नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
वपु काळे यांच्या एका पुस्तकातील हा उतारा. वाचा आणि विचार करा..
"आपण हा जो जन्म घेतला आहे, तो अपेक्षापूर्तींसाठी नाही. आपल्या दुस-यांकडूनच अपेक्षा असतात, असं नाही. आपल्या स्वत:कडूनही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत. उरतात फक्त जाळणा-या व्यथा. माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तींसाठी नाही. हा जन्म परतफेडीसाठी आहे.
तुमच्या सौभाग्यवती गेल्या. तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्यासाठी हा जन्म घेतलात. ह्याचा अर्थ, कोणत्या तरी जन्माची एक परतफेड झाली. तो अकाऊंट संपला.
ह्याच दृष्टीकोनातून सगळ्या लहान-मोठ्या घटनांकडे पाहण्याचा प्रयत्न करा. परतफेडीचा हा हिशेब ह्या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हाला मरण नाही. तेव्हा मनातल्या मनातसुद्धा परमेश्वराला उद्देशून --- मला का जगवलसं ? हा प्रश्न विचारु नका. कोणतीही व्यक्ती असो, तुमच्याशी विचित्र वागली, तिने तुमचा अपमान केला, दुर्लक्ष केलं, तुमच्या उपकाराचं कुणाला विस्मरण झालं, तर एकेक अकांऊट पूर्ण झाला, असं आजपासून स्वत:ला सांगायला लागा. बॅंकेतली शिल्लक संपली की पासबुकवर 'अकाऊंट क्लोज्ड' असा शिक्का मारतात. त्याप्रमाणे आपले किती अकाउंट्स क्लोज्ड झाले ह्याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका.
परतफेडीचा एकही क्षण टाळू नका. प्रारंभी तुम्हाला हे जड जाईल, पण आपलं मन जेवढं बलदंड असतं तेवढंच लवचिकही असतं. त्या मनाला सांगायचं, 'बाबा रे, आयुष्यभर तुझं ऐकलं, तुझ्या हुकुमात राहिलो. आता ही गुलामी मी सोडून देत आहे. आजपासून मी तुला मुक्त केलय.' हा प्रयोग करुन बघा, आणि किती खाती फटाफट बंद होतात, ह्याची प्रचिती घ्या. मीसुद्धा उद्या तुम्हाला ओळख दाखवली नाही, तर तुमच्या पासबुकात माझी एकच एन्र्टी होती, असं समजा. परतफेड परतफेड... हाच मंत्र ध्यानात ठेवा.
वसंत पुरुषोत्तम काळे
एक लक्षात ठेवा......
चांगुलपणा कधीच वाया जात नसतो.....
त्याच फळ देव कधीतरी आपल्याला देतोच.
आपण कोणाला केलेली छोटी किंवा मोठी मदत,
कोणाला दिलेला आर्थिक स्वरुपात मदतीचा हातभार,
रोज एखाद्या झाडाला नियमितपणे घातलेले पाणी,
वाढदिवस व लग्नांचा अवाढव्य खर्च वाचवुन कधी भुकेल्या माणसांना पोटभर जेवण देणे..
स्वताःच पक्षांकरिता व रस्त्यावरील बेघर जनावरांना नियमितपणे अन्न व पाण्याची सोय करणे....
गरीब विद्यार्थाला दिलेला शाळेय शिक्षणासाठीचा योग्य वा आर्थिकदृष्ट्या आधार....
अपंग व्यक्तिस व वयोवृध्दांना घाईगडबडीच्या वेळी मानसन्मानाने आपल्या गाडीतुन दिलेली लिफ्ट....
घरातील न लागणारे जुने सामान, वस्तु आणि जुने कपडे हे सर्व एखाद्या गरजु कुटुंबाला पुन्हा वापराला देणे ....
असे बारीकसारीक गोष्टीसुध्दा स्वमनाला भरपुर आनंद देऊन जातातच ...... आणि हो,
ही अशी काम बाकीचे करत नाहीत तर मीच का करावे अस आपण म्हणत बसायचे नाही, कारण चांगली कामे करायला कोणतीच जात पात, धर्म, राजकारण, सामाजिक विषमता, स्त्री, पुरुष, शहाणा, अडाणी, गरीबश्रीमंत असा कोणताच भेदभाव मध्ये येत नसतोच.....
आपण आपल चांगल काम चालुच ठेवायच... ईतरांच त्यांच्यापाशी..... फक्त आपल्यातला "चांगुलपणा" कमी होऊ द्यायचा नाही.... हे लक्षात ठेव....."....अस माझी आजी मला लहानपणी सांगत होती.
माझ्यातर लक्षात आहेच..
जमल्यास तुम्हीपण लक्षात ठेवा....
-- विवेक जोशी
प्रश्नः- ग्लोबलायझेशन म्हणजे नक्की काय?
उत्तरः- प्रिन्सेस डायनाचा मृत्यु!
प्रश्नः- काहीतरीच काय? प्रिन्सेस डायनाच्या मृत्युचा व ग्लोबलायझेशनचा काय संबंध?
उत्तरः- त्याचे असे आहे! एक ‘ब्रिटिश’ प्रिन्सेस तिच्या ‘इजिप्तशियन’ बॉय फ्रेन्डबरोबर ‘जर्मन’ कार मधून जात असताना ती कार एका ‘फ्रेन्च’ टनेलमध्ये क्रॅश झाली. त्या गाडीला ‘डच’ इंजिन होते. त्या गाडीच्या ‘बेल्जियम’ ड्रायव्हरने ‘स्कॉटलन्ड’ मध्ये तयार झालेली स्कॉच व्हिस्की ढोसली होती. त्या प्रिन्सेच्या मागे लागलेली ‘इटालियन’ पॅरॅपेझी पत्रकार तिचा ‘जपानी’ मोटर सायकलवर पाठलाग करत होते. तिला अपघात झाल्यावर एका ‘अमेरिकन’ डॉक्टरने तिच्यावर उपचार केले व यासाठी ‘ब्राझील’ मध्ये तयार केलेली औषधे वापरली. ही गोष्ट एका ‘इंडियन’ ने ‘अमेरेकन’ टेक्नॉलॉजी वापरून तुमच्यापर्यंत पोचवली. आता ही गोष्ट आपण आपल्या आय फोन, ऍन्डॉईड, विन्डोज सारख्या ‘अमेरिकन’ टेक्नॉलॉजी असलेल्या उपकरणांवर वाचणार असाल तर लक्षात ठेवा की याच्या मायक्रोचिप्स ‘तैवान’मध्ये तयार होतात तर स्क्रिन ‘कोरिया’ मध्ये तयार होतो. तुमचा फोन कदाचीत एखाद्या ‘बंगलादेशी’ कामगाराने ‘सिंगापुर’ मधील फॅक्टरीत तयार केला असेल व एखाद्या ‘पाकिस्तानी’ ट्रक ड्रायव्हरने त्याची वाहतूक केली असेल.
प्रिन्सेस डायनाचा मृत्यु, ही खबर तुमच्यापर्यंत पोचवणे व तुम्ही ती तुमच्या आय फोन, स्मार्ट फोन, टॅबलेट, लॅपटॉप किंवा पीसी वर वाचणे या प्रक्रियेत ब्रिटन, इजिप्त, जर्मनी, फ्रान्स, बेल्जियम, हॉलन्ड, स्कॉटलन्ड, इटाली, जपान, अमेरिका, ब्राझील, इंडिया, तैवान, कोरिया, बंगलादेश, सिंगापुर, पाकिस्तान अशा 17 देशांचे योगदान आहे.
याला म्हणतात ग्लोबलायझेशन किंवा जागतिकीकरण.
--उल्हास हरी जोशी
मोः-9226846631
आजकाल सोशल मिडियावर वावरणार्या मंडळींवर केलेली सुंदर टिप्पणी….
फ्लैटमधे राहणाऱ्या शहरी उच्चमध्यम वर्गीय लोकांचे जीवन, खोटा देखावा, प्रेमाचा अभाव, खंडित परिवार व एकटेपण – प्रेमाचा वसंत फुलणार कसा???
यात्रेचे फळ -प्रत्येकाच नशीब
Copyright © 2025 | Marathisrushti