नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
पावसाळ्यातल्या एका संध्याकाळी तो निवांत बाल्कनीतल्या खुर्चीत बसला होता.. पाऊसही सगळ्या परिसीमा ओलांडून बरसत होता.. अगदी त्या रात्री सारखाच !!…त्यामुळे तो जुना प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहणं सहाजिकंच होतं …
माझी राहूची महादशा संपली आणि गुरुची महादशा सुरू झाली. आणि अचानक माझ्यातील भोगी माणूस अदृश्य झाला.
रुद्राने आपल्या फ्लॅटवरून एक नजर फिरवली. सर्व आवश्यक वस्तू त्याने पॅक करून एका छोट्याश्या बॅग मध्ये भरून घेतल्या होत्या. रात्रभर खपून त्याने त्या बुटक्याच्या उशीच्या अभ्र्यात लपवलेला स्पाय कॅमेरा आणि रेकॉर्डिंग डिवाइस हस्तगत केले होते. त्याची कॉपी नसेलतर खुनाचा कसलाच पुरावा कोणालाच मिळणार नव्हता! त्याचे आणि बुटक्या टकल्याचे कनेक्शन राघवच्या हाती लागण्याची एक अंधुक शक्यता होतीच! बुटक्याच्या बॉडी बरोबर जर त्याचा मोबाईल हाती लागलातर, राघव कॉल हिस्ट्रीवरून रुद्रापर्यंत पोहचू शकत होता! काल स्पाय कॅमेऱ्या सोबत दोन लाखाची रोकड हि मिळाली होती! मुंबईत थांबणे धोकादायक होते. सारासार विचार करून रुद्राने रत्नागिरीचे तिकीट तत्काल मध्ये बुक केले होते.
मनोहर ‘पंजाब ढाब्या’च्या मागच्या लॉनवर आला, तेव्हा जसवंत अधीरतेने एका कोपऱ्यातल्या टेबल जवळ उभा असलेला दिसला. मनोहरने आसपासचे निरीक्षण केले. लॉनवर फारशी गर्दी नव्हती. बहुतेक सुटे सुटे टेबल होते. जसवंतच्या टेबलच्या आसपास कोणी नव्हते. दूर एक मुसलमान आपल्या मुलासोबत काहीतरी खाण्यात दंग होता. मनोहर निश्चित मनाने जसवंतच्या टेबलवर जाऊन समोर बसला.
“जसवंत, राघवला तुझा संशय आला आहे! कारण सापडलेल्या पुराव्या नुसार समभाव्य खून्याचे वर्णन तुझ्याशी तंतोतंत जुळतंय म्हणे!”
” येऊ दे मला पकडायला! मी तयार आहे! तो आला तर मी सांगेन कि खुनाच्या रात्री तू आऊट हाऊस मध्ये गेला होतास!”
” तू पेपर वाचत नाहीस का? आजच्याच पेपरमध्ये संतुकरावांचा खून साडे दहा ते साडे अकराच्या दरम्यान झालाय! अन त्या पूर्वीच मी निघून गेल्याचे तू पहिले आहेस. “
जरी त्या राज्यातील निवडणूक असली तरी अखेर जगातील मोठ्या लोकशाहीचा महायज्ञ होता तो. त्यामुळे त्या इतमामात तो साजरा होण्याची काळजी घ्यायलाच हवी होती. पण नारायण भंडारी बावचळला होता. अस्वस्थ झाला होता .

पुण्यात गरवारे कॉलेजमध्ये एफवाय बीए करणाऱ्या सोनालीला ट्रेकिंगचे वेड होते, पण आई बाबांचा तिच्या या छंदाला सक्त विरोध होता. मनिष आणि जयश्री या सुखवस्तू दांपत्याची ती एकुलती एक मुलगी. इतर मुलांसारखं तिने यूपीएससी करावं किंवा एनडीएची परीक्षा द्यावी अशी त्यांची इच्छा होती आणि त्यासाठी ते भरपूर खर्चही करायला तयार होते.
सोनालीचे सगळे मित्र पाचवीपासूनच बिझी झाले होते, कुणी आयआयटीची कसून तयारी करीत होता तर कुणी एम्स आणि मेडिकल साठी झटत होता. यशने तर सीएचा अभ्यास अकरावीपासूनच सुरू केला होता, त्याला लवकरात लवकर त्याचे सीए संपवून लॉ सुद्धा करायचे होते. तोरलचं लग्नं कुठल्यातरी बिझनेसमन फॅमिलीमध्येच करायचे असे घरून नक्की झालेले होते त्यामुळे तिने एमबीए एंट्रन्स कॅट इत्यादींची तयारी सुरू केली होती.
सोनालीला तिची फिरण्याची उर्मी स्वस्थ बसू देत नव्हती, तिच्या आवडीचं काहीच तिला तिच्या अभ्यासक्रमात सापडलं नव्हतं. तिला मराठी इंग्रजीमध्ये रस होता, पण नुसतीच भाषा शिकणं कोणत्याच प्रोफेशनल कोर्सला पुरेसं नव्हतं. तिच्या आवडी निवडीला साजेसा कोणताच विषय तिला अभ्यासक्रमात सापडत नव्हता. सोनाली हा आई वडिलांच्या डोक्याला ताप झालेला होता, तिचं वागणं त्यांच्या सोसायटीतल्या नात्यातल्या ओवी संदेश सुरभी नेहा प्रीतम या सगळ्यांपेक्षा खूपच वेगळं होतं आणि अभ्यासातही सगळाच आनंद होता.
एकदा आई वडिलांना न कळवताच ती एका ग्रुप बरोबर साठवलेले पैसे भरून राजगड ट्रेकला गेली. ती त्या ग्रुपलीडरच्या मागे नकळत चाललेली होती, पण तिचे खरे लक्ष इकडच्या वाटेने जाऊन बघ, तिकडच्या दरीत डोकावून बघ, पलीकडे उतरून पहा, झाडाच्या फांद्यांना लटक, खोडांच्या बेचक्यात उभं राहून फोटो काढ असेच होते. तिथे तिला गावातला शंभू भेटला. शंभू फारसा शिकलेला नसला तरीही त्याला जंगलांची बऱ्यापैकी माहिती होती. कोणती फुलं पावसाळ्यात येतात, उन्हाळ्यात कोणत्या गवताला मोठं मोठे तुरे फुटतात, कोतवलाची घरटी काटे सावरीवर का असतात? अशा त्याच्या कडून मिळालेल्या माहितीमुळे ती खूपच उत्साहित झाली आणि मी पुन्हा आल्यावर संपूर्ण जंगल फिरवून आणण्याची कबुली तिने त्याच्याकडून घेतली आणि नंतरच तिने तो ट्रेक व्यवस्थित पूर्ण केला. ती एक महिन्याभराने परत राजगडला आली, यावेळी शंभू आणि ती विंझर मधून सिंहगडवर जाण्यास निघाले, त्यांना शंभुचा मित्र शंकऱ्या भेटला. शंकऱ्याला सुद्धा जंगलाची प्राण्यांची आणि डोंगरदऱ्यांची बरीचशी माहिती होती पण ते दोघेही फारसे फिरलेले नव्हते. त्यांची मजल जेमतेम आठ दहा किलोमीटर्सच्या परिसरापूरतीच होती. तिने त्या दोघांना चालत रायगडला जाण्याचा प्रस्ताव दिला. ते दोघेही सुरुवातीला नकोच म्हणत होते पण शेवटी खाली कोंकणात उतरण्यास तयार झाले. मधल्या वस्त्यांमध्ये त्यांना प्रमिला आणि प्रसाद भेटले आणि त्या सर्वांनी मिळून भटकंती करायचं निश्चित केलं. पुण्याची सुरभी खरेतर युपीएससी आणि एमपीएससी सिरियसली देत होती, पण ती दुसऱ्या परीक्षेत खाली राहिली, तिला आता नव्याने तयारी सुरू करायची होती, फ्रेश होण्यासाठी म्हणून ती या चांडाळ पंचकात सामील झाली.
जंगल प्राणी वनसंपदा हेच आपल्या आवडीचे विषय आहेत, हे आता सोनालीच्या लक्षात येऊ लागले होते. स्थानिक लोकांना उपयुक्त अशी जंगली वनस्पतींची लागवड आपण जंगलात वनखात्याच्या परवानगीने सुद्धा करू शकत नाही, हे तिच्या लक्षात आले. सुगंधी गवतं औषधी तेल देणाऱ्या करंज्या सारख्या वनस्पती अशा अनेक वनस्पती तिला माहिती झाल्या होत्या पण त्याच्यासाठी ती काहिही करू शकत नव्हती. जंगलाच्या जवळ राहणाऱ्या लोकांना त्याची माहिती करून देऊन रोजगार उपलब्ध करता येईल असे तिला वाटत होते, पण जंगल फक्त नांवाला आपले असते, त्याची खरी मालकी सरकारचीच असते, हे तिच्या लक्षात आले. आपण आपल्या जंगल संवर्धनासाठी काय करू शकतो? हा विचार ती करू लागली. तिने यासंबंधी कोणते कोर्सेस आहेत? याची युनिव्हर्सिटी मध्ये चौकशीही केली, पण समाधानकारक उत्तरं मिळाली नाहीत. झूलॉजी आणि बॉटनी शिकण्यासाठी तिला पुन्हा बारावी सायन्स मधून करावे लागणार होते, पण तशी सोय उपलब्ध नव्हती.
फॉलिएज किंवा पगमार्कस् सारख्या संस्था, गाईडचे कोर्सेस आयोजित करतात, त्यामध्ये ते फोटोग्राफी आणि टुरिस्टस् ना आवश्यक तेवढी जंगलांची माहिती देतात, असे सोनालीला समजले, तिने चौकशी केली, त्यांच्या कोर्सच्या किंमती शंकर शंभू प्रसाद आणि प्रमिलाला परवडणाऱ्या नव्हत्या आणि त्यांचे कमी शिक्षण आणि तोकडे इंग्रजीचे ज्ञान त्यांच्या पुढच्या शिक्षणाच्या आड येत होते. बीए पूर्ण झाल्यामुळे तिचे आईवडील आता लग्नासाठी तिच्या मागे लागले होते, तिला स्थळंही येऊ लागली होती.
सोनालीला तिची आवड तर समजली आहे, तसे मित्रही मिळाले आहेत, सरकार दरबारी मदत करायला यूपीएसी करणारी मैत्रीण तिला येऊन मिळाली आहे. ती तिचे प्रश्न सोडवू शकेल का? तिला कायद्यात राहून प्रश्न सोडवायचे नाहीत, तर प्रश्न सुटण्यासाठी कायद्यात सुयोग्य बदल हवेत, अशीच तिची धारणा आहे. अयोग्य कायद्यांमुळे बऱ्याच अडचणी जटिल होऊन बसतात, असे तिला वाटते.
ती हि लढाई लढेल? का ती लग्नं करून संसाराला लागेल? जशा जशा या चांडाळ पंचकाच्या छोट्याशा विश्वात घटना घडतील तशा तशा मी तुम्हाला सांगत राहीन.
कोणत्याही विषयांत पारंगत व्हायचं असेल तर त्या विषयाला प्रत्यक्षामध्ये भिडणे आवश्यक असते. प्रत्यक्ष जागेवरच्या प्रश्नाचे भान आपल्याला शाळेतले विषय जास्त समजावून सांगू शकते. आजकाल मुलं आयुष्याशी दोन हात करताना दिसत नाहीत, ते फक्त शाळा क्लासेस आणि परीक्षेच्या तयारीमध्ये मश्गुल असतात. आज अनेक इंजिनियर्स घरे बांधू शकत नाहीत, किंवा अनेक सीए कंपनीची प्रत्यक्षातील परिस्थिती समजून घेऊ शकत नाहीत. आयुष्याशी भिडत दोन हात करत पुढे जायला शिकणे हेच खरे शिक्षण आहे.
आजच्या सिस्टीम मध्ये मला अनेक प्रश्नांची आणि अनेक स्तरातील समाजाची वेगवेगळ्या प्रकारे होणारी पिळवणूक दिसली. शिक्षणाने आणि कायद्याने नागरिक नाकर्ते बनविले आहेत, काहीही करण्याचा अधिकार फक्त राजकारणी आणि सरकारी नोकरांनाच आहे. हे दारुण पारतंत्र्य अजूनही लोकांच्या लक्षात येत नाहीये.
माझे जंगल असून मी त्याचं भलं करू शकत नाही आणि वन्यजीव माझे मित्र असून मी त्यांच्याशी जवळीक साधू शकत नाही. आज जे कोणी उत्तम काम केलेले जंगलप्रेमी आणि वन्यजीव प्रेमी आहेत, कायद्याने दुर्लक्ष केल्याने ते मोठे झाले आहेत. राजकारण्यांच्या प्रत्येक झाडावर आणि मातीच्या कणावर राज्य करण्याच्या हव्यासामुळे आपली परिस्थिती दारुण झालेली आहे.आणि त्यात बुरसटलेल्या सामाजिक चालीरीतींनी भर घालून ठेवलेली आहे. त्यावर प्रकाश टाकण्यासाठी हे छोटेसे कथानक लिहावे असे मला वाटले.
-- विनय भालेराव.
“भावगंधर्वांच्या” वरील पत्राला कारण म्हणजे एकदा आम्हीं माझ्या पत्नीच्या काही कविता त्यांच्या अवलोकनार्थ पाठविल्या होत्या. त्यांना हृदयनाथांनी चाली लावाव्यात आणि ध्वनिमुद्रण करून ती गीते रसिकांना उपलब्ध करून द्यावीत अशी संकल्पना होती.
नोकरीत असताना त्याची दिनचर्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे क्रमवार चालू असायची. सकाळी साडेनऊ वाजता तो घराबाहेर पडायचा. वेळेवर ऑफिसला पोहोचून, आपल्या टेबलवरचं काम शिस्तीनं उरकायचा.
संध्याकाळ झाली.
हवेत मस्त गारवा होता आणि घरात छान उबदार वातावरण.
तो घरात गादीवर आरामात पडला होता.
इतक्यात ती घरात आली.
ही नुसती आली नाही तर गुणगुणत आली. हिला सदानकदा गुणगुणण्याची सवय आहे.
ही हसत हसत गुणगुणली,“एऽऽ, तुला एक सॉलीड जोक सांगते. हा जोक जगातला सगळ्यात लहानात लहान जोक आहे. फक्त एका वाक्याचा जोक!
या जोकची “पॉयझन बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड” मधे पण एंट्री झालीए!! सांगू तो जोक?”
गादीवरुन उशीकडे सरकत तो म्हणाला,“आत्ताच सांगायचं काय नडलंय का? गेले तीन दिवस माझ्या पोटात रक्ताचा एक थेंब नाही! भुकेने माझा जीव कासावीस झालाय, आणि तुला
जोक सुचतोय?
तू गावभर फिरत रक्त पितेस तसं माझं नाही म्हंटलं! .. ..
माझं.. या घरातल्या माणसांशी “रक्ताचं नातं” आहे!”
हे एकल्यावर तिची गुणगुण वाढली.
ती रागाने फणफणत फुणफुणली, “पण एक सांगते, या घरातल्यांना तुझी किंमत नाही. जोडून सुटी आली तर गेले तुला गादीवर सोडून!
आपण गेल्यावर तुझं काय होईल, याची त्यांना आहे का चिंता?
“तुझ्यासाठी घरातल्या एकाने तरी मागं रहावं. या गादीवर झोपावं.” असं कुणाला तरी वाटलं?”
तो रागाने खसकून म्हणाला,“हे बघ,उगाचच “उचलली सोंड आणि लावली पंखाला” असं करू नकोस.
तू काय समजतेस काय आम्हाला?
तुझ्यासारखे गावभर हुसहुस करत फिरणारे आणि डबक्यात अंडी घालणारे आम्ही नव्हे!
आम्ही घरंदाज आहोत!
समझे?
उगाच गमजा करू नकोस.
अगं तहानने घसा सुकला तरी आम्ही दुसऱ्या घरी जाऊन रक्त पीत नाही!!
कारण..
कारण.. या घरातल्या माणसांशी मी आणि माझं कुटुंब “रक्तनिष्ठ” आहे!!”
“बरं बाई झाली घाई. मी इतकंसं बोलल्यावर लगेच एव्हढं काही सुनवायची गरज नव्हती. पण जाऊ द्या.
आता मला सांग, ही माणसं कधी परत येणार आहेत?”
“आज संध्याकाळ पर्यंत तरी यायला हवीत. नाहीतर उद्या माझं कठीणंच आहे. पण नाहीतर मागच्या वेळेसारखं झालं तरी बरं!”
ती म्हणाली,“म्हणजे मागच्या वेळी काय झालं होतं?”
तो सांगू लागला,“अगं त्यावेळी तू नव्हतीस म्हणून तुला माहित नाही.
त्या उन्हाळ्याच्या सुटीत ही घरातली सगळी जणं पंधरा दिवसा करता काश्मीरला का कुठेतरी गेली. पण त्यांनी जाताना घराची किल्ली बाजूच्यांकडे देऊन ठेवली.
त्यामुळे आम्हाला रक्त पाजण्यासाठी या बाजूच्या घरातली माणसं अधून मधून येत आणि कॉटवर लोळून जात.
त्यावेळी.. .. परक्या माणसांच्या हाताला, पायाला किंवा पोटरीला तोंड लावताना मला जरा अवघडल्यासारखं व्हायचं. नकोसं वाटायचं. मी खूप गोंधळलो होतो.
मग मला आईने समजावलं.
आई मला म्हणाली,“अरे आपण या घरातलेच आहोत. या घरात जे कुणी येतात ते आपलेच.”
त्यानंतर मात्र माझी भीड चेपली.”
तिने हसत हसत विचारलं,“काय रे, त्या शेजारच्या घरातला तो जाड्या ढेरपोट्या माणूस पण आला होता का तेव्हा? त्याचं रक्त तू टेस्ट केलं आहेस?”
तो आठवत म्हणाला, “बाप रे! तो तर सॉलीडच किस्सा आहे!
माझी आई त्याला गमतीने “दगडी उशी” म्हणते.
तो जेव्हा आमच्याकडे आला होता तेव्हा आई मला म्हणाली,“ढेकणू, त्या दगडी उशीच्या जवळपास पण जायचं नाही. झोपेत त्याचं बोट जरी आपल्या पाठीवर पडलं तर आपण चिरडून
जाऊ.
आणि त्यांचं रक्त पिण्यासाठी तू अजून लहान आहेस!”
मी लहान आहे, असं आई का म्हणाली असेल ग?”
त्याचा प्रश्न ऐकून ती गुणगुण गुणगुण गुणगुणली आणि म्हणाली,“ढेकणू तू तर अगदीच पाचवी फेल आहेस!
अरे रात्री जर त्यांचं रक्त प्यायलं तर आपलं डोकं सुन्नं होतं म्हणे. सॉलीड कीक येते!
माझी मोठी मावशी तर त्यांच्यावर तुटून पडते आणि मग त्यांच्याच कानावर झोपते.
जाऊ दे तुला नाही समजणार ते.”
“मग आता मला समजेल असा तो इटूकला जोक तरी सांग.” ढेकणू म्हणाला.
डासाची आई जोक सांगू लागली,“अरे एका दिवाळी अंकात असं लिहिलंय की,“आम्ही म्हणे माणसांना चावतो!” आता हा मोठा विनोदच नाही का?
चावण्यासाठी “दात” असावे लागतात.
पण आम्हाला तर दातच नाहीत मग आम्ही चावणार कसे?
माणूस भले चंद्रावर गेला असेल पण त्याला जर “आमच्या सारख्या डासांना दात नसतात” हेच जर माहित नसेल तर उपयोग काय?
रक्ताशपथ सांगते,“आम्ही माणसांना कधीच चावत नाही तर फक्त टोचतो.” आमच्या मऊमऊ सोंडेने टोचतो.”
ढेकणू आश्चर्याने म्हणाला,“मग, माणसांना चावतं कोण”
डासाई म्हणाली,“अरे कुत्रे असतात चावरे आणि लाळघोटे. हे कुत्रे माणसांच्या सारखं मागे मागे फिरत असतात.
आपण चावरे नाही तर आपण “टोचरे” कुटुंबातली मंडळी आहोत.
आपण माणसांच्या मागे नाही तर माणसंच आपल्या मागावर असतात!”
इतक्यात डासाईला कुठलासा वेगळा वास आला.
ती सावध झाली.
तिने सोंडेनेच ढेकणूला खूण केली.
ढेकणू गादीत शिरला.
डासाईने कल्टी मारली.
- राजीव तांबे.
मंडळी आज दिनांक १७ ऑगस्ट. ह्या तारखेला परदेशात काळ्या मांजरीचा कौतुक दिन साजरा करतात. म्हणूनच तिचं कौतुक करण्यासाठी ही कथा. फक्त एकच सांगू इच्छितो. काळी मांजर दिसायला भयानक जरी असली तरी ती खूप खेळकर आणि प्रेमळ असते. जरा अंधश्रद्धेला बाजूला ठेवून तिचाही विचार करा. बिचारी ती मुकी , ती आपल्या भावना आपल्याकडे कशा व्यक्त करणार
Copyright © 2025 | Marathisrushti