तू कहॉ ये बता इस नशीली रातमे
लेखसंग्रह

तू कहॉ ये बता इस नशीली रातमे

Category:

 

परमेश्वराची लिला अगाध आहे. त्याने नेमून दिलेलं काम रात्रंदिन करत रहायचं, एवढंच आपल्या हाती आहे का? दिवस सारा धकाधकीत जातो.पण,रात्र……….. तीचं काय करायचं?”रात्र” सोबतीने फुलवायची की, पार ताणून द्यायचं,ते आपल्या भावावस्थेवर अवलंबून असतं. रंजक स्वप्न आणि सत्य हा निव्वळ काल्पनिक दृष्यमाध्यमांचा लपंडाव असतो.

तुझे जीवनकी डोरसे बांध लिया है
लेखसंग्रह

तुझे जीवनकी डोरसे बांध लिया है

Category:

 

ती खरी कोण असते? तीचं आणि आपलं खरं नातं काय?फक्त एक भावनिक गुंतवणूक! परस्परांना परतीने सव्याज देण्यात येणारी प्रेम आणि विश्वासाची गुंफण. त्यात नेमकं असतं तरी काय? फक्त झोकून देणं. विरघळण्यासाठी प्रथम पडायला,तर हवं!आपटण्याची भीती नसलेली माणसंच पडायचं धाडस करतात.

ये कौन आया
मनोरंजन

ये कौन आया

Category:

 

अवचित काही गोष्टी आपल्याही नकळत आपल्या आयुष्यात घडत असतात.त्या आपल्याला कायम आठवणीत रहातात. एखादी मैफल असेल,तर त्याची रंगत काही औरच असते. तसा माहोल पुन्हा जमून येईलच,असं नाही.आपापसातील आनंद,प्रेम,आस्था वृध्दींगत करण्यासाठी एकत्र यायचं असतं,तिथे. नाहीतर एखादं विशिष्ठ निमित्त असतं. ते गुपित घोषित करण्यासाठी हा सारा जामानिमा असतो. अशातच कुणीतरी “खास” अवतरलंच तर,त्याला विशेष महत्त्व असतं.तो आल्यापासून मैफिलीला एक वेगळाच रंग चढलेला असतो. त्याच्या येण्याने “प्रफुल्लीतपणा” सर्वदूर पसरत जातो. त्याचं व्यक्तिमत्वच इतकं विलक्षण आणि आकर्षक असतं की,सर्वांची नजर त्याच्याकडे आपसूक वळत असते.त्याचा रुबाब,त्याचा थाट हा त्याचा जलवा असतो.

लेखसंग्रह

तुमने किसीकी जान को

Category:

 

नेहमीच्या वाटेवरून आपण आपसूक सहज सरळ चालत असतो,आपल्याच नादात! चालतांना मधेच आलेल्या वळणावर आपण नकळत कधी वळलो,ते लक्षातच येत नाही. वाट तीच असते.पण भोवताल बदललेला असतो. त्यात नाविन्याची ओढ असते.त्यामुळे त्यात गुंतून जाण्याची शक्यताच अधिक. तिथेच अचानक एका ठिकाणी आपलं लक्ष वेधलं जातं. काळीज लकाकतं. निश्चल मन आतुर होतं.पुन्हा पुन्हा वळून पहावसं वाटतं.चित्त थाऱ्यावर रहात नाही.”विवश होणं” काय असतं? हे त्या अवस्थेतून जाणाऱ्यालाच कळतं. ते शल्य दुसऱ्याला दाखवताही येत नाही की, नीटपणे समजावताही येत नाही. “जायबंदी_होणं” हे असंच असेल का?

जिंदगी का सफर
मनोरंजन

जिंदगी का सफर

Category:

 

जीवन…..म्हणजे नक्की काय? कुणी जाणलंय?कुणाला कळलंय?सगळंच अतर्क्य! चौऱ्याऐशी दशलक्ष योनीतून एकदाच हा जन्म मिळतो.त्यापासून शोध घ्यावा की बोध? सारंच अनभिज्ञ!अकल्पित! जीवनाचा हा प्रवास की प्रवाह?……हे फक्त “आपले आयुष्य आपण वाहून नेण्यात की वाहवून जाण्यात” पणाला लावतोय,यावर ठरत असतं.गंध उगाळल्याशिवाय पाजळत नाही,हेच खरं!वाट्याला आलेलं आयुष्य कल्याणकारी होण्यासाठी त्यावर मेहनतीचा अखंड अभिषेक केल्याशिवाय पर्याय नाही.त्यातून फलनिष्पत्ती होईल की नाही,हे कर्मावर सोपवावं. निस्वार्थ परोपकारी वाटचालीतून परमार् प्रगट होतो. त्यासाठी लाभार्थी कोण? हे ठरवणंही आपल्या हातात नसतं.