मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
(कजाकिस्तानची लोककथा)
एका गावात एक बुद्धिमान आणि अनुभवी वृद्ध रहात होता. त्याला एक मुलगा
होता. एक दिवस त्याने आपल्या मुलास सांगितले, “बेटा, तीन महत्त्वाच्या गोष्टी
लक्ष्यात ठेव. एक – कधीही अशा माणसास आपला मित्र करू नकोस. ज्यावर
तुझा विश्वास नसेल. दोन – कधीही अशा माणसाकडून कर्ज घेवू नकोस. जो
खानदानी श्रीमंत नसेल आणि तीन कधीही कोणतीही गुपित गोष्ट कोणालाही
सांगू नकोस मग ती तुझी बायको का असेना.”
(आसामी लोककथा)
एक कुंभार होता. त्याला तीन मुली होत्या. मुलगा नव्हता. त्याला आता
पुन्हा चौथी मुलगी नको होती. कुंभार बायकोला म्हणाला, “आता तुला पुन्हा
मुलगी झाली तर मी तुला घरात घेणार नाही.” कुंभाराची बायको माहेरी गेली. दुर्दैवाने तिला चौथी मुलगीच झाली.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा देव देखील दिवाळी साजरी करायचे. देव,
देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, पन्या आभाळात दिवाळीची मजा करायचे.
पृथ्वीवरच्या माणसांना, मुलामुलींना देखील देवांची दिवाळी बघायला
मिळायची. त्यावेळीची ही गोष्ट.
(ऑस्ट्रेलियन लोककथा)
एका राजाची एक सुंदर राणी होती. एका कावळ्याला ही राणी खूप आवडत होती. एके दिवशी राणी आपल्या सहा दासींसोबत रानात पांढरे सुरवंट शोधीत होत्या. कावळ्याने पाहिले आणि कावळ्याला एक युक्ती सुचली. कावळ्याने सुरवंटाचे रूप घेतले. रानातील दाट झुडपात लपून बसला. राणीच्या दासींनी सुरवंट पकडण्यासाठी साधे लाकडी गळ टाकले.
(जैन लोककथा)
एका शहरात तीन मित्र रहात होते. एक राजपुत्र, एक मंत्रिपुत्र आणि एक
वणिक पुत्र. एकदा तिघंही एकत्र आले आणि विचार करू लागले की कोण
कशामुळे जिंकला आहे.
(ऑस्ट्रेलियन लोककथा)
कुणी एके काळी आद्यदेव सृष्टी निर्माता बाईमी यांनी पशुपक्षी, जलचर, कीटक, फुले, वृक्ष अशी सारी सृष्टी निर्माण केली. परंतु ही सारीसृष्टी चित्रासारखी स्तब्ध होती. निर्जीव होती. या सृष्टीत चैतन्य नसल्यामुळे जमिनीतून रोपांना अंकूर फुटत नव्हते. तळ्यातील पाण्यावर बर्फाचे दाट थर असल्यामुळे जलचर बंदिवान झाले होते. अतिथंडीमुळे पक्षी गारठले.
एका बोरगाव नावाच्या खेड्यात सारजा नावाची एक आजी राहायची. ती गरीब होती पण कुणाकडे हात पसरायची नाही. परसात अळू, मेथी, काकडी लावायची. बाजारात विकून चार पैसे मिळवायची. शेंगदाणे, हरभरे भाजायची. कागदाचे कोन करून त्यात भरायची व शाळेतल्या मुलांना दहा- वीस पैशात विकायची.
वाराणशीचे राज्य. राजाचे नाव ब्रह्मदत्त. या राज्यातल्या एका व्यापाऱ्याच्या
कुळात बोधिसत्त्वाचा जन्म झाला. बोधिसत्त्व मोठा झाला. देशोदेशी हिंडून
व्यापार करू लागला.
तेरस याचा अर्थ तेरा! म्हणून त्रयोदशीला बोली भाषेत तेरस म्हणू लागले.
धनतेरस ह्या दिवसाला बायकांची दिवाळी असेही म्हणतात.
एके दिवशी नदीकडे जाणाऱ्या वाटेवर हत्तीला खार आडवी आली. सम्राटासारख्या तोऱ्यात चालणाऱ्या मातब्बर हत्तीनं तिला सोंडेनं वाटेतून बाजूला सारून म्हटलं, “बाजूला हो ग भिक्कार. चिमुरडे.” खारीला हा मोठा अपमान वाटला. तीही कोणी होतीच की. ह्या हत्तीला नीट वागायचं शिकवायला पाहिजे असं तिला वाटलं.
Copyright © 2025 | Marathisrushti