(User Level: User is not logged in.)

बाल-साहित्य

मराठीतील बालसाहित्य येथे वाचूया.

Sort By:

  • समुद्रतळीचा राजवाडा

    (जपानची लोककथा)

    दोन भाऊ सख्खेच. पण दोघांच्या दोन तन्हा होत्या व्यवसायाच्या मोठा
    “होना” पाण्यात गळ टाकून मासे पकडून विकत असे, तर धाकटा “होकी” हा
    डोंगरदऱ्यात हिंडून धावून शिकार करणारा. पक्षी मारणारा फासेपारधी म्हणून
    लोक त्याला ओळखीत असत.

  • मोती पोवळ्याची मोष्ट

    (अहिराणी लोककथा)

    एका गावात एक वृद्ध शेतकरी राहत होता. तो आंधळा होता. त्याला दिसत नसे. एके दिवशी चालता चालता तो विहिरीत पडला. तेव्हा “देवा मला वाचव रे” असे तो ओरडू लागला.

  • तुंडलनलि जातक

    ही कथा शास्त्याने जेतवनात राहत असताना लालुदायी येराळा, ज्याला मठ्ठ असे म्हणत असत, त्याला उद्देशून सांगितली.

  • मूर्ख कोल्हा

    एक कोल्हा होता. त्याला सगळेच मूर्ख कोल्हा म्हणून ओळखायचे. आपल्या
    या ओळखीने कोल्हा खूप दुःखी असायचा. तो विचार करू लागला, आपला
    मूर्खपणाचा शिक्का पुसून हुशार, बुद्धिमान कोल्हा ही प्रतिमा सगळ्यांसमोर
    येण्यासाठी काहीतरी केले पाहिजे. लोकांनाच मूर्ख बनवून आपल्याला
    राजाप्रमाणे सन्मान मिळवायला हवा.

  • गुरुदक्षिणा

    प्राचीन काळी ऋषिमुनी विद्यादानाचे काम करीत असत. त्यांचे आश्रम
    म्हणजे वेदाभ्यासाच्या शाळाच असत. अनेक शिष्य आश्रमात राहून
    विद्याभ्यास करीत होते.

  • आदिमानवाची चंद्रावर स्वारी

    (ब्रह्मदेशातली लोककथा )

    आज आपण जगभरात जेवढी लोकसंख्या पाहातो, तेवढी एके काळी नव्हती. या जगात खूप कमी लोक राहत होते. तेव्हा आजच्यासारखी शहरे नव्हती. प्रत्येक जण उंच बर्फाच्छादित डोंगरांच्या दरीत राहत असत. डोंगरात रहाणाऱ्या या लोकांना ‘चीन्स’ म्हणत.

  • हत्ती शिष्यचार शिकतो

    एके दिवशी नदीकडे जाणाऱ्या वाटेवर हत्तीला खार आडवी आली. सम्राटासारख्या तोऱ्यात चालणाऱ्या मातब्बर हत्तीनं तिला सोंडेनं वाटेतून बाजूला सारून म्हटलं, “बाजूला हो ग भिक्कार. चिमुरडे.” खारीला हा मोठा अपमान वाटला. तीही कोणी होतीच की. ह्या हत्तीला नीट वागायचं शिकवायला पाहिजे असं तिला वाटलं.

  • पर्वताची केली छत्री

    त्या काळी अशी चाल होती की, एखाद्या वर्षी पाऊस पडला नाही, तर इंद्राला प्रसन्न करून घेण्यासाठी यज्ञ करावा. त्याप्रमाणे नंद वगैरे गोपांनी यज्ञाची तयारी केली. पण इंद्राचा आणि आपला संबंध काय ? त्यापेक्षा ज्याच्याशी आपला रोज संबंध येतो त्या गोवर्धन पर्वताला नैवेद्य अर्पण करावा हे बरे, असे कृष्णाने सुचविले.