(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • उपरती

    नाही केली कधीच वारी
    नाही देखिली कधीही पंढरी
    नाही घडले स्नान भिवरेच्या थडी
    बांधत राहिलो मजले आणि माडी
    हाती नाही घेतले टाळ ना आले मुखी अभंग
    संसारात करीत राहिले नाना रंग आणि ढंग
    ना दान ना धर्म ना दाखविली माणुसकी
    आता कोण दाखविल कशाला मला आपुलकी
    या महामारीने उपरती झाली म्हणून आलो मी शरण
    नाही सोडणार तुझे चरण पण चुकव रे पुढील जन्म मरण
    धन्यवाद.
    -- सौ. कुमुद ढवळेकर.
  • सासरी जाताना

    हास्यमुखाने निरोप दे ग, प्रेमाने भरला

    विसरावी मी ओढ येथली, जाता सासरला.... ।। धृ ।।

    खूप दिले तू प्रेम आजवरी, सदैव ठेवीत पदर शिरी,

    पंखांना परि शक्ती देवूनी, सांग मला ग घेण्या भरारी

    सैल कर तू पाश आपला...१,

    हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,

    संसारातील धडे देवूनी, केलीस तयार कष्ट घेवूनी

    कुठे लोपला आज विश्वास तो, जागृत होता सदैव मनी

    नकोस देवू वाव शंकेला...२,

    हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला,

    ते तर केवळ घर निराळे, मायेने परि आहे भरले,

    जसे मिळवले प्रेम माहेरी, वाटीत जाईन सासरी सगळे

    आठवण करिता येईन भेटीला...३,

    हास्य मुखाने निरोप दे ग प्रेमाने भरला

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • अनुप्रास अलंकार चारोळी

    अनुप्रास अलंकार

    चारोळी

    (१)
    गाता गीत गाऊनी
    गायकाघरी गायकी
    गाजती गीतमैफीली
    गान कोकीळ गात की

    (२)
    चमच्याने चिवडा चाखा
    चाखतांना चापून चारा
    चिवड्यातल्या चारदाण्यासह
    चावून चावाच चुपचाप सारा

    (३)
    गंध गुलमोहराचा
    गंधाळला गारवारा
    गोकर्ण गेला गगनासी
    गुरवाघरी गेला गावसारा

    (४)
    हलवाई हलवती हलवा
    हल्दीरामचीच हवा
    हिरवीबर्फी हिरवापिस्ता
    हिरव्यातील हिरवा

    (५)
    नव्याची नवलाई
    नवरीच्या नथनीची
    नाकात नसतांना
    नकोशीच नाचक्की

    -- सौ.माणिक शुरजोशी
    नाशिक

  • आधुनिकता

    नवलाईचे विश्व सारे, नवलाईतच जगते ।

    आगळ्याच्या शोधामध्यें, नव-नवीन इच्छीते ।।

    ताजे वाटते आज जें, शिळे होई उद्यांच ते ।

    प्रवाही असूनी जीवन, बदल घडवीत जाते ।।

    मुल्यमापन बदलांचे, संस्कारावरी अवलंबूनी ।

    परिस्थीतीच्या भोवऱ्यामध्यें, विचार फिरे क्षणोंक्षणीं ।।

    मुळतत्व ते राही कायम, आकार घेई जसा विचार ।

    ताजा शिळा भाव मग तो, ठरविला जाई वेळेनुसार ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • काही शब्दांचे ओरखडे हृदयी उमटतात

    काही शब्दांचे ओरखडे हृदयी उमटतात
    कळत नाही निःशब्द घाव कधी बसतात
    कुणी येत अवचित वसंत पालवी लेऊन
    आयुष्यात स्थिरावत अलगद सावली बनून
    मन भरुन झालं की भावनांचा खेळ होतो
    कोण मग हलकेच अंतरी रडवून जातो
    इथे तिथे शब्दांचे फटकारे सारे बसतात
    स्त्रीला संयमाचे धडे सहज मिळतात
    कुणी आयुष्य अलगद व्यापून जातं
    आईचं बोलणं शब्दांत शहाण करुन जातं
    शब्दांचे बाण जिव्हारी फटकन लागतात
    चुकलेल्या वाख्येत मनाला घाव बसतात
    शब्दांचा खेळ सारा रोज बोथट करतो
    रोज नव्याने घाव आल्हाद होत जातो
    अश्रूनाही फारशी किंमत उरत नसते
    माणस माणसांना वापरुन धार बोथट होते
    टाईमपास हा कधी कधी शिकवून जातो
    कळ्यांचा भाव फुलांना न कळतो
    सहज कुणी आयुष्यात येऊन जातं
    विखुरलेले रंग विस्कटून आल्हाद जातं
    विश्वासात अविश्वास सहज खपून जातो
    माणूस माणसाला बोलून तोडून टाकतो
    निःशब्द मन अलवार हरवून जातं
    त्यालाही माहीत नसतं खेळ मनाचा उरतं
    अशी कशी बोच एकाकी मग रुतते
    कोण दुःखी होतो तर कोणाचे मन हर्षते
    भावविश्वात प्रेम कुणावर करु नये
    गुंतल मन अलवार तर मोहात रुतु नये
    शब्दांचे घाव कुणी मनावर सहज करतात
    असे कसे अश्रू अंतःकरण रडवून जातात
    आईच्या वात्सल्यात ऊब मायेची असते
    कोण हलकेच रडवून आयुष्य मिटून जाते
    संथ पाण्यात सायंकाळ केशरी भिजते
    जीव लावला अंतरी तर सल कातरी बोचते
    -- स्वाती ठोंबरे.
  • मुरब्बी

    लोणच्याला चव येते, थोडे मुरल्यानंतर ।

    आंबाही स्वादिष्ट लागे, आंबून गेल्यानंतर....१,

    विचारांची मजा वाटे, ऐकता ज्ञानी विचार ।

    परिपक्वता त्यांच्यातील, देई आनंदाला धार...२,

    परिपक्वता येण्यासाठीं, अनुभवाची भट्टी हवी ।

    ज्ञान चमकते, जेव्हां तर्कज्ञान पाही....३,

    विचारांत मुरलेला, मुरब्बी तो असतो ।।

    अनुभवाच्या शक्तीनें, योग्य पाऊल टाकतो...४

    डॉ. भगवान नागापूरकर

  • कळी लाजते पानात

    कळी लाजते पानात
    तिला खुणावतो वारा
    बसे डोलवित मान
    अंगी फुटतो शहारा..

  • हट्टी अनु

    एक होती अनु

    फुलासारखी जणू

    डोळे फिरवी गर्र गर्र

    पाऊल टाकी भरभर

    तिला लागली भूक

    गडू दिला एक

    बघितला रिकामा गडू

    तिला आले रडूं

    आईने दुध भरले

    कांठोकांठ ओतले

    तिला हवय जास्त

    दूध आहे मस्त

    रडरड रडली

    आदळ आपट केली

    सांडूनी गेला गडू

    पाठींत बसला मात्र धम्मक लाडू

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • मोक्षदायी जलधारा

    सरिता ही एक पुण्यप्रदा
    अखंडित समांतर किनारा
    ध्यास सागरी समर्पणाचा
    मोक्षदायीनी ती जलधारा...

    झुळझुळते संथ अविरत
    प्रवाह निश्चिंती वाहणारा
    घेते कवेत, सुखदुःखांना
    पापक्षालनी ती जलधारा...

    तमा न पर्वा तिला कशाची
    फुलवीते, दुतर्फा वसुंधरा
    नदिकाठ तो सर्वांगी सुंदर
    राऊळमंदिर गोपुर गाभारा...

    अध्यात्मी,भक्तीभावरंगला
    श्रध्येय, मुक्ती गंगाकिनारा...
    भगीरथाच्या गंगेचे गंगोदक
    जन्मी आत्मशांतीचा निवारा...

    --वि.ग.सातपुते .( भावकवी )

    9766544908

    रचना क्र.२३५

    १५ /९/२०२२

  • चोरलेले पुस्तकच भेट म्हणून मिळते तेंव्हा…

    शालेय शिक्षण पुरे करून,  महाविद्यालयात जाऊ लागलो. नवा उत्साह, नवे मित्रमंडळ आणि उच्च ते वातावरण. मनाचे, विचारांचे आणि बागडण्याचे एक वेगळेच स्वतंत्र. मला त्यावेळचा एक गमतीचा प्रसंग आठवला. ज्याचे धागेदोरे पुढील  जीवनात पंधरा वर्षानंतर विणले गेलेले आढळले. महाविद्यालयातील  तो दिवस आठवतो.