(User Level: User is not logged in.)

साहित्य - ललित

नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.

Sort By:

  • पराकोटीच्या दुःखाला (सुमंत उवाच – ४३)

    सुमंत जयंत परचुरे. 

    “ह्या quarantine समस्ये मूळे खूपच वांदे झालेत. जीवनावश्यक गोष्टी मिळणं किती कठीण झालंय.”

  • चातुर्मासाची समाप्ती

    माझ्या लहानपणी चाळीतील बायका पहाटे पाच वाजता उठून सगळी पारोसी कामे आटोपून अंघोळ करून पुजेचे साहित्य घेऊन आवळी पुजनाला जायच्या आम्ही लहान मुली त्यांच्या सोबत जायचो. एकमेकांच्या सहकाऱ्याने परिसर स्वच्छ झाला व पुजेच्या पाण्याने झाड टवटवीत झाले होते.

  • बुडबुडे

    आता शाळेला सुट्टी लागली की मला. खूप बोअर होत. काय करणार अशी भुणभुण लावली होती नातवाने. अरे आम्ही अशा दिवसात खूप मज्जा करायचो. तू असे कर बुडबुडे कर. त्याला समजले नाही म्हणून तो म्हणाला की म्हणजे वॉटर बबल्स का. पण ते आता मिळत नाही. बाहेर गेल्यावर असेल तर विकत घ्यावे लागते. हो ना पण आम्ही घरीच करायचो. त्यामुळे तो उत्सुक होऊन ऐकत होता. आम्ही फुलपात्रात पाव ते अर्धे असे पाणी घेऊन त्यात थोडेसे साबणाचा चुरा टाकायचो. मग कागदाची नळी पुंगळी वळून त्याने त्या पाण्यात फूंकर मारली की बुडबुडे छोटे छोटे तयार होऊन फुलपात्राच्या वर यायचे. आम्ही चाळीत वरच्या मजल्यावर जाऊन त्या नळीनेच फुंकर मारुन लहान मोठे फुगे सोडायचो. कधी कधी ते खूप मोठे तर कधी लहान तर कधी फुसके पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे पाणी तोंडात गेले नाही पाहिजे...

    मग आम्ही कठड्यावरुन ते पाण्याचे फुगे सोडून द्यायचो. आकाशाकडे तोंड करून फुंकर मारली तरी फुगे खालीच जातात. तेव्हा खालील बाजूस उभे असलेले आमची बच्चे कंपनी ते फुगे हातात घेण्यासाठी उड्या मारत. कधी कधी तर इंद्रधनुष्या सारखे रंग दिसतात.

    हे ऐकून त्याला मजा वाटली. पण मी विचार करत होते की माणसाचे आयुष्य म्हणजे एक बुडबुडाच आहे ना. कितीही आकाशात गरुड झेप घेऊन खूप काही मिळवले तरीही शेवटी जमीनीवर मातीतच शेवट आहे. काही शेवटपर्यंत जातात. तर काही आकालीच.....असो मी तरी कुठल्या कुठे विचारात भरकटत गेले आहे. पण त्या बुडबुड्यांची मजा काही औरच होती. पैसा खर्च नको. बोअर होत नाही. जिद्द निर्माण होते आणि बरेच काही.पण तो म्हणाला तसे बाजारात मिळतात तर मग कशाला उगाच धडपड करायची. बरोबर आहे ना त्याचे आजकाल सगळे काही मिळते. फक्त पैसा फेको तमाशा देखो. सगळे काही मिळत मात्र आंनद व समाधान विकत मिळत नाही म्हणून..
    धन्यवाद

    –सौ. कुमुद ढवळेकर.

  • पेट्रोल-चोर

    दुपारची वेळ होती. सोसायटीत थोडी सामसूमच होती. सौभाग्यवती स्वयंपाकघरात कामात होती. अमित संगणकावर कांही काम करत होता. मीही पेपर वाचत होतो. माझ्या लाडक्या संपादकाचा अग्रलेख वाचण्यात मग्न होतो. त्यांनी धनदांडग्या उद्योगपतींवर चांगलं झणझणीत लिहिलं होतं.

  • श्रावणबाळ

    श्रावण नदीवर आला. त्याने लोटा धुतला आणि तो पाण्यात बुडविला. लोट्यात पाणी भरताना त्याचा आवाज झाला. दशरथ राजाने तो आवाज ऐकला. त्याला वाटले, हत्तीच पाणी पिऊ लागला आहे. आवाजाच्या दिशेने त्याने बाण सोडला आणि “आई ग!” अशी आर्त किंकाळी त्याच्या कानावर पडली. घात झाला असे वाटून तो घाईघाईने नदीवर आला. श्रावणाच्या बरगडीत बाण घुसल्याचे त्याला दिसले. रक्त भळाभळा वहात होते. धावत जाऊन त्याने श्रावणाचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले.

  • स्वर्गातही सोशल मिडीया साकारणार

    पृथ्वीवरच्या सोशल मिडियाची खबर काही चुगलखोर आत्म्यांनी स्वर्गात पोहोचवली. एक दोन, ए ग्रेड अप्सरांनी नारदाच्या मदतीने लगेच इंद्राचे कान भरले. मानव निर्मित सोई सुविधांचे अनुकरण देवाधिकांनी करण्याविषयी इंद्राच्या मनात थोडी चलबिचल झालीही परंतु, ” स्मार्ट फोन आणि सोशल मीडियाचा दरबारात इफेक्टीव्ह कम्युनिकेशन टुल म्हणून वापर करुन आपण सर्व अप्सरांच्या हलचालींवरही लक्ष ठेउ व सतत सर्वाच्या टचमधे राहू शकु ” या स्वार्थी हेतूने इंद्रानी स्वर्गातल्या सोशल मीडियाला तत्वत: होकार दिला आणि सर्व अप्सरांची मीटिंग बोलावली.

  • सृजनशील दिग्दर्शक विजय राणे

    श्रीमंत पेशवे बाजीराव मस्तानी ही मालिका अफाट लोकप्रियता मिळवून संपली, या मालिकेचे दिग्दर्शक विजय राणे यांचा परिचय.

  • बंधन…

    अशी कितीतरी अदृश्य बंधनं आपल्या अवती-भोवती तयार झालेली असतात ती तोडु म्हणताही आपल्याला तोडता येत नाहीत. कडक लाकुड पोखरुन काढणारा भुंगा कमलदलाच्या पाकळ्यांच्या बंधनात स्वत:ला कोंडुन घेतो. काही बंधनं अशीच असतात, जी आपल्याला तोडवत नाहीतच मुळी.

  • हरवलेला भक्त

    रेल्वे गर्दीने भरून गेली होती. टी. सी ला एक पाकीट सापडते. त्यात काहीच पुरावा नसल्याने काहीच अंदाज येईना शेवटी त्याने विचारले, ही पर्स कुणाची आहे ?,तेव्हा एक आजोबा येतात आणि म्हणतात माझी आहे. टी.सी म्हणतो,खात्री कशी पटणार ? आजोबा म्हणतात त्यात श्रीकृष्णाचा फोटो आहे . त्यावर टी सी म्हणतो असा फोटो कोणाकडेही पडेल.त्यात काय विशेष ? तुमचा फोटोही नाही त्यावर आजोबा शांतपणे उत्तर देतात ,मी शाळेत असताना ही पर्स मला वडिलांनी दिली होती .थोडे पैसे खाऊसाठी दिलेले असायचे.तेव्हा आई बाबांचा फोटो लावला होता जसा कॉलेज कुमार झालो तेव्हा माझा मला फोटो आवडायचा त्यांचा फोटो काढून मग माझा फोटो ठेवायला लागलो नंतर लग्न झाल माझी बायको सुंदर होती माझा फोटो काढून मग तिचा फोटो ठेवू लागलो ,काही वर्षांनी आम्हाला एक मुल झाले . आयुष्याचा नवीन पर्व सुरु झाल . मग त्याचा फोटो ठेवू लागलो .

    मात्र हे सगळ सांगताना आजोबांचे डोळे पाणावले गेले , ते बोलतच राहिले, म्हणले काही वर्षापूर्वी माझे आई बाबा गेले नंतर माझी पत्नीही साथ सोडून गेली ,ज्या मुलाला मी वाढवलं त्यानेही मला सोडलं तो आता त्याच्या आयुष्यात व्यस्त झाला , मला पाहायला त्याच्याकडे वेळ हि नाही . म्हणून आता माझ्या पर्स मध्ये मी श्रीकृष्णाचा फोटो लावलाय . मला कळून चुकलय की भगवान श्रीकृष्ण माझे शाश्वत साथी आहेत . माझी साथ कधीच सोडणार नाही, जर मला आधीच कळलं असत की जे प्रेम मी माझ्या कुटुंबावर केले तेच मी देवावर केले असते तर असे एकटे पडलो नसतो .

    टी. सी ने त्या आजोबांची व्यथा समजून घेतली आणि पर्स परत केली . तो टी सी पुढच्या स्टेशन ला उतरून एका पेपर विक्रेत्याकडे जाऊन विचारले "भगवान श्रीकृष्णाचा फोटो आहे का ? मला माझ्या पर्स मध्ये ठेवायचा आहे.........

    गोष्ट व्यावहारिक दृष्टीने touching असली तरी येत्या काळाची चुणुक दाखवणारी आहे. कुटूंब छोटी छोटी होत चालली आहेत, स्वयंकेंद्रित होत चालली आहेत. आपण स्वत: पुढच्या अशा परिस्थिती साठी तयार असले पाहिजे म्हणजे नैराश्य येणार नाही. ह्या सगळ्यावर उपाय म्हणजे 'योग' आणि 'ध्यान' यांची कास आपण धरली पाहिजे.

    जय श्रीकृष्णा !!

  • ससा आणि कासव : नव्या भूमिकेत

    श्रीपाद यशवंतराव देशपांडे 
    जिल्हा परिषद कन्या शाळा परभणी 9421083255

    सकाळी दहा वाजेपासून कुणाशीही काहीही न बोलता त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली…… त्यांची ही कृती पाहून रस्त्याने जाणारे मुले मुली आणि इतर मंडळी त्यांच्या कामात मदत करू लागली….. केक गम यांच्या गटात सामील होत होता….. दोनाचे दोन हजार स्वयंसेवक कधी झाले हे कोणालाही कळले नाही आणि संपूर्ण शहरातला कचरा अवघ्या दोन तासात गोळा करून झाला….. आता त्या शहरातली प्रत्येक नाली, प्रत्येक फुटपाथ, प्रत्येक सिग्नल, प्रत्येक चौक आणि प्रत्येक रस्ता स्वच्छ दिसत होता.