वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
श्री दत्तात्रय ह्या देवाला प्रिय असणारा हा पवित्र वृक्ष.हा १०-१६ मी उंच असून गर्द सावळी देतो.ह्याची त्वचा तांबूस धुरकट असते.पाने ७.५-१० सेंमी लांब व भालाकार,व तीक्ष्ण टोक असलेली असतात.तसेच पाने तीन शिंरांनी युक्त असतात.ह्याचे फळ कच्चे असताना हिरवे व पिकल्यावर गर्द लाल असते.फळ गोल असून २.५-५ सेंमी व्यास असलेले असते.फळे गुच्छात उगवतात.फळात लहान किडे असतात.खोडाचा छेद घेतल्यास पावसाळयात बुंधा व मुळातून पिवळे जल स्त्रवते.
ह्या झाडाचे उपयुक्तांग आहे त्वचा,फळ,क्षीर व रस.ह्याच्या फळाची चव तुरट,गोड असून त्वचा चवीला तुरट असते.हि थंड गुणाची असते व जड आणी रूक्ष असते. हा कफपित्तनाशक आहे.
चला आता आपण ह्याचे औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)वेदना युक्त सूज व जखम ह्यात उंबराचा चीक लावतात.
२)वर्ण सुधारायला उंबराच्या पानांचे शृंग लेपासाठी वापरतात.
३)जखम धुवायला व तोंडात उष्णतेचे फोड आल्यास गुळण्या करायला पानांचा काढा उपयोगी आहे.
४)लहान मुलींना जुलाब होत असतील अथवा आव पडत असेल तर आणी आजार साम अवस्थेत नसेल तर उंबराचा चीक साखरे सोबत देतात.
५)जळजळ होत असल्यास उंबराचे पाणी उपयुक्त असते.
६)दात दुःखावर उंबराचा चीक लावतात.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
ओले आले नावाचा मराठी चित्रपट शुक्रवारी ५ जानेवारी २०२४ ला चित्रपट गृहात दाखल झाला. चित्रपटाचं नाव वाचून ते समजून घ्यायचा खूप प्रयत्न केला पण काही अर्थ लागे ना. मग ठरवलं जाऊयाच चित्रपट बघायला. अर्थातच चित्रपटाला गेल्यावर त्याच्या नावाचं वेगळेपण आणि त्या चित्रपटाचं वेगळेपण लक्षात आलं.
ओडिसा वा ओरिसा राज्यातील ११०० स्क्वे. किमी परिसर असलेले अती भव्य सरोवर चीलिका वा चिल्का हे पूर्व किनाऱ्यावरील तीन जिल्ह्यात पसरलेले असून जगातील स्थलांतरित पक्षांचे दोन नंबरचे स्थान.थंडीच्या मोसमात १६० विविध तर्हेचे हजारो पक्षांचे थवेचे थवे चीलिकात उतरतात.कॅप्सीकन सी,बेकल लेक,उरल सी,(रशिया),मंगोलिया,लडाख,उत्तर हिमालय, अशा हजारो मैल दूर अंतरावरील हे पाहुणे,लेकमध्ये तीन महिने मुक्काम करतात.
मॉरिसन सरकारच्या नव्या कार्यकाळात भारताशी मैत्रीसंबंध वाढविण्यावर तेथील सरकारचा भर असेल. दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये परस्परांबद्दल विश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा समावेश असलेल्या चतुष्कोनी संवादाबाबतही भारताची भूमिका महत्वाची आहे.
२६ नोव्हेंबर २००८ ला मुंबईतील दहशतवादी हल्ला असल्याची खात्री झाली आणि नॅशनल सिक्युरिटी गार्डला बोलवण्यात आले. नॅशनल सिक्युरिटी गार्ड (एनएसजी) दिल्लीवरून विमानाने ११६३ किलोमीटरचे अंतर पार करून २७ नोव्हेंबर २००८ ला सकाळी तीन वाजता’ मुंबईत पोहचले. एनएसजीच्या ऑपरेशनमध्ये एकूण आठ दहशतवादी मारले गेले. एनएसजीचे दोन कमांडो ठार झाले तर १८ जण जखमी झाले.
रात्री उशिराचा एक रेडिओ कार्यक्रम ऐकत होते. श्रोत्याने फोनवरुन आपली समस्या सांगणे,त्यावर निवेदकाने सल्ला देणे, मग एक चित्रपट गीत. पुन्हा पुढची समस्या. पुष्कळसे इंग्लिश शब्द मिश्रित असलेल्या हिंदी भाषेतील त्या कार्यक्रमाचे स्वरुप असे होते. फोनवर एका मुलाने सांगितले की त्याची ‘गर्लफ्रेंड’ सतत काही ना काही कारणाने व परत करण्याच्या बोलीवर पैसे मागते.
१९७५ साली साहाय्यक दिग्दर्शक झाल्यावर शांतारामबापूंनी त्यांना दिग्दर्शनाची संधी दिली. १९७६ साली जगदीश खेबुडकरांचे संवाद व गीते आणि राम कदम यांचे संगीत असलेला ‘झुंज’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला.
वर्षानुवर्ष आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचे चटके सहन करत संविधानिक मार्गाने आरक्षणासाठी लढा उभारणाऱ्या सकल मराठा समाजाच्या संघर्षाला यश आले असून मराठा समाजाला शिक्षण आणि नोकर्यांत आरक्षण देण्याच्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयावर मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आपली मोहोर उमटवली आहे.
गेल्या काही दशकात आपण एकत्र कुटुंब पद्धती कडून अलिप्त कुटुंब पद्धतीकडे वळालो. आता अलिप्त कुटुंब पद्धतीत देखील छोटेखानी कुटुंबाला प्राधान्य आहे. काळानुसार हा बदल घडताना भौतिक सुख सोयी वाढत आहेत आणि घरातील माणसांचा संवाद कमी होत आहे. आई, वडील आणि मुल अशा तीन माणसांच्या छोटेखानी कुटुंबात जर आई आणि वडील सतत बाहेर व्यस्त असतील तर त्या मुलाने संवाद साधायचा कोणाशी?
मागच्या पिढीतील ताई-भाऊ, काकू-बापू आणि आमच्या आई-वडिलांचे आदर्श संस्कार आमच्या सर्व बहीण भावंडांवर झालेले. रोज रात्री आम्ही सर्वजण बसून ‘रामरक्षा’ म्हटली. ‘मानसिक शांती’ हीच जमेची बाजू. माझे माहेर गिरगावांत आंग्रेवाडीत. तिथे आम्ही लहान असताना गाववाले विष्णू साठे, रघू आगाशे वगैरे मंडळी तासनतास येत व गप्पा मारीत. ती अशी कां येत असत? हयाच उत्तर कोकणात आल्यावर त्यांची बाजूचीच घरे पाहून मिळालं. कोकणातून मुंबईत आल्यावरसुद्धा एकमेकांना भेटण्याची ओढ आणि आपलेपणा.
Copyright © 2025 | Marathisrushti