वेगवेगळ्या विषयांवरील लेख आपण या ठिकाणी वाचू शकाल
हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे स्वतंत्र स्थान निर्माण करण्यासोबतच, संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी बॉलिवूडला दिलेली दिग्गज गायकांची पिढी. १९७० आणि ८० च्या दशकात जेव्हा चित्रपटसृष्टीतील मोहम्मद रफी, मुकेश यांच्यासारख्या महान गायकांचे पर्व संपत आले होते, तेव्हा या संगीतकार जोडीने देशाच्या कानाकोपऱ्यातून नव्या प्रतिभेचा शोध सुरू केला. केवळ गाणी बनवण्यापुरते मर्यादित न राहता, त्यांनी नवीन कलाकारांच्या सुरांना पैलू पाडले आणि त्यांना स्टार बनवले. त्यांनी सुरू केलेला ‘लिटल स्टार्स’ (Little Stars) आणि ‘लिटल वंडर्स’ (Little Wonders) हा मुलांचा ग्रुप म्हणजे संगीत विश्वातील नव्या ताऱ्यांसाठी सर्वात मोठे व्यासपीठ ठरला.
August 3, 2026
सकाळी लवकर उठावे. दोन श्लोक म्हणावेत. तळहात पहावेत. व्यायाम करावा, सर्व आह्निके आवरावीत. आणि देवासमोर उभे राहून प्रार्थना करावी. मनातल्या मनात नको. अदृश्यातील देवाची नकोच. आपल्या संस्कृतीमधे उपासना सगुणाची सांगितलेली आहे. सगुणाच्या उपासनेचा टप्पा पूर्ण झाला की निर्गुणाची उपासना करायची.
February 13, 2018
लालबुंद दिसणारा टोमॅटो हा मनाला आल्हाददायक व शरीरासही आरोग्यदायक आहे.
टोमॅटो ही फळभाजी संपूर्ण जगात आवडीने खाल्ली जाते. लालबुंद गोल गरगरीत, लंबगोल पाणीदार असे हे टोमॅटो सर्वासाठीच उपयुक्त आहेत. हिंदीमध्ये टमाटर, इंग्रजीमध्ये टोमॅटो, संस्कृतमध्ये रक्तफल तर शास्त्रीय भाषेमध्ये सोलॅनम लायकोपरसिकम या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती सोलॅनसी कुळातील आहे. टोमॅटो हा मूळचा दक्षिण अमेरिकेतील आहे. नंतर तो मलेशिया, भारत, अमेरिका, आफ्रिका असा संपूर्ण जगामध्ये आला. संपूर्ण जगात बटाटय़ाखालोखाल जास्त पिकवले जाणारे टोमॅटो हे लोकप्रिय पीक आहे.
औषधी गुणधर्म
कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस ‘अ’, ‘क’ जीवनसत्त्व, प्रथिने, आद्र्रता, खनिजे, तंतुमय व पिष्टमय पदार्थ अशा सर्व घटकांनी टोमॅटो परिपूर्ण आहे. आयुर्वेदानुसार टोमॅटो हे अग्निप्रदीपक, पाचक, सारक, रक्तशोधक मधुर आम्ल गुणात्मक, रुचकर, हृदय, लघु स्निग्ध व उष्ण वीर्यात्मक आहे. टोमॅटोमध्ये कमी उष्मांक असल्यामुळे मधुमेहींसाठी, हृदयरोग्यांसाठी एक वरदानच आहे.
उपयोग
० आहारामध्ये टोमॅटो हा उत्तम औषधी गुणयुक्त आहारीय पदार्थ आहे. टोमॅटोची भाजी, रस काढून सूप, तर जेवणामध्ये टोमॅटो कोशिंबीर, सॅलॅड अशा अनेकविध प्रकारांनी टोमॅटो वापरण्यात येतो.
० टोमॅटोमध्ये उष्मांकाचे प्रमाण तसेच कबरेदकाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे रक्तदाब, हाय कोलेस्टेरॉल, हृदयविकार, मधुमेह या विकारांमध्ये टोमॅटोचा औषधासारखा वापर करता येतो. वरील विकार असणाऱ्यांनी टोमॅटो नियमितपणे आहारात वापरावा.
० अति वजन असणाऱ्या व्यक्तींनी वजन कमी करण्यासाठी आहारामध्ये नियमितपणे टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटो खाल्ल्याने पोट भरल्याची भावना निर्माण होते व त्यामध्ये कमी उष्मांक असल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
० टोमॅटोमध्ये ‘अ’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने रातआंधळेपणा, दृष्टिदोष या विकारांवर टोमॅटो उपयुक्त आहे. हा दोष असणाऱ्या व्यक्तीने जेवणामध्ये रोज १ टोमॅटो नियमितपणे खावा. तसेच टोमॅटोची मूठभर पाने कुस्करून १ लिटर पाण्यात उकळावीत व हे पाणी दिवसातून तीन वेळा जेवण्यापूर्वी अर्धा कप प्यावे. यामुळे दृष्टीला तेज प्राप्त होते.
० रक्ताची कमतरता (अॅयनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी नियमितपणे रोज २ टोमॅटो खावेत. यामुळे रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यास मदत होते.
० टोमॅटोच्या १ कप रसामध्ये ‘क’ जीवनसत्त्वही भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे यकृताच्या विकारांमध्ये टोमॅटोचा रस गुणकारी आहे.
० टोमॅटोमध्ये मॅलिक आणि सायट्रिक अॅयसिड भरपूर प्रमाणात असल्याने टोमॅटो खाल्ल्याने लहान व मोठे आतडे अधिक कार्यक्षम होते व शरीरात साचलेला घट्ट मल पुढे ढकलण्यास मदत होते. म्हणून मलावरोधाची तक्रार असणाऱ्यांनी टोमॅटोचे सेवन नियमितपणे करावे.
० पिकलेल्या टोमॅटोचा ताजा रस लहान मुलांना २ ते ३ वेळा दिल्यास मुले निरोगी, बलवान व सुदृढ होतात.
टोमॅटोच्या रसात अर्जुनसाल चूर्ण व साखर घालून अवलेह बनवून तो नियमितपणे खाल्ल्यास हृदयविकार कमी होतो.
सावधानता
टोमॅटो आरोग्यास लाभदायक असला तरी मूतखडा, संधिवात, आमवात व आम्लपित्त असणाऱ्या रुग्णांनी टोमॅटो सेवन करू नये.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.डॉ. शारदा महांडुळे
March 14, 2017
माझ्या घरी टीव्ही आला..
आणि मी पुस्तकं वाचायचं विसरलो !
माझ्याकडे गाडी आली..
आणि मी चालायचं विसरलो !
माझ्याकडे एअरकंडिशनर आला..
आणि मी झाडाखाली बसून गार हवा खायचं विसरलो !
मी शहरात रहायला आलो..
आणि गावाकडच्या चिखल-मातीला विसरलो !
माझ्याकडे क्रेडिट - डेबिट कार्ड आलं..
आणि मी पैशाची किंमत विसरलो !
माझ्याकडे परफ्यूम आला..
आणि मी फुलांचा सुगंध विसरलो !
मी फास्ट फूड - जंक फूडची चव घेतली..
आणि वरण-भात खायचंच विसरलो !
माझ्या हातात मोबाईल आला..
आणि मी पत्र लिहायचं विसरलो !
माझ्याकडे कॉम्प्युटर आला..
आणि मी व्याकरण आणि स्पेलिंग विसरलो !
माझ्याकडे व्हॉटस-अॅप आलं..
आणि मी गप्पा मारण्यातली मजाच विसरलो !
जगण्यातल्या रोजच्या धावपळीत..
मी......... विश्रांती घ्यायलाच विसरलो !
-- निनाद प्रधान
April 20, 2016
४ जानेवारी १९९७ : सचिन १६९. ४ जानेवारी २००८ : सचिन नाबाद १५४. ४ जानेवारी २०११ : ?
January 4, 2011
आपण आपल्या घरात नित्यनेमाने देवपूजा करत असतो. या देवपूजेमध्ये आपण अनेक वस्तूंचा उपयोग करत असतो. ही सर्व साधने आपल्या घरात असतात मात्र त्याविषयी जास्त माहिती बहुतेकांना नसते.
देवपूजेत आपण हमखास वापरतो त्या वस्तू म्हणजे ताम्हण, घंटा, निरांजन, समई, फुले, नरळ, हळद-कुंकू, पळी-पंचपात्र वगैरे. याशिवाय फुले, अक्षता, गंध, शंख, कलश, भस्म, अगरबत्ती, रुद्राक्ष, विविध प्रकारची पत्री यांचाही देवपूजेत वापर होतो.
देवपूजेत वापरल्या जाणार्या प्रत्येक साधनाला काहीतरी महत्त्व आहे. ही सर्व साधने अत्यंत पवित्र आहेत. या सर्व साधनांच्या वापरामुळे जी फलप्राप्ती होते त्याविषयीही आपल्याला बर्याचदा माहित नसते.
सध्या वास्तुशास्त्र आणि फेंगशुईचे प्रस्थ वाढलेले आहे. त्यामध्ये देलेल्या वस्तूंपासून लाभ होतो असा अनेकांचा समज आहे. काही प्रमाणात हे खरेही आहे. मात्र आपल्या भारतीय संस्कृतीतील देवपुजेच्या विविध साधनांमुळेही आपल्याला अनेक प्रकारचे लाभ होतात हे आपण लक्षात घेत नाही आणि उगीचच चायनिज वस्तूंच्या मागे लागतो. आपल्याच घरातील या शुभ साधनांचा श्रद्धापूर्वक वापर केल्यास आपल्याला सुख, समाधान, शांती आणि समृद्धी लाभेल यात शंकाच नाही.
शुभ गोष्टींची सुरुवात आपण ॐकाराने करतो. ॐ हे ब्रम्ह आहे. ॐ हे अक्षर संपूर्ण विश्वाचे प्रतिक आहे. ओम हा परब्रम्हाचा संकेत असल्यानें ब्रम्हाच्या सर्व रुपांचा म्हणजेच `व्यक्त आणि अव्यक्त', `कालाधीन आणि कालातीत', `दृश्य आणि अदृश्य' रुपांचा वाचक आहे.
अध्ययनाला प्रारंभ करताना ॐ म्हणून "मला ब्रम्हप्राप्ति होवो" असे म्हटले जाते. त्याचप्रमाणे देवपुजेची सुरुवातही ॐकाराने केली जाते.
`देवपूजेतील साधने' या खास लेखमालेच्या माध्यमातून आपल्याला ओळख करुन दिलेय या सगळ्या पवित्र साधनांची. पौराणिक माहितीव्यतिरिक्त ऐतिहासिक आणि वैज्ञानिक माहितीही देण्याचा प्रयत्न इथे केलाय.
-- मराठीसृष्टी व्यवस्थापन
December 28, 2015
टेनिसक्षेत्रात जागतिक पातळीवर गेली काही वर्षे सेरेना आणि व्हिनस विल्यम्स या काळ्या (किंवा निग्रो) बहिणी अनभिषिक्त सम्राज्ञी म्हणून वावरत आहेत. त्यांची नावे, त्यांचा खेळ, त्यांची चपळाई, त्यांचे टेनिसच्या खेळातील वादातीत प्रभुत्व आणि जागतिक पातळीवरील कोणत्याही स्पर्धे तील त्यांचे अढळ-अजिंक्यपद, या सर्वांची आपल्याला आता सवयच झालेली आहे.
February 16, 2024
पान खाणे या प्रकारात, पानातील हे सर्व मिश्रण चावणे आणि चघळणे या दोन क्रिया महत्त्वाच्या !
पान तोंडातल्या तोंडात घोळवल्याने जीभेला उत्तम व्यायाम होतो. वर खाली, डावीकडे उजवीकडे,व तिरपी जीभ वळल्याने जीभेला जोडले गेलेले सर्व छोटे मोठे स्नायु अगदी स्वरयंत्रापर्यंत, ताणले जातात. आणि शब्दोत्पत्तीला मदत होते. गळ्यापासून टाळूपर्यंत जीभेला फिरावेच लागते. टाळू शकतच नाही.
July 10, 2017
समर्थांनी शिवथर घळीत त्याचे पट्ट शिष्य कल्याण स्वामी यांना दासबोध सांगितला आणि कल्याण स्वामी यांनी तो लिहून काढला. दासबोधा शिवाय समर्थांनी निर्माण केलेले वाङ्मय प्रचंड आहे . या शिवथर घळीचे महात्म खूप मोठे आहे. महाड- भोर रस्त्यावर माजेरी हे गाव लागते. त्या गावा पासून ४ मैलावर शिवथर घळ आहे. समर्थांनी या ठिकाणी वाङ्मय निर्मिती केली.दासबोध लिहिला गेला. महाराष्ट्रात दोन ठिकाणे अशी आहेत कि तिथे कंपास दक्षिण -उत्तर दिशा दाखवत नाही.शिवथर घळ आणि ठाणे जिल्ह्यातील गणेश पुरी जवळ तुंगारेश्वर पर्वतावर एक प्रचंड मोठी पांडव कालीन शिळा आहे तिथे कंपास दिशा दाखवत नाही.गणेश पुरी येथील नित्यानंद स्वामी त्याठिकाणी एकांतात बसायचे.आता श्री सदानंद स्वामी त्याठिकाणी ध्यान धारणा करतात.
दासबोधा शिवाय त्यांनी करुणाष्टके, मनाचे श्लोक ,आनंदवनभुवनी, आनंदवनभुवनम् (संस्कृत) आत्माराम अंतर्भाव,सार्थ अंतर्भाव,चत्वारमान, जनस्वभावगोसावी ,जुनाटपुरुष, पंचसमासी, पंचीकरणयोग,पूर्वारंभ, बाग प्रकरण,कारखाने प्रकरण,मनोबोध ,मान पंचक , षड्रिपुनिरुपण ,सवाया, समर्थ-वेण्णास्वामी संवाद, समर्थ- कल्याणस्वामी संवाद, समर्थ- केशवस्वामी संवाद, सार्थ भीमरूपी स्तोत्र, श्री सूर्यस्तुती, गुरुगीता, अशी अनेक स्त्रोत्र , कवने आणि आरत्यांची निर्मिती केली .
चिंतामणी कारखानीस
March 1, 2016
आज ज्या वीज आणि पाण्यासारख्या गोष्टींची पैशाच्या मस्तीत आपण काटकसर करत नाही त्या एक ना एक दिवस संपून जातील. ज्या माणसांना दुखावण्याबाबत स्वतःच्याच मस्तीत आपण काटकसर करत नाही ती माणसंदेखील एखाद दिवस आपल्याला किंवा जगाला सोडून जातील. हातात काय राहील याचा विचार करा बरं एकदा. मित्रांनो; काटकसर जिथे शक्य आहे तिथे करा. जितकी जास्त बचत कराल तितकं जीवन सुसह्य असेल. मग ती बचत पैशांची असो वा नात्यांची!!
December 28, 2017
Copyright © 2025 | Marathisrushti