(User Level: User is not logged in.)

बाल-साहित्य

मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • चतुर कोल्हा

    एक जंगल होते. जंगलात अनेक प्राणी राहत होते. वाघ, कोल्हा, लांडगा, अस्वल अशा हिंस्त्र प्राण्यांचे वास्तव्य तिथे होते. एके दिवशी कोल्हा जंगलात फिरत असताना खूप जोरात पाऊस आणि सोसाट्याचा वारा सुरू झाला. कोल्हा घाबरला. पळत सुटला.

  • पारितोषिक

    राजाच्या मंत्र्याचा मुलगा अजय पण मूर्त्या बनवित असे पण तो काही उत्कृष्ट मूर्तिकार नव्हता. परंतु त्याची इच्छा हीच असे की कसेही करून प्रथम पारितोषिक पटकावे. मंत्री पण चतुर होता. तो काही तरी युक्ती करून मुलाला कसे बक्षीस मिळेल याचा तो विचार करू लागला.

    ठरलेल्या दिवशी सर्व मूर्तिकार मूर्त्या घेऊन आले. रामकिरण नावाच्या मूर्तिकारने राजाची अतिशय सुंदर मूर्ती तयार केली होती. ती पहाताच मंत्री समजून गेला की नक्कीच या मूर्तीला प्रथम पारितोषिक मिळेल. त्याने रामकिरणला एकीकडे नेऊन सांगितले, खरंच, तू सुंदर मूर्ती बनविली आहेस.

  • पर्वताची केली छत्री

    त्या काळी अशी चाल होती की, एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही, तर इंद्राला प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ करावा. त्याप्रमाणे नंद वगैरे गोपांनी यज्ञाची तयारी केली. पण इंद्राचा आणि आपला संबंध काय ? त्यापेक्षा ज्याच्याशी आपला रोज संबंध येतो त्या गोवर्धन पर्वताला नैवेद्य अर्पण करावा हे बरे, असे कृष्णाने सुचविले.

  • जोजाची गोष्ट

    ‘जोजा ही एका राजाची मुलगी, पाय घसरून पडलेल्या एका म्हातारीला कुचेष्टेने हसली. तशी म्हातारीने चिडून शाप दिला: ‘तादेव’ नावाचा मृत राजपुत्र तुला पती मिळू दे अन् तुझे खूप हाल होऊ देत !’ बिचारी राजकन्या, तिने म्हातारीची विनवणी केली. तो मृत राजपुत्र कशाने उठेल म्हणून विचारले. तशी म्हातारीने सांगितले की, त्याच्या उशाशी थडग्यात एक मोठे चांदीचे पिंप ठेवलेले आहे, ते जी तरुणी तीन दिवसांत अश्रूंनी भरून टाकील तीच त्याला जीवदान देऊ शकेल व मग त्यांचे लग्न होईल.

  • पाळणा

    सुतार उत्तमसा
    तुजसाठी मिळवीला
    पाळणा रंगित बनवीला ।।

    चहूबाजूंनी
    राघु-मोर बसविले
    'पाळण्यात बाळ निजवीले ।।

    निज निज बाळा
    झोके देते मी तुजला
    खेळुनि बाळ बहु दमला ।।

  • नू’चे नाणे

    फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. चीनमधील ‘ताओन लिन’ या गावी एक पुजारी होता. त्याचं नाव होतं ‘वान चिंग.’ देशभर भ्रमण करून तो आपल्या गावी परतला. फावल्या वेळेत तो गावकऱ्यांना आपल्या भटकंतीतील अनुभव ऐकवत असे. गावकरी मोठ्या उत्सुकतेने त्याच्या गोष्टी ऐकत असत. विशेषतः चीनमधील भव्य आणि प्रसिद्ध अशा बुद्ध मंदिरांची जेव्हा तो वर्णने करीत असे तेव्हा लोक ती वर्णने ऐकून स्तिमित होत. ही वर्णने ऐकून ऐकून आपल्या गावातही एखादं भव्य मंदिर उभारावं असं गावकऱ्यांना वाटू लागलं.

  • साळींदर आणि कोल्ह्याची गोष्ट

    कोल्हा हा एक धूर्त, कावेबाज, चतुर आणि लबाडी करण्यात पटाईत असलेला प्राणी आहे. कोल्ह्याच्या अनेक चातुर्यकथा प्रसिद्ध आहेत. वास्तविक सिंह हा जंगलचा राजा, पण कोल्हा त्यालाही फसवतो. विहिरीच्या पाण्यात सिंहाला त्याचेच प्रतिबिंब दाखवून “तुझा प्रतिस्पर्धी तुला आव्हान देत आहे” अशी बतावणी करून तो सिंहाला चिथावतो.

  • बोरोली पिकली गांडोली शेकली

    एका बोरगाव नावाच्या खेड्यात सारजा नावाची एक आजी राहायची. ती गरीब होती पण कुणाकडे हात पसरायची नाही. परसात अळू, मेथी, काकडी लावायची. बाजारात विकून चार पैसे मिळवायची. शेंगदाणे, हरभरे भाजायची. कागदाचे कोन करून त्यात भरायची व शाळेतल्या मुलांना दहा- वीस पैशात विकायची. अंगणाला बोरीचे, वेलाचे कुंपण घालायची. हंगामात फळं आली की ती विकायची. चिमणी एकेक दाणा टिपते तशी संसार करायची. तरुणपणी नवरा गेला तरी ती हरली नाही. कष्ट करून आनंदाने जगत होती. गावातली उनाड मुलं कधी तिची बोरं चोरायची. पोरंच ती! खायची गोष्ट खाणारच, म्हणून ती कानाडोळा करायची. गावाबाहेरच्या जंगलातला कोल्हा तिच्या परसातली काकडी, बोरं खायला यायचा. आजीची नजर चुकवून तो काकडी फस्त करायचा.

  • धनतेरस

    आश्विन वद्य त्रयोदशीचा दिवस ‘धनतेरस’ या नावाने वाखाणला जातो. तेरस याचा अर्थ तेरा! म्हणून त्रयोदशीला बोली भाषेत तेरस म्हणू लागले.

    धनतेरस ह्या दिवसाला बायकांची दिवाळी असेही म्हणतात. कारण या दिवशी प्रभातकाली घरातील सर्व स्त्रिया व मुली अभ्यंगस्नान करतात. धनतेरस या सणामागे प्राचीन काळची एक कथा जडलेली आहे.) प्राचीन काळी यमुना नदीच्या काठी हरीतपूर नावाची एक नगरी होती. तेथे हंस नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो मोठा शूर व प्रजाहितदक्ष होता.

  • सागर आणि समुद्र पक्षी

    नाताळची सुटी लागली. सुटीत काय करायचे असा प्रश्न सागर, सीमा, परेश या मुलांपुढे पडला. सीमा म्हणाली, अभ्यासापेक्षा वेगळं काहीतरी करूया? परेश म्हणाला, संक्रांत येतेच आहे. आपणपतंग उडवू या. सागरने आकाशाकडे पाहिलं तर खरंच, काही मुलांनी पतंग उडवायला सुरुवातही केली होती. प्रत्येकाने पॉकेट मनीतले पैसे एकत्रित केले.