(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
  • बाजार’ – एक गडद नज्म !

    वधूची विक्री, एका गल्फमधील श्रीमंत भारतीयाला ! विक्री हा एकच समान धागा ! “कमला” दिल्लीत तर “बाजार ” हैद्राबादमध्ये ! स्मिता, नसीर, फारुख शेख, सुप्रिया पाठक, सुलभा देशपांडे- दृष्ट लागावी अशी स्टारकास्ट ! चित्रपटातील आणखी एक पात्र म्हणजे पार्श्वभूमीवरील हैद्राबाद ! ( यापूर्वी ” धरम “, ” मोहल्ला अस्सी ” , ” मुक्ती भवन” अशा अनेक चित्रपटांना वाराणशी ने सबळ पार्श्वभूमी पुरविली आहे. अगदी अलीकडचा नीना गुप्तावाला ” द लास्ट कलर “)

  • परीस…

    भीती नावाच्या प्रकाराची मनुष्याला अगदी लहान वयातच ओळख होत असते." झोप लवकर, बागुलबुवा येईल बघ. "इथपासून सुरू झालेला आपल्यातील भितीचा प्रवास अगदी शेवटच्या श्वासापर्यंत म्हणजेच मृत्यूशय्येवर पडल्यावर होणाऱ्या विलक्षण थररकापापर्यंत सुरूच असतो. भितीची कारणं वेगवेगळी असतील... प्रतिक्रिया सुद्धा वेगवेगळ्या असतील परंतु कोणतीही व्यक्ती घ्या कशाची ना कशाची भिती तिला सदैव सतावत असतेच.. लहानपणी मला अशीच बुरुजावरच्या घुबडाची फार भीती वाटायची... आमचं घर म्हणजे फार मोठा बुरुजाचा वाडा होता.. त्याच्या प्रत्येक बुरुजावर घुबडाचे कायम वास्तव्य असायचे. संध्याकाळ झाली की सारे पक्षी आपापल्या घरट्याकडे परतायचे...आमची सुद्धा खेळून खेळून घरी परतायची वेळ तीच असायची. मी पळत पळत घराकडे निघतांना बुरुजाकडे जायच्या पायऱ्या म्हणजे आम्ही त्याला 'चोप' म्हणायचो.अर्थात उतरत्या दगडी पाय-याचा रस्ता, या चोपंवर पाऊल ठेवलं की एकदम डोळ्यासमोर एक घुबड बसलेले दिसायचे मग पुढे जायची हिंमत व्हायची नाही. वाट बघायची कोणी मोठा माणूस वाड्यात जाणारा येईल का ? म्हणजे त्यांच्या सोबत जाता येईल. खरं तर एक लहानसा खडा फेकून हाणला तरी ते घुबड उडून जाईल पण तसे करणे शक्य नव्हते कारण त्या बाबतीत अशी एक दंतकथा होती की या घुबडांना जर का खडा मारला तर ते घुबड अलगद खडा झेलते अन् समुद्रात नेऊन टाकते मग जसा जसा खडा विरघळत जाईल.. तसे तसे आपण सुद्धा विरघळून जातो... या कथेचा एवढा प्रभाव होता की कधीच आम्ही घुबडाला खडा फेकून मारू शकलो नाही..

    जागच्या जागेवर गरकन फिरणारे... लुकलुकणारे त्याचे भेसूर डोळे, टवकारलेले कान,पंखांची केलेली फडफड काही केल्या माझ्या डोळ्यासमोरून जायची नाही. मध्यरात्री केव्हातरी घुssघुss असा घुबडाचा आवाज ऐकू यायचा.. मग तर अधिकच भिती वाटायची. तोंडावर पांघरून घेतलं तरी घुबड सारखं दिसत राहायचं. खरंतर नंतर मोठे झाल्यावर कळलं की घुबड काही देशात शुभशकून मानले जाते..घुबड हे तर ज्ञानाचे प्रतिक आहे. परंतु आपल्याकडे मात्र घुबडाला अशुभ मानतात.घुबड म्हणजे कुरुप आणि अजागळ पक्षी .. आमच्या लहानपणी आमच्या मित्रांचा सगळा वाचिक व्यवहार घुबड हा शब्द घेऊनच चालायचा. 'घुबडा सारखं काय टकमक बघतोस ?' ..'घुबडासारखं तोंड करायला काय झालं..?' 'घुबड्या तोंडाच्या...?' अन् मुलगी किंवा भांडकुदळ बाई असेल तर 'ती घुबडी..' असे घुबडा बद्दलचे वाक्य उच्चारतांना त्या घुबडाची भिती तेवढी कायम होती. खेळता-खेळता आम्ही घुबडाचं एक गाणं म्हणत असू .. घुबड घुमतं, पैसा मागतं पैसा कशाला?...असं ते बरंच लांबलचक गाणं होतं.

    काही लोक सांगायचे की आपली अंडी उबवण्यासाठी घुबड सातासमुद्रा पलीकडून परीस आणतात. हा परिस लोखंडाला लावला तर त्याचं सोनं होतं. आमच्या वाड्यात बसल्यानंतर चर्चा निघायच्या आमचे एक चुलत आजोबा नेहमी तवा किंवा लोखंडी वस्तू घुबड बसायचं तिथं नेऊन ठेवायचे. परिस आणला तर तो लोखंडी वस्तूला लागेल व ती सोन्याची होईल. या आशेवर वाट बघायचे.. .. परंतु कधीच त्यांच्या लोखंडाला परीस लागला नाही. यावरून असा निष्कर्ष ते काढत असायचे की घुबड आपल्या परिसाला खूप जपते, चुकूनही लोखंडाच्या जवळ अंडी ठेवत नाही. अशा चर्चा आमच्या कानावर पडायच्या अन मनात यायचे चुकून कधीतरी आपल्याला हा परिस सापडेल काय..? मग आपण साऱ्याच लोखंडी वस्तू सोन्याच्या करून टाकू बालबुद्धीला वाटत असणारे हे विचार हळूहळू वास्तवाचा शोध घेत गेले..अन् कळून चुकलं की 'परीस' नावाची अशी कोणतीच वस्तू जगात नसते... पण एक मात्र खरं की सतत चांगलं काम, प्रेमाने बोलणं,सत्य वागणं,अभ्यास, वाचन,चिंतन,गुरुचा सहवास,ज्ञानकणाची जिज्ञासा..यासारखे किती तरी परीस‌च होते जे पुढील आयुष्यात भेटत गेले ..कसे स्पर्शत गेले नकळत कळलं सुद्धा नाही..?स्वतःच्याच आयुष्याचं सोनं कसं होत गेलं तेही समजलं नाही ? घुबडाबाबतचे ते विचार आजही आठवतात...पण प्रत्यक्षात आज घुबडंच दिसत नाहीत..अन् भिती तर केंव्हाच पळून गेली आहे..दूर. बुरुजाचा वाडा ही तसा शाबूत राहिला नाही...फक्त मनावर काही परीस राहून गेले.तेच परीस मी जपत राहतो...जीवापाड.अजून ही असेच नवनवीन परीस भेटत राहतात... नकळतपणे. तेव्हा आयुष्याच सोनं होऊन जातं...‌

    -- संतोष सेलूकर.
    परभणी
    ७७०९५१५११०.

  • २३ मे – जागतिक कासव दिन

    कासवांच्या सातही प्रमुख प्रजाती सध्या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. म्हणूनच त्या प्राणिसंवर्धन आणि संरक्षण कायद्याच्या परिघात येतात. समुद्री कासवांना पकडणे बेकायदेशीर आहे.

  • लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग – १)

    संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचा सर्वप्रथम ठराव करण्यात आला तो 1946 च्या बेळगावात झालेल्या साहित्य संमेलनात! पुढे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. समितीच्या आंदोलनातून महाराष्ट्राची निर्मिती झाली, परंतु ती संयुक्त महाराष्ट्राची नव्हती, तर अपूर्ण महाराष्ट्राची!

  • मनं निर्ढावत चालली आहेत

    हिरवी हिरवी रानं....निळं निळं आकाश...लख्खं लख्खं सूर्यप्रकाश पात्यापात्यावर चमकणारे दवबिंदू ...उंच माळाच्या पोटाला अलगद बिलगून जाणारी चिमुकली पाय वाट. हलकेच झाडाला हेलकावून टाकणा-या वा-याच्या लहरी... झाडावर बगळ्यांची पांढरी नक्षी हे सारं असं मनात साठवलेलं होतं.. पूर्वी.परिसराची किती किती ओढ होती म्हणून सांगावी.... निसर्गाविषयी खूप आकर्षण वाटायचं.. तासनतास घालवायचे नदीच्या काठावर.. पिवळी- पिवळी कन्हेरीची फुलं गोळा करायची.. वाटत रहायचं आपल्याला ह्या फुलाशिवाय या निसर्गाशिवाय पर्यायच नाही... अगदी बुडून जायचो निसर्गाच्या रुपात तेंव्हा.. हळूहळू काळ बदलला.. एक एक करून अनुभवाचे पक्षी -हदयाच्या झाडावर गोळा होऊ लागले.त्यातले काही विचित्र होते.. काही थोडे निराशावादी होते. तर काहीना वर्गीकरणाच्या कुठल्याच कप्प्यात बसवता येणार नाही एवढे भयानक होते....

    ज्या निसर्गावर जीवापाड प्रेम करावं. जीव ओवाळून टाकावा असे वाटायचे तोच निसर्ग आज खायला उठल्यासारखा वाटू लागला आहे.. आपल्याला शेत आहे याची जाणीव होऊ लागली.. मग नदीला मोठ्ठा पूर आला तर सारी पिकं वाहून जातील... नुकसान होईल अशी भिती वाटू लागली. त्यामुळे पूर्वीसारखा मोठ्ठा पाऊस आल्यावर पूर आला तर टाळ्या वाजवून होणारा आनंद आज राहिला नाही... जाणिवांची मनात पक्की वस्तीस्थानं होत गेली.. अन पूर्वीच्या आनंदाच्या झोपडीचं पुनर्वसन होत गेलं... एक एक करून हळूहळू खळाळून हसणं विरुन गेलं...उरलं फक्त नाटकी हसणं तेवढंच...

    आत्ता आत्ता मुर्दाड विचारांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. हळूवार भावनांचे पक्षी दूर देशी उडून गेलेत आपण एक निगरगठ्ठं दगडी माणूस बनू लागलोय... तरीही आपण हात- पाय हलवून जिवंत असल्याचं नाटक करत असतो... आपण जिवंत नसतोच मुळी.. आपल्या भावना मृत... आपल्या संवेदनांना बोथट कातडीची साल.. कासवाच्या पाठीवरील टणटणीत... कवचासारखी किंवा आपण म्हणजे एखाद्या खाटीकखान्यात कसाई... कुणाबद्दलही कशाबद्दलही अनुकंपा न बाळगणारं आपलं स्वार्थी कठोर मन... या सार्या गोष्टी पुरेशा आहेत आपले मुर्दाड जीवन स्पष्ट करायला.... फक्त श्वास घ्यायलाच आपण जीवंत जीवन समजत असतो.

    आता तर आपल्या डोळ्यांमध्ये स्प्लेन्डर किंवा कॅलीबर्सची स्वप्न तरळू लागली आहेत. कधी कधी आपण एखादी ड्रीम राईडही घेऊ लागतो त्यावरून. एखाद्या गाडीची ठेकेदार फायरींगही रुंजी घालू लागते... आपल्या कानात... सेकंड ... थर्ड करत करत आपण सुसाट वेगाने धावू लागतो.. काळ्या करकरीत.. डांबरी रस्त्यावरुन ... काही रुपायाचं पेट्रोल गाडीत टाकून चेहऱ्यावरुन फुटका आनंद आणि दळभद्री समाधान मिरवत असतो आपण नेहमीच... पण ज्यांना संध्याकाळच्या फोडणीच्या तेलाची भ्रांत आहे अशी माणसं दिवसभर हाडाची काडं करून राबल्यावर संध्याकाळी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारं निखळ समाधान किंवा खळाळून हसणं आपल्याला हेवा वाटावं असंच असतं... पण आपल्याला त्याचं काहीच नसतं आपण फक्त खोट्या समाधानाच्या पाठीमागे लागलेलो असतो. आपल्याला आता ओळखू येत नाही ओढ्याचा खळखळणारा आवाज किंवा पाखरांचे कुजबुजणे, झाडांचे पानांच्या आडून डोकावणे... फुलांचे हळुवार पसरणे.... मोरांचे केकारव... काही काहीच वाटत नाही कशाचं ....समजत नाही त्यांची भाषा. आपली सौंदर्य दृष्टीच वेगळी झाली आहे पूर्णपणे.. कृत्रिम फुलं काचेच्या भांड्यात टेबलावर ठेवणं किंवा चित्रात दिसणारं संकुचित सौंदर्य एवढंच आपल्याला माहीत असतं..

    एखादं सुंदर गीत मुक्तपणे ऐकायला येईनासं झालं आहे हल्ली कुठलाच स्वर मधुर वाटत नाही गीत कितीही हळुवार असलं तरीही कानावर कर्कश्य आघात व्हावेत किंवा मुर्दाड भावनाच सारख्या मनात येऊ लागतात राहून-राहून सर्वांनाच सवय झाली आहे याची.. कुणालाही कशाचेही काहीही वाटत नाही.. सर्वांची मनं वरचेवर निर्ढावू लागली आहेत... प्रत्येक जण घाई... गर्दी .. गडबड यातच एवढा रमला आहे की त्याला किंचितही कळवळा वाटत नाही.. करुणेचा झरा कोरडा पडू लागलेला आहे... नावाभोवती वलंयं तयार होत आहेत.. मोठेपणाचे बेगडी मुखवट्यावर मुखवटे चढवले जात आहेत.. भावनांचेही व्यावसायीकरण होऊ लागलं आहे.. करकचून बांधून टाकलं आहे आपण आपल्या मनाच्या मुक्ततेला 'लाईफ स्टेटस'च्या नावाखाली आपल्याला फार मोठं टेन्शन येतं आपल्या बायकोला पिक्चरला घेऊन जाता आलं नाही याचं.. उटी.. कुलू मनालीला जायचं रिझर्वेशन तिकीट मिळालं नाही याचं.. कधीकधी नळाच्या पाण्याचं किंवा पेपर उशिरा आल्याचं टेन्शन येतं... आपल्याला पण आपल्याला चुकूनही आठवण होत नाही आपल्या शेजाऱ्याचा मुलगा का आतल्याआत धुमसतो आहे? किंवा परवा गल्लीत कोणी तरी का आत्महत्या केली? कारण आपण त्यांच्यावर खदाखदा हसण्याशिवाय काहीच करू शकत नसतो तसे आपण... आपण स्वतःला जिवंत समजत असतो तसं आपलं वागणंही फार काही चूक नसतं...

    अनुभवाच्या पक्षाच्या टोचण्या खात -खात प्रवास चालू असतो मात्र आपलीच फसवणूक करीत असतो... आपण... नेहमीच!

    -- संतोष सेलूकर
    परभणी
    ७७०९५१५११०

  • भक्तिसंप्रदाय समन्वय !!

    वारकरी संप्रदाय हा फक्त विठ्ठल भक्तांचा संप्रदाय नाही तर शैव, नाथ, दत्त, सूफि इत्यादी पंथातील चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेले ते एक सर्वसमावेशक व्यासपीठ आहे. समर्थ संप्रदाय हा महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा संप्रदाय. समर्थ रामदास स्वामी यांनी तो शिवकालात स्थापन केला. संत रामदास स्वामींप्रमाणेच या संप्रदायाच्या संतकवींनी व संतकवयित्रींनी विपुल लेखन केलं आहे. मला वाटतं वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये थोडीशी “फट “असली तरीही समर्थांचे वरील सार्वकालिक वचन सगळ्यांनी ध्यानी ठेवले तर “भक्ती संप्रदाय समन्वय” वेगळा समजावून सांगण्याची गरज भासणार नाही.

  • माझे स्वाक्षरी संग्रहालय – मुक्काम पोस्ट डोंबिवली

    “हे माझे घर शब्दांचे”. लिम्का रेकॉर्ड २०१६ ह्यांनी नोंद घेतलेली एकमेव “स्वाक्षऱ्याची भिंत”.  “सह्याजीराव – सतीश चाफेकर” – ह्यानी गेली ५० वर्षे स्वाक्षऱ्या गोळा करण्याचा छंद जोपासलेला आहे, आजमितीस त्यांच्याकडे १०००० हून अधिक स्वाक्षऱ्या आहेत. त्याचे मूर्त स्वरूप म्हणचेच “स्वाक्षरी संग्रहालय”

  • निरंजन – भाग ५० – शुभ असावा लोभ…

    लोभसपणा म्हणजे मोह होऊन जडलेले आकर्षण. कधी ते आकर्षण एखाद्या व्यक्तीवर होते तर कधी ते आकर्षण एखाद्या वस्तूचे असते. लोभ हा प्रत्येकाकडे आहे, पण तो इतरांच्या वस्तूवर कधीही नसावा, यावर रचलेली एक सुंदर बोधकथा…

  • आत्मज्ञान !

    इतरेजन जेव्हा योजना आखण्यात आणि स्वप्न पाहण्यात व्यस्त असतात, तेव्हा आपण आपल्या छोट्याशा प्रवासाचा आनंद घ्यावा. माझ्याभोवती खूप वैभव आहे, माझ्या क्षमता, दृष्टी आणि आकांक्षा यापेक्षा हे अधिक महत्त्वाचे आहे, मी सतत काहीतरी  ‘करण्यापासून’ आता फक्त ‘असण्यात’ मग्न आहे, अस्तित्वात असलेल्या सगळ्या लहानथोर गोष्टींनी ,बदलत्या संक्रमित निसर्गाने मी चकित होत असतो, असं वाटणं स्वाभाविक असतं.

  • मंदीतील सुवर्णसंधी

    सरकारची धोरणे,वाढते प्रदूषण कमी करण्याचे आव्हान आणि हळूहळू होणारी जनजागृती या मुळे ग्राहक इलेक्टिक वाहनाकडे वळायला नुकतीच सुरवात झाली आहे. हजारो कोटींची गुंतवणूक विद्युतवाहना मध्ये होत आहे. कोव्हिडं चा हा काळ आणि वाहनवर्गाचे संक्रमण लवकरच संपेल आणि पेट्रोल/डिझेल व विद्युत वाहनांना लवकरच चांगले दिवस येतील. ज्या उद्योजकांना वाहन क्षेत्रात व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांच्यासाठी, विशेषतः ज्यांना ऑटो डीलर बनायचे आहे त्यांच्यासाठी येते एक वर्ष खूप महत्वाचे आहे. तुम्ही या वर्षात विद्युत दुचाकी वाहनांची डीलरशिप खूप कमी गुंतवणूकीत घेऊ शकता आणि 2025 नंतर येऊ घातलेल्या विद्युत वाहन क्रांतीचा घटक बनून, प्रचंड नफा व स्थैर्य मिळवू शकता.