वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कानकूनची आंतरराष्ट्रीय हवामान बदल परिषद कोणतेही महत्त्वाचे निर्णय न घेताच संपली. मात्र, क्योटो कराराची मुदत 2012 पर्यंत आहे. त्या मुदतीत तरी विकसित आणि अविकसनशिल देशांनी आपल्यातील मतभेद कमी करून व्यापक भूमिकेतून क्योटो कराराच्या जागी नवा मसुदा आणला पाहिजे. त्यातही अमेरिका सर्वात जास्त प्रदूषण करत असल्याने तिच्यावर अधिक जबाबदारी आहे.
December 17, 2010
भारताच्या अंतराळ क्षेत्रातील भरीव यशात काही महत्त्वाचे टप्पे आहेत. यांतला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. या ऐतिहासिक उड्डाणास पन्नास वर्षे झाल्याच्या निमित्ताने हा विशेष लेख मराठी विज्ञान परिषदेच्या फेब्रुवारी २०२३ च्या अंकात प्रकाशित झाला होता. चांद्रयान ३ च्या निमित्ताने पुन्हा प्रकाशित करत आहोत.
August 22, 2023
२००४ साली माझ्या विद्यार्थ्यांचे-राधामोहनचे निधन झाले, कारण अपघातावेळी त्याने हेल्मेट घातले नव्हते. अंत्यविधीच्या वेळी त्याच्या वडिलांनी माझ्या सर्व विद्यार्थ्यांना हात जोडून विनंती केली होती- ” बाबांनो, वाहन चालविताना हेल्मेट घाला. माझ्यावर आज जी पाळी आली आहे, ती तुमच्या पालकांवर कधीही येऊ नये. ” या प्रसंगावर आधारित माझी “हेल्मेट ” ही कथा २०२० च्या “तरुण भारत ” च्या दिवाळी अंकात आली आहे.
June 10, 2021
देवांचे खजिनदार असणाऱ्या भगवान कुबेरांनी भगवान श्री शंकराची उपासना केल्यानंतर त्यांच्या आनंदा करता भगवान शंकरांनी निर्माण केलेला जलप्रवाह म्हणजे नर्मदेची उपनदी कावेरी.
September 7, 2020
बुधाचे निरीक्षण
बुध ग्रह सूर्यास्तानंतर संध्याकाळी काही वेळ पश्चिम क्षितीजाजवळ दिसतो तर काही महिन्यात हाच बुध ग्रह पूर्व क्षितीजावर पहाटे सूर्योदयापूर्वी दिसतो. बुध हा सूर्यापासून पहिलाच ग्रह आहे. त्यामुळे त्याचे सूर्यापासूनचे अंतर कमी आहे. परिणामी बुध ग्रह सूर्याची पाठ कधीच सोडत नाही. विशिष्ट कालावधीत, सायंकाळी किंवा पहाटे आणि क्षितीजालगत बुध दर्शन होत असल्यामुळे बुध शोधणे म्हटल. तर सोपे आहे म्हटल. तर कठीण आहे.
बुधाचे आगळे वेगळे दर्शन समजावून घेण्यासाठी सूर्यग्रहणाची घटना डोळ्यासमोर आणू. सूर्यग्रहणात पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये पण त्याच्याच पातळीत चंद्र येतो. यामुळे सूर्यबिंब झाकले जाते आणि चंद्राची अप्रकाशित बाजू (काळी बाजू) आपणास दिसते.
बुध ग्रहाची कक्षा सूर्य आणि पृथ्वी यांच्यादरम्यान असल्यामुळे बुध ग्रह सुद्धा पृथ्वी आणि सूर्य यांना जोडणाऱ्या रेषेवर या दोघांच्या दरम्यान येऊ शकतो पण... बुध लहान असल्यामुळे तो सूर्याला झाकू शकत नाही. बुधाचा लहान काळा ठिपका सूर्यबिंबावरून सरकत जातो. बुधाच्या लहान बिंबामुळे सूर्याच्या प्रकाश काही अडविला जात नाही. परिणामी बुध ग्रह सूर्यबिंबावरून गेला तरी आपल्याला पत्तासुद्धा लागत नाही.
सूर्यबिंबाच्या एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सरकत जाण्याच्या या घटनेलाच बुधाचे अधिक्रमण (transit) किंवा पारगमन असे म्हणतात.
अधिक्रमण कळते कसे?
गणितशास्त्र हे आश्चर्यकारक आणि अचूक शास्त्र आहे. सूर्य, बुध, पृथ्वी, चंद्र इ. ग्रहांच्या भ्रमणामुळे घडून येणाऱ्या गणिताने अधिक्रमणासारख्या विविध घटना केव्हा होणार ते १०० टक्के बिनचूक शोघता येते. हे शास्त्र भूतकाळातही शिरते आणि भविष्यकाळातही डोकावते. १६०७ ते २३०० या ७०० वर्षाच्या काळात बुधाची १४ अधिक्रमणे आहेत.
म्हणजे एका शतकात साधारण १२ ते १३ अधिक्रमणे होतात. सूर्य आणि पृथ्वी यांच्या दरम्यान दर ११६ दिवसांनी बुध ग्रह येतो. या घटनेला अंतर्युती म्हणतात. म्हणजे खरं तर वर्षातून ३ वेळा तरी अधिक्रमण व्हायला हवे होते नाही का? बुध ग्रह पृथ्वी व सूर्य यांच्या पातळीत फिरत नाही. बुधाची परिभ्रमण कक्षा या पातळीला दोन बिंदूत छेदते. या छेदनबिंदूपाशी अंतर्युती झाल्यासच अधिक्रमण होऊ शकते. अंतर्युती होणे आणि पृथ्वी-सूर्य जोडणाऱ्या रेषेत बुध येणे हे सध्या फक्त मे आणि नोव्हेंबर या महिन्याच्या १० तारखेच्या आसपास घडू शकते. तर आता अशी संधी ९ मे २०१६ रोजी, सोमवारी आली आहे. या अधिक्रमणाचे साक्षीदार आपल्याला व्हायचे आहे.
“मे” महिन्यातील अधिक्रमणाचे वैशिष्ठये
मे महिन्यात घडून येणाऱ्या अधिक्रमणाच्यावेळी बुध ग्रह सूर्यापासून दूर म्हणजे पृथ्वीला जवळ असतो. त्यामुळे बुध बिंब थोडे मोठे दिसते (त्याचा व्यास सुमारे १२ कला असतो). तरीही सूर्यबिंब त्याच्या सुमारे १५८ पट मोठे असते मग आता सांगा ते सूर्याला कसे झाकेल? उलट बुधाचा काळा ठिपकाच सूर्यबिंबावरून सरकताना दिसेल. बुधाने सूर्यबिंबाला एका टोकाशी स्पर्श केला की, आख्खे सूर्यबिंब पार करून दुसऱ्या टोकाशी बाहेर पडण्याच्या या घटनेला साडेसात तास लागणार आहेत. संध्याकाळी पावणेपाचच्या सुमाराला अधिक्रमण सुरु होईल ते रात्री सव्वाबारापर्यंत चालू राहिल. रात्री ८.३० च्या सुमारास या प्रवासाचा मध्य बुधाने गाठलेला असेल. म्हणजे तेव्हा सूर्यबिंबाच्या केंद्रबिंदूजवळ सूर्य असेल.
पण हाय? हा सगळा प्रवास आपल्याला पाहता येणार नाही. सूर्य अस्ताला गेला की, ज्या पडद्यावर हा खेळ आपण पाहणार तो पडदाच गायब होणार. नाही कां? तरी सुद्धा संध्याकाळी ४.४५ पासून सूर्यास्तापर्यंत साधारण दोन तास हा खेळ पाहता येईल
दोन तास तर दोन तास. म्हणतात नां? Something is Better than Nothing....
अधिक्रमण पाहतांना घ्यायची काळजी
बुधाचा काळा ठिपका सूर्यबिंबावर पहायचा म्हणजे सूर्याकडे पहाणे आलेच. मग नुसत्या डोळ्यांनी तर नाहीच नाही पण सौर गॉगलमधूनही (नेहमीचा गॉगल नव्हे) हे पाहता येणार नाही. बुधाचा लहान ठिपका दिसणार कसा? मग टेलिस्कोपचा वापर करावा लागेल. पण त्यालाही विशिष्ट असा सुरक्षित फिल्टर बसवला आहे कां याची पक्की खात्री करावी लागेल. द्विनेत्री म्हणजे binocular मुळीच नको. कारण त्याला फिल्टर बसविलेला नसतो. काही संस्था असे अधिक्रमण दाखवतील. तेथे जाता येईल. तरीही डोळ्यांच्या सुरक्षिततेची पक्की खात्री झाल्याशिवाय अशा कोणत्याही उपकरणातून थेट पाहू नये. अन्यथा डोळे कायमचे बिघडतील. अंधत्वही येऊ शकेल.
पुढील अधिक्रमणे
बुधाचे यानंतरचे अधिक्रमण ११ नोव्हेंबर २०१९ रोजी आहे. पण त्याचीही सुरुवात संध्याकाळी सहाच्या सुमारास असल्यामुळे न दिसण्याऱ्या अधिक्रमणातच त्याची गणना करावी लागेल. १३ नोव्हेंबर २०३२ चे बुध अधिक्रमण दुपारी १२.१५ ते ४.४० या वेळात दिसेल. मे महिन्यात होणारे यानंतरचे अधिक्रमण ७ मे २०४९ रोजी आहे. त्याची सुरुवातही याचप्रमाणे संध्याकाळी पावणेपाचचे सुमारास आहे? तेव्हा डोळ्यांची योग्य काळजी घेऊन अधिक्रमण निरीक्षणाची हीच संधी घ्यायला हवी.
- हेमंत मोने
९८२०३ १६३१५
e-mail : hvmone@gmail.com
आकृतीत बुध अधिक्रमण मार्ग दाखविला आहे. आपण पश्चिमेकडे तोंड करून उभे राहणार. म्हणजे सूर्यबिंबाची उत्तर बाजू साधारण उजवीकडे असेल. सूर्यबिंबाचा पूर्व बिंदू वरच्या बाजूस असेल. हे लक्षात घेऊन बुध अधिक्रमण मार्ग दाखविला आहे.
May 9, 2016
कोरोनाविरोधातील लढ्यात देश आज निर्णायक टप्प्यावर येऊन ठेपला असताना कुठलंही अविवेकी वर्तन निर्धाराला तडा देणारे ठरेल. त्यामुळे सरकार म्हणून बोलताना प्रत्येकाने जबाबदारीची व्यापक जाणीव ठेवून बोललं पाहिजे. नागरिकांनीही कर्तव्याच्या जाणिवा जोपासण्याची गरज आहे.
April 4, 2020
श्वासोछ्वास ही शरीराची अत्यंत महत्वाची नैसर्गिक क्रिया आहे. जीवंतपणाचे ते सर्वांत प्रमुख लक्षण असते. श्वास आहे तर जीवंतपणा आहे. त्याच्या शिवाय देह केवळ मृत झालेला असेल. जगण्यासाठी प्राथमिक गरज असते ती प्राणवायुची. अर्थात ऑक्सिजनची. वातावरणात तो मुबलक प्रमाणांत असतो. शरीर तो शोषून घेतो. व त्यातून शक्ती अर्थात उर्जा प्राप्त होते. जगण्याचे ते आद्य व प्रमुख साधन. श्वासोछ्वास क्रिया म्हणजे प्राणवायू घेणे व कार्बंनडाय ऑक्साईड मिश्रीत वायू शरीरावाटे बाहेर सोडणे. ह्या प्रक्रियेत फुफ्फूस, श्वास नलिका, नाक ही अवयवे सतत कार्यारत असतात. ह्या क्रियेची आपणास एका मर्यादेपर्यंतच जाणीव होत असते. तरी ही दैनंदिन क्रिया अजाणता (Involuntary Action) सदैव होत असते. आपले त्या क्रियाकडे केंव्हाच लक्ष नसते. वा तशी गरज देखील भासत नाही. सर्वकांही नैसर्गिक, सहज, व सतत होत राहते. केवळ शरीराची हालचाल कमीजास्त प्रसंगानुरुप होते, तेव्हांच त्या क्रियेची जाणीव होऊ लागते. ज्याला Conscious Breathing अर्थात श्वासोछ्वासाची जाणीव म्हणता येईल.
श्वास घेणे व सोडणे ही म्हटले तर छोटीशीच क्रिया. परंतु हीला ध्यान धारणेत फार महत्व असते. श्वासावर लक्ष केंद्रित करणे ह्या प्रक्रियेमध्ये, मेंदूत उत्पन्न होणाऱ्या विचारांच्या जाणीवेवर बाधा येते. विचारावरचे लक्ष सारले जाऊन ते श्वासावर केंद्रित करण्याच्या प्रयत्यांत, भरकटणाऱ्या विचारांवरचे लक्ष त्या क्षणाला तरी टाळता येते. श्वास अर्थात हवा ही नाकाद्वारे कशी आंत जाते, घशातून छातीकडे तीचा मार्ग असतो. तुम्हास त्याच्या मार्गावरच लक्ष केंद्रित करायचे असते. हवा नाकाद्वारे आंत खेचली जाऊन ती पून्हा त्याच वाटेने परत बाहेर टाकली जाते. आंत जाणारी हवा थोडा क्षण क्रिया थांबते. व परत हवा बाहेर पडते. ह्या सर्व क्रिया तूम्हास जाणीव पूर्वक टिपायच्या असतात. हवेचे आंत बाहेर येणे फक्त. म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करायचे असते. हे सुद्धा विचारावर लक्ष केंद्रित करण्यासारखेच असते. परंतु ह्यात विचाराबरोबर वाहून जाणे टाळले जाते. पून्हा येणाऱ्या विचारावर लक्ष जाण्यापासून अलिप्त राहता येते. ह्यांत विचारावरचे लक्ष श्वासावरच जात असल्यामुळे लक्षाची जाणीव एक मार्गीच होते. आत घेतला जाणारा व बाहेर काडून टाकलेला श्वास फक्त केंद्रित करणे.
खरे म्हटलेतर श्वासोछ्वास ही क्रिया Involuntary अर्थात अजाणता होणारी, परंतु तीच आता प्रथम Voluntary जाणती करायची असते. म्हणजे श्वास दिर्घ करुन घेणे व हलके हलके सोडणे हे ह्यात महत्वाचे.
ज्याप्रमाणे थंड पाण्याचा ग्लास भरुन पाणी पितानांच त्या पाण्याचा थंडपणा व तोंडातून घशातून पूढे जाताना जाणीव होते तशीच जाणीव तुमच्या श्वासाचीपण झाली पाहीजे. हा जाणता श्वासोछ्वास Awareness of breathing हा शक्यतो नेहमीचा भाग असावा. ह्याकडे लक्ष केंद्रित असावे. फक्त ध्यान धारणेच्या वेळीच नसून तुमच्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक हलचालीच्या वेळी देखील ही सवय तुमची कार्यकुशलबुद्धी वा लक्ष केंद्रित करण्याच्या वृत्तीला वाढविते.
मन चंचल असून ते कधीच शांत राहू शकत नाही. हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म ठरलेला असतो. त्यांत केव्हांच बदल करुन त्याला स्थिर अवस्थेत ठेवता येणे शक्य नसते. मात्र त्याच्या सततच्या धावपळीला, उड्डानाला एकाच दिशेने राहण्याचे मार्गदर्शन प्रयत्न करुन करता येते. हे फक्त जाणीवपूर्वक सवयीने साध्य करता येते. श्वासाच्या हलचालीवर लक्ष केंद्रित करणे ह्याने ते साध्य होते. मनाला सुद्धा ' एका वेळी एकच विचार ' ह्या तत्वावर हलचाल करण्याची गरज असते. तो त्याचा स्थायी स्वभाव तेव्हां त्या मनाला उत्पन्न होणाऱ्या विचारांच्या मागे धावू देण्यापेक्षा जाणीवपूर्वक श्वासाच्या हलचालीवर केंद्रित करणे शक्य होऊ शकते. ह्यालाच मनाची एकाग्रता साधणे म्हणता येइल.
ह्याच श्वासांच्या हालचालीवर मनाला केंद्रित करताना शरीरांत कांही क्रिया होऊ लागतात. प्रथम चांगल्या सपाट स्वच्छ आसनावर ताठ पाठीच्या कणाने बसलेल्या शरीराला स्थिर वा अचल केले जाते. व डोळे बंद करुन प्रथम ईश्वरी चिंतन वा नामस्मरण केले जाते. थोड्या वेळाने लक्ष श्वासाकडे केंद्रित केले जाते. ह्या प्रयत्न्यात मन एकाग्र होण्यास सुरवात होते. ह्या सर्व क्रिया जाणीवपूर्वक Voluntary action होत असतात. मात्र तुमच्या उत्स्फूर्त प्रामाणीक, आन्तरीक आणि सत्य प्रयत्नाने ह्याच जाणीवपूर्वक सूरु केलेल्या क्रियेमध्ये, लक्ष श्वासावर केंद्रित होत असताना, तुम्ही हळू हळू स्वतःला विसरु लागतात. अर्थात शरीराला विसरतात. स्वतःकडे आंत असलेल्या एका विशाल पोकळीमध्ये जावू लागतात. हे अजाणता Involuntary होऊ लागते. हीच जाणता व अजाणताची सिमा रेषा असते. कदाचित् विचीत्र अशा वातावरणांत तुम्ही शिरत असल्याचा भास होऊ लागतो. Hallucinations प्रमाणे. जाण –अजाण ही सिमा अत्यंत महत्वाची असते. कारण याच पायरीवर तुम्ही कदाचित् बेचैन होतात. भिती वाटते. एका माहीत असलेल्या अस्तीत्वामधून अपरिचीत वातावरणांत तुम्ही शिरत असल्याचा भास होऊ लागतो. हीच तुमची सत्व परिक्षेची वेळ असते. कित्त्येकजण जोराचा प्रयत्न करुन त्या सिमारेषेवरुन झटका देत, शरीर मनाला एकदम जागृत करतात. डोळे उघडतात व त्या अजाण अशा वातावरणांत जाण्याचे हमखास टाळतात. तुम्ही ध्यानमार्गाच्या दारापर्यंत पोहंचले असतात, परंतु तुमचे मन कमकुवत बनते. तुम्ही परत सामान्य व दैनंदिन वातावरणांत येतांत. झोपेच्या क्रियेमध्ये असेच असते. प्रथम व्यक्ती विश्रांती घेते. शरीर शिथील बनते. डोळे बंद होतात. हलके हलके देहातील जाणीवधारक क्रिया बंद पडून, सहज तुम्ही झोपेच्या आधीन जातात. जागृत अवस्था व निद्रा ह्याच्या सिमा रेखा निसर्ग अतिशय कौशल्याने पार करुन, एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये नेवून सोडतो. ह्याची थोडीदेखील जाणीव आपणास होऊ देत नाही. कारण ही नैसर्गिक क्रिया असते. व जन्मापासून निसर्ग तुम्हाला ह्यात साथ करीत असतो. म्हणून यात सहजता आढळून येते. दोन अवस्थेचे पदार्पण. जागृत आणि निद्रा अथवा निद्रेतून चाळविले जावून जागृत होणे. हे निसर्ग सहज साध्य करतो.
ध्यान प्रक्रिया प्रथमावस्थेत कृत्रीम असते. खऱ्या अर्थाने ती देखील नैसर्गिकच असते. परंतु तीला प्राप्त करावे लागते. आपल्या इच्छेनुसार ध्यानावस्था निर्माण करावी लागते. गाढ निद्रेचा खरा आनंद लूटण्यासाठी म्हणजे जाणीव होण्यासाठी गाढ निद्रा व जागृतावस्था ह्या दोन भिन्न अवस्थेला एकत्र करण्याची कला साध्य झाली पाहीजे. अत्यंत अवघड ही बाब आहे. ह्यात निद्रेमुळे शरीराला संपूर्ण विश्रांतीचे जे सुख समाधान लाभते ते तर साध्य होतेच. त्याच वेळी गाढ निद्रेमधील शांत नितांत आनंद, संतोष ह्याची जाणीव पण जागृत राहून मिळणे हे अप्रतीमच नव्हे काय ? ध्यानामध्ये हेच साध्य होते. दोन्हीही नैसर्गिक गुणधर्म जागृत अवस्था व निद्रा ह्यांचे सुख.
परंतु ध्यान धारणा सर्व सामान्यासाठी सहज व नैसर्गिक क्रिया रहात नाही. झोप वा निद्रा सहज दोन्ही अवस्थेमधले रुपांतर साध्य करते. ध्यानावस्था जागृत अवस्थेमधून ध्यान लागणाऱ्या स्थितीत जाताना त्या सिमारेषेवरुन झेप घेऊन जाते. हालके हालके निद्रेप्रमाणे जात नाही. हीच झेप अत्यंत महत्वाची असते. उडणाऱ्या पक्षाने झाडाचा वा डोंगरकड्याचा आधार सोडून आकाशाच्या पोकळीत छलांग मारल्याप्रमाणे. पक्षी एकदम पडेल अथवा उडेल. निसर्ग त्याला तसे ज्ञान व कला देतो. विमानाला मात्र झेप घेवून उड्डान करावे लागते. एका मोठ्या पोकळीत शिरण्यासाठी. निद्रा पक्षाप्रमाणे व ध्यान धारणा विमानाच्या उड्डानाप्रमाणे. इस पार वा उस पार.
प्राथमिक अवस्थेमधील ध्यान धारक ह्याच ' झेप ' अनुभवातून जातात. दोघाना एका अज्ञात वातावरणात शिरण्याचा एकदम नविन व प्रथम अनुभव घ्यावयाचा असतो. ह्यात शंका, भिती, अनिश्चीतता ह्या भावनाचा वरचश्मा होतो. म्हणून साधक घाबरुन त्याला सामोरे जाण्याचे टाळतो. येथेच कित्येक साघक हतबल होऊन ध्यानात खऱ्या अर्थाने शिरण्यामध्ये अयशस्वी होतात. ते आपले खोलात जाण्याच्या प्रक्रियेला तोडून टाकतात. निराश होतात. सुरवातीच्या श्वासावरचे लक्ष केंद्रित होण्याची क्रिया प्रथम जाणीवपूर्वक असली तरी सवय व प्रयत्नाने ती अजाणीव अर्थात Involuntary Action बनू लागते. ती मग सहज साध्य क्रिया बनते. साधक श्वासावरच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्रियेस थोड्याशा प्रयत्नातच देह मनाची स्थिरता निर्माण करु शकतो.
साधकाची पुढची पायरी म्हणजे तो ध्यानावस्थेमधल्या जाण-अजाण ह्या स्थरापर्यंत तर आलेल्या असतो. आता मनाचा निगृह, आत्मविश्वास आणि संकल्पाची शक्ती एकवटून ह्या पायऱ्यावरुन तसेच वाहून जावू देणे. ध्यान योगांत वा ध्यान धारणेमध्ये निसर्ग सदा तुमची साथ देत असतो. साथ देण्यास तत्पर असतो. तुम्हास कांही करावयाचे नसते. मनात कसलीही शंका वा भिती न बाळगता होवू घातलेल्या शांततेच्या अवस्थेला एकरुप व्हायचे असते. ह्यात कोणताच प्रयत्न वा हालचाल अपेक्षित नसते. जी स्थीती जी देहमनाची अवस्था निर्माण झालेली असते, त्यात झोकून द्यावे लागते. हा काळ देखील फार अल्प असतो. पण जर तुम्हास ध्यानावस्था प्राप्त झाली झाली तर मिळणारे समाधान, आनंद ह्याचे शब्दांत वर्णन करता येणार नसते. आणि त्या आनंदाची तुलना तर करताच येणार नाही. कारण तो तुमचा एकमेव 'एकमेवाद्वितीयो ' आनंद असेल. ज्याला म्हणतात Ecstasy of Joy अर्थात नितांत आनंद वा परमानंद
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 2, 2016
नद्या विकल्या जात आहेत, जमिनीची उत्पादकक्षमता स्वत:च्या हाताने संपविली जात आहे, आपण खात असलेल्या अन्नात रासायनिक खताच्या माध्यमातून विष मिसळलेले आहे, हे माहीत असूनही आनंदाने आपण ते ग्रहण करीत आहोत; मात्र आपण काही चूक करीत आहोत किंवा कोणी आपल्याला जागवत आहे, याची जाणीवच आपण हरवून बसलो आहोत. आपल्या संवेदनाच संपल्या आहेत.
December 1, 2012

October 16, 2015
ऋग्वेदातील १०व्या खंडात १६५ व्या सूक्तात चार ऋचा कपोत उर्फ कबुतर या पक्ष्या संबंधित आहे. या ऋचांचा साधारण अर्थ (अध्यात्मिक अर्थ वेगळे ही असू शकतात) कपोतरुपी दूताचे स्वागत केले पाहिजे. अन्न व दुग्ध अर्पण करून त्याचा सत्कार केला पाहिजे. कपोतरुपी दूताचा अपमान किंवा त्या वर प्रहार नाही केला पाहिजे. तो मंगल करणारा असो. अमंगलकरी बातमी आणणारा कपोत उदा: शत्रू सैन्याचे आक्रमण इत्यादी, लवकरात लवकर घरातून दूर निघून केला पाहिजे.
February 16, 2015
Copyright © 2025 | Marathisrushti