वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
अहंकार म्हणजे गर्व, गर्विष्ठपणा, स्वतःच्या श्रेष्ठत्वावर वाटणारा एक उन्मत भाव, एक वाईट स्वभाव, इतरांना कमी लेखणारे विचित्र वागणे. अहंकारामुळे आपण फक्त नातेसंबंध नाही तर आपल्यातली माणुसकी सुद्धा संपवतो. ही कथा आपल्याला शिकविते की कधीही गर्व करू नये. अहंकार बाळगू नये.
June 19, 2020
।।एकदन्ताय नम: बृहतीपत्रं समर्पयामि ।।
वांग्याच्या क्षुपाप्रमाणे दिसणारे हे १-२मीटर उंचीचे काटेरी क्षुप असते.ह्याची पाने ७-१५ सेंमी लांब असतात व मागील बाजुस शिरेवर काटे असतात.फुले निळा असतात व मंजीरी स्वरूपात असतात.फळ हे गोल १ सेंमी व्यासाचे कच्चे असताना हिरवे पांढरी रेघ असलेले व पिकल्यावर पिवळे होते.बी स्निग्ध ०.०५ सेंमी व्यासाचे असते.
ह्याचे उपयुक्तांग मुळ व फळ असते.
हे चवीला कडू तिखट असून उष्ण गुणाचे तसेच हल्के,रूक्ष व तीक्ष्ण गुणाचे असते.हे कफवातनाशक आहे.
आता आपण ह्याचे उपयोग पाहूयात:
वेदना असलेल्या भागावर ह्याचा लेप करतात.
चाईवर मधासोबत ह्याचा लेप केला जातो.
उल्टी होत असल्यास मध व गाईच्या तुपासह हिच्या फळाचा रस घ्यावा.
डोरलीचे मुळ सर्दी,खोकला,दमा,ह्यात उपयुक्त आहे.
बियांचा उपयोग स्त्रियांच्या मासिक पाळीच्या तक्रारींमध्ये होतो जसे पाळी वेळेत न येणे,स्त्राव कमी होणे इ.
वेगवेगळ्या त्वचा विकारात हिचा उपयोग होतो.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर,
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
August 7, 2017
बर्याच लोकांना सारख्या ढेकरा येणे किंवा वारा सरणे याचा त्रास होत असतो. उतारवयात हे जास्त आढळते.
वायुविकाराचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला माहीत नसताना हवा गिळण्याची सवय होय. दुसरे कारण म्हणजे काही अन्नपदार्थांवर होणारी जिवाणू प्रक्रिया.
बध्दकोष्ठता असल्यावर मोठया आतडयात मळ बराच वेळ राहून सूक्ष्मजंतूंच्या क्रियेमुळे वायू तयार होतो. हा वायू थोडा थोडा पण घाण वास येणारा असतो.
उपचार
बैठया जीवनपध्दतीत गॅस होणे स्वाभाविक आहे. काही ना काही व्यायाम करणे हे गॅस निवारण्यासाठी आवश्यक आहे. निदान चालण्याची सवय असावी. ज्या अन्नपदार्थांमुळे गॅस वायू होतो ते टाळावेत.
वायूने फारच त्रास होऊन पोट फुगले असल्यास एक सोपा उपाय करता येईल. गुडघे व कोपरावर ओणवे होऊन गुदद्वारात साधी लहान रबरी नळी सरकवल्यास आतील हवेला वाट मिळून ती बाहेर पडते. वर सरकणे हा हवेचा नैसर्गिक गुणधर्म आहे. म्हणूनच पाण्यातून बुडबुडे वर येतात. या गुणधर्माचा वापर करून हवा गुदद्वाराच्या तोंडाशी आणता येते. आतडयाला पीळ पडला असल्यासही कधीकधी या उपायाचा गुण येतो व ऑपरेशन टळते. मात्र नळी अर्ध्या वितीपेक्षा जास्त आत सरकवू नये. योगासनांपैकी काही आसने गॅस गुदद्वाराकडे आणतात. (उदा. पवनमुक्तासन)
आयुर्वेद
वायू, गुबा-यामागे काही कारणे असू शकतात. अति पाणी पिणे,आहारात बटाटा,रताळी, साबुदाणा असे पिठूळ पदार्थ असणे, हरबरा डाळ आणि उडीद, इत्यादी डाळी. अशा विशिष्ट पदार्थांशी संबंध टाळावेत. बैठे काम करणा-यांनाही याचा त्रास होतो.
वायू, गुबारा यांचा त्रास होणा-यांना कपभर गरम पाण्याबरोबर दीड चमचा लवणभास्कर चूर्ण किंवा एक चमचा हिंगाष्टक चूर्ण दिल्यास चांगला उपयोग होतो. ही चूर्णे जेवणाबरोबर, म्हणजे भात-पोळी याबरोबरही घेता येतात.
बैठे काम करणा-यांनी पोटाच्या साध्या क्रिया कराव्यात. एक साधी क्रिया पुढीलप्रमाणे. जेवणानंतर दीड-दोन तासांनी ताठ बसून बेंबी आत ओढून5 ते 15 सेकंद तशीच ठेवण्याचा प्रयत्न करावा. असा उपाय वारंवार व नेहमी केल्यास गुबा-याचा त्रास निश्चित कमी होतो. मात्र बेंबी आत ओढून धरल्यास दुखत असेल तर आतील अवयवांना सूज आहे अशी शंका येणे साहजिक आहे अशा बाबतीत डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. योगाभ्यासात पोटासाठी बरेच उपाय आहेत.(नौलि, उड्डियान, इ.) या उपायांचा निश्चित उपयोग होतो.
होमिओपथी निवड
आर्सेनिकम, बेलाडोना, सीना, कॉस्टिकम, चामोमिला, फेरम मेट लायकोपोडियम,नक्स व्होमिका, पल्सेटिला, सिलिशिया, सल्फर,डायस्कोरिया, चायना
-- लेखक : डॉ. श्याम अष्टेकर
(MBBS, MD community Medicine)
-- आरोग्यदूत WhatsApp ग्रुपवरुन (Posted by Sushama Mohite)
September 15, 2017
लोकसंगीताचा वापर करण्यात आलेली हिंदी आणि मराठी चित्रपटातील अनेक गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत. लोकसंगीताचा ठेका हाच मुळात रसिकांचे, पाय थिकरवणारा असतो. अंगात उत्साह सळसळतो आणि आपली पावले आपोआपच जागेवर थिरकायला लागतात. लोकसंगीताच्या ठेक्यावरील अशाच एका गाण्याने गेल्या काही वर्षांपासून अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.
July 4, 2025
गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिका व त्यांच्यासह इतर अनेक देश इस्त्राईल पॅलिस्टाईन प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करत आहेत. काही वर्षांपूर्वी पॅलिस्टाईनचे नेते यासर अराफत आणि त्यावेळचे इस्त्राईलचे पंतप्रधान यांना त्यांच्या दरम्यान झालेल्या करारामुळे नोबेल पुरस्कारही देण्यात आलेला होता. प
July 23, 2014
आसाममध्ये बेकायदा राहणारे नागरिक शोधण्यासाठी ‘एनआरसी’ हा उपक्रम राबविला गेला. त्यात आसाममधील ३.२९ कोटी लोकांपैकी ४० लाख लोक नागरिकत्वाचा योग्य पुरावा देऊ न शकल्याने अवैध ठरले आहेत. भ्रष्ट यंत्रणा आणि राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने अनेक राज्यांत असे नागरिक आहेत. घुसखोरी करून देशाच्या साधनसंपत्तीत वाटेकरी होणाऱ्या अशा नागरिकांवर कारवाई झालीच पाहिजे. आसामच्या एनआरसीपासून बाकीच्या राज्यांनी वेळीच धडा घ्यायला हवा.
August 7, 2018
ज्या काँक्रीटमध्ये पोलादी सळ्या वापरतात, त्याला ‘सलोह काँक्रीट’ अथवा ‘आरसीसी’ म्हणतात. काँक्रीट ठरावीक मर्यादेपर्यंतचा दाब सहन करू शकते. इमारतीसाठी वापरले जाणारे काँक्रीट दर चौरस सेंटीमीटरला साधारणपणे २०० किलोग्रॅम वजनाचा दाब सहन करू शकते, पण काँक्रीटची कांडी बनवून तिला दोन्ही टोकाकडून ताण दिला तर ती दर चौरस सेंटीमीटरला ५ किलोग्रॅमएवढ्या वजनालाही तुटू शकते. म्हणजेच काँक्रीटमध्ये दाब सहन करायची ताकद चांगली आहे, पण ताण सहन करायची ताकद नाही.
January 31, 2023
काल युट्युब वर मिशन राणी गंज हा सुंदर सिनेमा पाहिला. मी शक्यतो सिनेमा माझी मुलगी प्राजक्तासोबतच बघत असते, म्हणजे मग छान शेअरिंग, गप्पा होतात. पण आता ती इथे नसल्यामुळे एवढ्यात एकटी एकटी मूवी बघते.
March 1, 2024
आज हे गाणं ऐकलं आणि तुमच्यासमोर थोडसं व्यक्त व्हावसं वाटलं. कोरोनाच्या काळात बऱ्याच जणांनी बरंच काही गमावलं आहे. पुन्हा माणसाला माणसाची किंमत कळली आहे. पैसा, भौतिक सुखांच्यापेक्षाही कितीतरी पट अधिक माणसांना माणूसच हवा याची जाणीव झाली आहे.
August 19, 2023
दोन दिवसांपूर्वी गांवाकडे आलोय सिंधुदुर्गात..सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत प्रचंड गरम..! घरात राहणं कठीण..! रात्री मात्र पांघरूणाशिवाय झोप यायची नाही येवढी छान थंड हवा
May 8, 2016
Copyright © 2025 | Marathisrushti