वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
सात दिवसांपेक्षा कमी कालावधीत जगातील सात आश्चर्यांना भेट देण्याचा विक्रम जेमी मॅकडोनाल्ड याने केला आहे. ‘ॲडव्हेंचरर’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला जेमी हा ब्रिटिश नागरिक आहे.
जगातल्या कोणत्याही देशात जा. देवाने ‘अनंत हस्ते’ दिलेले स्त्रीसौंदर्य तिच्या विवाहप्रसंगी ओसंडून येतं. लग्नविधीतले दोन मुख्य भाग म्हणजे, साखरपुडा आणि लग्नविधी. सून पसंत करायची जबाबदारी आई-वडिलांची. तेच विवाहाची तारीख नक्की करतात. नातलग मंडळी आहेर-खरेदीत गर्क होतात तर दोन्ही पक्षाचे आई-बाबा विवाह-पूर्वतयारीला लागतात. खर्च वाटून घ्यायचा. पण वधूच्या आई-वडिलांनी लेकीच्या संसाराची भांडीकुंडी द्यायची हा संकेत असतो.
यासाठी केला होता अट्टहास असे बिरुद या सोहळ्यास देण्यास हरकत नाही, असा महत्वाचा विवाहसंस्कार लग्नविधी म्हणजे मंगलाष्टक. मंगलाष्टकांशिवाय लग्न लागले हे शास्त्रसंमत होत नाही. आंतरपाटाच्या दोहोबाजूला रुबाबदार नवरा आणि अधोमुखी गौरवर्णा अलंकार पुष्पमंडित सालंकृत नवरी उभे असतात. पौराहित्य करणाऱ्या ब्राह्मणाच्या शात्रोक्त मंत्रोच्चाराने नांदी होऊन नातेवाईक देखील एकेक करीत पाच, सात मंगलाष्टकांमधून देवदेवतांना, निसर्ग देवतांना, पवित्र नद्यांना सहजीवनासाठी आशीर्वाद देण्याचे आवाहन केले जाते. मंगलाष्टकांच्या नादमधुर झंकाराबरोबरच डोईवर पडणाऱ्या पवित्र फुलादी धान्याच्याअक्षतांच्या रूपाने नातेवाईक, सख्या सोबत्यांच्या आशीर्वादाने आणि शुभेच्छाने वधु-वर प्रसन्न होतात. शेवटची मंगलाष्टक ‘वाजंत्री बहू गल्बला न करणे’ संप्पन्न होते. आंतरपाट दूर होतो. हा अत्यंत नाजूक क्षण असतो. नववधु शिर झुकलेल्या वराच्या गळ्यात वरमाला घालते आणि नंतर वर-वधूच्या गळ्यात पुष्पमाला घालतो. वधु-वर मंत्रमुग्ध होतात. मंगलाष्टकांतील आवाहनानुसार गगनातून देव आशीर्वाद द्यावयाचा क्षण मंगलमय वाद्याने वातावरण भारून टाकतो. लग्नसभेत आनंदीआनंद होतो.
परंतु अलीकडच्या काळात या मंगलमय पवित्र धीरगंभीर धार्मिक सोहळ्यास, थट्टामस्करीच्या नावाने गालबोट लावणारी प्रथा रूढ होऊ लागली आहे. मित्रमंडळी, नातेवाईकांच्या फाजील उत्साहाने आणि खोट्या प्रतिष्ठेच्या आविष्काराने या वरमाला अपर्णाच्या मंगलमय भावूक क्षणांचा चोळामोळा करताना वधु-वराला उचलून घेऊन त्यांना हार घालण्यापासून परावृत्त करण्याची दांडगाई केली जातेय. या चढाओढीत विवाहसंस्काराचे पावित्र्य आणि गांभीर्य सहजी नजरेआड केले जातेय. आपण आपल्याच सहकारी वधु मैत्रिणीचे आणि वर मित्राचे भावविश्व क्षणार्धात उधळतो आहे याची पुसटशी जाणीव या सवंगड्यांना का नसावी बरे! मग गदिमांच्या ओळींची पुन्हा आठवण येते.सीता स्वयंवराचे किती विलोभनीय दृश्य रेखाटले आहे या वरमाला अर्पण सोहळ्याचे.
आकाशाशी जडलें नातें धरणीमातेचें
मुग्ध जानकी दुरुन न्याहळी राम धनुर्धारी
नयनांमाजी एकवटुनिया निजशक्ति सारी
पुढे गदिमा, सीतेच्या लज्जेचे मार्मिक वर्णन करतात,
फुलुं लागलें फूल हळूहळू गाली लज्जेचें
उंचावुनिया जरा पापण्या पाहत ती राही
मुक्त हासतां, भूमीकन्या मनोमनीं लाजे
आणि तो वरमाला अपर्णाचा अधीर क्षण काय वर्णावा
पित्राज्ञे उठे हळुं ती मंत्रमुग्ध बाला
अधिर चाल ती, अधिर तीहुनी हातींची माला
गौरवर्ण ते चरण गांठती मंदिर सौख्याचें
आणि झुकले थोडे राम, जानकी घाली वरमाला
गगनामाजीं देव करांनी करिती करताला
त्यांच्या कानीं गजर पोंचले मंगल वाद्यांचे
स्वयंवर झाले सीतेचे...
आपण प्रत्येकाने अशा चुकीच्या प्रथांना मुळातूनच पायबंद घातला पाहिजे. पुढील पिढीच्या समाजमनावर होऊ घातलेले वाईट परिणाम रोखण्यासाठी, हिंदू संस्कृतीच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी या कुप्रथेविरुद्ध विरुद्ध व्यापक जनजागृती करावयास हवी. इंग्रजाळलेल्या आजच्या तरुण, हिंदू मराठी पिढीसमोर आदर्शवादी आणि विवेकपूर्ण लग्नसोहळे संपन्न होऊन, आजच्या तरुणाईला स्वैर वृत्तीपासून परावृत्त करायला हवे.
लेखक : घनश्याम परकाळे
श्री घनश्याम परकाळे यांच्या कॉमन मॅन या ललित लेखन संग्रह इ-पुस्तकातील हा लेख.
हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
https://marathibooks.com/books/common-man-by-ghanashyam-parkale/
किंमत : रु.१५०/
सवलत किंमत : रु.७५/-
जगात बर्याच घटना घडतात. परंतु स्थानिक घटना, चांगल्या किंवा वाईट, या दूरवर होणार्या घटनांपेक्षा आपल्यावर अधिक परिणाम करतात. बर्याच घटना अगदी कमी कालावधीसाठी आपल्या मनात राहतात, काही थोडा जास्त काळ. केवळ काही गोष्टी चिरस्मरणात राहतात.
जातिंगाचे गूढ हे एका गूढकथेसारखे आहे, जिचे काही तुकडे आपल्या हाती लागले आहेत, पण कथेचा शेवट आणि मुख्य कारण अजूनही अज्ञात आहे. आणि कदाचित निसर्गाची हीच खासियत आहे; तो आपल्याला आपल्या ज्ञानाच्या मर्यादांची नेहमी जाणीव करून देतो. जोपर्यंत या ‘का’ आणि ‘फक्त इथेच का’ या प्रश्नांची ठोस उत्तरे मिळत नाहीत, तोपर्यंत जातिंगाचे रहस्य हे रहस्यच राहणार आहे.
आफ्रिकन सुंदरीनी विश्वसुंदरी स्पर्धेत प्रथम विजयश्री प्राप्त केली १९५४ साली. त्यावर्षी इजिप्तच्या अॅंटीगॉनने सुंदरी पद पटकावले. १९५८ ला सादर झालेल्या स्पर्धेत पेनीलोप नावाच्या दक्षिण आफ्रिकेच्या सुंदरीने चषक पटकावला. १९७४ साली स्पर्धेत नाट्य घडले. हेलन मॉर्गन या ब्रिटीश सुंदरीला मुकुट मिळाला. चार दिवसांनंतर समजले, तिला अठरा महिन्याचा मुलगा होता. ‘आई’ असल्याचे समजल्यावर तिला राजीनामा द्यावा लागला.
अरुंधती भट्टाचार्य या सेल्सफोर्स, इंडियाची अध्यक्षा आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत . त्या निवृत्त भारतीय बँकर आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माजी अध्यक्षा देखील आहेत. त्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अध्यक्षा असलेल्या पहिल्या महिला आहेत.
झांझीबारचे नागरीक साखरझोपेत होते. सुमारे ८०० आफ्रिकन बंडखोरांनी बेटावरच्या पोलिस चौक्यांवर ‘जॉन ओकेलो’ या जिगरबाज म्होरक्याच्या नेतृत्वाखाली अचानक हल्ला चढवला. जबरदस्त हल्यामुळे स्तंभित झालेले पोलिस काहीही करू शकले नाहीत. बंडखोरांनी चौकीतला दारूगोळा यथेच्छ लुटला आणि रेडिओ स्टेशनवर कबजा मिळवला. अरब पोलिसांना अशा हल्ल्याचा प्रतिकार करण्याचे कोणतेही प्रशिक्षण मिळाले नव्हते.
कासवांचे पृथ्वीतलावर २२ कोटी वर्षांपासून वास्तव्य आहे. म्हणजे कासव हे सरडे, साप किंवा मगरी या प्राण्यांपेक्षा पुरातन प्राणी आहे.
नैना लाल किडवाई यांचा जन्म १४ एप्रिल १९५७ रोजी एका पंजाबी कुटुंबात झाला. किडवाई यांचे वडील सुरिंदर लाल एका विमा कंपनीचे सीईओ होते. किडवाई यांची आई थापर ग्रुप ऑफ कंपनीजचे संस्थापक करमचंद थापर यांची मुलगी होत्या.
Copyright © 2025 | Marathisrushti