(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भविष्य

    नाशिकमध्ये माझा एक मित्र आहे. खलील जिब्राननं त्याला वेडं बनविलेलं आहे. जिब्रानच्या साहित्याचं मराठीत भाषांतर करून ते प्रकाशित करण्यासाठी मोठी पदरमोडही त्यानं करून घेतली आहे. एक चांगला वाचक, चांगला कवी असं त्याचं वर्णन होऊ शकेल. भविष्य हा

    त्याच्या रोजीरोटीचा व्यवसाय. अपारंपरिक किवा पर्यायी औषध साधना हाही त्याच्या आवडीचा, संशोधनाचा विषय. अमावस्या वगळता आठवड्यातले सहा दिवस तो नाशिकपासून मुंबईपर्यंतच्या अनेकांच्या भविष्यात डोकावत असतो किवा काही औषधे तरी देत असतो. सतत माणसात वावरणार्‍या या माणसाला स्वतःच्या पुस्तकाचं भविष्य मात्र पाहाता आलं नाही.

    असो, तर या मित्राकडे जाऊन बसणं हाच मुळी एक जीवनानुभव असतो. डॉक्टरपढे जसा रुग्ण सहजपणे नग्न होतो तसंच माणसाचं भविष्य सांगणार्‍या या माझ्या मित्रापुढं अनेकांनी आपल्या आयुष्यातल्या अनेक गोष्टी सांगून टाकलेल्या. आई-वडील-पती-पत्नी एकमेकांना सांगणार नाहीत, अशी गुपितं त्याच्या पुढ्यात खुली झालेली. माणूस कसा असतो? त्यागी, स्वार्थी, विकृत, बीभत्स की आणखी काही हे सारं त्याच्यापुढं उघड होणार्‍या आयुष्यात पाहता येतं. एकदा मी म्हटलं, ‘‘खलीलच्या भाषांतरांपेक्षा ही माणसांची कथा लिही, चांगला लेखक म्हणून गौरव होईल तुझा;’’ पण त्यानं ते ऐकलं नाही. असं बोलल्यावर तो फक्त हसतो, तसाच याहीवेळी हसला एवढंच. तर भविष्य अन् त्याची ओढ, त्याची उत्सुकता किती टोकाची असू शकते. याचा एक अनुभव तुम्हाला सांगायचा म्हणून ही प्रस्तावना. अर्थात, हा अनुभव नाशिकमधल्या त्या मित्राचा नाही. तो आहे पुण्यातल्या एका स्नेहाचा. दोघांमधलं साम्य हेच, की भविष्य हाच त्यांच्या उपजीविकेचा भाग. पुण्यातला हा मित्र तर चक्क चार्टर्ड अकाउंटंट आहे; पण भविष्य हेच सूत्र महत्त्वाचं. असंच एका संध्याकाळी त्याच्या घरी गेलो. दारातच थांबलो. कारण मित्रासमवेत एक वृद्ध गृहस्थ बसलेले होते. बहुधा भविष्य हाच विषय असावा. मनात आलं, वयाची साठी ओलांडल्यानंतरही

    भविष्याचं औत्सुक्य कायम असतं? मी म्हटलं, ‘‘चालू द्या. मी नंतर येतो,’’ मित्रानं थांबविलं. त्या वृद्धाला म्हणाला, ‘‘आपण पुन्हा भेटू, हे माझे पत्रकार मित्र आलेत, त्यांना वेळ दिली होती मी.’’ खरंतर मी त्याची वेळ घेण्याचा प्रश्न नव्हता; पण त्या वृद्धाला टाळण्यासाठी हे सारं होतं हे लक्षात आलं माझ्या. तो वृद्ध गेला. थोड्या वेळानं पुन्हा येतो म्हणाला. आता त्या वृद्धाचा विषय काढावा असं काही नव्हतं; पण मनातून प्रश्न जात नव्हता. मी दरवाजाकडे खूण करूनच विचारलं, ‘‘यांच
    ं काय काम?’’ ‘‘होतं असंच काहीतरी’’ असं म्हणून मित्र ते टाळू शकला असता पण म्हणाला, ‘‘बस. सांगतो.’’ आतल्या खोलीत चहाची ऑर्डर दिली अन् त्या वृद्धाची कहाणी मी ऐकू लागलो.

    ‘‘तर या माणसाचं वय आता ६५ असावं. दहा-बारा वर्षांपूर्वी तो आणि त्याच्या पत्नीत तणावाचं वातावरण निर्माण झालं. तणावाचं कारण होतं, विवाहबाह्य संबंध किवा अनैतिक प्रेमसंबंध.’’ मी थोडा सावरून बसलो. मित्र सांगू लागला. ‘‘आता हे बघ हे माधवराव आणि त्यांच्या शेजारचे गणपतराव एकमेकांचे चांगले मित्र. मैत्री अशी की त्यांनी फ्लॅटही एकमेकांच्या जवळच घेतले. दोन्ही कुटुंबांचं एकमेकांकडे जाणं-येणं चालू होतं. काही खाद्यपदार्थांचे नमुने एकमेकांकडे जात होते. अशाच एके दिवशी माधवरावांच्या पत्नीनं गणपतरावांना आवडतात म्हणून गुलाबजाम केले. त्यांच्या घरी आवर्जून पाठविले. झालं, इथं संशयाला पालवी फुटली. दोन कुटुंबातल्या प्रत्येक व्यवहाराचे अर्थ लावले जाऊ लागले. घरात भांडणं होऊ लागली. एकदा माधवरावांची समजूत घालायला गणपतराव आले अन् घरातलं वादळ दोन घरात पोहोचलं. हा म्हातारा त्या म्हातार्‍याला काही काही बोलला. या सगळ्याचं पर्यवसान माधवरावांच्या घटस्फोटात झालं. न्यायालयानं घर माधवरावांच्या पत्नीच्या ताब्यात दिलं. माधवरावांनी घर सोडलं; पण ती इमारत नाही सोडली. तिथंच जागा घेऊन ते राहू लागले. गणपतरावांची पत्नी अधूनमधून त्यांची विचारपूस करू लागली. पत्नीविषयी संशय घेणार्‍या मनात मित्राच्या पत्नीविषयी अवाजवी प्रेमाच्या भावना येऊ लागल्या. सध्या हे असं चाललंय...’’
    मित्रानं साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरात संपविली.
    इथं भविष्याचा काय प्रश्न येतो? माझ्या मनातला प्रश्न अखेरीस मी विचारून टाकला मित्र म्हणाला. ‘‘थांब. भविष्याचा हा प्रश्न समजावा म्हणून तर भूतकाळ सांगितला. आता हे जे वृद्ध गृहस्थ आले त्यांना भविष्यातून दोन प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. एक म्हणजे गणपतरावांच्या पत्नीचं आणि माझं लग्न होईल का? ग्रह कसे आहेत? जमेल तर केव्हा?’’ ‘‘दुसरा प्रश्न काय?’’ मी विचारता झालो. त्यावर माझा मित्र म्हणाला, ‘‘ती तर खरी गंमत आहे. मानवी स्वभावाचं वेगळेपणं सांगणारा तो प्रश्न आहे. माझ्या घटस्फोटित पत्नीचं आणि गणपतरावांचं लग्न तर होणार नाही ना? ते होऊ नये म्हणून काय करता येईल?’’ असे ते प्रश्न आहेत.
    त्या वृद्धाच्या प्रश्नाचं ते स्वरूप ऐकून मी हादरून गेलो. सहज दाराकडे पाहिलं, तो वृद्ध आपलं भविष्य जाणून घेण्यासाठी पुन्हा
    येत होता. त्याचं भवितव्य आणि माझा मित्र यांच्यात थांबण्याचा वेडेपणा मी केला नाही इतकंच.

    -- किशोर कुलकर्णी

      February 25, 2006


  • रेशीमगाठी – भाग १

    काय रे केदार, असा का बसला आहेस डोक्याला हात लावून? बरं वाटत नाही का? आणि इतका उशीर?” प्रदीपने-केदारच्या मित्राने-विचारलं. केदार म्हणजे एक उमदा, सतत हसतमुख असणारा. वेळेच्या बाबतीत काटेकोर, कामात चोख.

      March 7, 2022


  • ओळख

    गाडीने चांगलाच वेग घेतला होता. रात्रीचे नऊ वाजले होते.मीनल खिडकीशी बसून बाहेरच्या काळोखात बघत होती. रेल्वेच्या डब्याची सावली डब्यातल्या प्रकाशामुळे बाहेर जमिनीवर पडली होती व ती पण गाडीबरोबर धावत होती. मीनल आज फार खुश होती. ती चक्क हिमाचल प्रदेशात चालली होती. सिमला मनालीचे तिचे फार वर्षांचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. सोबतीला होती तिची मैत्रिणी सारखीच असलेली वहिनी, सीमा. त्यामुळे पूर्ण प्रवास खूपच आनंदात होणार यात काही शंकाच नव्हती. हसतखेळत दोघींनी नुकतच डब्यातले जेवण घेतले होते. आता झोपायची तयारी करायची होती.

      June 6, 2026


  • माझी पहिली कॅसेट

    एक गायक म्हणून संपूर्ण कॅसेट गाण्याची माझी योग्यता आहे का, हे विचारण्यासाठी शंकर वैद्यांकडे गेलो. 'ही तुझ्या आवाजातील संपूर्ण कॅसेट आतापर्यंत रिलीज व्हायला हवी होती. थोडा उशीरच झालाय असे समजून कामाला लाग,' या शब्दात त्यांनी प्रोत्साहन दिले. कॅसेटच्या खर्चाचा अंदाज घेतला. तीस ते चाळीस हजार रुपये अपेक्षित खर्च होता. भाऊंनी कर्जाऊ पैसे देण्याचे मान्य केले. हे कर्ज दीड वर्ष काम करून माझ्या पगारातून फेडले जाणार होते. कॅसेटसाठी मी सर्व काही करायला तयार होतो. संगीतकार प्रभाकर पंडितांचा कॅसेटचा अनुभव दांडगा होता. त्यांनी खूप मार्गदर्शन केले. त्यांनाच कॅसेटचे संगीतकार म्हणून काम करण्याची विनंती केली. ते नामवंत संगीतकार असल्याने त्यांचे मानधन जास्त होते. ते कमी न करता त्यांनी टप्प्याटप्प्याने स्वीकारावे अशी विनंती केली. माझ्या एक एक गोष्टी ऐकून प्रभाकरजींना आणि पंडित वहिनींना खूप मजा वाटत असे. माझ्या अचाट साहसाचे त्यांना कौतुकही वाटत असे. शिवाजी पार्क, दादरमध्ये आता माझी तीन घरे अशी होती की जेथे मी कसलीही आगाऊ सूचना न देता बिनदिक्कत जेवायला जाऊ शकत असे. पहिले घर श्रीकांत ठाकरे यांचे व दुसरे घर प्रभाकर पंडितांचे आणि तिसरे घर यशवंत देवांचे. या तीनही महान संगीतकारांनी त्यांच्या गाण्यांबरोबरच मला जे प्रेम दिले, ते मी कधीही विसरू शकणार नाही.

    'अरे, गाणी निवडली आहेस का कॅसेट करायला?' प्रभाकर पंडितांच्या शब्दांनी मी भानावर आलो. गमतीची गोष्ट ही होती की, कॅसेटच्या इतर कामांच्या नादात कॅसेटची गाणी कोणती असावीत हा विचारच मी केला नव्हता. मी त्यांनाच सल्ला विचारला. 'तुझी आणि तुझ्या कंपनीची पहिली कॅसेट विठ्ठलाच्या अभंगांची करू या.' प्रभाकर पंडितांनी सल्ला दिला. अभंगाच्या चाली बांधण्यात त्यांचा हातखंडा होता. भावनिकदृष्ट्या तर हा सल्ला बरोबरच होता, पण व्यावहारिकदृष्ट्याही तो योग्य होता. कारण विठ्ठलाच्या अभंगांची कॅसेट सीझनल नसते, ती बाराही महिने विकली जाते. ताबडतोब काही अभंग निवडून आम्ही रिहल्सलला सुरुवात केली. वरळीचा सिस्टीम रेकॉर्डिंग स्टुडिओ आम्ही निवडला. या रेकॉर्डिंगच्या निमित्ताने एका अद्ययावत स्टुडिओच्या हाय डेफिनेशन माईकसमोर गाण्याची अग्नीपरीक्षा मला द्यायची होती. एरवीचे गाणे आणि या माईकसमोर गाणे यात जमीन अस्मानचे अंतर असते. तुमच्या गाण्यातील छोट्यातील छोटा दोषही हा माईक अचूक पकडतो. या स्टुडिओचे नामवंत रेकॉर्डिस्ट प्रमोद घैसास यांनी मनापासून मला याबाबतीत मार्गदर्शन केले. त्याबद्दल मी त्यांचा कायम ऋणी राहीन. या रेकॉर्डिंग दरम्यान प्रमोद आणि मी चांगले मित्र बनलो. त्यानंतर माझ्या अनेक गाण्यांचे रेकॉर्डिंग प्रमोद घैसास यांनी केले. अनेक कार्यक्रमांसाठीही त्यांची साथ लाभली. आमची मैत्री आजही अतूट आहे.

    १२ जानेवारी १९८७ रोजी सकाळी ठीक दहा वाजता माझे गुरु श्रीकांत ठाकरे यांनी आशीर्वाद देऊन रेकॉर्डिंगचा शुभारंभ केला आणि रेकॉर्डिंगला सुरुवात झाली. सकाळी दहाला सुरू झालेले रेकॉर्डिंग रात्री दहा वाजता संपले. त्या एकाच दिवसात मी आठही अभंग गायले. काम कठीण होते, पण रेकॉर्डिंगचा खर्च कमी करण्यासाठी ते आवश्यक होते. एका दिवशी दोनच गाणी अशी चैन मला परवडणारी नव्हती. दुसऱ्या दिवशी सकाळीच प्रभाकर पंडित आणि प्रमोद घैसास यांनी ट्रॅक मिक्स करून मास्टर तयार केला. त्यावेळी मास्टर स्पूलवर म्हणजे मोठ्या टेपवर होत असे. मग कॅसेटवर एक कॉपी घेऊन मी घरी आलो. आई-भाऊंबरोबर संपूर्ण कॅसेट ऐकली. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. चार महिन्यांच्या अथक श्रमानंतर मलाही समाधान लाभले. यानंतर या कॅसेटचे कलात्मक मूल्यमापन टीकाकार आणि जाणकार रसिक करणार होतेच. पण ही संपूर्ण कॅसेट गाण्याची अवघड कामगिरी मी पूर्ण केली होती. आता कॅसेटचे कव्हर आणि त्याच्या कॉपीज करण्याचे काम होते. माझा आर्टिस्ट मित्र मिलिंद मोकाशी याने सुंदर कव्हर तयार केले. पण कॅसेट अॅसेम्बल करण्याचा खर्च मात्र माझ्या कॉपीज संख्येने कमी असल्याने फार वाटत होता. “अरे, तू स्वतः इंजिनीयर आहेस. कॅसेट अॅसेंब्लिंग तुला स्वतःलाच नाही का करता येणार?" भाऊंनी त्यांच्या पद्धतीप्रमाणे नवा चॅलेंज टाकला. मी स्वीकारला. मुंबईला लॅमिंग्टन रोडला जाऊन मी कॅसेट अॅसेंब्लिंगचा पंधरा दिवसांचा कोर्स केला. नंतर आमच्या काही कामगारांना ट्रेनिंग दिले. कॅसेटचे सर्व पार्टस् बाजारातून विकत आणले आणि स्वर-मंचच्या पहिल्या कॅसेटच्या पाचशे कॉपीज तयार केल्या. लवकरच ४ फेब्रुवारी १९८७ या दिवशी कॅसेटचा प्रकाशन समारंभ आयोजित केला.

    'गाऊ विठोबाचे नाम' या माझ्या पहिल्या संपूर्ण कॅसेटचे प्रकाशन माझे गुरू पं. विनायकराव काळे यांच्या हस्ते झाले. ख्यातनाम साहित्यिक वि. आ. बुवा कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. माझ्या शाळेचे मुख्याध्यापक अशोक चिटणीससर विशेष निमंत्रित होते. त्यांनी अतिशय परिणामकारक भाषण केले. आजही ते माझ्या स्मरणात आहे. कॅसेटमधील निवडक अभंगांचे मी गायन केले. कॅसेट निर्मितीच्या धडपडीत मनापासून सर्व प्रकारे मला मदत करणारा माझा जवळचा मित्र महेश वर्दे याने पहिली कॉपी विकत घेतली आणि नवीन कॅसेटच्या विक्रीला प्रारंभ झाला. मी माझी पहिली कॅसेट प्रकाशित झाल्यामुळे अतिशय आनंदात होतो पण या कॅसेटविक्रीचे काम किती कठीण असणार आहे, याची पुसटशी कल्पनादेखील मला नव्हती.

    - अनिरुद्ध जोशी

      July 10, 2022


  • नारदमुनींची महाराष्ट्रभेट

    नारदमुनी म्हणजे आद्यपत्रकार ! पंचमहाभूतांमधील बातम्या मिळवून वर्तमान गरजेप्रमाणे त्या-त्या देवाच्या कानावर घालायची अलिखीत जबाबदारी त्यांच्यावर. कधी ब्रह्मा, विष्णू तर कधी महादेव, इंद्र… त्या-त्या देवाच्या दरबारात कळ लावली की पुढचे रामायण कसे सोपे जायचे.

      February 15, 2024


  • गोल्ड’स्पाॅट’

    सदुसष्ट वर्षांच्या या जीवन प्रवासात प्रसंगी पुण्यातील फुटपाथवर झोपलेला हा माणूस अमेरिकेत जाऊ शकतो हे कुणाला सांगितलं तर, खरं वाटेल का? जर माणसाच्या अंगी जिद्द, चिकाटी, कठोर परिश्रम करण्याची तयारी, दृढ आत्मविश्वास आणि जिवलग मित्रांचा सहवास असेल तर सर्व काही शक्य आहे.

      October 30, 2021


  • खलनायक? नव्हे ‘नायक’!

    शाही सोहळ्यासाठी मिलिंद गुणाजीने चाळीस लाख रुपये खर्च करुन, आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांना रोजगार मिळवून दिला. मुंबईहून आलेल्या वऱ्हाडी मंडळी व खास पाहुण्यांची चोख व्यवस्था ठेवून इतरांसाठी एक आदर्श घालून दिला..

      February 6, 2022


  • नानाऽ करते

    विजया मेहतांच्या ‘हमीदाबाईची कोठी’ या व्यावसायिक नाटकात त्याने सत्तारची भूमिका साकारली तर ‘पुरुष’ या नाटकात, गुलाबराव साकारला.. ‘पुरुष’ नाटक सादर करताना काही अतिउत्साही प्रेक्षक नानाचेच संवाद ऐकण्यासाठी इतर कलाकारांच्या सादरीकरणाचे वेळी थिएटरमध्ये गोंधळ घालायचे, अशावेळी तो व्यथित होत असे.

      January 19, 2022


  • माझ्या मातीचे गायन !

    १९९६ साली माझ्या पत्नीचा दुसरा काव्यसंग्रह ” वाटेवरच्या कविता ” प्रकाशित करण्याचा विचार पुण्यातील नीहारा प्रकाशनाच्या सौ. स्नेहसुधा कुळकर्णी यांनी बोलून दाखविला. मुखपृष्ठाची संकल्पना आमच्या गणपतीपुळे ट्रीपच्या बागेतील एका छायाचित्रावरून सुचली. प्रस्तावनेसाठी सुधीर मोघेंशी संपर्क साधला आणि काहीशा झटापटीनंतर ती मिळाली. (वो कहानी फिर कभी !) प्रश्न उरला – आशीर्वादाचा! यासाठी साहित्य सृष्टीतील आजोबा ” कुसुमाग्रज ” यांच्यापेक्षा अधिक समर्थ व्यक्ती कोण असू शकेल?

      June 5, 2021


  • गणेशछाया

    संध्याकाळी गणेश त्या पत्यावर पोहोचला. त्यानं त्या टुमदार बंगल्याच्या दारावरची बेल वाजवली. सकाळच्या त्याच मुलीने दरवाजा उघडला व वडिलांना तिने ‘दादा, आलाय..’ असं सांगितलं.

      September 18, 2021