मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.
गोरी गोरीपान, फुलासारखी छान
दादा, मला एक वहिनी आण । धृ. ।।
गोऱ्या गोऱ्या वहिनीची अंधाराची साडी
अंधाराच्या साडीवर चांदण्यांची खडी
चांदण्याच्या पदराला बिजलीचा बाण ! ।॥१॥।
वहिनीला आणायाला चांदोबाची गाडी
चांदोबाच्या गाडीला हरणांची जोडी
हरणांची गाडी तुडवी गुलाबाचें रान ! ।।1२॥।
वहिनीशी गटद्टि होता तुला दोन थापा
तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
बाहुल्यांच्या परी होऊ दोघी आम्ही सान ! ।।1३।।
प्राचीन काळी ऋषिमुनी विद्यादानाचे काम करीत असत. त्यांचे आश्रम म्हणजे वेदाभ्यासाच्या शाळाच असत. अनेक शिष्य आश्रमात राहून विद्याभ्यास करीत होते. ऋषिमुनींनासुद्धा वेदविद्यापारंगत शिष्यांकडे पाहून कृतार्थ झाल्यासारखे वाटे. अध्ययन संपले की, काही ना काही गुरुदक्षिणा देण्याचा प्रघात होता. त्याशिवाय गुरुंचे ऋण फिटले असे समजत नसत.
एक कोल्हा होता. त्याला सगळेच मूर्ख कोल्हा म्हणून ओळखायचे. आपल्या या ओळखीने कोल्हा खूप दुःखी असायचा. तो विचार करू लागला, आपला मूर्खपणाचा शिक्का पुसून हुशार, बुद्धिमान कोल्हा ही प्रतिमा सगळ्यांसमोर येण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. लोकांनाच मूर्ख बनवून आपल्याला राजाप्रमाणे सन्मान मिळवायला हवा.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट. तेव्हा देव देखील दिवाळी साजरी करायचे. देव, देवता, यक्ष, गंधर्व, किन्नर, पन्या आभाळात दिवाळीची मजा करायचे.पृथ्वीवरच्या माणसांना, मुलामुलींना देखील देवांची दिवाळी बघायला मिळायची. त्यावेळीची ही गोष्ट.
रे हिंद बांधवा, थांब या स्थळी
अश्रू दोन ढाळी
ती पराक्रमाची ज्योत मावळे
इथे झाशीवाली । धृ ।।
तांबे कुलवीरश्री ती
नेवाळकरांची कीर्ती,
हिंदभूध्वजा जणु जळती
मर्दानी राणी लक्ष्मीबाई
मूर्त महाकाली ।।१।।
घोड्यावर खंद्या स्वार,
हातात नंगी तरवार
खणखणा करित ती वार
गोऱ्यांची कोंडी फोडित पाडित
बीर इथे आली ।।२।।
कडकडा कडाडे बिजली,
शत्रुचि लष्करे थिजली,
मग कीर्तीरुप ती उरली,
ती हिंदभूमीच्या पराक्रमाची
इतिश्रीच झाली ।३।।
मिळतील इथे शाहीर,
लववितील माना वीर
तरु, झरे ढाळतिल नीर
या दगडा फुटतिल जिभा
कथाया कथा सकळ काळी ।!४॥।
रे हिंद बांधवा, थांब या स्थळी
अश्रू दोन ढाळी
ती पराक्रमाची ज्योत मावळे
इथे झाशीवाली ।।५।।
तू माझी माऊली । तू माझी साऊली ।
पाहतो वाटुली । पांडुरंगे ॥१॥
तू मज एकुला । वडिल धाकुला ।
तू मज आपुला । सोयरा जीव ॥२॥
तुका म्हणे जीव । तुजपाशी असे ।
तुजविण ओस । सर्व दिशा ॥३॥
एक होता मेधी राजा. मोठा भरभक्कम ताजा तवाना. रंगानं काळा. पण मोठा ऐटबाज. मनात आलं की, आभाळात उंच उंच भरारी मारायचा. धावल्या ढगांना पकडायचा. त्यांची मानगूट धरायचा. धक्काबुक्की करायचा. त्यामुळं पाऊस अवचितच पडायचा. माणसं मग, आच्यारी का विच्यारी व्हायची. ते बघून हा असा हसायचा की, दोन पर्वतांची टक्करच जणू झालीय असा दणका उडायचा! त्याच्याजवळ एक छानदार लहान पिशवी असायची. देवानं ती त्याला दिलेली होती. म्हणून ती तो आपल्या केसात लपवून ठेवायचा. पण हा खुशीत आला की, ती एकदम चकाकायची.
“तुझ्या गळा
माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा'
“ताई, आणखि कोणाला ?'
“चल रे दादा चहाटळा ! ॥१॥
“तुज कंठी
मजअंगठी !
“आणखि गोऽफ कोणाला?"
“वेड लागले दादाला !'
“मला कुणाचे ? ताईला !' ॥२॥
“तुज पगडी
मज चिरडी !
“आणखि शेला कोणाला ?'
“दादा, सांगूं बाबाला ?'
“सांग तिकडल्या स्वारीला !' ॥1३॥
खुसू खुसू
गालि हंसू -
वरवर अपुले रुसू रुसू !'
“चल निघ, येथे नको बसू
“घर तर माझे तसू तसू ॥४॥
कशी कशी
आज अशी
गंमत ताईची खाशी !'
“अता गट्टी फू दादाशी'
“तर मग गट्टी कोणाशीं?' ॥ ५॥
एक होता राजा. त्याचं राज्य लहान होतं; पण मन मोठं होतं. त्यामुळं तो सुखी होता, आणि त्याची प्रजाही सुखी होती.
एकदा तो फिरत-फिरत एका जत्रेत जाऊन पोचला. तिथं त्याला एक तरुण दिसला. त्याच्या हातात सफरचंदाच्या झाडाची एक फांदी होती आणि त्या फांदीला सात सफरचंद लागली होती. राजाला मोठी गंमत वाटली. त्यानं त्या तरुणाला विचारलं, ‘काय रे भाऊ, ही सफरचंद विकायची आहेत कां?
एका गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. तो आंधळा होता. त्याला दिसत नसे. एके दिवशी चालता चालता तो विहिरीत पडला. तेव्हा “देवा मला वाचव रे” असे तो ओरडू लागला.
Copyright © 2025 | Marathisrushti