वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
गणपती ही विद्येची व सकल कलांची आराध्य देवता,गणांचा अधिपती म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे.प्रतिवर्षी येणा-या गणेश उत्सवाची प्रतीक्षा सर्व भक्त आतुरतेने करीत असतात. गणेशाची प्रतिष्ठापना आणि त्यामागील आशय समजून घेतला तर या उत्सवाची खुमारी अधिकच वाढेल.
January 30, 2019
आयुर्वेदातील मार्गदर्शक तत्वे - क्रमांक सहा
पोटात खड्डा पडावा.
सोकपिट सगळ्यांनाच माहिती आहे. सोकपीटचे काम काय असते ? तर आजूबाजूला असलेले पाणी आपोआप ओढून घेणे.
त्यामुळे काय होते ?
आजूबाजूला असलेली ओल कमी होते. तिथे सुकेपणा निर्माण होतो आणि पाणी खड्ड्यात ओढले जाते.
पोट म्हणजे सोकपिट अशी कल्पना करून पाहूया. पोट म्हणजे मुख्य स्रोतस. जिथून सर्व शरीराचे पोषण सुरू होते. आपण जे काही खातो पितो, त्यातूनच हे पोषण होत असते. जे काही खातो पितो, त्यातून पोषण झाल्यावर जो भाग शिल्लक रहातो, त्याला मल असे म्हणतात. जो टाकाऊ असतो. घाम, लघवी, संडास या मुख्य मार्गाने तो काढला जातो.
ही अत्यंत स्वाभाविक प्रक्रिया आहे. पचन पूर्ण होण्यासाठी आपण स्वतः तर काहीच करत नाही. जे काही करायचे तेवढे सर्व शरीरच करत असते. आध्यात्मिक भाषेत हे सर्व ईश्वर करत असतो. आणि वैज्ञानिक भाषेत यालाच "नेचर" असे म्हणतात.
आपला "मीपणा" यामधे आला की पचन बिघडते. आणि आम तयार होतो. या आमाचा स्वभाव चिकटून रहाण्याचा असतो. आणि कोणतीही गोष्ट पाण्याशिवाय चिकटतच नाही. म्हणजे जर या आमातील रस म्हणजे द्रव भाग, कमी केले गेले तर चिकटण्याची प्रक्रिया कमी होत जाईल.
अतिरिक्त पाणी काढण्यासाठी आजूबाजूला जर खड्डा असेल तर हेच पाणी वेगळे करण्याचे काम विनासायास होते. यालाच मी सोकपिट टेक्निक म्हणतो. आता हा खड्डा जर पोटात तयार केला तर ?
खड्डा म्हणजे रिकामी जागा. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण हे पोट भर भर भरत असतो. आतमधे तो जागा असतो, म्हणून खाल्लेल्या अन्नावर प्रक्रिया होत असते. दर दोन तासांनी खा खा खाऊन ही जागा आपण कमी करत जातो. त्याच्या कामावरचा लोड जर आम्ही वाढवला तरच आम तयार होऊन चिकटणार आहे. म्हणून पोट थोडे रिकामे करावे, त्याच्यावरचा लोड कमी करावा, पोटात थोडा खड्डा तयार करावा. म्हणजे "आमातील रस म्हणजे द्रवांश" या खड्ड्यांमधे आपोआपच ओढला जाईल. चिकटणे कमी होईल, उरलेला आम सहजच सुकुन जाईल.
नियम म्हणून हा खड्डा ( सोकपिट ) तयार करून घेतला की, आम नष्ट झालाच म्हणून समजा.
वैद्य सुविनय दामले.
कुडाळ सिंधुदुर्ग.
9673938021
02362-223423.
03.05.2017
May 3, 2017
जोडवी हा मंगळसूत्रानंतर घातला जाणारा सौभाग्यलंकार आहे. सप्तपदी दरम्यान नववधूच्या पायात जोडवी घालण्याचा स्वतंत्र विधी असतो. म्हणजेच मंगळसूत्र आणि जोडवी हे दोन अलंकार सौभाग्याचे प्रतिक मानले जातात. ते आयुष्यभर ठेवण्याची प्रथा आहे.
March 8, 2024
हृदय हा माणसाच्या शरीरातील एक महत्त्वाचा अवयव आहे. यातील विद्युत प्रक्रियेमुळे हृदयाची धडकन चालू असते. हृदयाचे ठोके मिनिटाला साठ ते शंभर या प्रमाणात पडत असतात. याचे मापन इलेक्ट्रोकार्डिओग्राफ नावाच्या यंत्राने करता येते. यात इलेक्ट्रोड रुग्णाच्या छातीला खास जेलीच्या मदतीने लावले जातात. हे इलेक्ट्रोड हृदयाची स्पंदने टिपतात व ते इलेक्ट्रोकार्डिओग्राफकडे पाठवतात. सरकत्या स्क्रॉलपेपरवर त्याचे तरंग उमटतात, त्यालाच आपण इलेक्ट्रोकार्डिओग्राम असे म्हणतो.
October 29, 2022
वास्तविक आपले सण असे नियमितपणे एका ठराविक तारखेला कधीच येत नाहीत. त्यांच्यात वर्षागणिक बदल होत असतात. मग ती गणेश चतुर्थी असो, दसरा असो, गुढी पाडवा असो की दिवाळी असो.
April 21, 2011
देशामध्ये स्त्री-भ्रृण हत्या ही समस्या रोखण्यासाठी तसेच मुलींना मुलांप्रमाणे समान हक्क मिळायला हवे यासाठी हा दिवस आज साजरा केला जातो.
या कार्यक्रमामुळे देशात १०४ जिल्ह्यांमध्ये स्त्री-भ्रृण हत्या करण्याचा दर कमी झाला आहे.
October 11, 2021
हल्ली आपण नेहमी तक्रारी ऐकत असतो की -
काय करावे - वेळच मिळत नाही, " " इच्छा खूपच असते पण वेळ देता येत नाही "
" आलो असतो हो ,काय सांगू, " वेळ कधी निसटून गेला काही कळतच नाही ",
"तुम्हाला तर माहिती आहे -आज काल वर्क-स्ट्रेस किती आणि कसा असतो ते , वेळ काढू म्हटले तरी नो -टाईम "..!
"ऑफिस कामासाठी वेळ द्यावा लागतो " हे तर मान्यच करायला पाहिजे ,तरी ही आपल्या समोर खूप व्यस्त आणि मोठ्या कार्यात सतत व्यग्र असणाऱ्या
व्यक्तींची उदाहरणे आहेत की -ज्या नियमाने वेळेचे गणित सोडवतात , आपल्या आवडीच्या गोष्टी करतात ,आवडीचे छंद जपतात ",
त्यांना जर हे जमू शकते ? तर आपल्याला त्यांच्या इतके नाही , तरी थोडे फार जमवता येणे का जमणार नाही ?
यस , असे नक्की करता येते , असे करतांना एक मोठा "स्पीड -ब्रेकर लागतो ..तो "पण " या शब्दाचा .
हा स्पीड ब्रेकर दूर करता आला तर ,आश्चर्य कराल इतका फरक पडलाय असे जाणवेल..
पण " या शब्दच विनाकारण बाऊ करणारे अनेकजण आपल्या भवताली असतात ..बघा याची काही उदाहरणे -
" मी केले असतो हो हे काम , पण ,आत्ता करू मग करू , वेळ निघून गेली ..आता काय करू ?
" मी करणारच होतोहो -सगळी तयारी केली होती . पण , ऐनवेळी प्रोब्लम ..काय सांगावे , चान्स हुकला आमचा ,
" मी अगोदरच सांगितल होत , त्याला देऊ नका हे काम , पण , आमच ऐकताय कोण ? यातली पुढची गम्मत पहा -
त्याने तर काम केले नाही , पण, याने सुद्धा "त्याला दिले "म्हणून स्वतःहून काहीच केले नाही , फायदा मात्र "पण " चा घेतला .असो.
काम करायचे ,पण, ते वेळेवर ", ही अट सुद्धा अनेकांना त्रासदायक वाटत असते .
" कामाचं काय घेऊन बसलात राव , करू की ,काय घाई आहे ?,
आपल्याला बुवा घाई जमत नाही ,काम कसं सावकाशीने करायचे ,म्हणजे ते चांगले होते ".
आता तुम्हीच सांगा -अशा पद्धतीने वागणाऱ्या "वेळ काढू माणसाला ", वेळेची किंमत आणि महत्व समजत नाही असे कसे म्हणता येईल , पण..स्वभाव असतो एकेकाचा
मित्र हो - चालू वर्षाचे सरते दिवस आहेत , नव्या वर्षाची चाहूल लागली आहे ..
तेंव्हा .."वेळेचे गणित सोडवणे , वेळेचा गुंता सोडवणे , आणि मुख्य म्हणजे
"वेळ देण्याचा प्रयत्न सुरु करणे ", हा संकल्प करू या , आणि या संकल्पपूर्तीसाठी मनापासून "वेळ देऊ या ".
यासाठी एक यादी तयार करू - ती यासाठी की - आपल्याला कशासाठी , कुणासाठी वेळ द्यायचा आहे -हे कळून येईल.
१. सर्वात महत्वाचे - स्वत:साठी वेळ काढून तो द्यायचा आहे - असे केल्यावर - वाचन करणे , चितन आणि मनन करणे , संवाद वाढवणे "
संपर्क वाढवणे " यातील गोष्टी जमेल तशा ,जमेल तितक्या करणे.
२. नौकरी . ड्युटी केली म्हणजे काम संपले , वेळ संपली - असे करून कसे चालेल ?, घर सांभाळनाऱ्या गृहिणीसाठी " घर हे खूप मोठे किचकट कामाचे कार्यालय आहे ",
त्यामुळे या कामात तिला मदत केली पाहिजे ", आणि असे करणे सर्वांच्या हिताचे आहे ,हे मनाशी कबुल करावे .
३. आई-बाबा आणि "पालक या भूमिकेतून मुलांशी असलेल्या आपल्या नात्यावर चिंतन व्हावे लागणार आहे ",
ही अतिशय नाजूक आणि गंभीर वेळ " का आली आहे ? या समस्येवर उपाय करण्याची वेळ आहे ", त्यासाठी सुद्धा इतर सगळी कामं सोडून वेळ "द्यावा लागणार आहे.
तूर्तास ही त्रि-सूत्री " अवलंबिली तरी खूप काही करण्यासारखे आहे .
"Time ", समय , वेळ , या गोष्टी आपल्या आयुष्यात अतिशय महत्वाच्या आहेत . चान्स , संधी , प्रयत्न , उपलब्धी , मेहनत , परिश्रम , निर्णय आणि निर्णय क्षमता ", समयोचितपणा , प्रसंगावधान ", हे सर्व विशेषणे - वेळ " संबंधित आहेत .
वेळ घालवणे , वेळ दवडणे , वेळ वाया गेला , वेळ निघून घेली , वेळेवर केले असते तर ..ही वेळच आली नसती ..!,
किती उशीर केलात हो ..वेळेवर आला असतात तर ...! नक्कीच काही करता आले असते ..
हाती वेळ होता तेंव्हा झोपा काढल्या .. आता ऐन वेळी काय होणार ? नुसती फजिती ...!
मित्र हो - वरील सर्व उद्गार आपल्या परिचयाचे आहेत , कधी कधी आपल्याला उद्देशून सुद्धा कुणी हे असे म्हणाले असेल , यातून एक नक्कीच म्हणता येते की - वेळ नेहमीच उपलब्ध असतो .. तो मिळत नाही तर तो काढावा लागतो ."एखाद्या कामासाठी "वेळ देणे ", महत्वाचे आहे.
तुम्ही सुद्धा माझे हे "वेळ -आख्यान "कसे वाटले ..यावर वेळ काढून प्रतिक्रिया कळवाव्या ही विनंती.
भेटू ..पुढच्या आठवड्यात ..नवा विषय ..नवा लेख ..
स्नेहांकित -
-- अरुण वि.देशपांडे
पुणे.
9850177342
(प्रकाशित - दै.सत्य -सह्याद्री -रविव्वार पुरवणी -सत्य-सरिता .दि.१६-१२-२०१८ )
December 27, 2018
देशाच्या संसदेवर हल्ला केल्याप्रकरणी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावलेला आणि आजही तुरुंगात खितपत पडलेल्या अफजल गुरूने केलेला दयेचा अर्ज राष्ट्रपतीकडे प्रलंबित असल्याचे आजपर्यंत भासवले जात होते, परंतु राष्टपतीभवनाकडून त्याचा अर्ज गृहमंत्रालयाकडे विचारणा करण्यासाठी मागेच पाठविला असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणजे ही दिरंगाई राष्ट्रपतींच्याकडून नव्हे तर केंद्रीय गृहमंत्रालयाकडून होत असल्याचे सत्य आता समोर आले आहे.
February 25, 2011
बुलडाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर हे जागतिक आश्चर्य आहे. हजारो वर्षांपूर्वी उल्कापातामुळे हे सरोवर तयार झाले असून, या सरोवराचे पाणी खारे आहे. हे सरोवर पाहायला जगभरातील लोक लोणारला भेट देतात.
January 4, 2025
Invisible world and science_ (अदृश्य जग आणि विज्ञान)
(Invisible world and science- (अदृश्य जग आणि विज्ञान)-By-Karan Kamble/करण कांबळे kamble)

विज्ञान हे एका मॅथ्स च्या पहिल्या प्रयत्नातील Problem प्रमाणे असते , म्हणजे निश्चित नसते अपुरे असते. त्याचे उत्तर हे पी एचडी लेवला मिळते आणि चुकीचा प्रयत्नामुळे नंतर ते चुकीचे ही ठरते. म्हणजे आज जे काय माध्यमिक level ला शिकवले जाते ते नंतर modified होणार असते. मग चुकीचे का होईना नंतर ते शिकावे तर लागतेच. म्हणून आपण इथे थोडे current science पाहणार आहोत ; जे वास्तवा वरती आधारित आहेत , रहस्य मय व काही अद्भूत आणि विश्वाचा अस्तित्वावरती प्रश्न करणारे. जसे हे विश्व आपण पाहतो ते खरच real आहे का ? जसे स्वप्नात आपल्याला जागे झाल्याशिवाय स्वप्न की अस्तित्व कळत नाही अगदी तसेच या अस्तित्वाला समजायला तुम्हाला जागाव लागेल (You have to awake). असे म्हणू शकतो कारण आपल्या संसारी जीवनात आपण तितके व्यस्तच आहोत. त्यापासून थोडे लक्ष वेधण्या साठी
सद्या काही चर्चेत असलेल्या science बद्दल काही रहस्य मय facts आणि theory आपण पाहणार आहोत . त्या अशा आहेत : 1] Big-bang Theory_(विश्वाची उत्पाती सांगणारा सिद्धांत ) 2] Multi-universe and Dimensions_(अस्तित्वातील दुसरे universe आणि आयाम तथा Dimension) 3] Parallel Universe_(तुमच्या या जगातील हुबेहूब असे दुसरे अस्तित्व अर्थात समांतर ब्रम्हांड 4] Theory of relativity by Einstein And Stefan hoking_(काल यात्रा/time travel भूतकाळ भविष्यकाळ यात्रा वर्तमानातून and Time Dilation concept ) 5] Quantum theory_(निर्जीव वस्तूंचे स जीवांसारखे behaviour proved experimentally) 6] Simulation theory_(हे विश्व वास्तविक नसून एक simulation आहे) 6] String theory_(Theory of Everything विश्व भौतिक नसून अ भौतिक आहे)
To be continued … In the next Article /PART:2 Starting from BIG BANG….
"Copyright Reserved (©)" AUTHOR – KARAN KAMBLE
March 14, 2024
Copyright © 2025 | Marathisrushti