नामवंत लेखक, नवोदित लेखक, ऑनलाईन लेखक यांच्या कथा, कविता, कादंबरी, प्रवासवर्णनासहित भरपूर साहित्य.
योगसामर्थ्याने ते चौदाशे वर्षे जगले अशी मान्यता आहे.. यांच्या गुरूचे नाव वटेश्वर म्हणून यांना चांगावटेश्वर असेही म्हणतात. काहींच्या मते वटेश्वर म्हणजे चांगदेवांच्या अंतरंगात प्रकाशणारे ईश्वराचे रूप).
त्या बुटक्याचे काय झाले असेल? युद्धात बुटक्याचा एक डोळा फुटला आणि एक पाय तुटला…..
आरू, लता आणि राज, त्यांच्या गावी ट्रीपला आले. 14 फेब्रुवारीला राज आणि लता गढीवर फिरायला गेले. लता एकटीच परत आली. तिनं सांगितलं, राज तिच्याशी भांडण करून निघून गेलाय. त्यानंतर राज परत कधीच, कुणालाच दिसला नाही. त्याला शेवटचं भेटलेली व्यक्ती लता आहे. पण राजच्या शोधला उपयोगी पडेल असे कोणतेच उत्तर ती देत नाहीये….
दो लब्जो की है,
दिल की कहानी,
याद है मोहब्बत,
याद है जवानी.
ये कश्ती वाला,
क्या गा रहा था,
कोई उसे भी,
भी याद आ रहा था.
लाला लाललाला लाला लालाऽ
लाला...
माझ्या वयाच्या साधारण १३,१४ व्या वर्षी अमिताभ व झिनत या जोडीवर चित्रित झालेला हा मुव्ही मी बघितलेला. द ग्रेट गॅम्बलर च्या उपरोक्त गाण्याने रसिकांच्या मनावर गारुड केले होते. कित्येक वर्षांपूर्वी बघितलेल्या या गाण्याचा सीन जशाचा तसा आठवला.या गाण्यातील गंडोला, ज्याला आपण होडी म्हणतो यात आज बसण्याची संधी मिळणार होती. व्हेनिस शहरामध्ये पोहोंचल्या नंतर .
मला वाटतं या शहराला याच गाण्यांमुळे, 'द सिटी ऑफ रोमान्स'असे म्हटले जात असावे. व्हेनिस शहर नव्हे ,आयलँडच (बेट) ते!कारण चोहोबाजूंनी पाण्याने वेढलेले हे शहर. पाण्याला तेवढ्यापुरते बाजूला सारत या शहराची वस्ती उभी राहिली असणार,यावर पूर्ण विश्वास बसतो. शहरात प्रवेश करतानाच मुळी,बऱ्याच लोकांना सामावून घेणाऱ्या एका वॉटर बस चा पंधरा मिनिटं प्रवास करावा लागतो. हा प्रवास आपल्याला व्हेनिस आयलॅंड वर घेऊन जातो. तेथून थोडे चालत जाऊन आपण पोहोचतो, गंडोला राईड च्या स्टेशन वर.
येथे पोहोचल्यावर मात्र व्हेनिसला 'कालव्यांचे शहर' का म्हणत असावेत? याची प्रचिती येते.तार्किकतेवर घासून मत मांडावयाचे म्हटले, तर पाण्याचे साम्राज्य पुर्विच असावे तेथे. पाण्याला बाजूला सारत शहराची निर्मिती झाली असावी. हे माझे म्हणणे मी मांडलेले आहेच. पण वस्ती झाल्यानंतर आपल्याला आता दिसू लागते ते पाणी कालव्यांच्या रूपात.
येथे दळणवळणासाठी भरपूर होडी वजा गंडोला नामक पाण्यातली वाहनं उपलब्ध आहेत.शिवाय पर्यटकांसाठी हे एक आकर्षणाचं केंद्रबिंदू आहेच. या गंडोला मध्ये राईड करून किमान प्रत्येक भारतीय स्वतःला अमिताभ आणि झिनत या रुपात बघत असणार. यात वादच नाही. सुरुवातीला वाॅटर बस मधून स्वच्छ दिसणारे पाणी,गंडोला चा प्रवास चालू झाला की, काहीच वेळात ती जेव्हा शहराच्या आतल्या भागात जाऊ लागते, त्यावेळी अतिशय अस्वच्छ दिसते. किंबहुना,आपण का करतोय ही राईड?असा प्रश्न पडून अंतर्मुख व्हायला होते. या भागातील पूर्वीची रहाती घरं आता हॉटेल्स मध्ये रूपांतरीत केलेली आहेत.तेथील सांडपाण्याची व्यवस्था याच वाहत्या पाण्यात सोडलेली आहे हे जेंव्हा आपल्याला लक्षात येते, तेव्हा आपण नाल्यांतून फिरत आहोत असा भास होतो.त्यामुळे 'दुरून डोंगर साजरे'या म्हणीमध्ये चपखल बसेल अशी ही राईड आहे.
लंडन पासून ईन्सब्रूक पर्यंत बघितलेल्या अनुभवलेल्या स्वच्छतेचे, इटलीमध्ये आल्यानंतर विसर्जन झाले किंवा काय अशी शंका मनात येते.आपण भारताच्या जवळ जात आहोत, हे पण लक्षात येते. इटलीतील अस्वच्छते मुळे.
गंडोला मधून दिसणारा शहराचा लूक मात्र छान आहे.वाहत्या पाण्यातील हे शहर दुरुनच बघावयास मजा येते.
राईड संपवून तेथेच आसपास असणाऱ्या,ग्लास फॅक्ट्री ला आपण भेट देतो. येथे उच्च तापमानावर द्रवरूप काचेला आकार देत विविध प्रकारची काचेची उपकरणे, प्राणी,मोठमोठे फ्लॉवर पॉट, वगैरे वस्तू बनवताना आपल्याला प्रत्यक्ष बघता येते. हे बघत असताना आपल्याकडच्या मातीची भांडी बनवणाऱ्या कुंभारी कलेची मात्र आवर्जून आठवण होतेच.चकाकणारी रंगीबेरंगी पानाफुलांच्या डिझाईन्स ने बनवलेल्या वस्तू खूपच महागड्या.केवळ विंडो शॉपिंगचा आनंद घ्यावा.
व्हेनिस मध्ये मर्यादित आकारमानाची जमिनीची उपलब्धता आहे. म्हणून गर्दीही भरपूर असते. येथे आपण ओरिएंटेशन टूर ज्या वेळी करतो त्यावेळी,अति उत्कृष्ट नमुन्यांची बांधकामं आपल्याला बघावयास मिळतात.खरोखरच अचंबित व्हायला होते.
सेंट मार्क्स स्क्वायर मध्ये तर तिन्ही बाजूंनी प्रचंड संख्येने आर्चस् असणाऱ्या व इमारतींवर माणसांचे मोठेच मोठे पुतळे असणाऱ्या लांबच लांब वास्तू बघून डोळे विस्फारायला होतात. बॅसिलिका चर्च ची वास्तु प्रचंड मोठी. बांधकाम कलेचा सुंदर नमुना आहे.याच ठिकाणी,सुर्य,चंद्राच्या भ्रमणाच्या गतीवर आधारित घड्याळ व बारा राशी यांमधील गणित एका प्राचीन ईमारतीवर कोरलेले आहे.
इटालीत प्रवेश केल्यानंतर या देशांना समृद्ध इतिहास असल्याच्या खुणा ठिक ठिकाणी दिसू लागतात.प्रवेश घेण्यापूर्वीच आम्हाला सुशांतने येथील गर्दी तसेच पॉकेट मारीची दाट शक्यता असल्याची कल्पना दिली होती. त्यामुळे जवळचे पैसे, पासपोर्ट सांभाळण्याकडे आपोआपच लक्ष केंद्रित व्हायचे. गोरे गोमटे लोक सुद्धा चोर असतात, हे ऐकून आश्चर्य वाटले.
इटली मध्ये आणखी एक वेगळेपण जाणवले ते सॅनिटरी सिस्टीम मध्ये! टॉयलेट मधील दोन कमोड्सची असणारी पध्दत सुरुवातीला आपल्याला चक्रावून टाकते. तसेच वाॅश बेसिनच्या पाण्याची तोटी चालू बंद करण्यासाठी, आपल्याकडे चार चाकी गाड्यांना जसा क्लच असतो, तसा पायाने चालू बंद करण्याचा क्लच बघून गंमत वाटली. डेंटिस्टच्या पेशंट तपासावयाच्या खुर्चीला अशी पद्धत उपयोगात आणली जाते. हे लगेच लक्षात आले.अशा पद्धतीने कालव्यांच्या शहरात बराच वेळ घालवत, आइस्क्रीमचा आस्वाद घेत पुन्हा वाॅटर बसने आम्ही आमच्या बसथांब्याजवळ जाऊन मुक्कामासाठी पाडोवा येथे आलो.
हे शहर, येथील हॉटेल जरी चांगले होते, तरी इतर ठिकाणी डिनर किंवा ब्रेक फास्ट ची जशी व्यवस्था होती तशी काही या देशात कुठेच मिळाली नाही, हेच खरे.
सकाळी काहीतरी खाऊन ब्रेकफास्टचा अनुभव घेतला, आणि पिसा या ठिकाणी जावयास निघालो. रस्त्यात फेरारी गाड्यांच्या म्यूझियम ला भेट दिली.सचिन तेंडुलकरला बक्षीस मिळालेल्या फेरारी गाडी विषयी ऐकले होते.पण या अतिसुंदर म्युझियमला भेट देऊन, १९५९ सालापासून ते, २०१५ सालापर्यंतच्या गाड्यांचे सर्व मॉडेल्स अगदी जवळून बघितले.आवडलेल्या गाड्यांबरोबर फोटो शूटिंग करण्याची हौस भागवून घेतली. 'दुधाची तहान ताकावर' म्हणतात तसेच.
इटलीतील आणखी काही आकर्षणं बघण्यासाठी येथील लहरी निसर्गाबरोबर पिसा येथे प्रयाण केले. युरोपात आत्तापर्यंत वाजली नाही, तेवढी थंडी, गार हवेच्या रुपांत आम्हाला येथे जाणवत होती. शिवाय मधेच उन्हाचे चटके तर अचानक पावसाच्या सरी, असा अनुभव. आणि निसर्गाचा लहरीपणा येथे जास्त दिसून आला.
तुलनेने इतर देशांपेक्षा इटलीत अस्वच्छता दिसून आली. याचा मी आवर्जून उल्लेख केला.पण बाकी युरोपात राखली जाणारी स्वच्छता, वाखाणण्याजोगीच.ठिक ठिकाणी डस्टबिन्स. रस्त्यांवर तुम्हाला जराही धूळ, कचरा नावालाही सापडणार नाही. टॉयलेट्स बाथरूम्स अगदी सार्वजनिक ठिकाणची सुध्दा आरशासारखी चकचकीत. पेपर नॅपकिन्स ची मुबलकता. त्यामूळे युरोपात फिरताना स्वच्छता गृह म्हणजे आल्हाददायक अनुभव होता. बऱ्याच ठिकाणी वॉशरुम वापरावयास खिशाला चाट बसायची. पण असे असतानाही टॉयलेट्स मध्ये कमोड स्प्रे ची व्यवस्था न ठेवता,टिश्यू पेपर्स वर एवढा खर्च का केला जातो?हे कोडे काही सुटत नाही. पाण्याची कमी असावी हे पुष्टी देणारे कारण अजिबातच नाही यासाठी. पण ही आपल्याला अजिबात पचनी न पडणारे गोष्ट आहे. हे अगदी खरे.
भाग ९ समाप्त
क्रमश:
© नंदिनी म. देशपांडे.

बिपीन व त्याचे जेष्ठ सहकारी यांच्यातील तणावपूर्ण वातावरण तापतच चालले होते. बॅंकेक्डून कर्ज व्यवस्थित मिळत होते, पण कामाच्या ऑर्द्र्स कमी झाल्या होत्या. याच्या तीरसट भांडखोर स्वभावामुळे शेवटच्या क्षणाला काम हातातून जात होते.
मेडिकल कॉलेजच्या आगदी सुरवातीचे दिवस आठवतात. १९६० सालचे. त्यावेळी M.B.B.S. पांच वर्षाचा कोर्स होता. पहिले दोन वर्षे प्राथमिक विषय ( Anatomy-Physiology ) व नंतरचे ३ वर्षे, क्लिनिकल विषय सर्जरी-मेडिसीन गायनिक इत्यादी. स्टेथॉसकोप प्रथमच गळ्यांत लटके. खऱ्या अर्थाने विद्यार्थ्याला आपण डॉक्टर होत असल्याचची जाणीव त्याक्षणीच होत असे.रोग, निदान, आणि उपाय ह्या मालिकांना आरंभ होत असे.
सर्जरी अर्थात शस्त्रक्रिया ह्या विषया बद्दल एक वेगळेच कुतूहल होते. डॉ. विक्रम मारवा हे सर्जरी ह्या विषयाचे प्राध्यापक होते. एक विषय तज्ञ व उत्कृष्ट शिक्षक देखील. त्यांची शिकवण्याची पद्धत वेगळीच होती. प्रश्न-उत्तरे यांची देवाण-घेवाण करीत ते शिकवायचे. समजण्यास सोपे, चांगले व पद्धतशीर. परंतु सामान्य विद्यार्थ्याला तसे नापसंत असे. विषयाची एकाग्रता, लक्ष लाऊन ऐकणे, तत्पर असणे, विषयाची समज झालेली असावी, थोडेसे प्राथमिक वाचन. ह्या अपेक्षा विद्यार्थ्यावर एक प्रकारचा मानसिक दबाव निर्माण करीत होत्या. लक्ष नसणे, अवांतर विचार, वहीपेन्सीलीचा चाळा, नसत्या गोष्टींचा विचार मनांत चालणे, नजर चुकवुन इतर वाचन, आणि केंव्हा केंव्हा तर चक्क डूलकी घेणे, ह्या प्रकाराला आपोआप आळा बसत असे. केंव्हा प्राध्यापक कुणाला उप प्रश्न विचारतील, व तो मुलगा कसा तोंडघाशी पडेल हे सांगता येत नसे.
सर्व मुले त्यामुळे नेहमी सतर्क (अलर्ट ) असत.
वर्गातल्या मुलांचे लहान लहान ग्रुप्स केले होते. आमचा ग्रुप १० विद्यार्थ्याचा. सर्जरी विषय, प्राध्यापक विक्रम मारवा यांच्याकडे. आज ऑपरेशन थियेटरचा १ लाच दिवस. थियेटरचा एक अँटेन्डन्ट होता. आम्ही सारे त्या वातावरणांत नवखे. व तो अशिक्षित असून १५-२० वर्षाचा अनुभवी. त्यामुळे त्याच्या प्रत्येक हलचाली, बोलण्याची तऱ्हा, सुचना करण्याची ठेवण, ही एखाद्या लेक्चररप्रमाणे भासत होती. आम्ही त्याक्षणी आमच्या विषय अज्ञानाला झाकून त्याच्या अरेरावी पद्धतीला थोडेसे वचकून होतो. थियेटरच्या बाहेरील वऱ्हान्ड्यात आम्ही जमा होताच तो आला व सूचना केली. सर्वानी आपली पादत्राणे काढून, थियेटरची घालावित. आतल्या खोलीतील थियेटरचे कपडे घालावे. डोके,तोंड झाकण्याचे मास्क बांधावे. ऑपरेशन थियेटर मधल्या कपाटातील वा ट्रालीवरील कोणत्याही वस्तूना स्पर्श करु नये. ह्या सुचना अती प्रभावी व खोचक पद्धतीने तो बोलून गेला. ऑपरेशन टेबल पासून एक फूट दुरीवर उभेराहून सर्व निरीक्षण करा हे सुचविले. आम्ही न बोलता, एकमेकाकडे बघीतले. सर्व त्याच्या सुचनेप्रमाणे केले. अर्थात त्या सुचना प्राध्यापकांच्या वा थियेटर इन्चार्जच्या असतील हे मान्य करीत त्याच्या वक्तीमत्वाकडे दुर्लक्ष केले.
एक अतीशय गंभीर भयावह, मनाचा थरकाप उडवणारे ऑपरेशन थियेटरचे वातावरण होते. सर्वांचे पेहेराव, हेच प्रथम दर्शनी भयानक वाटत होते. सर्वांचे झाकलेले शरीर, फक्त लुकलुकणारे डोळे चमकत होते. बोलण्याचे आवाज येत नव्हते. हातवारे करुन सुचना दिल्या जात होत्या. निरनीराळ्या मशीन्स ठेवलेल्या. कांही चालू. वेगवेगळे आवाज येत. गँस सिलेंडरची ने आण दिसत होती. लाईटचे फोकस गरजेप्रमाणे टाकले जात होते. टेबलावर पेशंटला कव्हरकरून झोपवले होते.
ज्या भागावर शस्त्रक्रिया होणार होती, तेवढाच भाग दृष्य होता. आम्ही कुणाचेच भळभळा वाहणारे रक्त आजपर्यंत बघीतले नव्हते. तेथे आज चिरफाड बघणार होतो. अर्थात औषधांच्या माध्यमातून हे सर्व कांही शारिरीक यातना, क्लेश, त्रासारहीत होणार होते. रोग्यासाठी हे जाणीवेविणा घडणार होते. ही त्यातील समाधानाची बाब होती. ऑपरेशन थियेटर तर आम्हाला त्या क्षणी ' यमपूरी ' च असावी असे वाटत होते. जन्म मृत्युचा एक प्रकारे झगडा, द्वंद्व आम्ही बघणार होतो. समजणार होतो. आणि मृत्युच्या विळख्याची पकड त्या क्षणी तरी कशी ढिली केली जाते, हे महान शास्त्रीय ज्ञान घेण्यासाठी आम्ही उत्सुक होतो. महान ज्ञान, परंतु तेथील मार्ग अर्थात ऑपरेशन थियेटरचे वातावरण मात्र आमच्या नवख्या मनाचा थरकांप उडवणारे, भयावह व अत्यंत गंभीर असल्याचे क्षणोश्रणी वाटत होते.
सहकारी डॉक्टर, परिचारीका सर्व आल्या. ते आपआपल्या जागी ऑपरेशन टेबला भोवती स्थानापन्न झाले. आमची उत्सुकता, व एक प्रकारची मनाची धीर गंभीर पकड हे शिगेला पोंहचली होती. अनुभवाच्या एका वेगळ्याच दालनात आम्ही आज प्रवेश करणार होतो.
प्रमुख सर्जन प्राध्यापक आले,
"अरे भाई यहां इतना सन्नाटा क्यु ?. Why so Silence here. ? Enjoy Surgery. I want study the Subject Sincerely in a Joyful mood".
मी मागे उभा होतो. माझ्याकडे बघत ते म्हणाले " Yes Doctor " ( प्राध्यापकांची ही पद्धत होती की ते विद्यार्थ्यालाही डॉक्टर संबोधीत बोलायचे) मी लगेच पुढे होत त्याना अभिवादन केले. " Will you do one thing for us. " मी चमकलो. ते Us अर्थात सर्वासाठी म्हणाले. मी त्यांच्या सुचनेची वाट बघत सकारात्मक हलचाली केल्या. "देखो आज न्युझीलंडके साथ आपना फायनल क्रिकेट मँच चल रहा है ना. I have forgotten my Transistor at home. Will you please get the same available here right now." एकदम सर्वांमध्ये हस्याची लाट दिसून आली. सर्वांचे चेहरे फुलले. जणू प्राध्यापकानी आमची मने व आवड यांची एकदम पकड घेतली. आमच्यापैकी एकाच्या बँगमध्येंच त्यानी ट्रानझेस्टर आणलेला होता, तो बाहेर बँगेत होता. त्याने चटकन जाऊन तो आणला.
निर्माण होऊ बघत असलेल्या अशा गंभीर व भयावह वातावरणाला इतका नाट्यमय परंतु बहारदार ट्विस्ट मिळेल हे कुणालाही स्वपनांत देखील वाटले नसेल. तीन तासाचे मोठे ऑपरेशन ( Major Abdominal Surgery ) त्या दिवशी आम्ही सर्व विध्यार्थी बँचने अनुभवला.
विषयाच्या गंभीरतेबरोबर खेळातील कॉमेंटरी ऐकत, त्यावरच्या टिका टीपणी करीत, त्यामध्ये मोकळेपणाने सहभाग घेत आनंद लूटला. वातावरण हे केंव्हाच गंभीर अथवा हलकेफुलके नसते. आम्ही ते आपल्या विचारांच्या ठेवणीमधून निर्माण करीत असतो. सर्जरी सारखा रुक्ष, तणाव निर्माण करणारा विषय, केवळ प्राध्यापकांच्या हसत खेळत फुलविण्याच्या कलेमुळे बऱ्याच विद्यार्थ्यामध्ये आवड निर्माण करु शकला.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
माझ्या खूपशा अप्रकाशित कथानकांचा नायक म्हंटल तर वावगं ठरणार नाही, अशा जीवलग मित्रांवर काही चार पाच टिपण्या कराव्या असं सतत वाटत होतं... पण सतत शैक्षणिक कामाची माझी व्यस्तता अन् त्यात म्हणजे औचित्य सापडंना हे महत्वाचं........... आपल्या जवळच्या व्यक्तीचं आस्तित्व, त्याची गरज समजण्यासाठी (थोडक्यात चिंतन) थोडेच क्षण असतात त्यामध्ये आत्ता वाढदिवसाची भर पडली....झुकेरबर्ग दादाच्या फेसबुक वर असंच मार्च अखेर पर्यत चे वाढदिवस बघत असताना नजरेस एक आगामी इव्हेंट सापडला... अन् त्या जीवस्य मित्रांबाबत टिपणी रेखण्यासाठी लेखणी उचलण्याचं औचित्य सापडलं... तसा हा मित्र माझ्याहुनही दोन चार वरीस थोरला पण आमची दोस्ती ही बालपणापासूनचं वर्गमित्र असावी अशी... या दोस्तांशी घष्टण व्हायला तसा बराच वेळ गेला.मी मतदान करण्यास पात्र व्हायला अन् ह्यो पंचविशी पार पडायला एका सहकारी दूध संस्थेमध्ये आम्ही दोघेही कार्यरत झालो, त्यावेळी मी त्याच्याहून दोन वरीस सीनिअर होतो या धंद्यात.... पण शिक्षणात ह्यो माझ्यापेक्षा वरचड त्यामुळे सेक्रेटरी म्हणून मानगुटीवर येवून बसला... असंच चार पाच वरीस एकत्र राहिल्यानं नातं अभेद्य झालं...... दादाबद्दल असणारी माझी निष्ठा अन् माझ्या वर त्याचं असणारं प्रेम याकाळात खूपच पराकोटीला गेलं. उठताबसता फोन व्हायचाच.....कामाच्या निमितानं सगळ्या मुलुख भर जुन्या बजाज गाडीवरनं फेऱ्या ठरलेल्या असायच्या......... या आमच्या जोडगोळीमुळे अनेकांच्या मनात वितुष्ट होतंच खरं.. कारण संस्था कामकाजात सक्रिय त्यामुळं अनेकांचा खुन्नसी रोष जाणवायचा.. सहज रोजच्या बोलण्यातून राजकीय उपदेश द्यायचं काम जुनेजाणते लोकं खूप अदबीने करत होते...
तसा विद्यार्थी जीवन अनुभवणारा मी अन् माझा जिवलग मित्र शशीदा हा कौटुंबिक परिस्थितीपुढे हतबल होवून शैक्षणिक प्रवास थांबवून प्रापंचिक जीवनात मग्न, तसं अजून शशीदा चं लग्न झालं नव्हतं पण आईवडील वृद्ध झाल्यानं कौटुंबिक डोलारा ह्याच्या खांद्यावर आलेला........ तसं शशीदाचं प्रारंभीचं जगणं जरा कष्टप्रद गेलं... पोटापाण्यापुरती पुरेशी शेती, त्यातून निघणारं तोकडं उत्पन्न ह्यामुळे शिक्षणासाठी लागणाऱ्या खरचाकडे सतत नाईलाजाने दूर्लक्ष होत होतं... असंच शिकत शिकत वाणिज्य शाखेची पदविका घेण्यासाठी हा दशकापूर्वी पुणे शहरात वास्तव्यास होता... घराकडून येणाऱ्या पैशातून खर्च भागत नव्हता म्हणून कंपनी मध्ये नाईट शिफ्ट मध्ये रूजू होवून कसंबसं पदव्युत्तर अभ्यासक्रम ही पूर्ण केला... स्वप्न C.A होण्याचं होतं त्यामुळे खूप मेहनतीने शिफ्ट सांभाळून अभ्यास पण चालू होता.. पण नियतीचा डाव वेगळा होता कंपनी मध्ये शटडाऊन चालू झालं, हातंचा रोजगार गेल्यानं बेरोजगार तरूण ही बिरुदावली त्यात घरून येणारे पैसे शहरासारख्या ठिकाणी अपुरं पडू लागले... दिवस ढकलता येईनात... शेवटी स्वप्नांना तिलांजली देवून गाव गाड्याकडं यावं लागलं... आत्ता शेतकामाबिगार पर्याय नव्हता... उच्चशिक्षित आहे म्हणून हे काम करू हे म्हणता येत नव्हतं.... काही दिवसांनी आमच्या बा. ना संस्थेत सेक्रेटरी रूजू झाला... आत्ता जरा घडी बसत होती.. दुध उत्पादनात आत्ता विशेष लक्ष द्यायला सुरवात केली होती.. पूर्वापार दोनच असण्याऱ्या त्यात बी एक बांड असणाऱ्या म्हशीच्या गोठ्यात आत्ता पाऊण डझन वलाडूंन पार ढोरांचा कळप झालता... शेती कडे पण अभ्यासपूर्ण लक्ष त्यामुळे यशस्वी ऊस उत्पादकांच्यात नाव अग्रेसर होतं गेलं.... जिल्हाच्या ठिकाणी तहसिल ठिकाणी भरलेल्या कृषीप्रदर्शनामध्ये दुचाकी वरुनच आम्ही दोघे एक सॅंपल म्हणून पाच उसांची एक मोळी स्पर्धेत ठेवून यायचो.. दोन तीन दिवस प्रदर्शनात उसाजवळची पाटी वाचून नाव चरचिलं जायचं.... कधी कधी नंबर बी यायचा तर कधी कधी फक्त प्रोत्साहनपर नुकती थाप चं मिळायची..... सतत चाललेल्या शेतीतील प्रयोगामुळं तालुक्याचं कृषी खातं लईच जवळ घ्यायला लागलं... तालुक्यातील शेतकऱ्यांना दाखवायला प्रगत शेतकरी रुपी एक उत्साही तरूण चेहरा मिळाला... आमच्या गावपाढंरीत तर कृषी अधिकाऱ्यांचा मुक्काम बसू लागला.... अनेकविध योजना राबवण्यात येवू लागल्या, प्रबोधन पर व प्रगत शेतीशी निगडीत कार्यक्रम शशीदा च्या मदतीने गावात पार पडू लागले.... अवकाळी येणाऱ्या पावसानं अन् कीडीमुळं शेतकरी हतबल होतं होता त्याना शासनाच्या मदतीची गरज होती.. पण अधिकारी तिथं पर्यत पोचत नव्हते... पण हा हरहुन्नरी तरूण अख्खं कृषी खातं बांधापर्यत नेवून पंचनामा करून घेण्यास मदत करत होता... त्यामुळे त्याची गौरवाखातर तालुकापातळीवर कृषी मित्र निवड झाली.. अजून तो कृषी मित्र म्हणून कार्यरत आहेचं.... दुग्ध व शेती व्यवसायातून मोबदल्यातून मोठी स्वप्न पूर्ण होणार नाहीत म्हणून नव्या रोजगाराच्या संधी ही शोधू लागला... तितक्यात कीपॅड 4G फोनचा चा विक्रेता म्हणून पर्यायी काम पण शोधलं.. आत्ता तालुक्यात घराघरात कीपॅड चा फोन पोचवण्यात हा पुढं.. या तुफान मानधन ही मिळत होतं.. हळूहळू आर्थिक घडी बसवत बसवत हा तरूण वाटचाल करत होता..
हा सगळा प्रवास मी जवळनं बघत होतो.. काही वेळा मैत्री खातर मीही रविवारी सुट्टी चा त्यांच्या कंपनीने ठरवलेल्या गावात त्याच्या बरोबर जात होतो... ह्या व्यवसायातून दादाच्या खूपशा ओळखी वाढल्या.. आत्ता गावोगावी गाडीवरून फेरफटका मारत असता सतत हात वर करावा लागत होता.... काही फोनच्या तांत्रिक अडचणी असतील तर कस्टमर आॅफीस ऐवजी दादालाच लई फोन यायचे... पण त्रास न मानता तो अडचणींच निरसन करत गेला... तालुक्यातील कंपनीच्या आॅफीस मध्ये ग्राहक लोकांच्या तोंडून फक्त दादाच्या कामाची स्तुती व्हायची... हे असंच दोन वरीस चाललं नंतर कंपनीने ही त्याची तालुक्याच्या आॅफीस मध्ये मॅनेजर पदी निवड केली.... आत्ता कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न संपला होता.. फक्त जवळच्या लोकांना वेळ देता येत नाही ही खंत तो बाळगून होता.. नोकरी दहा बारा तास करत असल्याने आमचा ही फोन आत्ता वरचेवर कमीच होतं गेला.... पदव्युत्तर शिक्षणासाठी मीही स्थलांतरित झालोय आत्ता ... पण अजूनही माझी ख्यालीखुशाली करण्यासाठी आठवड्यातून रविवारी नक्की एक फोन येतोच... आर्थिक मदत पण आहेच मला वरचेवर.... तसं जीवन सुखसमृद्धीचं चालू आहे हल्ली त्याचं... यंदा त्याच्या लग्नाचं पण सुरू आहे.. यंदा रस्सा भात फिक्स हायच, अशी दाट चिन्हे दिसतायत............शशीदा च्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.. एखाद्या चा वाढदिवस असला कि हल्ली प्रत्येक जण WhatsApp च्या स्टेटस (हे तर मुखपत्र याचं बरं) च्या माध्यमातून भरमसाठ शुभेच्छा देतात... मोठ्या आसामी चं वळख ना पाळख खरं, छायाचित्र लावून आपली पोच कुठं पर्यत आहे हे स्वारस्य दाखवतात... पण आम्ही थेट संपर्क ध्वनीवरून संपर्क केल्यानंतर, खूपशी बाष्कळ बडबड संपत संपत असताना शुभेच्छांचा योक शबोद देताव एकमेकांना... पण या शुभेच्छा पूर्वक शब्दांत खूपशा भावना दडलेल्या असतात अन त्या अचूक पोचतात ही....... गेली दोन वर्षे फक्त फोनवरून शुभेच्छा देतोय कारण सेमिस्टरची परिक्षा नेमकी याच्या वाढदिवसादिवशीच...... पण ह्या वेळी चित्र वेगळं होईल ... परीक्षा लांबणीवर आहेतच.. त्यात वाढदिवस ही जंगी करता येईल असं नियोजन आखलयं त्याच्या माघारीचं हं...... आमच्या सुखादुखःत सहभागी असणाऱ्या अवलियाचा वाढदिवस 30 मार्च रोजी साजरा करण्याचं निश्चितच मनोमनी ठरवलंय... तसा शशीदा माझ्या सारख्या असंख्य तरूणांना आदर्शवत आहे.... परिस्थिती वर मात करण्याचं सामर्थ्य तर वाखाणण्याजोगं आहे... त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या चरित्राचा वृतांत मांडता आला.... वाढदिवसाच्या दिवशी तर सोशल माध्यमातून माझी लेखणी झुंजार पणे शुभेच्छांचा ढीग पाडेलंच...... त्यामुळे आत्ता पुरेसं शब्द जरा थोपवतो....
शब्दाकंन - गजानन साताप्पा मोहिते
दार उघडले आणि थंड गार वाऱ्याचा झोत अंगावर आला. शहारून गेलो, केस ताठरले.
१९६५ आणि १९८५ साली मानव्य आणि प्रियकर-प्रेयसी यांच्यातील प्रेम किती जिवंत,हळुवार, रसरशीत, नाजूक आणि भिडून जाणारं होतं याचा प्रत्यय काल “सीता रामम ” बघताना आला. मूळ भाषा तेलगू असली (with English subtitles) तरी दर्जेदार कलाकृती कायम भाषेच्या अडसरांना ओलांडून “ये हृदयीचे ते हृदयी ” पोहोचविते याचा हा दुसरा अनुभव.
आपली ‘हेच माझे माहेर’ मध्ये साकारलेली ‘शकू’ची भूमिका अविस्मरणीय ठरली. या भूमिकेने आपणास पुन्हा राज्य पुरस्कार मिळवून दिला.
Copyright © 2025 | Marathisrushti