची अनुभूती घ्यायची असते. काही गोष्टी फक्त जगायच्या असतात. जीएंचं साहित्य या प्रकारात मोडतं. माणसे जाताना केवळ आठवण मागे ठेवून जात नाहीत, तर विचार मागे ठेवून जातात, अस्तित्व मागे ठेवून जातात. माणसाला मरण असतं, विचारांना मरण नसतं. त्यांच्या साहित्यानं दुःखं सहन करण्याची प्रतिकारशक्ती वाढविली आहे, अनेक संकल्पना स्पष्ट केल्या आहेत. अनेकांना जगण्याची उमेद दिली आहे, वास्तवाची जाण करून दिली आहे. जीए म्हणजे एक साहित्यातलं अस्वस्थ करणारं नाव. अस्वस्थ साहित्य मनाला चटका लावतं, चिरकाल स्मरणात राहातं. पु.ल., वि. वा., जी. ए. हे साहित्यातील दीपस्तंभ आहेत. दुर्बोधतेततही जसा ग्रेस असतो तसं अस्वस्थतेत जीए असतात.

  • कायदा आणि फायदा

    कायदा आणि फायदा

    कायद्याचा हात पकडून चालणारा व्यक्ति नेहमी निश्चिंत राहतो. त्याला कशाची भीती वाटू शकत नाही… .. कारण कायद्याची रेषा ओलांडली आहे ह्याची चिंता सतत सतावत राहते. म्हणून कोणत्या कर्माची निवड आपण करतोय हे तपसावे. जर व्यावहारिक जीवनामध्ये ही रेषा ओलांडली तर तन, मन, धन, जन,.. .. असेल अनेकानेक प्रकारचे नुकसान सोसावे लागेल ते समजून घ्या.म्हणून लक्षात ठेवा ‘कायदा आणि फायदा’

  • कायदा आणि गर्भवती स्त्रिया

    कायदा आणि गर्भवती स्त्रिया

    गर्भवती स्त्रियांब्दल सध्या अस्तित्वात असलेला कायदा पुरेसा आहे काय ? गर्भवी स्त्रियांना स्वयम्.निर्णयाचा अधिकार नको कां ? गर्भवती स्त्रियांच्या मनाचा, तसेंच त्यांच्या भविष्याचा विचार न केल्यास, त्यांच्यावर अन्याय होत नाहीं काय ?

  • कानडी दंडेली

    कानडी दंडेली

    गेल्या सहा दशकापासून कानडी झेटिंगशाहीचा सामना करणाऱ्या सीमाभागातील मराठी भाषिक नागरिकांच्या अस्मिता दुखावण्याचा खेळ अजूनही सुरूच असून कर्नाटक सरकारने सीमाभागातील मराठी भाषिक तरुणांची डोकी फोडून आता तर कहरच केला आहे. १ नोव्हेंबर हा कर्नाटक राज्य स्थापनेचा दिन सीमा भागातली मराठी जनता काळा दिन म्हणून पाळते. महाराष्ट्रद्वेषाने पछाडलेल्या कानडी सरकारने कार्यकर्त्यावर लाठीहल्ला करण्याचे आदेश दिले आणि कर्नाटक पोलिसांनी शेकडो मराठी भाषकांची डोकी फोडली. याला महाराष्ट्रद्वेषाचा कळस म्हटला पाहिजे.

  • कस्टम शाॅपी

    कस्टम शाॅपी

    त्याकाळी वर्तमानपत्रात कस्टमने जप्त केलेल्या वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांच्या जाहिराती असत. काही जाहिराती ‘छोट्या जाहिराती’ सदरात येत असत. पहिल्या पानावर जाहिरात असायची ती ‘घरोंदा’ कस्टम शाॅपीची! त्या जाहिरातीत परदेशी घड्याळे, पर्फ्युम, कॅमेरे, व्हिडिओ कॅमेरे, टेप रेकाॅर्डर, व्हिसीआर, खेळणी यांची यादी व किंमती दिलेल्या असत.

  • कविकुलगुरु कालिदास

    कविकुलगुरु कालिदास

    कालिदास प्राचीन नाही, मध्ययुगीन नाही. तो ‘होऊन गेलेला’ नाही, तो ‘आहे तसाच’ आहे. तो काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. तो एका प्राचीन भाषेच्या नागमंडलात खिळलेला नाही, तो कालनिरपेक्ष आहे. ‘मेघदूत’ निर्माण करणार्‍या कालिदासाची पदवी तरी कशी ठरवावी ? तो निसर्गाकडून पाठ घेणारा आणि पाठ देणारा नाही. तो केवळ प्रेमिकही नाही. मग त्याचे सृष्टीशी नाते तरी काय ? सर्व नात्यांपलीकडचे त्याचे नाते अवघ्या आसमंताशी आहे. तो आणि निसर्ग असे द्वैत मुळातच मावळलेले आहे. उरले आहे फक्त तादात्म्य.”

  • कलिंगड दिन

    कलिंगड दिन

    मंडळी आज ३ ऑगस्ट आणि आज कलिंगड दिन परदेशात साजरा केला जातो. चला तर थोडासा ह्याचा इतिहास जाणून घेऊ.

  • कलम ३७० पश्चात काश्मीरच्या विकासाला चालना

    कलम ३७० पश्चात काश्मीरच्या विकासाला चालना

    गेली ७० वर्षे या ‘कलम ३७०’ मुळे भारतातील इतर कुठलेही कारखाने, उद्योगपती, उद्योजक काश्मीरमध्ये जाऊन आर्थिक व्यवहार, उद्योग-व्यवसाय करू शकत नव्हते. जम्मू-काश्मीरच्या विकासासाठी जो प्रचंड निधी केंद्र सरकारकडून दिला जात असे, त्याचा दुरूपयोग केला जायचा. एखादा प्रकल्प महाराष्ट्रात १० लाखांमध्ये बांधला जात असेल, तर तो जम्मू-काश्मीरमध्ये अनेक पटीने जास्त पैसे खर्च करून तयार केला जायचा. ९० टक्के पैसे हे काश्मीरमधील २५० कुटुंबाच्या खिशात जात होता. त्यामध्ये राजकीय पक्ष, तेथील काही उद्योजक आणि हुर्रियत कॉन्फरन्ससारखे समर्थक होते.

  • कलम ३५(ए) काश्मिर – लक्षावधी लोकांचे जीवन असह्य

    कलम ३५(ए) काश्मिर – लक्षावधी लोकांचे जीवन असह्य

    काश्मीरमध्ये राजकीय पक्षांना आणि तथाकथित विचारवंतांना देशाच्या विरोधात बोलण्यासाठी कुठलेही कारण पुरेसे ठरते. आता नवे कारण म्हणजे राज्यघटनेतील 35 अ हे कलम. यावरून आता वादविवाद सुरू झाला आहे. इतर वेळी एकमेकांशी भांडणारे पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि इतर अपक्ष सदस्य याबाबत एकत्र आले आहेत.

  • कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग ३

    कलकत्ता मेल व्हाया नागपूर – भाग ३

    नियतीने हा वन डाऊन चा मार्ग माझ्यासाठी पुढे अनेकदा निवडून ठेवला होता आणि थेट सिक्कीम, भूतान , आसाम पर्यंत या गाडीच्या मदतीने माझे पाय लागले. आता वन डाऊन च्या तोडीची गीतांजली व दुरांतो एक्सप्रेस या गाड्या दिमतीला आहेत. परंतु आजही वन डाऊन नागपुर मेल तशीच रुबाबात आपला प्रवास करीत आहे.