(User Level: User is not logged in.)

लेखसंग्रह

वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • किचन क्लिनीक – काकडी

    किचन क्लिनीक – काकडी

    हि प्रत्येकाची आवडती.हिला बोली भाषेत तवसे देखील म्हणतात.हिची कोशिंबीर,रायते अगदी लाजवाब लागते.गरमी मध्ये शरीर व मन थंड करणारी हि काकडी सगळ्यांचीच लाडकी.
    हिचा उपयोग स्वयंपाका मध्ये जसा होतो तसाच हिचा वापर आपण घरगुती औषध उपचारात देखील करू शकतो.

    हिचा वर्षायू रोमश वेल असतो.आणि ह्याच वेलीला हि रसरशीत फिक्कट हिरव्या रंगांची फळे लागतात जे चवीला गोड व थंड असते.त्यामुळेच हे शरीरातील पित्तदोष कमी करते व वात व कफ दोष वाढविते.

    आता आपण हिचे औषधी उपयोग पाहू:

    १)अंगाची जळजळ होत असल्यास काकडीचा लेप लावावा व हिच्या बिया थंडाई मध्ये घालून देतात.

    २)लघ्वी कमी होत असेल तर काकडीचे बी, जिरे व साखर पाण्यात घालून केलेला काढा प्यावा फायदा होतो.

    ३)अंगावर पांढरे जात असल्यास १ ग्राम काकडी बी मधला गर + १ ग्राम पांढ-या कमळाच्या पाकळ्या वाटून त्यात जिरे व खडीसाखर घालून ७ दिवस खावे.

    ४)उन्हाळयात उष्णता कमी करायला काकडी चिरून त्यात खडीसाखर व लिंबाचा रस घालून खावी.

    ५)छातीत जळ जळ होत असल्यास ४ चमचे काकडी रस+खडीसाखर हे मिश्रण सकाळी उपाशी पोटी घ्यावे.

    ६)गव्हाचे पदार्थ खाऊन जर अजीर्ण झाले तर त्यावर उतारा म्हणून काकडी खावी.

    अतिमात्रेत काकडी खाल्ल्यास सर्दी होते.

    वैद्य स्वाती हे.अणवेकर
    आरोग्य आयुर्वेदीक क्लीनीक,
    म्हापसा गोवा.
    संपर्क:९९६०६९९७०४

      November 11, 2016


  • श्री मीनाक्षी पंचरत्नम् – ४

    श्रीमत्सुन्दरनायकीं भयहरां ज्ञानप्रदां निर्मलां
    श्यामाभां कमलासनार्चितपदां नारायणस्यानुजाम् ।
    वीणावेणुमृदङ्गवाद्यरसिकां नानाविधामम्बिकां
    मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् ॥ ४॥

    श्रीमत्सुन्दरनायकीं- मदुराई येथे असणाऱ्या मीनाक्षी मंदिरामध्ये भगवान श्रीशंकरांचे श्रीनटराज स्वरूप विद्यमान आहे. या स्वरूपाला तेथे श्री सुंदरेश्वर असे म्हणतात. त्या श्रीमान भगवान सुंदरेश्वरांची नायिका देवी श्री मीनाक्षी श्रीमत्सुन्दरनायकी स्वरूपात वंदिली जाते.

    भयहरां - भक्तांच्या भीतीचे हरण करणारी. सगळ्यात मोठी भीती असते मृत्यूची. आई जगदंबेच्या कृपेने मोक्ष प्राप्त होत असल्याने ही भीतीच नष्ट होते.

    ज्ञानप्रदां- या मोक्षाला कारण असणारे आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान प्रदान करणारी.

    निर्मलां- शुद्ध चैतन्यस्वरूपिणी, माया मल विरहित अशी.

    श्यामाभां- आपल्या अत्यंत तेजस्वी सावळ्या वर्णाने आकर्षक दिसणारी. कमलासनार्चितपदां- कमळावर बसणाऱ्या भगवान ब्रह्मदेवांनी चरणकमलांची उपासना केली आहे अशी. नारायणस्यानुजाम् - भगवान श्री नारायण अर्थात श्री विष्णूंची लहान भगिनी.

    वीणावेणुमृदङ्गवाद्यरसिकां- वीणा, वेणू म्हणजे बासरी आणि मृदंग इत्यादी वाद्यांच्या ध्वनींचा रसिकत्वाने आस्वाद घेणारी.
    यात वीणा हे तंतुवाद्य, बासरी हे वातवाद्य तर मृदंग हे चर्मवाद्य. अर्थात या तीनही प्रकारांमुळे परिपूर्ण होणारे संगीत.

    नानाविधामम्बिकां- अनेक रुपांमध्ये नटून विश्व निर्माण करणाऱ्या,

    मीनाक्षीं प्रणतोऽस्मि संततमहं कारुण्यवारांनिधिम् - कारुण्याचा जणू काही महासागर असणाऱ्या आई जगदंबा मीनाक्षीला मी सतत वंदन करतो.

    -- प्रा. स्वानंद गजानन पुंड

      May 13, 2020


  • “आप”ली माध्यमे

    आप बद्दल माध्यमांनी चालवलेला एकतर्फी प्रचार यावर प्रकाश टाकण्याचा एक प्रयत्न...


    सध्या आपल्याकडे सगळ्याच वृत्तवाहिन्यानवर अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण, आणि त्यांची पार्टी आप एवढी एकाच बातमी चालू आहे. आपल्या माध्यमांना आप ने इतकी भूल घातलीये कि, माध्यमे हे साफ विसरून गेलीयेत देशात दुसर्याही घटना घडतायत, आणि या आप वाल्यानाही माध्यमात, चर्चेत कसे राहायचे हे कळून चुकलाय, कधी कोणत्या घोषणा, कधी बतावण्या आणि काहीच नाही तर कधी वादळी वक्तव्य करून हे लोक चर्चेत माध्यमात राहतात. त्याचं प्रत्येक वाक्य किंबहुना त्याची प्रत्येक हालचाल हि ब्रेकिग न्यूज होऊन बसलीये. त्यामुळे देशातील इतर नागरिकांना आता काही प्रश्न नक्की पडत असतील कि, आपण भारतातच राहतो का? देशात दिल्ली सोडून दुसरी राज्य आहेत का? आपल्या देशात टीम केजरीवाल शिवाय इतर हि नेते आहेत का? आणि आप शिवाय दुसरे कोणते पक्ष आहेत का?

    वास्तविक आपल्या भारत देशात २८ स्वतंत्र राज्ये आणि ७ गणराज्ये आहेत. ६ राष्ट्रीय आणि ४० प्रादेशिक पक्ष आहेत. याशिवाय कोणत्याही पक्षाच्या चिन्हाचा वापर न करता हि काही लोक आमदार आणि खासदार निवडून येतात. असे आपल्या भारतात एकूण २८ मुख्यमंत्री, ५४३ खासदार आणि ४२१५ आमदार आहेत. या सगळ्या मध्ये सध्या देशात मोठ्या चर्चेचा विषय ठरलेला पक्ष म्हणजे आम आदमी पार्टी. हा पक्ष ज्या राज्यात निवडून आलाय त्या राज्याची एकूण लोकसंख्या आहे १६७५३२३५. विधानसभेची एकूण गणसंख्या आहे ७० आणि आम आदमी पार्टी चे एकूण आमदार आहेत फक्त २८. त्यांच्यापैकी फक्त ६ मंत्री आहेत आणि बाकी सदस्य आहेत. हि एवढी माहिती देण्याचे मुख्य कारण देशात दिल्ली सरकार च्या मंत्र्यानप्रमाणे देशभरात शेकडो मंत्री आहेत आणि हजारो आमदार आहेत. अरविंद केजरीवाल सोडून देशात २७ मुख्यमंत्री आहेत. ज्यांच्या पैकी ३ मुख्यमंत्री असे आहेत जे अरविंद केजारीवाल यांच्या सोबत निवडून आले आहेत. आणि तेही बहुमताने, पण तरीहीदेशाची माध्यमे त्यांची चर्चा कुठेच करताना दिसलं नाहीयेत. पण दिल्ली सरकार पैकी कोणी शिंकल तरी त्याची ब्रेकिंग न्यूज केली जातीये. अस म्हणतात कि, माध्यमे कोणालाही नायक आणि खलनायक बनवू शकतात त्याचा प्रत्यय पूर्णतः सध्या आपल्या देशात येतोय. माध्यमांनी बनवलेला नायक म्हणजे दिल्ली चे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी. माध्यमांच्या आपल्याला हवा तसा वापर करून घेण या लोकांना उत्तम जमलाय म्हणूनच कदाचित माध्यमांना देशभरात ४२१५ विधानसभा सदस्य न दिसता फक्त २८ च दिसत आहेत.
    ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून जन्माला आलेल्या या आम आदमी पार्टीचा जन्म मुळात कॉंग्रेसच्या भष्टाचारी राजवटी विरोधासाठी झाला. अण्णांनी आपले आंदोलन ज्या मुद्द्यावर केले, तोच मुद्दा उचलत आणि अण्णांशी फारकत घेत अरविंद केजरीवाल यांनी आपली राजकीय कारकीर्द सुरु केली. कॉंग्रेस सरकार विरोधी वाढता जनक्षोभ आणि आणि सरकार ची भाष्टचाराची प्रकरणे याच्या विरोधी आंदोलने, मोर्चे काढून या पक्षाने आपली ओळख लोकांपर्यंत पोहोचवली. आधीच कॉंग्रेस च्या राजवटीला कंटाळलेल्या जनतेला भाजपा हा उत्तम पर्याय समोर दिसत होता. दिल्ली च्या निवडणुकीतहि जनतेची प्रथम पसंती हि भाजपालाच होती. याचाच प्रत्यय म्हणून दिल्ली च्या जनतेने भाजपला सर्वाधिक पसंती देत ३२ जागांवर विजय मिळवून दिला. आणि आम आदमीला २८ जगावर म्हणजेच जनतेला सरकार हवे होते भाजपाचे. १५ वर्ष राज्य करणाऱ्या शीला दीक्षित यांच्या कॉंग्रेस पार्टीला फक्त ८ जागा मिळाल्या. भाजपा ने कोणाशीही युती न करता विरोधात बसने मान्य करत जनमताचा आदर राखला. पण आम आदमी पार्टीने सत्तेसाठी ज्या पक्षाच्या विरोधासाठी त्यांच्या जन्म झाला त्यांच्याशीच आघाडी करत जनतेची साफ फसवणूक केली. आणि आपल्या माध्यमांनी ह्या गोष्टीचा जाब विचारायचा सोडून आप चा उदोउदो चालू केला. ज्या कॉंग्रेस ला सत्तेपासून दूर लोटण्याचा प्रयत्न जनता करत होती त्याच कॉंग्रेस ला परत सत्तेत आणून आप ने जनतेची शुध्द फसवणूक केलीच, पण त्याहून जास्त फसवणूक आपल्या माध्यमांनी केली असा माझा स्पष्ट मत आहे. वास्तविक दिल्लीच्याच विधानसभा निवडणुकीच्या काळात राजस्थान, मध्यप्रदेश, आणि छातीसगड याही राज्यांच्या निवडणुकी झाल्या. दिल्लीत जसे भाजपाला सर्वाधिक जनाधार मिळाला तसाच याही राज्यात मिळाला. लोकांची प्रथम पसंती भाजपालाच आहे हे हि स्पष्ट झाले. परंतु माध्यमांनी या गोष्टीला सोयीस्करपणे नजरेआड करत देशातील सर्वाधिक प्रामाणिक, सर्वाधिक जनाधाराचा पक्ष म्हणजे आपच अशा थाटात आपल्या बातम्या पुढे रेटल्या आणि त्या लोकांच्या मनात बिंबवत राहिल्या. देशात घडणाऱ्या कोणत्याही मोठ्या घटनेला बगल देत माध्यमानी जनतेचे लक्ष फक्त आणि फक्त आप वर रोखायचा प्रयत्न करत. पक्षपाती पणाचा कळस केला. आपल्या देशातील वृत्त वाहिन्या कोणाच्या इशार्यावर चालतात हे जनतेला चांगलच कळायला लागलाय त्यामुळे कॉंग्रेसशी आघाडी हि वास्तवातील टीकेची झोड उठवणारी गोष्ट आप साठी मात्र सुप्रसिद्धीची सुवर्ण वाटच झाली.बर प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी कॉंग्रेसनेच शिकवलेले सगळे मार्ग हे लोक वापरू शकले. जसे साधे पणाचे नाटक करत शपथविधीसाठी केलेला मेट्रो प्रवास,(असा प्रवास सोनिया आणि राहुल गांधी यांनीही केला आहे फक्त लोकल मधून), लाल दिवा, सरकारी घर, सरकारी गाडी न वापरण्याच्या घोषणा. आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे कॉंग्रेस च्या पायावर पाय देत केलेल्या पोकळ घोषणा दिल्ली च्या जनतेला अर्ध्या दारात वीज देणार, ७०० लिटर पाणी देणार, त्यामुळे देशभरातील जनतेचे लक्ष वेधण्याट हि माडली यशस्वी झाली खरी, पण त्यांच्याच सरकारने अशा अनेक घोषणा देशभरात या पूर्वीही करून ठेवल्यात पण अंमलबजावणी होताना कुठेही दिसला नाही. त्यामुळे आप च्या या घोषणांच्या मागे खरा आवाज कोणाचा हेही जनतेला लवकरच कळेल. किंबहुना कळायला सुरवात हि झालीये. सरकारीघरात राहणार नाही असे ठासून सांगणारे केजरीवाल १० खोल्यांच्या दुमजली घरामुळे जनतेसमोर खोटे सिध्द होताच आपल्याला नको मोठे घर सरकारी छोटे घर हि चालेल. असा म्हणून आपला बचाव करायचा केविलवाणा प्रयत्न हि या महाशयांनी केला. सरकारी गाड्या नाकारणाऱ्या आम आदमीच्या नेत्यांनी सरकारी गाड्या तर घेतल्याच वर आम्ही लाल दिवा नाकारला होता गाडी नाही असा खोटा बचाव हि केला. हे आणि अशी अनेक उदाहरण आहेत पुढेही मिळत राहतील. ते हे सगळ करतात या बद्दल काही तक्रार नाही कारण आधी सरकार विरोधी लढणारे आम आदमीचे कार्यकर्ते आता सरकार बनून खास झालेत. हे विसरून कस चालेल. आणि देशाला सवय झालीये सगळ्याची, गेली कित्येक दशके कॉंग्रेस तेच तर करत आलाय. आता फक्त मुखवटा आप चा असला आतला बोलविता धनी कॉंग्रेसच म्हणावा लागेल.

    असो सांगण्याचा मुद्दा हाच कि, अशा खोट्या वागण्याने जनतेची फसवणूक होणार असेल तर देशातील माध्यमांनी जनतेला खरेपणा दाखवून देण त्यांचा काम आहे. बर सगळी माध्यमे अशीच आहेत असा माझा बिलकुल मत नाही. पण जी आहेत त्यांनी निदान आता तरी जनतेशी प्रामाणिक व्हाव असा माझा प्रामाणिक मत आहे. कारण आपल्या वृत्ताला भुलून जनतेने जर चुकीच्या पक्षाला मतदान केले तर त्याचे परिणाम पुढील ५ वर्ष देशाला सलग भोगावे लागतील आणि सद्याच्या जनतेला ते परवडणार नाही. त्यामुळे जे खरे नायक आहेत त्यांनाच नायक म्हणा ज्यांना तुम्ही नायक बनवताय त्यांची पात्रता तेवढी आहे का हा हि विचार करा. नाहीतर प्रशांत भूषण सारखे हुशार काश्मिर सारख्या संवेदनशील विषयात आपले निर्बुद्ध विचार व्यक्त करतात आणि आप च्या सवयी प्रमाणे पुन; चर्चेत येतात. पण हे होत असताना देशाच्या, देशातील नागरिकांच्या, सीमेवर दिवसाची रात्र करणाऱ्या आपल्या जवानांच्या भावना किती दुखावल्या जात असतील. त्यांच्या मनोधैर्यावर किती परिणाम होत असेल हा विचार नाही करत. आणि आपली माध्यमेही या गोष्टीचा निषेध न करता अशा वक्तव्या वर येणाऱ्या प्रतिक्रियान सर्वस्वी दोष देत बसता. पण प्रतिक्रिया म्हणजे घडून गेलेल्या क्रियेचा पडसाद असतात. त्यामुळे आपल्या जवाबदारी ला ओळखून देशाचे नुकसान तर होणार नाही न याची घ्यायला हवी. सध्या तरी आपल्या देशाची परिस्थिती अशी नाही कि कोणाला प्रयोग म्हणून देश सोपवावा. ज्यांनी स्वताला सिध्द केला आहे अशा आणि अशाच लोकांकडे देशाची सत्ता असावी असा एक सामान्य माणूस म्हणून माझा मत आहे.
    बाकी समाजकारणासाठी जन्माला आलेल्या आप सारख्या पक्षाने सत्ताकारणासाठी कॉंग्रेस बरोबर मिळून केलेलं राजकारण कळण्या इतके आपल्या देशाचे नागरिक सुज्ञ नक्कीच आहेत...

      January 11, 2014


  • खास नवरात्रीसाठी

    नवरात्रीत नियमितपणे केले जाणारे काही विधी

    मालाबंधन

    नवरात्रात देवीचे रोज मालाबंधन करावे. पहिल्या दिवशी विड्याच्या पानाची माळ बांधावी व नंतर प्रत्येक दिवशी तिच्या रूपा प्रमाणे मालाबंधन करावे.

    महाकाली, महालक्ष्मी,महासरस्वती व शेवटी ‘विजया’ ही तिची रूपे आहेत. दुस-या व तिस-या दिवशी रक्तवर्ण पुष्पे नंतर तीनदिवस झेंडू, सोनचाफा, शेवंती,तुळशीच्या मंजिर्या व नंतर पांढरी सुवासिक फुलेह्यांची माळ करावी.

    दीपप्रज्वलन

    म्हणजे तेजाची पूजा. भगवंताच्या तेजाच्या पूजेने आपल्या हृद्यातील तो तेजोमय भाव जागृतव्हावा आणि तेजानेतेजाची पूजा करावी अशी कल्पना आहे.यासाठी दोन जड समया ठेवाव्यात व नऊ दिवसअखंड दीप चालू ठेवावा.
    तेल संपल्या मुळे किंवा काजळी झटकताना जर दिवा शांत झाला तर विचार करण्याचे कारण नाही.
    दिवा पुन्हा लावावा, पण सगळे व्यवस्थित असताना दिवा शांत झाला तर कुलदेवतेचा जपकरावा, तिची प्रार्थना करावी,क्षमा याचना करावी.

    फुलोरा

    नवरात्रात देवीला फुलोरा करण्याची पद्धत आहे.
    यात करंज्या आणि कडक पुर्या, साटोर्या करतात.
    हा फुलोरा कुटूंबातील प्रथेप्रमाणे तॄतीया, पंचमी,सप्तमी, अष्टमी या दिवशी करावा.
    देवघरात मंडपी ठेवून हा फुलोरा बांधला जातो.
    पूजा करताना आपण ‘ यथादेहे तथा देवे ‘ हा भाव ठेवून पूजा करतो.
    त्यामुळे आपण तरी आपल्या घराला असेखरकटे बांधून ठेवू का?
    ते खरकटे पदार्थ बांधून ठेवण्याची पद्धत चूकीची आहे.
    त्यापेक्षा डब्यातठेवून त्याचा नेवेद्य दाखवावा. नेवेद्यदाखवितो म्हणजे काय करतो ? समर्पण भावनेनेअर्पण करतो. देव नेवेद्य द्विकरतो म्हणजे काय तर अर्पण करणार्याचा भाव पाहून वास घेतो.

    होम

    नवरात्रात अष्टमीला होम करण्याची प्रथा आहे. ब-याच ठिकाणी अजबली देतात. ‘अज’ म्हणजे बोकड. खाणे आणि हिंडणे या खेरीज बोकडाचा काय उपयोग? रस्त्यावरून चालला तरी लांबूनच त्याची दुर्गंधी येते.याची जातच कडू असते. याचे मांस भक्षण केल्याने बुद्धिला मांद्य येते. शिवाय तो रस्त्यावरील कुठेकचरा खातो, त्या पासूनच त्याचा रक्ताची निर्मिती होते.
    असे मांस खाल्याने अनेक रोगांना अनेक रोगांना निमंत्रण मिळते.

    म्हणूनच पूर्वीच्या ऋषिमुनींनी द्रष्टेपणानेहोमात अजबली देण्याची प्रथा सुरू केली.याच्या रक्ताने कनिष्ठ देवता प्रसन्न होतात.
    नवरात्रात दुष्ट शक्तीचा नाश करण्यासाठीचआपण या देवी ( शक्ती ) स्वरूपाची पूजा करतो.

    महाराष्ट्रात देवीची साडेतीन पिठे आहेत.

    त्यापैकी कोल्हापूरची ” महालक्ष्मी”,तुळजापूरची “भवानी”, व वणीची “सप्तश्रुंगी”ही पूर्ण पिठे व माहुरची “रेणुका” हे अर्धपीठ आहे. कारण माहुरला फक्त तांदळा आहे. फक्त मुखपूजन आहे.तांदळा हे पार्वतीचे रूप आहे. तिथे शिवाचा लोपआहे.
    इतर पिठामध्ये प्रत्येक मूर्तीच्या डोक्यावर शिवलिंग आहे. म्हणजे शिवशक्ती दोन्हीही आहे.देवीच्या-सेवा :श्री सुक्तांची आवर्तने उपाध्यायांकडून करवून घ्यावीत.

    कुंकूमार्चन

    देवीला कुंकू हे अतिशय प्रिय आहे. कुंकू हे हळदी पासून बनविले जाते. हळद ही सुवर्णाची गुणधर्म धारण करते.ती रजोगुणी आहे. तीला ते प्रिय आहे. स्त्रीचे रूपच अग्निस्वरूप आहे. त्यामुळे लाल रंग तिला प्रिय आहे.म्हणून कुंकूमार्चन सेवेने ती प्रसन्न होते. कुठल्याही देवतेच्या मुर्तीला कुंकूमार्चन करावे,त्यामुळे शक्तीदायिनी देवता प्रसन्न होतात व आपणास सामर्थ्य प्राप्त होते, सौभाग्य देते, ऍश्वर्यदेते. कुंकूमार्चन श्री यंत्रावर करतात.

      October 1, 2016


  • नोटा बंदीचे धोरण आणि चलन बदल

    नोटाबंदीचा सर्वात मोठा परिणाम लघु उद्योगांवर झाला, नोटबंदीपूर्वी बहुतांशी उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होत होते. नोटाबंदीच्या काळात या उद्योगांमध्ये रोखीने व्यवहार होणे बंद झाले, रोख रकमेचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेकांचे उद्योग ठप्प झाले. परंतु पुढील काळात परिस्थिती सुधारली.

      December 29, 2022


  • अंदमान द्वीपसमूह : भारताचा निसर्गरत्न

    अंदमान द्वीपसमूह : भारताचा निसर्गरत्न

    अंदमान व निकोबार बेटे हिंद महासागरात, बंगालच्या उपसागराच्या आग्नेयेस पसरलेली आहेत. या द्वीपसमूहात एकूण ५७२ बेटे आहेत, त्यापैकी फक्त ३८ बेटांवरच लोकवस्ती आहे. ह्या ५७२ बेटांमध्ये अंदमान बेटे ३२५ हून अधिक आहेत आणि मुख्यत्वे पर्यटनासाठी प्रसिद्ध. निकोबार बेटे त्यामानाने तुलनेने अलिप्त व तिथे मुख्यत्वे तिथल्या मूळ निवासी लोकांचे वसतयव असल्यामुळे पर्यटकांसाठी खुली नाहीयेत. अंदमान निकोबार बेटांचा समूह उत्तर–दक्षिण ८०० किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. येथे उष्णकटिबंधीय हवामान असून वर्षभर ऊन–पाऊस यांचा खेळ चालतो. ऑक्टोबर ते मे – पर्यटनासाठी उत्तम कालावधी आणि जून ते सप्टेंबर – मान्सून; पाऊस जास्त असल्याने, फारसे पर्यटक येत नाहीत.

      April 14, 2026


  • तेजोवलय (Aura) भाग 1

    ऑरा ..किंवा मराठीत ज्याला तेजोवलय हा छान शब्द आहे. तुम्ही शब्दांनी, वागण्याने आपल्या भावना किंवा intentions लपवू शकता .. पण तुमचे तेजोवलय काहीही लपवून ठेवत नाही.. तुमच्याबद्दलची सर्व माहिती तुमचं तेजोवलय देत असते.

      July 20, 2017


  • विडा घ्या हो नारायणा – भाग ३

    पान खाण्याचा एक विशिष्ट नखरा आहे. “पान लावणे” ही एक खास कला आहे. दर्दी खवैय्याला यातील नजाकत बरोब्बर समजते. आपल्याला हवी असलेली, किंचित पिवळसर झाक असलेली दोन पाने चंचीतून निवडून, हलकेच झटकून सफाईदारपणे पुसत, नखानी त्याचे टोक आणि त्याचा हिरवा देठ खुडुन, दातांनी एकदाच त्याचा चावा घेत देठ टाकून द्यावा. नखांनी पानावरच्या शिरा हलकेच काढाव्यात. या शिरा काढताना पानाला भोक पडता नये, एवढे सराईत झाल्याशिवाय चारचौघात पान खायला सुरवात करू नये. नाहीतर त्याएवढा लाजीरवाणा प्रसंग दुसरा नाही.

      July 4, 2017


  • पशुधन घटते; दूध कसे वाढते?

    कायदा काही करणार नाही, कायदा काही करू शकत नाही, कारण कायदा राबविणारी व्यवस्थाच पंगू आहे, गुलाम आहे. त्यामुळे लोकांनीच आता स्वयंस्फूर्तपणे काही करणे गरजेचे आहे. बहिष्कार हे एक मोठे अस्त्र आहे, ते अहिंसक तर आहेच शिवाय अतिशय प्रभावी आहे. दूध माफियांना धडा शिकवायचा असेल तर लोकांनी दुधावरच बहिष्कार टाकायला हवा.

      March 27, 2011


  • ज्येष्ठ स्त्रियांकरिता आहार

    वयाची साठी ओलांडली की शरीराच्या क्रिया मंदावतात. शारीरिक क्रिया मंदावल्यामुळे शरीराला आहाराची कमी गरज भासते. अशा वेळी आवश्यतक तेवढाच पण संतुलित आहार घ्यायला हवा- जेणेकरून शरीराचं पोषण तर होईलच, पण शरीराला जडत्व मात्र येणार नाही. कसा असावा हा आहार? त्यांच्या वेळा कशा असाव्यात? ज्येष्ठांकरता असणाऱ्या आहाराचे विविध पैलू. .......

    एकदा का रजोनिवृत्तीचा काळ व्यवस्थितपणे पार पडला, की साठीची चाहूल लागते. जीवनाच्या निवृत्तीकडे वाटचाल सुरू होते.

    वृद्धत्व ही नैसर्गिक क्रिया आहे. शरीराची वाढ व वयात येणे होईपर्यंत शरीरातील जडणघडणीच्या क्रिया अधिक, तर पुढे विघटनाच्या क्रिया पेशींमध्ये अधिक होतात. म्हणून वृद्धत्व येते. साठीनंतर शरीरातील आवश्यसक पेशींचा ऱ्हास होत असतो. शरीरक्रमांमध्ये बदल घडून येत असतात. वयोपरत्वे ऐकणे, दृष्टी, चव, स्पर्श, वास वगैरे संवेदना कमी होऊ लागतात. शरीरात फिजिऑलॉजिकल पॅथॉलॉजिकल, मानसिक बदल होत असतात. याची कारणेही अनेक आहेत. शारीरिक हालचालींची कमतरता, भूक मंदावणे, आपली कोणाला गरज नाही याची सतत बोचणी असणे, एकटेपणाची भावना सतावणे, वगैरे! शारीरिक हालचाली कमी झाल्यामुळे बेसल मेटॅबोलिक रेट कमी होतो- ज्याकरिता आहाराचे प्रमाण कमी करणे महत्त्वाचे ठरते. तरीही तो संतुलित मात्र हवाच.

    आहारात सकाळचा नाश्तार घेणे अत्यंत आवश्याक असते. तो सकाळी ८ ते ९ पर्यंतच घ्यायला हवा. त्यात आपले जुने पारंपरिक पदार्थ हवेत. दुपारचे जेवण एक वाजता. त्यात चौरस आहार- ज्यात वरण, भात, भाजी, पोळी, दही, कोशिंबीर, फळ असावे. संध्याकाळी ५ ते ६ मध्ये हलका कोरडा नाश्ता्- ज्यात चिवडा, लाह्या, सत्तू, गोपाळकाला, रताळी असे पदार्थ चांगले. रात्रीचे जेवण ८ ते ९ दरम्यान व दुपारसारखेच! रात्री दही व फळ खाऊ नये. झोपताना दूध, हळद, अंजीर घ्यावे.

    अन्न घटकांची गरज

    कॅलरीज - हे नेहमी श्रमांच्या तुलनेत असतात. साठीमध्ये चयापचयाची गती कमी होते. म्हणून पूर्वीपेक्षा निदान ३०० कॅलरीज तरी कमी घ्याव्यात. शीतपेये, ब्रेड, बिस्किटे, साखर, पेस्ट्री वगैरे टाळावे.

    प्रोटिन्स - मानसिक ताणतणाव, इन्फेक्श्न, जुने रोग वगैरे असल्यास जरा अधिक, पण सहज पचणारे प्रोटिन्स घ्यावेत. भरपूर दूध, दही, ताक घ्यावे. डाळींमध्ये मुगाची डाळ पचायला सोपी. इतर कडधान्ये मोड आणून घेतल्यास चांगले.

    कार्बोहायड्रेट्‌स - शरीरात इन्शुलिनच्या होणाऱ्या कमतरतेमुळे रक्तशर्करा कमी-अधिक होण्याचे प्रमाण वाढते म्हणून व कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड्‌स रक्तातील वाढलेले असल्यासही आहारात साखर नसावी. त्याऐवजी संपृक्त कर्बोदके म्हणजे धान्ये, फळे, डाळी, दूध यांचे सेवन असावे. यातूनच चोथाही मिळतो. दातांचा त्रास असल्यामुळे पॉलिश तांदळाचे, ब्रेड-बिस्किटांचे अधिक आणि भाकरीचे कमी सेवन होते. यामुळे "ब' जीवनसत्त्वे मिळत नाहीत; पण आहारात ज्वारी, बाजरी, गहू, सोजी, हातकुटाईचे तांदूळ, कंदमुळे, फळे हवीत. जिभेवर ठेवल्यावर विरघळणारे पदार्थ टाळावे.

    स्निग्ध पदार्थ - रिफाइंड तेल, वनस्पती तूप, लोणी, साय, चीज, मिठाई, तळलेले पदार्थ, पुऱ्या, पराठे कमी होणे अत्यंत आवश्य क असते. दिवसभरात ३ चमचे घाणीचे ताजे तेल आणि दीड चमचा तूप आहारातून मिळावे. वनस्पतींपासून निघणाऱ्या तेलात कोलेस्टेरॉल नसते. ते पशूंच्या स्निग्धात, वनस्पती तुपात असते. कोरोनरी हार्ट डिसीजने येणाऱ्या मृत्यूचे प्रमाण मेनोपॉजनंतर अधिक आहे. म्हणून वनस्पती तूपही टाळावे. मांसाहार घेऊ नये.

    चोथा - साठीनंतर शरीराचे श्रम, हालचाली कमी होतात. म्हणून आतड्यांची कार्यक्षमताही कमी होते. आतड्यांतील स्नायूंचे आकुंचन-प्रसरण या क्रिया मंदावतात. अन्न पचणे कठीण होते. बद्धकोष्ठता सरसकट अनेकांमध्ये आढळून येते. याकरता गव्हाचा दलिया, पालेभाज्या, शेंगभाज्या, ज्वारी, बाजरी, फळे, ओवा, मेथीदाणा, नाचणी, हळीव, कारळी, कुळीथ, जवस यासारख्या गोष्टी रोजच्या आहारात असाव्यात.

    कॅल्शिअम -. रोज १/२ ते ३/४ लिटर दूध हे दही-ताकाच्या रूपात घ्यायलाच हवे. कॅल्शियमवर प्रोटिन्स जीवनसत्त्व "क'चे शोषणही अवलंबून असते. अन्नाचे पचन सुलभ होते. याशिवाय नाचणी, खसखस, हळीव, सोयाबीन, खजूर, पालेभाज्या रोज खाव्यात. भात शिजवताना त्यात चिमूटभर मऊ असा खायचा चुना घालावा.

    लोह - रक्तकण, हिमोग्लोबिन तयार होण्याकरिता या खनिजाची आवश्याकता असते. लोह सर्व पालेभाज्या, खजूर, बाजरी, नाचणी , मनुका, अंजीर, हळीव यात भरपूर असते. भाज्या, सलादवर लिंबू पिळूनच खावे.

    जीवनसत्त्वे - अ, ई, क, बीटा कॅरोटिन यांना अँटीऑक्सिाडंट्‌स म्हणतात. ते पेशींचा ऱ्हास होणाऱ्या रोगांपासून आपला बचाव करतात. दूध, दही, तेलबिया, गव्हांकुर, गव्हाच्या रोपांच्या रसातून, लाल भोपळा, गाजर, पपई, रताळं, तीळ, खसखस, खरबूज, टरबूज बियांतून मिळतात. जीवनसत्त्व "ड' हाडांच्या मजबुतीकरता, नितळ निरोगी त्वचेकरता आवश्यळक. ते दूध, सकाळच्या कोवळ्या सूर्यप्रकाशातून मिळतं. वृद्धांना हिंडणं-फिरणं कठीण होतं. तरी शक्यूतोवर सकाळच्या वेळी बाहेर येणं आवश्याक.

    झिंक - वृद्धांमध्ये या खनिजाची कमतरता होते, म्हणूनही रोगप्रतिकार शक्ती कमी होते. म्हणून धान्ये, डाळी वगैरे सालासकट खावे.

    बहुतेक ज्येष्ठांना उच्च रक्तदाबाच्या तक्रारी असतात. म्हणून आहारात मिठाचे प्रमाण कमी असणे आवश्यकक असते. हृद्रोकगातही ते कमीच हवे. जोडीला मॅग्नेशियम, पोटॅशियम हे क्षार वाढवायची गरज असते. त्याकरता हिरव्या भाज्या, पुदिना, कोथिंबीर, फळे, सुका मेवा या गोष्टी रोज खाव्यात.

    हिरड्यातून रक्त येणे, झालेल्या जखमा चिघळणे, हेही वृद्धांमध्ये आढळते. म्हणून नैसर्गिक स्वरूपात "क' जीवनसत्त्व घेणे फायदेशीर ठरते. मोतीबिंदू तयार होणे, पिकणे या गोष्टी "क' जीवनसत्त्वाने लांबविता येतात. म्हणून आवळा, लिंबू, फळे, सलाद भरपूर खावे. तसेच फोलिक ऍसिड, जीवनसत्त्व ब ६ याचीही कमतरता दिसते. रक्तातील होमोसिस्टीनचे वाढलेले प्रमाण, या जीवनसत्त्वांची कमतरता तर हृद्रोागाची नांदी दर्शविते. सहसा हातापायांना मुंग्या येणे, चक्कर येणे वगैरे गोष्टी जीवनसत्त्व ब १२ ची कमी दाखवतात. याकरता रोज भरपूर भाज्या, फळे, ताक व अंकुरित कडधान्ये व यीस्टच्या गोळ्याही घ्याव्यात.

    संजीव वेलणकर पुणे
    ९४२२३०१७३३
    संदर्भ:- जयश्री पेंढरकर
    आहारतज्ज्ञ

      September 28, 2016