नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
कार्यक्रमांसाठी मी थोड्या वेगळ्या वाटेने जायचे ठरवले आणि तशी संधीही मला लवकरच मिळाली. सरकारतर्फे एक निवेदन टाईम्स ऑफ इंडियामध्ये आले होते. हे निवेदन मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि डिपार्टमेंट ऑफ कल्चरतर्फे छापले होते. नॅशनल इंटिग्रेशन थ्रू म्युझिक अॅन्ड डान्स या विभागात समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता अशी शिकवण देणारे संगीत व नृत्याचे प्रोजेक्टस् मागवले होते. त्यांचे कार्यक्रम छोट्या शहरातून व गावातून सरकारतर्फे केले जाणार होते.
प्रयोगशील पंडीत सत्यशील देशपांडे यांची ” माझा कट्टा ” वरील अफाट, आश्चर्यकारक मुलाखत पाहिली आणि त्यांत उल्लेखिलेले “गान गुणगान ” हे त्यांचे पुस्तक ( त्यांतील खास वैशिष्ट्यामुळे) लगेच विकत घ्यायचे ठरविले.
उन्हाळ्याची सुट्टी असल्याने प्रणय आणि प्रगती काकांकडे गावी आले होते . रात्री जेवण झाल्यावर प्रणय, प्रगती व काकांची मुलं घराच्या अंगणात घोंगडीवर गप्पा मारत बसायची . तेव्हा त्यांचे विजूकाका त्यांना विज्ञानाच्या छान छान गमती जमतीच्या गोष्टी सांगायचे . मुलांना खूप मजा वाटायची .

खरे तर मी तिला दरोरोज पहातो. ती कोण आहे हे पण मला माहित आहे . पण बोलण्याची कधी वेळच आली नाही.दुकानात सुट्टे पैसे नव्हते .
मी जेमतेम पाच वर्षांचा होतो. शेजारपाजारच्या काकू, आजी, आत्या म्हणायच्या, ‘या वक्ताला पोर्गी होऊ दे मंजी शिवा ले राखी बांधाले भन भेटल.’ मलाही ते ऐकून वाटायचं की आपल्या घरात लहान बाळ आलं की किती मज्जा येईल. मला ती राखी बांधेल, भाऊबीजेला ओवाळेल, असा विचार मनात आला की सतत आईभोवती फिरायचो.
रात्री पडल्या पडल्या सहज विचार केला चित्रपटासाठी एखादी कथा लिहावी आणि कथा लिहुन पण टाकली. माझी कथा कोणी स्विकारण शक्यच नव्हत तरी पण एक तुक्का लावला. मला तर वाटतय काहीशे कथातुन माझी कथा लकी ड्राँ’ पद्धतीनी काढली गेली असावी!
तितली उडी..’ हे गाणं वैजयंतीमालावर चित्रीत केलेलं होतं. त्या वर्षीचा फिल्मफेअर पुरस्कार पहिल्यांदाच महंमद रफी यांच्या ‘बहारों फुल बरसाओं..’ व ‘तितली उडी..’ या शारदा अय्यंगारच्या गाण्याला असा दोघांनाही मिळाला!!
विजया मेहतांच्या ‘हमीदाबाईची कोठी’ या व्यावसायिक नाटकात त्याने सत्तारची भूमिका साकारली तर ‘पुरुष’ या नाटकात, गुलाबराव साकारला.. ‘पुरुष’ नाटक सादर करताना काही अतिउत्साही प्रेक्षक नानाचेच संवाद ऐकण्यासाठी इतर कलाकारांच्या सादरीकरणाचे वेळी थिएटरमध्ये गोंधळ घालायचे, अशावेळी तो व्यथित होत असे.
जीवनाच्या रगाड्यातून-
भारत हा देश अनेक कारणांसाठी प्रसिद्ध आहे. याच भूमीचा आदर अनेक कवी-लेखक-विचारवंतांनी आपल्या रसाळ व देखण्या शैलीतून केला आहे . याच भारतभूमीचे वर्णन करताना राजिंदर कृष्णन आपल्या सुप्रसिद्ध गाण्यात म्हणतात,
Copyright © 2025 | Marathisrushti