नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
परमेश्वराचं अस्तित्व हा सातत्यानं चर्चिला जाणारा विषय. कोणी ते सहजी मान्य करतात, तर कोणी बिलकूल नाही. प्रत्येकाला आपली बाजू मांडण्यासाठी भरपूर उदाहरणं असतात. काही विज्ञानावर सिद्ध करता येतात, तर काही विज्ञानासाठीही गूढ. नेमकं काय असावं? विचार करायला लागलो, की प्रश्नांची भेंडोळी पुढे सरकत राहतात अन् उत्तरं... उत्तरं सापडली तर मग प्रश्नाचं अस्तित्व राहिलं असं कसं म्हणता येईल? अशीच काही प्रश्नांची भेंडोळी घेऊन मी एकदा माझ्या आध्यात्मिक गुरूंच्या भेटीला गेलो. चार-पाच वर्षे झाली त्याला. अम्मा-भगवान या नावानं जगात सर्वदूर त्यांना ओळखलं जातं. आमची भेट झाली. चेन्नईपासून शंभरएक किलोमीटरवर असलेल्या वरदेपालयम येथील त्यांच्या आश्रमात. सध्या तिथं वननेस विद्यापीठ साकार झालंय... तर आमची भेट झाली अन् सर्वप्रथम मी सांगितलं की, भगवान परमेश्वर खरोखर आहे का? तो दिसतो का? जाणवतो का? माझा एक मित्र तर म्हणतो, ``परमेश्वर वगैरे झूठ आहे. मीच भगवान आहे.'' भगवान म्हणाले, ``परमेश्वर आहे. तो जाणवतो, तो दिसतो हे जेवढं खरं आहे. तेवढंच तुमचा मित्र भगवान आहे हेही खरं. आता हे पाहा रस्त्याच्या कडेला तुम्ही उभे आहात. वाहतूक सुरू आहे. अचानक एक वाहन अतिवेगाने तुमच्याकडे येताना दिसतंय. त्या वाहनचालकाचा वाहनावरचा ताबा सुटलाय. कोणत्याही क्षणी तुम्ही त्याखाली सापडणार आहात. पळण्याचं त्राण नाही. तेवढा अवधीही नाही. आता केवळ जे होईल त्याचा स्वीकार करणं एवढंच हाती आहे. त्याला पर्यायही नाही. आपलं मरण आपल्याच डोळ्यांनी पाहावं असा हा प्रसंग... अन् अगदी क्षणात एक हात पुढे येतो. तुम्हाला धक्का देतो. तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळता. त्याचवेळी ते वाहनही भेलकडत तुमच्या पुढे जाऊन खड्ड्यात कोसळतं. तुम्हाला फारतर खरचटलं आहे. तुम्ही जिवंत आहात. कोणी धक्का दिला तुम्हाला? तुम्ही पाहाता. एक खेडूत. अशिक्षित. तो तुम्हाला सावरायला पुढे येत असतो. तुम्ही म्हणता, अगदी देवासारखा आलास. तुझ्यामुळं आज मी जिवंत आहे. हा जो खेडूत आहे तो घटनेपूर्वीही तुमच्या आसपासच होता; पण त्याच्याकडे तुमचं लक्ष गेलेलं नव्हतं. त्याचं अस्तित्व जाणवलेलं नव्हतं. आता ते जाणवलेलं आहे. तो देवासारखा आला, असं म्हणतो आपण, पण तो तर खरा परमेश्वरच! त्याला ओळखण्याची दृष्टी हवी. मनाच्या गाभाऱयात कृतज्ञता हवी. खरंतर तो परमेश्वर सततच तुमच्यासोबत असतो. तुम्ही श्वास घेता म्हणजे काय करता? आपण श्वासोच्छ्वास घेतो याची जाणीवही नसते. आपल्याला क्षणोक्षणी जिवंत ठेवणाऱया त्या परमेश्वराचं अस्तित्व मान्य करण्याची वृत्तीही नसते. तेवढा कृतज्ञभावही नसतो; पण जेव्हा तुमचं नाक-तोंड दाबलं जातं किंवा तुमची घुसमट होते तेव्हा परमेश्वराची आठवण येते.''
भगवानांनी परमेश्वरी अस्तित्वाचं निरूपण साध्या-सोप्या शब्दात केलं. त्यावेळी ते पटलंही; पण या भेटीनंतरही तो प्रश्न मनातून हद्दपार झाला असं नव्हे. कारण हे सारं प्रत्यक्षात कसं आणायचं? प्रश्न सुटत नव्हता. सहा महिन्यांपूर्वी पुण्यात डॉ. विजय सावंत यांना भेटायला गेलो. महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनचे ते कार्यकारी संचालक आहेत. ज्येष्ठ संगणकतज्ञ विजय भटकर यांच्यासमवेत त्यांनी या क्षेत्रात मोलाचं कामही केलंय. डॉ. सावंत यांच्याशी चर्चा सुरू होती. वेगवेगळे विषय येत होते अन् अधूनमधून त्यांचे फोनही सुरू होते. एक फोन आला. बहुधा राजकीय क्षेत्रातल्या एखाद्या प्रभावी व्यक्तीचा असावा. या संवादात पलीकडचा माणसू काय बोलतोय हे कळत नव्हतं; पण त्याचा अंदाज बांधता येत होता. तो सांगत होता, ``उद्या मी त्या उमेदवाराला तुमची भेट घ्यायला सांगतो. त्याला वेळ द्या. समजावून घ्या. तुम्हाला रोज अनेक लोक भेटत असतील; पण त्याला इतर अनेकांप्रमाणं समजू नका. कारण मी त्याला पाठवतोय... वगैरे!'' या संवादातलं....विजय सावंत यांचं उत्तर, विवेचन मात्र मी ऐकू शकत होतो. ते म्हणाले, ``अवश्य पाठवा. मी भेटेन त्याला. काय हवी ती मदतही करीन. तुम्ही काळजी करू नका... हो! हो!! रोज अक्षरश शंभर-दोनशे लोकांना मी भेटतो हे खरंय; पण मला भेटणारा प्रत्येकजण परमेश्वराचाच अवतार आहे या भावनेनं मी त्यांना भेटतो. त्यामुळं माझ्या दृष्टीनं इतर असं कोणीच नसतं. तुम्ही सांगा त्यांना - मी भेटेन.'
आपल्याला भेटणारा प्रत्येक माणूस हा परमेश्वराचा अवतारच आहे, अशा भावनेनं रोज शेकडो लोकांना भेटणं ही भावनाच मला अंतर्मुख करून गेली. सकारात्मकता म्हणजे यापेक्षा वेगळी काय असते? व्यावसायिक अभ्यासक्रम असो, की तणावनिर्मूलन की व्यक्तिमत्त्वविकास या साऱयात सकारात्मकता सांगितली जातेच ना? काही लोक त्याला परमेश्वर म्हणत असावेत. आपल्या भोवताली स्वार्थ, इर्षा, असूया काही कमी नाही; पण त्यातला परमेश्वर पाहायला हवा. दृष्टी जोपासायला हवी. मग त्याला परमेश्वरी अंश म्हणा किंवा तुम्ही जोपासलेली सकारात्मकता...
-- किशोर कुलकर्णी
February 17, 2006
…. आणि हे आडनांव ज्येष्ठ भगिनीचे वादळ मला गिरकावून गेलं. तिची यच्चयावत पुस्तके (अगदी शेवटचे “विंचुर्णीचे धडे”) मिळवून/विकत घेऊन वाचली आणि संग्रही ठेवली. “एकेक पान गळावया” हरवलं तर नवं घेतलं.
November 28, 2021

निशा, 22 वर्षाची, गहूवर्णाची, कुरळ्या केसांची, रेखीव बांधा, हसरा चेहेरा, डोळ्यावर चष्मा असलेली, थोडीशी मितभाषी मुलगी, घरातून बाहेर पडण्यासाठी आवरत होती. तिनं लाल रंगाचा टॉप, निळ्या रंगाची जीन्स घातली होती. त्यावर लेमन कलरचा, फुलांची सुंदर प्रिंट असलेला मोठ्ठा स्टोल घेतला होता. तिची सॅक तिनं पाठीवर अडकवली होती. तिच्या स्कूटरची चावी तिला मिळत नव्हती त्यामुळे तिची गडबड चालली होती. तिची चावी ठेवण्याची नेहमीची सगळी ठिकाणं शोधून झाल्यावर तिनं आईला आवाज दिला…
April 1, 2020
आतां विश्वात्मकें देवें । येणे वागयज्ञें तोषावें ।
तोषोनि मज द्यावें । पसायदान हें ।।
जे खळांची व्यंकटी सांडो ।
तया सत्कर्मी रति वाढो ।
भूतां परस्परें जडो । मैत्र जीवाचें ।।
दुरितांचे तिमिर जावो । विश्व स्वधर्मसूर्ये पाहो ।
जो जें बांडील तो तें लाहो । प्राणिजात ।।
वर्षते सकळमंगळीं । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळीं । भेटतु भूतां ।।
चलां कल्पतरुंचे आरव । चेतना चिंतामणींचें गांव ।
बोलते जे अर्णव । पीयूषाचे ।।
चंद्रमे जे अलांछन । मार्तण्ड जे तापहीन ।
ते सर्वांही सदा सज्जन । सोयरे होतु ।।
किंबहुना सर्वसुखीं । पूर्ण होऊनि तिहीं लोकीं ।
भजिजो आदिपुरुखीं । अखण्डित ।।
आणि ग्रंथोपजीविये । विशेषीं लोकीं इये ।
दृष्टादृष्ट विजयें । होआवें जी ।।
येथ म्हणे विश्वेश्वरावो । हां, होईल दान पसावो ।
येणें बरें ज्ञानदेवो । सुखिया जाला ।।
June 11, 2026
सूर्य म्हणजेच रवी, हा स्वयंप्रकाशी व तेजस्वी ग्रह आहे. तारांगणातील माझ्यासारखे असंख्य ग्रह, हे चंद्रासारखे परप्रकाशी आहेत. अशा रवीचे थोडे जरी प्रकाशकिरण ज्याच्या अंगावर पडले, तो धन्य झाला. मी ही असाच एक.
June 26, 2022
एका शाळेमध्ये एकं शिक्षिका आपल्या वर्गातल्या मुलांना जगातील सात आश्चर्ये काय आहेत ते लिहायला सांगते. सगळी मुले बहुतांशाने अशी यादी बनवतात.
१. ग्रँड कॅनियन
२. ग्रेट वॉल ऑफ चायना
३. पनामा कॅनाल
४. ताज महाल
५. एम्पायर स्टेट बिल्डींग
६. पिरामिडस ऑफ इजिप्त
७. सेंट पिटर्स बॅसिलिका
सगळ्या मुलांच्या वह्या तपासून झाल्यावर शिक्षिकेच्या लक्षात येते की त्यातल्या एका मुलीने अजून आपली वही सादर केलेली नाही. ती त्या मुलीकडे बघते. ती मुलगी अजूनही मनापासून आपल्या वहीत काहीतरी लिहित असते.
शिक्षिका तिला विचारते "तुझे काही अडले आहे काय? तुला मदत हवी असेल तर मी करते.” शिक्षिकेला वाटते की हिला सगळी सात नावे आठवत नसतील. ती मुलगी लाजरी असते. ती मानेनेच नकार देत म्हणते "या जगात एवढी आश्चर्ये आहेत की मी सातच नावे लिहून त्यात सगळ्यांना कशी सामावणार? ”शिक्षिका तिला म्हणते “ जे लिहिले आहे ते मला दाखव. वाचूनच दाखव. इतरांनाही कळू दे तू काय विचार केला आहेस."
मुलगी वाचू लागते.
१. स्पर्श
२. श्रवणशक्ती
३. दृष्टी
४. सुगंध घेण्याची शक्ती
५. चव घेण्याची शक्ती
६. हसण्याची कला
७. प्रेमाची शक्ती
तिची यादी ऐकून शिक्षिकेसहित सगळी मुले स्तब्ध होतात. विचार केलेला नसतो की ही सुध्दा जगातली आश्चर्येच आहेत. शिक्षिकेला त्या मुलीच्या विचारांचे आणि बुध्दीचे कौतुक वाटते. ती अचानक टाळ्या वाजवू लागते. तिच्या पाठोपाठ वर्गातली सगळी मुले उभी राहून टाळ्या वाजवू लागतात. प्रथम त्या मुलीला वाटते आपले काही चुकले की काय. परंतु सर्वांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ती लाजते. शिक्षिका हळूहळू चालत तिच्या जवळ येते आणि तिला घट्ट मिठी मारते.
पुस्तकात जे लिहिले नाही आणि जे त्यातल्या ज्ञानापलीकडले आहे त्याची जाणीव या लाजऱ्या मुलीने सर्वांना करुन दिलेली असते. शिक्षिकेचे डोळे आनंदाश्रुंनी भरुन येतात.
खरोखर आपण सुध्दा या आश्चर्यांचा कधी विचार करतच नाही. आपण सगळे काही गृहित धरतो. आयुष्याला सुध्दा आणि या छोट्या छोट्या चमत्कारांना सुध्दा. ज्यांच्या. जवळ यातली एक जरी शक्ती नसते त्यांना आयुष्यभर किती गोष्टींना वंचित रहावे लागते याची आपण साधी कल्पनाही करु शकत नाही. पाच इंद्रियांखेरीज आपल्या जवळ असीम प्रेम करायची जी शक्ती आहे त्याचाही आपण विचार करत नाही अथवा ती योग्य तऱ्हेने वापरतही नाही.
त्या लहान मुलीच्या विचाराने आपणही थोडे अंतर्मुख व्हायला हरकत नाही. आपण जेवढा याचा विचार करू तेवढे आपण विस्मयचकीत होऊन जाऊ. जीवनातला आनंद आणि जीवनाची किंमत दोन्ही आपल्याला कळेल यात शंकाच नाही.
-- नीला सत्यनारायण
अनघा प्रकाशनच्या मैत्र या लेखसंग्रहातील हा लेख. हे पुस्तक मार्च २०१७ मध्ये प्रकाशित झाले.
June 28, 2024
” हे परमेश्वरा काय चालले आहे हे तुझ्या राज्यात ? ” बघ किती माणसे दगावलीत, त्या दुष्ट स्वाईन फ्लूच्या विषाणूमुळे. ? काय बिचाऱ्यांचा दोष? तू तर ह्या जगाचा कर्ता करविता. ही तर क्षुलक बाब तुझ्यासाठी. कर ह्यावर काहीतरी उपाय. दे त्यांना आशिर्वाद.”
January 28, 2019
गेल्या पंधरा दिवसांपासून कावेरी ताईंची पळापळ सुरु होती. मागच्याच आठवड्यात भर दुपारी उन्हातान्हात बाजारात फिरून फिरून खणाचे परकर पोलक्याचे कापड आणले होते. तसे ते त्यांच्या मनासारखे मिळाले नव्हतेच, पण काही तरी मिळाले याचा त्यांना आनंद झाला होता
November 25, 2025

विजय टी .व्ही. वर मालिका पाहत असताना विजयच्या लक्षात आले की या मालिकातून रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीणही बहिणीला राखी बंधू शकते आणि बहीणही बहिणीचे रक्षण करू शकते हा विचार पुढे आणण्याचा प्रयत्न होताना दिसला. प्रथमदर्शनी विचार करता राक्षबांधन हा फक्त भावा- बहिणीचा सण आहे पण सध्याची सामाजिक परिस्थिती पाहता आणि विभक्त कुटुंब पद्धती पाहता अशी परिस्थिती निर्माण होऊच शकते ज्या घरात भाऊ नसतील फक्त बहिणी असतील तर त्यांनी ओढून ताणून कोणाला भाऊ करण्यापेक्षा विजयला हे बहिणीने बहिणीला राखी बांधून तिला तिचे रक्षण करण्याचे वचन देणे हा एक उत्तम पायंडा ठरू शकतो असे वाटते. आणि तसेही आज स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत कशातही मागे नाहीत. त्यामुळे त्या त्यांच्या बहिणीचे रक्षण करूच शकतात. यात पुरुषांना कमीपणा वाटण्याचेही काही कारण नाही… आज कित्येक भाऊ राक्षबंधनाला बहिणीचे रक्षण करण्याचे वचन देत असले तरी कित्येकदा संकट समयी बहिणीही भावाचे रक्षण करतात की ! विजय आपल्या लहान बहिणीच्या बाबतीत पूर्वीपासूनच खूप हळवा होता..
September 3, 2022
ही कथा आहे एका अभ्यासू व संस्कारक्षम मुलाच्या धडपडीची . जिद्दीची आणि परिश्रमपूर्वक यश मिळवणाऱ्या बालकाची . एका छोटया गावाच्या विकासासाठी धडपडणाऱ्या गुरुजींची . ज्यांनी नवी पिढी घडविण्याचा वसा घेतला आहे.
January 15, 2019
Copyright © 2025 | Marathisrushti