(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • खारूताई

    खारूताई लबाड पाहिलीत का तुम्ही
    आत्ता होती इथे, लगेच गेली कुठे
    गोंडेदार शेपटीवाली चालते तुरु तुरु
    झाडावर चढते सुरु सुरु सुरु
    पानाआड लपते, लपाछपी खेळते
    चलाख खारूताई अैटीत बसते
    मुलांना बघून खुष होते

    -- सुधा नांदेडकर

  • अतृप्त भूक

    चंद्रा तुझे रूप कसे रे, गोंडसवाने छान

    टक लावूनी बघता, हरपूनी जाते भान

    मधूर शुभ्र नभी चंद्र तो, जणू चांदीची थाली

    अगणीत वाट्या विखूरलेल्या, दिसे भोवताली

    टपोर चांदणे वाहूनी जाते, त्या थाली मधूनी

    स्वाद लूटता धुंद होतो, घेता ते झेलूनी

    रिक्त होते एक वाटी ती, भरूनी जाई दुजी

    प्राशन करिता सीमा नसे मग, आनंदा माजी

    अतृप्त सदा मन तरीही, त्या चांदण्यापाई

    आतूरतेने दुजा रात्रीची, सतत वाट पाही

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • गावाकडची अमेरिका – पार्श्वभूमी – ३

    माझा जन्म मुंबईचा. आयुष्याची साधारण ३० वर्षं मुंबईत काढलेला मी एक अस्सल मुंबईकर आहे. आई वडिलांच्या दोघांच्याही बाजूने वकीली आणि शिक्षकी हे दोन महत्वाचे पेशे. दोन्ही बाजूंच्या कुटुंबांमधे काहीजण डॉक्टर्स किंवा इंजिनिअर्स, बरेचसे पोस्टग्रॅज्युएट्स आणि काहीजण Ph.D. त्यामुळे घरातलं वातावरण शिक्षणाला सर्वस्व मानणारं. बहुतेक सारेजण मुंबई, पुण्यात स्थिरावलेले. त्यामुळे या सार्‍या शहरी वातावरणात, गावरान वारा लागण्याचं काहीच कारण नव्हतं. नाही म्हणायला ९-१० वर्षांचा होईपर्यंत मी आजोळी (आईच्या माहेरी) डोंबिवलीला वाढलो. डोंबिवली म्हणजे मुंबईपासून ५० कि.मि.वर ठाणे जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. मध्य रेल्वेवर ठाणं आणि कल्याण या दोन मोठया गावांच्या मधे आणि रेल्वेच्या लोकल सेवेने मुंबईपासून तासाभराच्या अंतरावर. १९६५ – १९७० च्या सुमारास देखील डोंबिवली फार वेगळं होतं. त्यावेळी ते उच्चभ्रू, सुसंस्कृत लोकांचं, मुंबईच्या धकाधकीपासून दूर पण तरीही सोईस्कर अंतरावर वसलेलं असं एक छोटंसं वसतिस्थान होतं. गावाच्या सुसंस्कृत वातावरणाची साक्ष पटवण्यासाठी पु.भा. भावे आणि शं.ना.नवरे यांच्यासारखे दिग्गज साहित्यिक / नाटककार डोंबिवलीला आपलं घर मानून रहात होते.

    आजीच्या घरातून पाठीमागे भाताची शेती दिसायची. पुढच्या अंगणात पेरू, चिंचा, जांभूळ आणि पपईची झाडं होती. त्यामुळे घरची फळं खाण्याचा आनंद उपभोगला होता. आजीच्या घरापुढच्या रस्त्याच्या कडेलाच भाजीवाले, फळवाले टोपल्या घेऊन विकायला बसायचे. त्यावेळी डोंबिवलीत व आजूबाजूच्या खेड्यांमधे आगरी लोकांची वस्ती खूप होती. आगरी म्हणजे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी. कमरेला जेमतेम फडकी गुंडाळलेले आगरी पुरुष आणि चापूनचोपून नेसलेल्या रंगीबेरंगी लुगडयातल्या आगरी बायका कायम दिसायच्या. सगळे रापलेले आणि काटक. पुरुषांच्या कमरेला उघडे कोयते आणि बायकांच्या केसात भरपूर फुलं. काही आगरी बायका आजीकडे वर्षानुवर्षे घरकामाला होत्या. कुणी शेतातले तांदूळ घेऊन यायचं, कुणी वरी, तर कुणी करवंद. उन्हाळ्याच्या दिवसांत कलिंगड, टरबुजांनी भरलेल्या बैलगाडया घेऊन आजूबाजूच्या खेडयांतून आगरी लोक यायचे. आजीच्या घरासमोरच बैलगाडया सोडून बैलांना बांधून ठेवलं जायचं. या बैलगाडया घेऊन येणारे काही आगरी लोक आजीच्या चांगले ओळखीचे झाले होते. मग ते कधी कधी विकायला आणलेल्या कलिंगडांची रास आजीच्या घरातच लावून जायचे.

    आजीच्या घरासमोरचं अंगण मातीचं होतं. दर आठवडा पंधरवडयाने ते शेणानं सारवलं जायचं. समोरच्या रस्त्याच्या कडेला भाजीवाल्यांनी इतस्तत: टाकून दिलेला सडका भाजीपाला खायला गावातली भटकी गाई-गुरं यायची. ती कधी मधी आजीच्या अंगणात फुलझाडं खायला किंवा अंगणात वाळत टाकलेलं काही हुंगायला यायची. मग त्यांना आरडा ओरडा करून हुसकावून लावलं की मोठंच काम केल्यासारखं मला वाटायचं. शाळेतनं आलं की संध्याकाळी हुंदडतांना आसपास मोकाट गुरांचा वावर कायम असायचा. त्यातले काही सांड कधी कधी एकमेकांवर नाक फेंदारून आणि शिंगं रोखून चालून जायचे आणि त्यांच्या झुंजीमुळे सगळीकडे धुरळा उडायचा. आसपासचे लोक आरडा ओरडा करून, दगडं काठया मारून त्यांना पळवून लावायला बघायचे. मग तो सगळा गलका ऐकून आजी किंवा मामा धावत बाहेर यायचे आणि आम्हा मुलांना घरात घेऊन जायचे.

    त्याकाळी डोंबिवली गावाच्या थोडसं बाहेर गोग्रासवाडी म्हणून एक गोशाळा होती. आजूबाजूला भरपूर झाडी आणि शेतं असलेलं ते एक शांत आणि सुंदर ठिकाण होतं. कधीतरी काही सणानिमित्ताने किंवा केवळ सहलीसाठी आजी आणि आजूबाजूच्या बायका आम्हा मुलांना तिकडे घेऊन जायच्या. त्या श्रद्धाळू बायकांच्या देखरेखीखाली आम्ही मुलं त्या गाई वासरांना हिरवं गवत आणि गूळ खायला द्यायचो आणि त्यांच्या डोक्यावरून हात फिरवून नमस्कार ठोकायचो.

    माझ्या मामांना भटकण्याची खूप आवड. त्यामुळे शनिवार-रविवारी आसपासच्या खेडयांमधे, टेकडयांवर, खाडयांवर मामांबरोबर मी खूप भटकलो. कल्याण किंवा मुंब्र्याच्या खाडीवर जायचं, करवंदाच्या जाळीमधून फिरून करवंद खायची, शेतांच्या बांधांवरून चालायचं, पावसात भिजायचं हे सारं भरपूर केलं.
    एकंदरीत १९६० च्या दशकातल्या डोंबिवलीने मला एका छोटयाशा गावातलं स्वछंद बालपण उपभोगू दिलं. त्या निमग्रामीण वातावरणाचा रंग माझ्या नकळत माझ्या अंतरंगावर पक्का बसला आणि मग पुढे शहरी वातावरणाचे, रंगाचे, कितीही थर त्यावर चढले तरी तो मूळ निमग्रामीण वातावरणाचा गाभा काही पुसला गेला नाही.

    १९७१ साली आजोळ सोडून मी माटुंग्याला (मुंबई) आई वडिलांकडे रहायला आलो. दादरच्या बालमोहन विद्यामंदिर या मराठी माध्यमाच्या, त्या काळच्या मुंबईतल्या अग्रगण्य शाळेमध्ये पाचवीपासून शिकू लागलो. दादासाहेब रेग्यांसारख्या (मुलांसाठी “दादा”) शिक्षण महर्षींनी सुरू केलेल्या या शाळेने, मराठी माध्यमाची कास धरून, मध्यमुंबईतल्या कमीत कमी दोन पिढयांवर शुद्ध मराठी मध्यमवर्गीय संस्कार केले.

  • शान्त समईत जशी वात

    शान्त समईत जशी वात,
    तशी समाजात स्त्री जात,
    जळून जळून प्रकाश देत,
    क्षणिक फक्त मोठ्या होत,--!!!

    पणतीची ज्योत तशी,
    आमुची ही असे जात,--
    जगच छोटे भोवतालचे,-- स्वयंप्रकाशी मोठे करत,

    लामणदिव्यात उर्जास्त्रोत, रात्रंदिनी सारखे *अविरत,
    मंद असूनही सतत, कार्यरत, भोवताली प्रकाश पसरवत,--!!!

    नंदादीपातील जशी ज्योत,
    स्त्री तशी तिच्या संसारात,
    हळूहळू अगदी तेवत,--!!!
    दुसऱ्याला प्रकाशमान करत,--!

    निरांजनातील छोटीवात, संसारासाठी उभी राहत,
    सारखे सारखे पहा जळत,
    स्वतःला ओवाळून टाकत,--!!!

    निमूट उभे राहणे,
    खंबीर अचल होणे,
    स्वतः चटके सोसत,
    भोवताल उजळून टाकणे,--!!!

    अंधारावर मात करत करत,
    काळ्या तमास नष्ट करणे,
    आपले स्त्रीत्व साकारत,
    प्रकाश-कारणे झिजणे,--!!!

    असे झिजत झिजत,
    पुढे वाटचाल करणे,--
    वाऱ्यावादळांतही पुरत्या,
    जिद्दीने पुन्हा फडफडणे--!!!

    जो येई तो हात लावी,
    धक्के सहत राहणे,
    वेदनांनी तडफडत,
    आपुले तेज सांभाळणे,--!!!

    कुणी धरू पाहे ज्योत"",
    त्यास धीराने सामोरे जाणे,
    वेळीअवेळी चमकत, चमकत
    आपली अस्मिता जपत राहणे,-!

    कणाकणाने पळापळाने,
    जिवांत जीव आहे तोवर, उभे-आडवे, जळत राहणे,
    मग तेजाचावसा,दान देणे,--!!!

    ज्योतीने ज्योत पेटवीत,
    मगच संपत संपत जाणे,!--
    उजेडाच्या वाटेअंती, *ज्योतिर्मय श्वास सोडणे,!

    हिमगौरी कर्वे.©

  • मोहमाया दलदल

    दलदल होता चिखल मातीची, पाय जाती खोलांत
    प्रयत्न तुमचे व्यर्थ जाऊनी , न होई त्यावर मात...१,

    सावध होवूनी प्रथम पावूली, टाळावे ते संकट
    मध्यभागी तुम्ही शिरल्यानंतर, दिसत नाही वाट....२,

    मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली
    चुकूनी पडतां पाऊल तुमचे, खेचला जातो खाली...३,

    जागृतपणाचा अभाव असतां, गुरफूटूनी जातो
    मोहमायेच्या आकर्षक गुणाला, बळी तोच पडतो....४,

    वेगवान त्या जीवन प्रवाही, खिळ बसे मोहाने
    क्षणीक सुखाच्या मागे जातां, दु:खी होई जीवने....५

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • जखमी होऊन पिल्लू पडले

    जखमी होऊन पिल्लू पडले, घायाळ, केविलवाणे, करुण आवाजी साद घाले,
    आईस बोलावे सारखे,

    पक्षीण भोवती घिरट्या घाले, चोचीने त्यास गोंजारी,
    कळेना तिला काय जाहले,
    कसे पडले ते खाली ,--?

    करूण साद ती ऐकून कोणी,
    धावत आला दयावंत,
    अती गरीब असूनही,
    पक्षिणीस भासे देवदूत,

    हळुवार हाते पिल्लाला,
    जवळ घेऊन कुरवाळी,
    साशंक मनाने पक्षीण मात्र,
    सारखी हिंडे भोवताली,

    नाजुकशा स्पर्शाने जाणवे,
    ‌इवल्या पिल्लाच्या शरीरी,
    दिसे,-- कांटा रुतलेला,
    बघून कोवळ्या पिल्लाला,
    त्यांतील होई देव जागा,--!!

    पिल्लू सारखे वेदनेने,
    तडफडून रडत असे,
    पक्षीण घायाळ जखमेवाचून,
    तो असहाय्य जीव असे,--!!!

    प्राण तिच्या डोळ्यात सारे,
    डोळ्यातूनच बोलत असे,
    येई कींव दयावंता,
    बाजूस करे तो काटा,
    वर लावी औषध त्याला,
    विचार केवढा मोठा,--!!!

    घेऊन जाई घरी पिलास,
    पक्षीण येत असे पाठी,
    पिल्लू ठेवले कापसात,
    उपचार करण्यासाठी,

    पक्षीण येई रोज तेथे,
    करत मुक्त संचार,--!!!
    घास पिल्लाला भरवे ,
    आता भरोसा तिला फार,

    खूप काळ मध्ये जाई,
    पिल्लू तिथल्या तिथे हिंडे,
    आईस बघून तेवढे ,
    उडण्यास सज्ज होई,--!!!

    एक दिवस आला असा,
    पिल्लू घरातल्या घरात उडे,
    पक्षीण घेऊन जाई त्याला, मानवतेचे देणे केवढे,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • गोळा-बेरीज (माझी लंडनवारी – 36)

    ऑफिस रूटीन नेहमीप्रमाणे चालू होते. पहिल्याच आठवड्यात मी अल्पर्टनला जाउन तिथलं सिम घेतलं होतं. त्यामुळे आता माझ्याकडे मोबाईल होता. हळू हळू तिथे आसपास राहणाऱ्या आणि आमच्या कलिग्ज् बरोबर काम करणाऱ्या इतर लोकांशी, कुटुंबीयांशी ओळखी झाल्या.

  • तुझे तुलाच अर्पण !

    तुझेच घेऊनी तुलाच द्यावे, भासते ही रीत आगळी ।
    उमजत नाही काय करावे, तुझीच असतां सृष्टी सगळी ।।१।।

    वाहणाऱ्या संथ नदीतील, पाणी घेऊन अर्घ्य देतो ।
    सुंदर फुले निसर्गातील, गोळा करुन चरणी अर्पितो ।।२।।

    अन्न ग्रहण करण्यापूर्वी, नैवेद्य तुजला दाखवितो ।
    जगण्याचा तो मार्ग दोखवी, ह्याचीच पोंच आम्ही देतो ।।३।।

    विचार ठेवूनी पदोपदीं, साऱ्यांचा तूं असशी मालक ।
    दुजास देण्यातील आनंद, हाच मिळवित असे एक ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • विश्वामित्राची देणगी

    विश्वामित्राची देणगी छम छम बाजे पैंजण माझे मी अप्सरा स्वर्गाची देवलोकींच्या राज्याची ।। धृ ।।

  • डाग!

    कितीही देशी शीतल चांदणे
    आनंदाचा ठरुनी मेरुमणी
    काट्यापरि हा मध्येंच बोचतो
    डाग तुझा लक्ष्य खेचूनी

    ठाऊक नाहीं कधीं कुणाला
    कसा लागला डाग उरीं
    पडला असेल चुकून देखील
    कुणी रंग उधळतां वेड्यापरि

    शुभ्रपणाचा मानबिंदू हा
    डागरहित जीवन त्याचे
    केवळ एका डागापायीं
    सत्य झांकाळते कायमचे

    मिटून जातां डागही मिटतो
    उरते मागें सत्य तेवढे
    परि पुसण्यासाठी डाग एक तो
    मिटणे उपाय जहाल केवढे

    जोवरि जीवन चंद्रा तुझे
    डाग दिसेल माथ्यावरचा
    दुग्धामृताच्या घटांमधला
    असेल थेंब तो विरजणाचा

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com