(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • अठरा हाताचा गणपती

    अठरा हाताचा गणपती

    रत्नागिरी शहरातील आंबराई वरची आळी या भागात १८ हात असलेल्या गणपतीचे मंदिर असून महाराष्ट्रातीलच नव्हे जगात पहिलेच गणेश मंदिर आहे. १८ हात असलेली श्री गणेशमूर्ती फक्त रत्नागिरी जिल्ह्यातच आहे. हे गणेशाचे मंदिर कै. विनायक कृष्ण जोशी यांनी स्वतःचे मालकीचे ठिकाणात स्वखर्चाने बांधले आहे.

  • सिने मे जलन

    सिने मे जलन

    प्रत्येकाचा एक काळ असतो तसा तलतचा ही काळ होता, नव्हे आजही आहे. वार्धक्यामुळे व्यक्तिमत्त्वाला घरघर लागते पण प्रसिद्धीला कधीच घरघर लागत नाही. पुस्तके कपाटात बंद असली तरीही त्यांचा इतिहास कधीच बंद होत नाही. तरल अनुभव काय असतो हे तलत कडून शिकावं.

    टेलिफोनवर गाणं म्हणणं ही कल्पना आपल्याला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाते. गाणं म्हणजे नायक नायिकेंचा धुसमुसळेपणा पाहण्याच्या सवयीला छेद देणारं हे गाणं तरलतेचा रेशमी अनुभव देतं.आपल्या मनातील दर्द सांगत असताना किती संयमीत पद्धतीने तलत यांनी ते गाणं म्हटलं आहे.

  • एलियन प्लीमन – दुसऱ्या महायुद्धातील गुप्तहेर

    एलियन प्लीमन – दुसऱ्या महायुद्धातील गुप्तहेर

    एलियनचा जन्म 6 डिसेंबर 1917 रोजी मारसेलीस फ्रांस येथे झाला. तिचे वडील ब्रिटिश तर आई स्पॅनिश होती. तिचे शिक्षण ब्रिटन व स्पेन मध्ये झाले. तिचे इंग्रजी फ्रेंच, स्पेनिश भाषेवर प्रभुत्व होते. ग्रॅजुएशन झाल्यावर ती लिनसेसटर येथे कपड्याच्या व्यापारासाठी गेली.

  • एरंड

    एरंड

    बऱ्याच घरामध्ये पुर्वीपार पासून आठ दिवसातून एकदा पोट साफ करायला एरंड तेल घेण्याची प्रथाच आहे जणू.चला तर आज आपण ह्या एरंडाची थोडक्यात ओळख करून घेउयात.

    ह्याचे २-६ मीटर उंचीचे गुल्म असते,पाने रूंद व खंडीत कडा युक्त असून हाताच्या बोटां प्रमाणे हे पान भासते.ह्याला येणारी फुले एकलिंगी असतात.तर फळ कच्चे असताना हिरवे मऊ व काटे असलेले असते.ह्यात दोन कप्पे असतात.ह्याचे बी द्विदल असते.तर मुळ वरच्या भागात जाड व टोकाला निमुळती होत जाते.

    ह्याचे उपयुक्तांग आहे पाने,बीज,तेल व मुळ.ह्याची चव गोड,कडू,तिखट असून हे उष्ण गुणाचे असते.तसेच हे स्निग्ध,तीक्ष्ण,सुक्ष्म,जड असते.एरंड वातकफनाशक आहे.

    आता आपण ह्याचे उपयोग पाहू:

    १)सुज आलेल्या भागावर एरंडाची पाने गरम करून बांधतात.

    २)पोटदुखीत एरंड मुळाचा काढा हिंग व सैंधव घालून देतात.

    ३)आमवातामध्ये एरंड तेल सुंठीच्या काढ्यासोबत देतात.

    ४)बाळंतीणीस अंगावर दुध सुटायला एरंड तेलाचा अभ्यंग करतात.

    ५)पोट फुगले असल्यास एरंडाची पाने व बियांची चटणी गरम करून पोटावर बांधतात.

    (सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )

    वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

  • एबीपी माझा’ मराठी वृत्तवाहिनीची १४ वर्षे

    एबीपी माझा’ मराठी वृत्तवाहिनीची १४ वर्षे

    स्टार ग्रुप आणि भारतीय आनंद बझार पत्रिका या दोन संस्थांनी ३१ मार्च २००३ मध्ये स्टार माझा या नावाने या वाहिनीची सुरुवात केली. ही वाहिनी मीडिया कन्टेन्ट ॲन्ड कम्युनिकेशन्स सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एमसीसीएस) या कंपनीच्या अखत्यारीत चालते. एमसीसीएस एबीपी टीव्ही आणि स्टार न्यूज ब्रॉडकास्टिंग लिमिटेड या दोन कंपन्याच्या ७४:२६ भागीदारीत चालते.

  • एका भटक्याने अनुभवलेला अफगाणिस्तान

    एका भटक्याने अनुभवलेला अफगाणिस्तान

    गेल्या सहा दशकांत अफगाणिस्तानमध्ये अनेक स्थित्यंतरे झाली. या काळामध्ये ज्या भटक्यांनी अफगाणिस्तानला भेट दिली त्यांनी आपल्याला भावले तसे या देशाबद्दल लिखाण करुन ठेवले आहे. त्यांच्यातलाच एक आहे निक डँझिगर. धाडसी प्रवृतीचा जातिवंत भटक्या पक्षी. १९८२ साली निकला `विन्स्टन चर्चिल फेलोशिप’ मिळाली. या आर्थिक बळावर पुढे निक डँझिगर याने प्राचीन `सिल्क रुट’चा प्रवास करुन त्यातील अनुभवांवर आधारलेले `डँझिगर्स ट्रॅव्हल्स’ हे पुस्तक लिहिले.

  • पाच फिल्म फेअर विजेता चित्रपट ‘ब्रह्मचारी’

    पाच फिल्म फेअर विजेता चित्रपट ‘ब्रह्मचारी’

    भप्पी सोनी दिग्दर्शित ‘ब्रह्मचारी’ हा चित्रपट २६ एप्रिल १९६८ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला पाच फिल्म फेअर पारितोषिके मिळाली होती. या चित्रपटातील सर्व गाणी लाजबाब होती.

  • ऐतिहासिक अमृतांजन पूल आजच्या दिवशी पाडला

    ऐतिहासिक अमृतांजन पूल आजच्या दिवशी पाडला

    इंग्रजांनी मुंबई-पुण्यात पाय रोवल्यावर १८३० मध्ये बोरघाटातून खोपोली आणि खंडाळा यांना जोडणारा रस्ता काढला.‌ त्यावेळी स्थानिक धनगर शिंगरोबाच्या मदतीने नागफणी समोरच्या पर्वतरांगेतून खिंड काढण्यात आली. एकावेळी जेमतेम एक वाहन जाऊ शकेल, एवढी अरुंद अशी ही खिंड होती. मुंबई आणि पुणे ही दोन महत्त्वाची केंद्रे जोडणाऱ्या या रस्त्याने १८३०पासून वाहतूक सुरू झाली, तेव्हा इंग्रजांनी या खिंडीत एक कोनशिला बसवली.

  • दोरीवरच्या उड्या मारण्याचे फायदे

    दोरीवरच्या उड्या मारण्याचे फायदे

    जर तुम्हाला वजन घटविण्यासाठी नियमितपणे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जाण्यास वेळ नसेल, तर घरच्याघरी दोरीवरच्या उड्या मारणे हा चांगला पर्याय असू शकतो. सतत दहा मिनिटे दोरीवरच्या उड्या मारल्याने सुमारे शंभर कॅलरीज खर्च होतात.

  • तुमको न भूल पाएँगे – रफ़ी साहेब

    तुमको न भूल पाएँगे – रफ़ी साहेब

    आजपासून ४३ वर्षांपूर्वी….. ३१ जुलै २०२३ या दिवशी एक अशुभ वार्ता रात्री देणारी सकाळ उगवली होती….. लहान मुलासारखं निर्व्याज हसू असणारा एक उत्कृष्ट चेहेरा तितक्याच उत्कृष्ट आवाजासह शांत झाला ! मुझको मेरे बाद ज़माना ढूँढेगा म्हणणारा रफ़ी शांत झाला !