नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
प्राथमिक शिक्षणाची परवड
June 25, 2017
पूर्वी पावसाळा सुरु झाला की, माळ्यावर ठेवलेल्या छत्र्यांचा शोध घेतला जायचा. त्या नादुरुस्त असतील तर त्यांची दुरुस्ती केली जायची. प्रत्येक पेठेतील एखाद्या चौकात छत्री दुरुस्ती करणारा दिसायचाच. काही फिरते छत्री दुरुस्ती करणारे गल्लीतून ‘ए छत्रीऽऽवाला’ असं ओरडत जाताना दिसायचे. जुन्या काळ्या छत्र्या, मोठ्या आणि दणकट असायच्या. तिची मूठ लाकडी असायची. कापडही चांगल्या दर्जाचं असायचं. दहा वीस वर्षांचे पावसाळे त्या आरामात सहन करायच्या.
July 1, 2021
अंतरा आणि अभिनय दोघे मुंबईतील वरळीच्या किनाऱ्यावर फिरत होते. दोघांनी आपले हात मागून दुसऱ्याच्या कमरेभोवती लपेटलेले होते. अंतरा आणि अभिनय दोघे मनाने एकमेकांच्या प्रेमांत आकंठ बुडालेले होते. दोघांचेही शिक्षण आता पूर्ण झालं होतं. या वर्षी ते दोघेही आपापल्या गांवी परतणार होते. अंतराला तर उद्याच गांवी जायचे होते.
February 2, 2026
होम quarantine झाल्यापासून सगळेच आपण आपल्याला आजूबाजूच्या भौतिक सुखाचा प्रचंड loss झालाय नाही का?
September 26, 2021
बाबा रिटायर व्हायच्या पूर्वीच गावातील आमच्या जुन्या घराचे नूतनीकरण केले होते. गावातील आमचे दुमजली घर एखाद्या वाड्या सारखेच मोठे होते. घरातील वरचा माळा लाकडाच्या फळ्यांनी आणि त्याच्यावर आणखीन एक पोटमाळा. घराचे छप्पर अजूनही कौलारु आहे. साठ पासष्ट वर्ष होऊनही आमच्या त्या घराच्या भिंतीत खिळा ठोकता येत नाही एवढे मजबूत बांधकाम आजोबांनी करून घेतले होते.
October 29, 2021
१९७२ साली भारतात दूरदर्शन सुरु झाल्यावर, पहिल्याच आठवड्यात एका लोकप्रिय कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्या कार्यक्रमाचं नाव होतं ‘फुल खिले हैं गुलशन गुलशन’! हा कार्यक्रम सलगपणे तब्बल २१ वर्षे चालला.
July 29, 2021
समत्व बुद्धी
एका टोंकावरती जातां, शांत न राही झोका तेथें,
विलंब न करता क्षणाचा, जाई दुजा टोका वरती ।।१।।
जीवनांतील झोके देखील, असेच सदैव फिरताती,
बऱ्या वाईटातील अंतर, नेहमी चालत असती ।।२।।
समाधान ते मिळत नसे, जेव्हां बघता तुम्हीं भोग,
त्यांत देखील निराशा येते, मनीं ठरविता जेव्हां योग ।।३।।
जवळपणाच्या नात्यामध्यें दुरत्वाचे अंकूर फूटते,
दूर असता कुणी तरी, जवळ करावे वाटते ।।४।।
संतूलन करूनी मनाचे, समत्व बुद्धी ठेवावी,
टोकावरती जाण्याची भूमिका, सदैव टाळीत रहावी ।।५।।
मध्य बिंदू तो साधतां, निवड न राही एकाची,
स्थिरत्व येईल जीवनाचे, टोके जातां सुख दु:खाची ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
September 23, 2015
एका संडेच्या दिवशी केसांची हेअरस्टाईल व्यवस्थित केली आणि पिवळं पितांबर नेसून गाईचं गोमूत्र शिंपडत मुलींच्या कन्याशाळेकडे जाण्यासाठी उजवीकडे राईटला वळलो.
October 1, 2019
पाखरांची शाळा भरे पिपळावरती
चिमण्यांची पोरे भारी गोंगाट करती ! ॥१॥
उतरते ऊन, जाते टळूनी दुपार
पारावर जसा यांचा भरतो बाजार ! ॥२॥
बाराखड्या काय आई, घोकति अंगणी?
उजळणी म्हणती का जमूनी रंगणी? ॥३॥
तारेवर झोके घेती बसूनी रांगेत
भुर्रकन इथे तिथे उडती मौजेत ! ॥४॥
खेळकर मुले, नको कराया अभ्यास
परीक्षेत का न आई व्हायची नापास? ॥५॥
लक्ष यांचे पांगलेले पेरूच्या बागेत
मास्तरच यांना हवे आमुचे रागीट ! ॥६॥
पावसाळ्यातही शाळा आमुची न गळे
गळकी न शाळा यांची, भिजती सगळे ! ॥७॥
रविवारी, सणवारी आमुच्यासारखी
यांना नाही सुटी, भली मोडली खोड की ! ॥८॥
यांच्याहून आम्ही आई ! शहाणे, नव्हे का?
गप्प शाळेमधी, कधीं धरितो न हेका ॥९॥
होतो पास आम्ही, देती दिपोटी बक्षीस
मौज काय सांगू? मिळे सुट्टीही शाळेस ! ॥ १०॥
June 19, 2026
हि माझी कथा -विदूषक १९९९च्या दिवाळी अंकात सु र आळंदकर या नावाने ‘भोवनीच मयत ‘ या शीर्षका खाली लिहली होती.
August 27, 2018
Copyright © 2025 | Marathisrushti