(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • जिंदगी का सफर

    जिंदगी का सफर

    जीवन…..म्हणजे नक्की काय? कुणी जाणलंय?कुणाला कळलंय?सगळंच अतर्क्य! चौऱ्याऐशी दशलक्ष योनीतून एकदाच हा जन्म मिळतो.त्यापासून शोध घ्यावा की बोध? सारंच अनभिज्ञ!अकल्पित! जीवनाचा हा प्रवास की प्रवाह?……हे फक्त “आपले आयुष्य आपण वाहून नेण्यात की वाहवून जाण्यात” पणाला लावतोय,यावर ठरत असतं.गंध उगाळल्याशिवाय पाजळत नाही,हेच खरं!वाट्याला आलेलं आयुष्य कल्याणकारी होण्यासाठी त्यावर मेहनतीचा अखंड अभिषेक केल्याशिवाय पर्याय नाही.त्यातून फलनिष्पत्ती होईल की नाही,हे कर्मावर सोपवावं. निस्वार्थ परोपकारी वाटचालीतून परमार् प्रगट होतो. त्यासाठी लाभार्थी कोण? हे ठरवणंही आपल्या हातात नसतं.

      July 1, 2023


  • जागतिक महिला दिन

    भारतात मुंबई येथे पहिला महिला दिवस ८ मार्च १९४३ साली साजरा झाला. १९७१ सालच्या ८ मार्चला पुण्यात एक मोठा मोर्चा काढण्यात आला होता. पुढे १९७५ हे वर्ष युनोने `जागतिक महिला वर्ष’ म्हणून जाहीर केले. त्यानंतर स्त्रियांच्या समस्या ठळकपणे समाजासमोर येत गेल्या. स्त्रियांच्या संघटनांना बळकटी आली.

      March 8, 2022


  • श्री शारदा भुजंगप्रयात – भाग ४

    भजे शारदाम्बामजस्रं मदम्बाम् – अशा माझ्या सर्वश्रेष्ठ आई शारदेचे मी भजन करतो.

      January 31, 2020


  • आजचा आरोग्य विचार – विषयाचे प्रास्ताविक भाग चार

    महर्षी योगी अरविंदांच्या समकालीन वासुदेव बळवंत फडके होते. दोघांनाही देशाच्या पारतंत्र्याबद्दल अतीव दुःख होते. पण योगी अरविंदांना झालेल्या गुरु आज्ञेप्रमाणे स्वातंत्र्य मिळायला अजून अवकाश असल्याने इंग्रजांच्या विरोधात सशस्त्र बंड पुकारण्याची ही योग्य वेळ नाही, हे जाणून महर्षींनी शस्त्र त्याग केला आणि स्वतःची साधना वाढवली.

      January 29, 2018


  • कोण म्हणतो भारत गरीब आहे?

    सध्या भारतीय लोकांना कोणत्या प्रश्नाने अस्वस्थ केले आहे, असा प्रश्न कुणी विचारला आणि तुम्ही महागाई, बेरोजगारी, दहशतवाद, भ्रष्टाचार, अन्नधान्य आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई यापैकी एक किंवा हे सगळेच उत्तर पर्याय म्हणून निवडले, तर दोनच गोष्टी सिद्ध होतील आणि त्या म्हणजे एक तर तुम्ही भारतात राहत नसावे किंवा भारतात राहूनही तुम्हाला भारतीय लोकांची अजिबात ओळख पटलेली नसावी.

      June 9, 2010


  • संत तुकाराम महाराज

    अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मध्ये सौ. नयना अशोक मेंगळे यांनी लिहिलेला हा लेख


    संत तुकाराम महाराजांचे अभंग नावाप्रमाणेच अभंग आहेत! अंतर्गत शक्तीची जबरदस्त ताकत त्यांच्या ठायी होती. भक्ती हेच त्यांचे सर्वश्रेष्ठ मूल्य होते. त्यांना नीतीमूल्याची जाण होती. जनजागृतीचे कार्य त्यांनी आयुष्यभर केले. विट्ठल नाम हे अमृतापेक्षाही त्यांना गोड वाटे. नामचिंतन जसेजसे खोलवर रूजले तसेतसे त्यांचे चित्त शुद्ध होऊ लागले. ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी आहे. कधी त्यांचे अंतःकरण पश्चात्तापाने दग्ध होई तर कधी ते आपल्याच मनाशी सुसंवाद साधू लागले. अहंकाराची जागा नम्रतेने घेतली. सर्व चराचरात परमेश्वर भरलेला आहे ही परमेश्वराच्या सर्वात्मकतेची जाणीव त्यांना होती. त्यामुळे त्यांच्या आचरणात आमुलाग्र बदल झाला. निस्पृह भावना, निरासक्त वृत्ती निर्माण झाली. 'वज्रादपि कठोरानि, मृदुनि कुसुमादपि' असा त्यांचा स्वभाव बनला.

    परम वैराग्य, निढळ भक्ती, अंतर्मुख वृत्ती, डोळस श्रद्धा, वाणीतील परखडपणा, कठोर आत्मपरीक्षण आणि रसाळ प्रासादिकता अशा संतश्रेष्ठ तुकोबांच्या अभंगवाणीने कवित्वाचा जणू कळसच गाठला. 'भले त्यांसि देऊ गांठीची लंगोटी । नाठाळाचे माथी हाणूं काठी' अशी भावना त्यांच्या अभंगांतून व्यक्त होऊ लागली. प्रपंचात राहून परमार्थ साधता येतो. लोकांचे कल्याण व्हावे म्हणून त्यांनी रोखठोकपणे उपदेश केला आहे.

    तुकाराम बोल्होबा मोरे (आंबिले) असे त्यांचे पूर्ण नाव. जन्म देहू गावी. त्यांचे आईवडील धार्मिक प्रवृत्तीचे आणि विठ्ठलभक्त होते. ते नित्यनेमाने पंढरपूरला जात. लहानपणीच आई-वडील वारले. थोरला भाऊ सावजी विरक्त होऊन संसार तुकारामांच्या अंगावर टाकून परागंदा झाले. दुष्काळी परिस्थितीमुळे होते ते सारे द्रव्य संपले. धंदाव्यवसायात नुकसान झाले. पहिली पत्नी रखमाई व मुलगा शिवाजी अन्नान्न करून मेले. दुसरी पत्नी अवलाई (जिजाबाई) म्हणजे पुण्यातील आप्पाजी गुळवे यांची कन्या. कजाग आणि आक्रस्ताळी होती. धंद्याचे दिवाळे निघाले. इतक्या आपत्ती वयाच्या एकविशीच्या आतच त्यांच्यावर कोसळल्या. त्यामुळे त्यांचे मन संसाराविषयी उदास, उद्विग्न झाले. परंतु या आपत्तींनी खचून न जाता त्याचा उपयोग स्थितप्रज्ञाप्रमाणे झेलून आत्मकार्याकडे त्यांनी करून घेतला. 'बरे झालें देवा, निघाले दिवाळे' असे ते अभंगात म्हणतात. नंतरच्या उत्तरायुष्यात त्यांची साधकावरच्या, नंतर साक्षात्कार आणि सिद्धावस्था, धर्मरक्षणाचे कार्य, भक्तियोग, संतसंगती, व्यावहारिक नीती, विठ्ठलभक्ती, रामभक्ती, वैदिक धर्माचे स्वरुप, शिवरायांच्या शिवधर्मांतील लोकोत्तर कार्य. समाजातील दुष्ट प्रवृत्तींवर कडाडून हल्ला, समाजकंटकांचा विरोध आदी प्रत्येक बाबतीत तुकोबांनी कळस गाठला. इतकी प्रसिद्धी कोणत्याही संताच्या वाट्याला आलेली नाही.

    श्रीपांडुरंगासह नामदेव स्वप्नांमध्ये येऊन त्यांनी तुकोबांना स्वप्नात जागे केले आणि कवित्व कर, व्यर्थ काही बोलू नकोस हे काम सांगितले. माप करते वेळी हिशोब विठ्ठलांनी ठेवून त्यांनी थापटून सावध केले. नामदेवांनी स्वप्नात सांगितले की, मी शंभर कोटी अभंग करण्याचा संकल्प केला होता. त्यापैकी शहाण्णव कोटी अभंग झाले असून उरलेले चार कोटी तू करून संकल्प पूर्ण कर. असे तुकाराम महाराज म्हणत. नामदेवांची स्वप्नात भेट झाल्यामुळे तुकोबांना कवित्व स्फूर्तीचा प्रसाद प्राप्त झाला. स्वप्नातच तुकोबांवर सद्गुरुकृपा होऊन 'रामकृष्ण हरी' हा मंत्र मिळाला. बाबाजी हे त्यांचे गुरु !

    स्वतःला पोहता येत नसता ते दुसऱ्याला शिकवू इच्छितात याला काय म्हणावे? असा सवाल तुकोबाराय करतात. मानवी गुरुची आवश्यकता नाही असे ते म्हणतात. मात्र सद्गुरूने मेघवृष्टीप्रमाणे सर्वांना समानरीतीने उपदेश करावा. त्यांच्यापैकी एकालाच निवडून आपला शिष्य मात्र करू नये. नाहीतर त्या गुरुला शिष्याच्या पापाचा अर्धा वाटा लागेल. असे विचार त्यांनी मांडले. शेवटी मन हेच आपले गुरु असते व मन हेच आपले शिष्य असते. माझा मीच व्यालो नि स्वतःच आपल्या पोटी जन्माला आलो असा एक उच्च विचार त्यांनी दिला आहे.

    प.पू. तुकाराम महाराज हे एक श्रेष्ठ विचारवंत होते. त्यांच्या विनोदी अभंगांकडे पाहिले असता त्यांचे सर्वच अभंग लोकप्रिय व लोकप्रसिद्ध आहेत. 'वाघे उपदेशिला कोल्हा | सुखें खाऊं द्यावें मला ।।' या अभंगांत भुकेला वाघ आणि धूर्त कोल्हा अशी जोडी आहे. वाघ कोल्ह्याला सांगतो की, मी भुकेला आहे. तेव्हा तू माझी भूक शमवून उपकाराचे पुण्य पदरात पाडून घे. नाहीतरी तू मरणार आहेसच. चतुर कोल्हा साळसूदपणे वाघाला सांगतो, वाघोबादादा, वाघोबादादा, तुझ्या तोंडून हे पुण्यदायक सत्य ऐकून मी आनंदित झालो आहे आणि एवढे बोलून कोल्हा मोठ्या शिताफीने पळून जातो. तुकाराम महाराज म्हणतात, वाघ आणि कोल्ह्याच्या परस्परविरोधी गोष्टीवरून दोन ठक आणि महाठकांची गाठ पडल्यावर काय होते हे जाणून घेऊन दोन धूर्तांच्या स्वभावांचे धर्म व वर्म सुजाणांनी लक्षात घ्यावे. त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या सर्व दुःखांचा, संकटांचा सन्मान 'बरे झाले देवा' या शब्दांत केला आहे. पण जेव्हा हेच तुकाराम महाराज आपल्या घराच्या स्थितीचे वर्णन उपहासात्मक विनोदी बुद्धीने करतात तेव्हा वाचक अचंबित होतो, स्तिमित होतो.

    आम्ही भाग्याचे भाग्याचे ।
    आम्हां तांबे भोपळ्याचे ।।१।।
    लोकां घरीं गाई म्हैसी ।
    आम्हां घरी उंदीरघुसी ||२||
    लोकां घरी हत्ती घोडे ।
    आम्हां आघोडीचे जोडे ||३||
    तुका म्हणे आम्ही सुडके |
    आम्हां देखोन काळ धाके ।।४।।

    तुकोबांची कीर्तने ऐकून आदराने शिवाजीमहाराजांनी त्यांच्याकडे दिवट्या, छत्री, घोडे व धन, अलंकार पाठविले पण तुकोबांनी या ऐश्वर्याचा, धनाचा स्वीकार केला नाही. ते परत करताना शिवबाला सोबत नऊ अभंग पाठविले. त्यांत काही विठूमाऊलीला व काही अभंग शिवबांना उद्देशून आहेत. आयुष्याच्या अखेरीस वैभवात राहण्याची संधी आपण होऊन चालून आली होती. ती त्यांनी नाकारली. 'आता येथे पंढरीराया । मज गोविशी कासया || तुका म्हणे देवा । माझे सोडवणे धावा ।। अशी त्यांनी प्रार्थना केली.

    सर्व संतमहात्मे एकच सत्य पुनश्च सांगत आहेत, 'हा संसार कितीही सुंदर लाडाकोडाचा वाटत असला तरी तो मोहमय आहे, मायावी आहे. तरी या मृगजळात गुंतून राहू नका. परब्रह्माकडे जाणाऱ्या मार्गाने सातत्याने दृढ निश्चयाने वाटचाल करा. 'हाचि नेम आतां न फिरे माघारी' हा निश्चय येथे महत्त्वाचा आहे.

    तुकोबांना झालेला स्वप्नदृष्टांत व सद्गुरुकृपा यामुळे त्यांच्या जीवनात झालेले आमुलाग्र परिवर्तन यामुळे ते एका उच्च पातळीवर गेले. दैवी योग्यता आली. ते मराठी भाषेचे मुकुटमणी झाले. त्यांनी नामस्मरणाने व भक्तियोगाने साधना करून संत ज्ञानेश्वरांच्या बरोबरीचा मान मिळविला. त्यांनी कंठरवाने आत्मतिडीकेने घणाघाती शब्दांत वज्रप्रहार करून समाजाला जागविण्याचा प्रयत्न केला. 'तुका झालासे कळस' ही उक्ती सार्थ झाली म्हणूनच संत बहिणाबाई म्हणतात,

    ज्ञानदेवे रचिला पाया ।
    तुका झालासे कळस ।।

    सौ. नयना अशोक मेंगळे, बोरीवली (पूर्व)

    (अनघा प्रकाशन दिवाळी अंक २०१६ मधून)

      September 6, 2022


  • अध्यात्म की बाजार…

    गेल्या काही दिवसात अध्यात्म याच्याशी संबंधीत आपल्या देशात जी काही प्रकरणे उगड झाली आहेत त्यामुळे अध्यात्म या विषयावर एक प्रश्न चिन्ह निर्माण झालेले आहे. आजही आपल्या देशात स्वतःला अध्यात्मिक गुरू म्ह्णवून घेणार्‍यां भोंदूंची कमी नाही. सर्वच अध्यात्मिक गुरू भोंदू असतात असं नाही म्ह्णता येणार आणि खर्‍या अध्यात्मिक गुरूंची समाजाला गरज ही आहेच. फक्त गुरू मंत्र देण्याच्या नावाखाली शिक्षांचा गोतावळा तयार करून आपल्या देशात चहाच्या टपर्‍यासारखी जी मठे उभारली गेलेली आहेत तेथे दिल्या गेलेल्या मंत्रात किती ताकद असेल ते त्या देवालाच ठावूक ! याच मठांच्या जागेवर अनेक गुन्हे घडल्याचेही कित्येकदा निदर्शनास येत असते. पुर्वी या बाबा, बुवा आणि भोंदू अध्यात्मिक गुरूंच्या नांदी फक्त अशिक्षीत लोकच लागत असत पण आता स्वतःला उच्च शिक्षीत म्ह्णवून घेणारे ही या बाबा – बुवांच्या पायावर पडलेले दिसतात. गरीब श्रीमंतीच स्वप्न पाहत आणि श्रीमंत मोक्षाच स्वप्न पाहत या बाबा-बुवांच्या नादी लागतो. गुरूला साक्षात त्रीदेवांपेक्षा मोठ मानणारी आपली संस्कृती त्यामुळे ही संस्कृती मानणारे आपलं सर्वस्व ही गुरूच्या चरणी अपर्ण करायला मागे पुढे पाहत नाहीत. प्रसंगी आपल्या अध्यात्मिक गुरूंसाठी आपले प्राणही देण्याची शिक्षांची तयारी असते. मागच्या काही वर्षात आपल्या देशात खर्‍या अध्यात्मिक गुरूंचे दर्शन सर्वसामान्यांना नशिबानेच होते पण त्याउलट भोंदू बाबांची अनेक प्रकरणे एका मागून एक उगडी होत आहेत. सध्याच्या अध्यात्मिक गुरूंकडे असलेल्या संपत्तीचे आकडे पाहिल्यावर देशातीलच नव्हे तर जगभरातील उद्योगपतींनाही घाम आल्यावाचून राहत नसेल. एकीकडे आपला देश मंगळावर जाण्याची तयारी करतोय आणि याच आपल्या देशातील राजकीय मंडळी जर बाबा- बुवांच्या पायावर लोटांगण घालतात अस चित्र भविष्यात दिसल तर ते आपल्या देशाचच दुदैव म्ह्णावं लागेल दुसर काय ?

    आपल्या देशातील बहूसंख्य लोक अध्यात्मिक गुरूंच्या मागे लागतात ते मोक्ष प्राप्तीसाठी मुळात मोक्ष ही संकल्पना गृहीत धरावी की नाही याबद्दल ठाम मत व्यक्त करावं की नाही इतकी माहिती उपलब्ध नाही. ढोबळ्मानाने या बाबतीत असेही म्ह्णता येईल की अस्तित्वाच नसलेली गोष्ट मिळविण्यासाठी सार्‍यांचा अट्टहास सुरू आहे. आपल्या देशातील एखाद्या कुटूंबातील कुटूंब प्रमुखाने गुरू केला की तो आपल्या कुटूंबातील सर्वांनाच त्या गुरूच्या चरणी लोटंगण घालायला भाग पाडतो. पुर्वी फक्त ईश्वर हाच आपला एकमेव संरक्षण कर्ता आहे अशी सर्वसाधारणतः लोकांची समजूत होती पण हल्ली सर्व संकटातून, दुःखातून मुक्ती मिळवून मोक्षाच्या मार्गावर मार्गस्थ होणाचा एक मेव मार्ग म्हणजे गुरूमंत्र आणि तो देणारा अध्यात्मिक गुरू असा गैरसमज समाजात जाणिव पूर्वक पसरविला गेला आहे. आपल्या देशातील वाढ॑ती लोकसंख्या ,मुळभूत गरजांचा अभाव, वाढती बेकारी आणि वाढत्या सामाजिक समस्या यामुळे त्रस्त झालेल्या आजारी पडलेल्या प्रत्येकाला एक मानसिक आधार हवा असतो नेमका तो आधार हे अध्यात्मिक गुरू योग्य वेळी देतात आणि लोकांच्या गळ्यातील ताईत होतात. समाजात संस्कृती, संस्कार आणि नैतिकता टिकून राहावी म्ह्णून समाजाला ईश्वर या संकल्पनेची आणि अध्यात्मिक गुरूंची आवश्यकता आहेच पण ती फक्त खर्‍या अध्यात्मिक गुरूंची भोंदूंची नाही. आता या भोंदू बाबा, बुवा आणि अध्यात्मिक गुरूंचे पितळ उगडे पाडण्यासाठी खर्‍या अध्यात्मिक गुरूंनीच पुढाकार घ्यायला हवा. आपल्या देशात अध्यात्माच्या नावावर प्रचंड बाजार मांडलेला दिसतो ज्यात लाखो लोक आपला स्वार्थ साधताना दिसतात. आपल्या देशातील शिक्षणपध्दतीत एक त्रूटी आहे ती म्ह्णजे आध्यात्म या विषयाचा शाळेय शिक्षणात समावेश केला गेला नाही ते होण गरजेचे आहे. आपल्या देशातील स्वतःला स प्रसिध्द म्ह्णवून घेणार्‍यांचे आपल्या संस्कृती बाबतचे ज्ञान नव्हे अज्ञान किव येण्यासारखे असल्याचे बर्‍याचदा दिसते. आपल्या देशात अध्यात्माच्या नावावर जमा झालेला बराचचा पैसा लोकहिताच्याच कामी आला असता तर देशाची बर्‍यापैकी प्रगती झाली असती. सर्वच अध्यात्मिक गारूंचे आर्थिक व्यव्हार अधिक पारदर्शी करण्याबाबत सरकारणे विचार करायला हवा. अध्यात्म हे लोकांना ज्ञानाचा मार्ग दाखविण्यास कारणीभूत ठरायला हवे पण आज अध्यात्माचा बाजार मांडून ते लोकांना लुबाडण्याचा अड्डा होत आहे...हे कोठे तरी थांबायला नको का ?

    लेखक – निलेश बामणे
    गोरेगांव ( पूर्व ) मुंबई
    मो. 9029338268

      December 20, 2014


  • ४० लाख तरुण व्यसनाधीन करणारा नार्को टेररिझम

    जम्मू –काश्मीर, पंजाब आदी सीमावर्ती राज्यांत घुसखोरांबरोबरच शस्त्रास्त्रे आणि अमली पदार्थांची तस्करी करून तेथे अशांतता माजविण्याची व तरुण पिढी बरबाद करण्याची कुटिल खेळीही पाकिस्तान खेळत आहे. हा गंभीर धोका ओळखून त्याचा एकजुटीने मुकाबला केला पाहिजे. या भस्मासुराचा बंदोबस्त करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती दाखविण्याची आणि राज्य व केंद्राने समन्वयाने काम करण्याची गरज आहे.

      January 23, 2015


  • डिलिव्हरीनंतर नेमकं काय कराल; काय टाळाल?

    पिढ्यानपिढ्या या देशातले लोक बाळ-बाळंतीणीची व्यवस्थित काळजी घेत आहेत. ते जणू मूर्खच होते असे चित्र रंगवून परदेशी कंपन्यांच्या चकचकीत वेष्टनातली ‘बेबी किट्स’ वा ‘टॉनिक’ गळ्यात मारण्याच्या उद्योगांपासून सावधान!!

      December 29, 2017


  • चवीने खाणार त्याला आरोग्य लाभणार!

    अम्ल रस हा उत्तम पाचक आहे. त्यामुळे उतारवयात होणाऱ्या मलावष्टंभ व इतर पचनविकारांवर रामबाण. आपल्याकडे पूर्वापार आलं-लिंबू पाचक बनविले जाते ते याचेच उदाहरण. अम्ल रसाची आणखी एक विशेषता म्हणजे, यामुळे एक प्रकारची तरतरी येऊन थकवा दूर होतो. सर्व सरबतं डोळ्यांसमोर आणा, म्हणजे सहज लक्षात येईल. पण याच्या अति सेवनामुळे मात्र स्नायू, यामध्ये शिथिलता येते, तसेच विविध त्वचारोगांचीही उत्पत्ती होते.

      April 22, 2023