वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
कोटीराङ्गदरत्नकुण्डलधरे कोदण्डबाणाञ्चिते ।
शिञ्जन्नूपुरपादसारसमणीश्रीपादुकालंकृते
मद्दारिद्र्यभुजंगगारुडखगे मां पाहि मीनाम्बिके ॥ ३॥
आई जगदंबेचे अद्भुत वैभव वर्णन करताना आचार्यश्री म्हणतात,
कोटीराङ्गदरत्न- कोटी अर्थ वेगवेगळ्या प्रकारचे, अत्यंत मौल्यवान रत्नांनी घडविलेले अंगद म्हणजे बाजूबंद,
कुण्डलधरे- कुंडलांना धारण करणाऱ्या, कोदण्डबाणाञ्चिते- कोदंड अर्थात धनुष्य. हे भगवान विष्णूंच्या धनुष्याचे नाव. दंड अर्थात सत्ता. अधिकार. ज्यावर कोणाचाही दंड चालत नाही ते कोदंड. आई जगदंबेची देखील क्षमता तशीच असल्याने तिच्या हातातील धनुष्याला ही कोदंड म्हटले आहे.
हे कोदंड आणि बाण धारण करणाऱ्या,
कोकाकार- कोका अर्थात पांढऱ्या कमळाच्या उमलण्यास सिद्ध असणाऱ्या टपोऱ्या कळीप्रमाणे आकार असणाऱ्या,
कुचद्वयो- स्तन युगुलावर,
परिलसत्प्रालम्बहाराञ्चिते- रुळणाऱ्या मोत्यांच्या माळांनी अत्यंत सुंदर दिसणाऱ्या,
शिञ्जन्नूपुर- मनोहरी किंकिंण करणाऱ्या पैजणरूपी,
पादसारस- सारस पक्षी जसा कमळावर बसून आवाज करतो तशी ती पैंजणे चरण कमला वर ध्वनी करीत आहेत अशी,
मणीश्रीपादुकालंकृते- रत्नजडित सौंदर्याने संपन्न खडावा चरणात धारण करणाऱ्या, रत्न आणि सोने यांचे पैंजण देखील राणी शिवाय कोणाला वापरण्याची परवानगी नाही. संपूर्ण विश्वाची महाराणी असणारी आई जगदंबा पैंजणच नव्हे तर खडावा देखील रत्नजडित वापरते
आई जगदंबेच्या अद्वितीय वैभवाचे वर्णन करताना आचार्यश्री एका वेगळ्याच भूमिकेला आपल्यासमोर ठेवतात. येथे त्यांनी वापरलेली उपमा अत्यंत मनोज्ञ आहे. आचार्य श्री म्हणतात,
मद्दारिद्र्यभुजंगगारुडखगे - माझ्या दारिद्र्य रुपी सर्पा करिता गरुड रुपी पक्षी असणाऱ्या, अर्थात जसे गरुडाला पाहताच सर्प पळून जातो तसेच तिच्या दर्शनाने संपूर्ण दारिद्र्य लुप्त होते अशा सकल दारिद्र्य विनाशिनी,
मां पाहि मीनाम्बिक- हे आई जगदंबे मीनाक्षी माझे रक्षण कर.
-- प्रा. स्वानंद गजानन पुंड
May 27, 2020
राष्ट्रीय सुरक्षा परिषद भारतात ४ मार्च १९६६ रोजी स्थापन करण्यात आली, म्हणून हा दिवस ‘राष्ट्रीय सुरक्षा दिन’ म्हणून साजरा केला जातो. ‘नॅशनल सेफ्टी कौन्सिल’ ही एक स्वायत्त संस्था आहे, जी निस्वार्थ भावनेने कार्य करते.
March 4, 2025
वर्षभर ज्या सणाची आतुरतेने वाट पाह्यची सवय लहाणपणापासुनच लागलेली आहे, तो दिवाळसण आजपासून सुरु झाला. यंदा गणपती, नववरात्राप्रमाणे दिवाळीवरही पावसाची सावट असल्याने आणि फटाक्यांमुळे होऊ शकणाऱ्या प्रदुषणाचा बागलबोवा उगाचंच उभा केला गेला असल्यामुळे थोडासा हिरमोड झाला हे खरं असलं तरी उत्साह मात्र कणभरही कमी झालेला नाही. परिस्थिती नैसर्गिक असो वा मानव निर्मित, सणांची राणी असलेल्या दिवाळीचं स्वागत तिच्या इतमामाने, पारंपारीक पद्धतीनेच केलं पाहिजे हे माझं आग्रहाचं मत आहे, मग पाऊस काही करो आणि कायदा काही म्हणो. दिवाळी हा कृषी संस्कृतीतला सण असल्याने या दिवसांत पाऊस हा असायचाच कारण शेतीचा तो अविभाज्य भाग आहे, पण या सणात कायद्याची लुडबूड मात्र अनाकलनीय आहे. असो, आपण आपला सण पारंपारीक पद्धतीनेच साजरा करावा असं मला वाटतं, क गाढव असतो..!
October 16, 2017
या लेखामध्ये एचएएलने विमाने कशी निर्मिती केली, यांनी बनवलेल्या विमानांची क्षमता कशी होती, या विमानांची किंमत किती होती आणि ही विमाने वेळेवर हवाई दलाला देण्यात आली होती का, त्यांच्याऐवजी खाजगी क्षेत्रातील कंपनीला प्राधान्य का देण्यात आले या पैलूंवर ते आपण चर्चा करू.
October 29, 2018
सिग्मंड फ्राईड एकदा बायको व मुलाला घेऊन बागेत फिरायला गेला. मुलगा छोटा होता. आई-वडील गप्पात गुंग झाल्यावर तो हळूच तेथून संधी साधून गायब झाला. थोडया वेळानंतर समोरच खेळणारा मुलगा गेला कुठे म्हणून आई कासावीस झाली. घाबरून ती इकडे तिकडे त्याला शोधण्यासाठी पळू लागली. घाबरलेल्या, सैरावैरा पळणार्या आपल्या पत्नीला फ्राईड म्हणाला, ‘‘अगं मला एवढंच सांग आपला बागेत जायचा बेत ठरला तद्नंतर तू त्याला अमुक एक जागी जाऊ नकोस असं काही सांगितलं होतं का?’’ ती म्हणाली हो, ‘‘बागेतल्या कारंज्याजवळ जाऊ नको असं बजावलं होतं. त्याने, लगेच बायकोला घेऊन कारंज्याकडे कुच केली. मुलगा कारंज्याच्या थुई-थुई नाचणार्या पाण्यात पाय बुडवून मजेत पाण्याचे फवारे अंगावर घेत नाचत होता.’’ बायकोने मुलाला हाक मारली व फ्राईडचा हात धरत विचारलं, ‘‘तुम्हाला सिध्दी प्राप्त झालीय का ? हा कारंज्याजवळच आहे हे कसे तुम्हाला कळालं ?’’ फ्राईड म्हणाला - ‘‘सिध्दी-बिध्दी काही नाही, मला माणसाचं मन समजतं थोडंफार.’’
खरोखर मित्रांनो कवयत्री बहिणाबाईंनी म्हटल्याप्रमाणे आता भुईवर असणारं मन क्षणार्धात आकाशात जाते. प्रयोग करून पहा, डोळे मिटून ध्यान करताना ध्यानात माकडे यायला नकोत असा विचार केला कि दोन-तीन माकडं डोळयासमोर येतील. एखादया दारावर आत डोकावू नये अशी पाटी लावली कि आत डोकावण्याची तीव्र इच्छा मनात निर्माण होईल व काहीही करून आपण आत डोकावणारच.
एक राजा लढाईला जाताना राजमहालात आपल्या देखण्या राणीला ठेवून जिवलग मित्राकडे चावी देऊन राजा त्याला म्हणाला, ‘‘मित्रा मी जर तीन दिवसांत परत आलो नाही तर लढाईत माझा मृत्यू झाला असे समजून तू राजमहालाचे कुलूप उघड व राणी तुझीच असे समज.’’ राजा लढाईला निघाला. वाटेत एक तासानंतर तो विश्रांतीला थांबला. पाहतो तर काय त्याचा जिवलग मित्र खूप वेगाने घौडदौड करत चावी घेऊन आला व राजाला म्हणाला अरे यार ही किल्ली दुसर्या कुलपाची दिसतेय, राणीच्या महालाची नाही. पाहिलंत ना, राणीच्या मोहापायी तीन दिवसांनी कुलूप उघडण्याची राजाज्ञा त्याने धुडकावून लावली होती.
अंर्तमनाला एखादी गोष्ट करू नकोस असे ताकिद देऊन दरडावून सांगितले की ते तीच गोष्ट करून बघण्यासाठी धडपड करते. त्यावेळी बर्हिमनाने त्याला सहजपणे - हळुवारपणे, तत्वनिष्ठ भावनेने गोंजारत समजावून सांगितले व त्याचे फायदे-तोटे मैत्रीभावनेने लक्षात आणून दिले कि अंर्तमन-बर्हिमन यात सुसंवाद सुरू होतो. तेथे ताणाचा अजिबात लवलेश नसल्याने दुष्कृत्य घडत नाहीत. अंर्तमन व बर्हिमन यांच्यात सतत बोलणे चालू असते. त्यालाच स्वसंवाद असे म्हणतात. आपल्या मनाचा काही भाग आपण सर्वांना दाखवण्यासाठी प्रयत्न करतो. पण काही भाग मात्र कोणालाही व कधीही दिसू नये यासाठी आपण जागरूक असतो.
आपला भाव देवाला दिसावा असे भक्ताला वाटते, आपले प्रेम प्रेयसीला कळावे असे प्रियकराला वाटते, कविता रसिकांनी वाचावी व लोकांनी आपणांस दाद दयावी असे कवीला वाटते. आपल्या जीवनाचा काही भाग सगळयांना दिसावा पण संपूर्ण अंतरंग मात्र सगळयांना दिसावे, असे आपणास कधीच वाटत नाही. कारण आपण प्रथम आपले व नंतर जगाचे असतो.
मन हा आपल्या जीवनाचा गाभा आहे. जीवनाचे सारे रंग व तरंग सामावून घेणारे अंतरंग म्हणजे मन. निर्वाणाचा साक्षात्कार होतो तो मनाच्याच ठायी. सारे वेग व आवेग विराम पावतात ते मनाच्याच ठायी. जीवनाचे सुख-दुःख हे मनावरच अवलंबून असते. म्हणून मनात काय चाललेय याचा वारंवार एक्स-रे काढण्यासाठी सजग राहून दिर्घश्वसनाचा सराव करावा. थोडे चालणे, काही आसने करणे, सुर्यनमस्कार घालणे महत्वाचे असते. हे करण्याबरोबर मनाचे शांत चित्ताने तटस्थपणे निरिक्षण करावे त्यासाठी *रोज सकाळ-संध्याकाळ मांडी घालून शांत बसा. तटस्थपणे येणार्या जाणार्या श्वासाला डोळे मिटून जाणत रहा*. यामुळे मनातील विचारांचे वादळ हळूहळू शांत होऊ लागेल व मनाचा एक्स-रे व्यवस्थित पाहून मनानी मनानेच ऑपरेशन करून मनाला प्रसन्न करता येईल.
शेवटी म्हणतात ना, ‘‘मन करा रे प्रसन्न - सर्व सिध्दीचे कारण.’’
Forwarded Post
December 12, 2016
माता कात्यायनी हा दुर्गेचा सहावा अवतार आहे. महर्षी कात्यायन यांच्याकडे मातेने कन्या स्वरूपात येऊन काही काळ सहवास केला होता. त्यामुळे महर्षी कात्यायन यांच्या नावावरून मातेला कात्यायन हे नाव देण्यात आले.
October 26, 2020
ज्यांना जो पक्ष आवडतो, त्याना मतदार मतदान करत असतो. काहीजण पक्ष कुठलाही असे, आपल्या जातीच्या उमेदवाराला मतदान करत असतो. अशांना देशापेक्षा जात महत्वाची वाटते. काही आपल्या धर्माच्या उमेदवाराला मतदान करत असतो. काही पक्षांची पारंपारीक मतं असतात, ती काही झालं तरी त्या पक्षाच्या उमेगवारालाच जातात .
April 20, 2019
युरेनियम हे लोह, तांबं, जस्त यासारखंच धातूच्या स्वरूपातलं मूलद्रव्य आहे. मात्र हे मूलद्रव्य अल्प प्रमाणात किरणोत्सर्गी आहे.
August 10, 2023
स्वाइन फ्लूच्या देशभरातील रुग्णांनी हजाराचा टप्पा ओलांडला असून पुण्यात याचा प्रादुर्भाव सर्वात जास्त आहे. अर्थात या आजारामुळे घाबरून न जाता त्याचा सामना करण्यासाठी काही खबरदारी घेण्याचा सल्ला वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ देत आहेत. स्वाइन फ्लूसंदर्भात लक्षात ठेवाव्यात अशा काही ठळक बाबी...
स्वाइन फ्लू म्हणजे काय?
स्वाइन फ्लूलाच स्वाइन इन्फ्लुएन्झा, एच१एन१ फ्लू, हॉग फ्लू किंवा पिग फ्लू अशी अनेक नावे आहेत. पक्षी, प्राणी विशेषत: डुकरांमध्ये आढळणा-या तापाच्या या प्रकाराची लक्षणे मानवी शरीरात गंभीर स्वरूप धारण करतात. या तापाचे इन्फ्लुएन्झा ‘ए’ आणि इन्फ्लुएन्झा ‘सी’ असे दोन प्रकार आहेत. यापैकी इन्फ्लुएन्झा ‘ए’चे एच१एन१, एच१एन२, एच३एन१, एच३एन२ आणि एच२एन३ असे प्रकार आहेत. स्वाइन फ्लूचं वेळीच निदान झाल्यास त्याला प्रतिबंध करता येतो. निरोगी शरीर कोणत्याही आजारपणास अटकाव करण्याचा उत्तम मार्ग आहे. यासाठी आपलं शरीर तणावमुक्त असणं गरजेचं आहे.कारण तणावामुळेही शरीर यंत्रणा कमकुवत बनू शकते. काही गोष्टी कटाक्षाने पाळल्यास स्वाइन फ्लूच नव्हे; अन्य कोणताही आजार दूर ठेवता येतो.
प्रमुख लक्षणे
थंडी वाजून खूप ताप येणे घसा दुखणे स्नायूदुखी सतत डोके दुखणे कफ कमजोरी निरुत्साही वाटणे हृदयाच्या तक्रारी असलेल्या रुग्णांना सामान्य रुग्णांपेक्षा याचा अधिक त्रास होतो. कारण या आजाराचा हृदयाच्या कार्यप्रणालीवर परिणाम होतो. त्यामुळे श्वास घेण्यात अडथळे, रक्तदाबात बदल, हृदयाचे ठोके वाढणं, थेट हृदयावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. या कारणांमुळे हा आजार हृदयाच्या तक्रारी असलेल्यांना अधिक त्रासदायक, धोकादायक ठरू शकतो. हा ताप आल्यावर श्वास घेण्यात अडथळा निर्माण होतो. ब्रिटिश हार्ट फाऊंडेशनच्या अहवालानुसार, या आजाराच्या फैलावाच्या काळात फ्लूसारख्या गंभीर प्रसंगी आजारादरम्यान किंवा लागण झाल्यानंतर तात्काळही हृदयविकाराचे धक्के बसू शकतात.
हे कराच!
नियमित योग, ध्यानधारणा आणि श्वासाचे व्यायाम करा. तणावाचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि हृदयाच्या आजारांवर मात करण्यासाठी शारीरिक क्रिया हा उत्तम मार्ग आहे.
स्वत:ला शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. आनंद वाटणा-या कामात स्वत:ला कार्यरत ठेवा. आवडीचं संगीत ऐका. कारण तणाव दूर करण्यासाठी संगीत हे उत्तम साधन आहे.
सूर्यप्रकाशात बाहेर पडा. कारण सूर्यप्रकाशात मिळणारं ‘डी’ जीवनसत्त्व आजारांशी लढण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा. कमी कॅलरीच्या समतोल आहाराचं सेवन करा.
हात धुण्यासाठी नेहमी अॅण्टिबॅक्टेरियल साबण वापरा. १५ सेकंद साबणाचा फेस हाताला लावून नंतर हात पाण्याने स्वच्छ धुवा. माणसाला साधारण आठ तास झोप आवश्यक असते. तेवढी झोप मिळाली की प्रतिकारशक्ती उत्तम राहते.
शरीरातील अनावश्यक टॉक्सिन बाहेर टाकण्यासाठी दिवसभरात आठ ते दहा ग्लास पाणी पिणं आवश्यक आहे. पुरेसं पाणी प्यायल्याने आजार दूर राहतात.
तापासारख्या आजारात प्रतिकारशक्ती उत्तम असणं आवश्यक असतं. कारण शरीरात येणा-या विषाणूंना थोपवण्याचं कार्य प्रतिकारशक्ती करते. म्हणून ती वाढवणं गरजेचं आहे.
स्वाइन फ्लूचा प्रसार अधिक होऊ नये म्हणून शासन वेळोवेळी काही सूचना करीत आहे. त्यांचे नियमित पालन करा आणि हा प्रसार रोखण्यास मदत करा.
अल्कोहोलमुळे प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अल्कोहोलमिश्रित पदार्थ घेऊ नका.
नियमित व्यायामाने रक्ताभिसरण सुरळित होते, जेणेकरून संपूर्ण शरीराला ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. म्हणूनच आठवड्यातून तीन ते चार वेळा ३० ते ४० मिनिटे वॉक करा.
तोंडावाटे बाहेर पडणारा कफ अथवा नाकातून येणा-या शिंकेमधून तापाचे विषाणू बाहेर पडतात. ते हवेतून दुस-या माणसाच्या नाकात शिरतात. त्यामुळे आजारी माणसाच्या संपर्कात आल्यास त्याच्यापासून किमान एक फुटाचं अंतर राखा आणि शक्यतो त्याला हात लावू नका.
खोकला, सर्दी किंवा ताप आला असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यांच्या सल्ल्यानुसार वागा. त्यांनी दिलेली औषधं नियमित वेळेवर घ्या.
गर्दी टाळा. गरज नसताना गर्दीच्या ठिकाणी किंवा सहलीला जाणं टाळा.
स्वाइन फ्लूचा प्रतिबंध करण्यासाठी सरकारी यंत्रणाही सज्ज झाली आहे. यासंदर्भातील शंकांचे निरसन करून घेण्यासाठी किंवा मदत मिळवण्यासाठी खालील क्रमांकांवर संपर्क करा.
हेल्पलाईन क्रमांक
राज्य : -०२२-२२०२६५७९
बृहन्मुंबई महापालिका : ०२२-२३०८३९०१
ठाणे : ०२२-२५३४७७८५
पुणे : नायडू रुग्णालय - 09923130909
August 13, 2009
डॉ. मंजू बन्सल या आण्विक बायोफिजिक्स क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत. त्या बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या आण्विक बायोफिजिक्स युनिटमध्ये सैद्धांतिक बायोफिजिक्स ग्रुपमध्ये प्राध्यापक होत्या . त्या बंगळुरू येथील इन्स्टिट्यूट ऑफ बायोलॉजिकल इन्फॉर्मेटिक्स अँड अप्लाइड बायोटेक्नॉलॉजीच्या संस्थापक संचालक आहेत.
August 15, 2025
Copyright © 2025 | Marathisrushti