(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • घडलय बिघडलंय

    कपड्या बद्दल तर एवढी मोठी क्रांती झाली आहे की एक स्वतंत्र ग्रंथ होईल. वारेमाप कपडे. पण धुण्याचा अजिबात त्रास नाही. वॉशिंगमशिन तयार आहेच. डाग काढायला सोयीचे झाले आहे. त्यामुळे दाग अच्छे है असे म्हणत आई हसतमुखाने लेकराचे कपडे धुते. शिवाय हे लेस ते लेस सगळेच यूजलेस असलेले तोकडे कपडे पाहून वाटते की मूलभूत गरज आहे की मूलभूत सुविधा आहे. आणि एक फायदा म्हणजे जीन्स. टिशर्टस कुणीही कुणाचे घालू शकतात. म्हणजे हे मला नक्की माहीत नाही पण ऐकले आहे म्हणून लिहिण्याचे धाडस केले आहे.

      June 10, 2022


  • गुरुदक्षिणा

    गुरुकुल शिक्षण पद्धतीत शिक्षण पूर्ण झाल्यावर गुरुंच्या आज्ञेनुसार विद्यार्थी स्वगृही जायचे. तिथे अध्यापनात सर्वांगीण विकास होण्याचे संस्कार केले जात असे. अशी ही एक पद्धत होती की गुरुकुल सोडून जातांना गुरुदक्षिणा दिली जायची. ती पण ऐच्छिक व ऐपतीप्रमाणे.

      February 24, 2022


  • समाजातील जड़णघडणीत संत साहित्याचे योगदान

    संतसाहित्यवाङमयनिश्चितच सामाजिक स्तरावर , समाजाच्या जडणघडणीवर तसेच समाज कल्याणाच्या विचारांनी प्रेरित असून सत्य मानवी धर्माची! मानवी नीतिमूल्यांची! जाणीव करून देणारी अवीट अविरत प्रवाही वांग्मयीन गंगोत्री आहे.

      November 22, 2021


  • माझा पहिला विमान प्रवास

    विमानात बसणे हा माझ्यासाठी नवीन अनुभव होता. पहिल्यांदाच विमानात बसणार होतो, त्यामुळे रात्रभर झोप म्हणता झोप काही येईना. कधी एकदा हि रात्र संपते, कधी एकदा मी एअरपोर्टला पोहचतो आणि विमानात बसतो असे झाले होते. विमानात बसल्यावर ते वर जाताना, कसे बरे वाटणार, काय अनुभव येणार ह्याची मनाला हुरहूर लागून राहिली होती.

      March 30, 2013


  • वाचनातूनच ‘खरं’ जग कळतं

    हरलेल्या व्यक्तीला प्रोत्साहन दिलं तर तो जिंकू शकतो. हे समजायला वाचनच मदतीला येतं. अपयशी ठरल्या नंतर आत्महत्येचा विचारही मनात न येता उमेदीनं जीवन जगण्याची प्रेरणा मिळते. एकमेकांच्या सुख दुःखाची तीव्रता कळू लागते. करोडपती असणाऱ्या माणसातील ‘गरीबी’ व हमाली करुन जेमतेम भूक भागविणाऱ्यातील ‘श्रीमंती’ दिसू लागते.

      February 13, 2022


  • भरुनी येता आकाशी (सुमंत उवाच – १०९)

    सुमंत जयंत परचुरे. 

    पावसाळा! काहींना न आवडणारा शब्द तर काहींसाठी आनंदाचं उधाण घेऊन येणारा शब्द. मला पावसाच्या रिमझिम सरींमध्ये भिजायला आवडतं, तर काहींना मुसळधार कोसळणाऱ्या पावसात चिंब व्हायला. पण, पावसाळा म्हटलं की कित्येक चांगल्या- वाईट गोष्टी तो घेऊन येतो.

      December 29, 2021


  • पिठाची गिरणी

    आता जमाना बदलला आहे. पिठाच्या गिरण्यांची संख्या कमी झाली आहे. तयार आट्याची दहा किलोची आकर्षक ब्रॅण्डेड पॅकेट्स मिळतात. उच्च मध्यम वर्गीयांकडे पोर्टेबल आटा चक्की असते. ते घरच्याघरी गहू, ज्वारी दळू शकतात.

      November 27, 2021


  • आज्जीची माया

    खूप सुंदर असतं घरात आज्जी असणं. घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं. तिच्या पदराआड दडलं की कसं सुरक्षित वाटतं. वेगळेच संस्कार होतात मनावर तिच्यासोबत असलं की. तुम्ही चुकलात तर प्रेमाने तुम्हाला ओरडेल, रोज संध्याकाळी देवासमोर बसून शुभंकरोती म्हणवून घेईल, मनाचे श्लोक पाठ करून घेईल, लाडू वळले की पहिला तुम्हाला देवासमोर ठेवायला लावेल आणि दुसरा तुमच्या हातात देइल, तुमचा हात हातात घेउन मंदिरात नेइल आणि तुम्ही परत निघताना निरोप घेत तुमचा गोड पापाही घेईल.

      July 5, 2020


  • ग्रीष्माचे दोन रंग

    मार्च महिन्याच्या सुरवातीस थंडीचा कडाका ओसरू लागतो. हवेत सुरेख गारवा येऊ लागतो.  स्वेटर रजया बासनात गुंडाळून ठेवल्या जातात.पंख्याचा वेग वाढला जातो.

      July 2, 2020


  • शैलेंद्र

    आज शैलेंद्रला जाऊन पन्नास वर्षं झाली. त्याच्या जीवनाच्या शोकांतिकेवर आतापर्यंत अनेकदा लिहिलं गेलयं. त्याचा शोकात्म शेवट आठवला की मन हमखास खिन्न होतं. म्हणून ठरवलं की आज त्याच्या फक्त आनंददायी आठवणींची उजळणी करायची आणि मस्त गाणी ऐकायची !! आणि मग जाणवलं की एक tragic end सोडला तर त्याचा सगळा कलाप्रवास म्हणजे एक "सुहाना सफर"* आहे.
    मग मी गेलो या सफरीवर ....
    मधुमती पासूनच सुरुवात केली :

    मधुमतीमधलं, टूटे हुए ख्वाबोंने हमको ये सिखाया है हे काळजाला हात घालणारं गाणं त्यानं अवघ्या दहा मिनीटांत लिहिलं होतं आणि नंतर ते मधुमतीचं एक हायलाईटच बनून गेलं .

    त्याच्या बंगल्याशेजारी हेमंतकुमारला चित्रपट दुनियेत सगळेजण, ''राजा 'साली'वाहन" असं म्हणायचे. कारण त्याच्या चार अविवाहित मेव्हण्या ( हिंदीत : साल्या) काही दिवस त्याच्या बंगल्यावर राहत असत. एके रात्री शैलेंद्र स्वतःच्या बंगल्याच्या गेटपाशी अडखळून पडला. त्याने मद्यपान केले होते . तो पडलेला पाहताच शेजारी गच्चीत उभ्या असलेल्या हेमंतकुमारच्या मेव्हण्या जोरात हसल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी शैलेंद्रनं गाणं लिहिलं :

    जंगलमें मोर नाचा किसीने न देखा
    हम जो थोडीसी पीके जरा झूमें...

    रंगोली चित्रपट चालू असताना त्याचं आणि शंकर-जयकिशन यांचं थोडं भांडण झालं. हे तात्पुरतं भांडण रसिकांसाठी बरंच फायदेशीर ठरलं, कारण शैलेंद्र लिहिता झाला :
    छोटीसी ये दुनिया पहचाने रास्ते है, तुम कभी तो मिलोगे तो पूछेंगे हाल .

    बूट पॉलिशच्या एका सिच्युएशनवर, शैलेंद्र विचार करत, सोफ्यावर बसला होता. घरात काही पाहुणे आले होते.
    तेवढ्यात त्याचा दोन वर्षांचा मुलगा, अर्धवट खाल्लेला लाडू, इवल्याश्या मुठीत धरून त्याच्या समोर आला आणि पाहुण्यांना पाहून सोफ्याच्या मागे लपला. तेव्हा पाहुण्यांनी त्याला विचारलं , 'बाळा, तुझ्या मुठीत काय आहे ?'
    हे ऐकताच शैलेंद्रच्या लेखणीतून शब्द प्रकटले,

    "नन्हें मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठीमें क्या है
    मुठ्ठीमें है तकदीर हमारी
    हमने किस्मतको बसमें किया है"

    कधी नव्हे तो एकदा 'राज कपूर' बरोबर वादविवाद झाला . शैलेंद्रनं लगेच आव्हान दिलं,
    " हम भी है तुम भी हो दोनो है आमने सामने*"
    ( नंतरची ओळ मात्र चित्रपटाच्या प्रसंगाला साजेशी) .

    आवारा ची कथा ऐकायला 'राज' त्याला, के ए अब्बास यांच्याकडे घेऊन गेला . अब्बास म्हणजे त्या काळातलं बडं प्रस्थं ! शैलेंद्र अगदीच नवखा ! अब्बासनी शैलेंद्रकडे बघितलं सुद्धा नाही. सलग दोन तास ते कथा 'सुनवत' राहिले. शेवटी राजने शैलेंद्रला विचारलं "क्यों कवीराज, कुछ समझमें आया?"
    शैलेंद्र खाडकन म्हणाला ,
    "गर्दीशमें था, आसमान का तारा था, आवारा था"
    त्या दोघांनी चमकून शैलेंद्रकडे पाहिलं . या शब्दांनी फक्त टायटल साँग तयार झालं असं नाही तर चित्रपटाच्या मध्यवर्ती व्यक्तिरेखेचं स्वरूपही ठरुन गेलं.
    पुढे हे गाणं रशियात सुद्धा इतकं लोकप्रिय झालं की तिथल्या 'कँसर वॉर्ड' या सुप्रसिद्ध कादंबरीदेखील या गाण्याचा उल्लेख आला.

    " आवारा" नंतरच्या चित्रपटांत, राज कपूरच्या व्यक्तिरेखेचं वर्णन करणारी बहुतेक सगळी गाणी शैलेंद्रनं लिहीली : मेरा जुता है जापानी, 'होटोंपे सच्चाई रहती है', ' मेरा नाम राजू घराना अनाम' इ. मुकेश हा राज कपूरचा 'प्रकट' आवाज होता तर शैलेंद्र हा 'आतला' आवाज !

    एकदा शैलेंद्र आणि जयकिशन रस्त्यावर फिरत होते आणि समोरून एक अप्रतिम सौंदर्यवती येताना दिसली. 'ती पाहताच बाला कलीजा खलास झाला' अशी अवस्था जयकिशन यांची झाली. ते तिच्याकडे वळून वळून पाहत असताना, शैलेंद्र मागून उद्गारला :
    'मुडमुडके न देख मुडमुडके

    शैलेंद्रच्या अशा 'सुखद स्मृतींनी' मनात दाटी केली. मग, "घायल मनका पागल पंछी उडनेको बेकरार' मधील असह्य वेदना कुठल्या कुठे उडून गेली . "शैलेंद्र" म्हटलं की मनावर दाटून येणारी काजळी विरून गेली.
    ताजंतवानं होऊन उठलो. "अनाडी"ची रेकॉर्ड काढली आणि लावली ,
    के मरके भी किसीको याद आयेंगे
    किसीकी आसूओंमें मुस्कुराएंगे
    कहेगा फूल हर कलीसें बार बार
    जीना इसीका नाम हैं

    धनंजय कुरणे , कोल्हापूर
    9325290079)
    14.12.2016

      December 14, 2016