नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
“का,सत्य कटू असतं म्हणून? ती घटना एक भास नसून विनाशकाली शक्तिने आपलं दाखवलेलं अस्तित्व आहे. कंपनीतील इतरांचा अनुभव तू चेष्टेवरी नेतो आहेस,पण त्यातही तथ्य आहे! मेलेल्या पंढरीचं भूत झालयं असं मला म्हणायचं नाही, पण ती जागा घातक झालेय!”
सुखा मागूनी येते दुःख, दुःखा मागूनी सुख असं असतंच.
बरीच गाणी अशी असतात जी चित्रपट क्षेत्रातील अनेक कलावंताशी जोडली जातात. अंदाज मधील “जिंदगी एक सफर है सुहाना….यहाँ कल क्या हो किसने जाना…” असे हसरत लिहून गेले( या गाण्याने हसरत यानां दुसरा फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला) आणि संगीतकार जयकिशन आपली शेवटची चाल बांधून निघून गेले. “जाने कहाँ गए वो दिन….’’ हे त्यांचे गाणे आजही अंगावर काटा उभे करते व राज कपूरचा प्रचंड केविलवाणा चेहरा डोळ्या समोर तरळू लागतो. “झनक झनक तोरी बाजे पायलिया” चे सूर कानी पडताच राजकुमारचा दु:खमग्न चेहरा आठवतो. या गाण्यासाठी हसरत यानां डॉ. आंबेडकर पुरस्कार मिळाला होता. वर्ल्ड युनिव्हरसिटी राऊंडने त्यानां डॉक्टरेट बहाल केली होती.
अमर , अकबर आणि अन्थोनी एकमेकांना खूप दिवसांनंतर भेटले होते. बालपणीच्या एक एक आठवणी एकमेकांना सांगता सांगता विषय विज्ञानाकडे केंव्हा झुकला हे कुणाच्याच लक्षात आले नाही. मग विज्ञान आणि कुराण असा विषय निघाला. आजचे जग… विज्ञानाने केलेली प्रगती…, संगणक युग इथून सुरू झालेला विषय गप्पात चांगलाच रंग भरत होता. त्यात अमरने भर घातली. अलीकडील काळात तो पवित्र कुराणाच्या अभ्यासात जरा जास्तच रस घेऊ लागला होता. त्याने सांगितले ……….
“आई आता बास झालं हं तुमचं, चांगुलपणा शोधणं! प्रत्येक गोष्टीत चांगुलपणा पाहावा, चांगुलपणा शोधावा हे ऐकून ऐकून आम्ही कंटाळलो. आयुष्यभर चांगुलपणा शोधून तुम्हाला मिळालं काय, ते तरी कळू दे.” वृंदा चिडून चिडून बोलत होती आणि तितक्याच थंडगारपणाने त्यांनी उत्तर दिलं, “तुझ्यासारखी सून मिळाली.”
“सकाळ ” उघडला आणि आनंददायी वृत्त वाचले – ” अमेरिकन कवयित्रीला साहित्याचे नोबेल पारितोषिक ! ” चक्क काव्य या साहित्य प्रकाराला सर्वोच्च सन्मान !
Copyright © 2025 | Marathisrushti