मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
अगस्ती मुनी यांना दक्षिण भारतातील प्रबळ राक्षसांचा नाश करण्यासाठी व ऋषीमुनींना आश्रय देण्यासाठी उत्तर भारतातून ब्रह्मा, विष्णू महेश यांना दक्षिण भारतात पाठवतात. तेव्हा महादेव म्हणतात की, “मी गोदाकाठच्या पंचक्रोशीत जनस्थान या ठिकाणी ‘कपालेश्वर’ या नावाने प्रकट होईन” आणि विष्णूने वचन दिले की, “मी रामअवतारी तुमच्या भेटीला येईन.
तू माझी माऊली । तू माझी साऊली ।
पाहतो वाटुली । पांडुरंगे ॥१॥
तू मज एकुला । वडिल धाकुला ।
तू मज आपुला । सोयरा जीव ॥२॥
तुका म्हणे जीव । तुजपाशी असे ।
तुजविण ओस । सर्व दिशा ॥३॥
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. इथे फक्त पाणीच पाणी होते. त्या पाण्यातील एका कमलपत्रावर देवाचा जन्म झाला. देवाने एकदा आपला खांदा घासला तर त्यातून कावळ्याची अन् खेकड्याची निर्मिती झाली
कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम घरी रहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत. ते ती भिक्षा कुंतीकडे देत.
(महानुभाव ग्रंथातील गोष्ट)
कव्हणा एका महात्माचिये आधारिये परिसू होता तो कव्हणी एका ब्राह्मणाचे
घरा वसतीसी जाये. दारी तिटत तिटत ऐसे पाणी पडत होते तेणे तयाचे वस्त्र
आंबट-ओले ऐसे जाले होते.
असतिल तेथे जिकडे तिकडे
विखरुनि पडली फुले
असतिल पक्षी झाडावरती
गोड गात बेसले
असेल तेथे वहात सुंदर
दुधासारखी नदी
असतिल डोलत हिरवी पिवळी
कमळे पाण्यामधी
घरे तेथली सुरेख असतिल
चमकत सोन्यापरी
आत लाविल्या असतिल
रंगी बेरंगी तसबिरी
झगमग झगमग करीत असतिल
तिथले सुंदर दिवे
विझतहि नसतिल ते वाऱ्याने,
जणु दुसरे काजवे
रोजच जत्रा भरत असावी
तिथे नदीच्या तटी
असतिल खाऊ देत घेऊनि
पैसे दाटुमुटी
पंख लावुनि हिंडत असतिल
वरती तिथली मुले
असतिल चालत ढगावरुनहि
टाकित हळु पावले
असतिल भारी रंगित कपडे
बाळांचे तेथल्या
शिवले असतिल शेवंतीच्या
गुंफुनिया पाकळ्या
खूप दागिने असतिल त्यांनी
अंगावर घातले
पुन्हा काढुनि नसतिल कधीही
पेटीमधि ठेवले
मनास माने तितुके भटकत
असतिल मेघांवर
स्वर्ग असा हा बघावयाला
मिळेल का लोकर
त्रिविक्रमसेन राजा शिंशपवृक्षाकडे आला आणि वेताळाला पूर्वीप्रमाणेच खाद्यांवर घेऊन तो पुन्हा यायला निघाला. तेव्हा खाद्यांवरील शवातील वेताळ त्याला म्हणाला, ‘हे महाराज, तू फार दमला असशील! म्हणून तुझे श्रमपरिहार करण्यासाठी मी एक कथा सांगतो. ती ऐक.’
एक होती कळी. सुंदर, टपोरी. जाणाऱ्या येणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर पडल्या की, लोक म्हणायचे काय सुरेख आहे ही कळी ! तो तो कळी भाव खायची. आपल्या सौंदर्यावर भारी भरायची. मस्का मारायची. शेजारच्या कळ्या तिच्याशी बोलायच्या, हसायच्या. पण कळी काही कुणाशी बोलायची नाही की, हसायची नाही की, खेळायची नाही.
एक कुंभार होता. त्याला तीन मुली होत्या. मुलगा नव्हता. त्याला आता पुन्हा चौथी मुलगी नको होती. कुंभार बायकोला म्हणाला, “आता तुला पुन्हा मुलगी झाली तर मी तुला घरात घेणार नाही.” कुंभाराची बायको माहेरी गेली. दुर्दैवाने तिला चौथी मुलगीच झाली. तिच्या अंगाचा थरकाप झाला. आता नवऱ्याला कसे तोंड दाखवायचे याची तिला काळजी लागली. तो आपल्याला घरात घेणार नाही, याची तिला खात्री होती. तिच्या आईने पुढे काय होईल याचा अंदाज घेऊन त्या बाळाला कपड्यात गुंडाळले, टोपलीत घातले आणि टोपली नदीत सोडून दिली. तरंगत तरंगत टोपली पाण्याच्या प्रवाहाबरोबर वहात गेली.
एक श्रीमंत जमीनदार शेतकरी होता. आपल्या बायका-मुलांसह तो शेतावरच राहात असे. त्याला पशुपक्ष्यांची भाषा अवगत होती. फक्त हे ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगायचे नाही, असे त्याच्यावर बंधन होते. त्याने ते ज्ञान दुसऱ्या कुणाला सांगितले तर त्याच्या वाट्याला मृत्यू येणार होता. त्यामुळे हे रहस्य त्याने कुणालाच कळू दिले नव्हते. पण या भाषिक देणगीमुळे त्याला पशु-पक्ष्यांच्या भावभावना चटकन समजायच्या. गोठ्यातले वासरू भुकेने व्याकूळ झाल्यामुळे त्याच्या आईचा धावा करते आहे; घोड्याला कंटाळा आला आहे, त्याला चक्कर मारून आणली पाहिजे हे त्याला चटकन कळायचे. मांजरांची भांडणं, कोंबड्यांचा कलकलाट, पक्ष्यांचे गुंजन यातला भावार्थ त्याला समजायचा.
Copyright © 2025 | Marathisrushti