(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • राजमाता कैकयी

    अकारण कां नांवे ठेवता सदैव कैकयीला ।
    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला ।।धृ।।

    जेव्हां दशरथ युद्धास जाई ।
    कैकयी त्याच्या सेवेत राही ।।
    राजनीति अन् युद्धनीति ही ।
    अवगत झाली सारी तिजला ।।१।।
    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला

    नजीकच्या त्या देशामधूनी ।
    रावणादी असुरी शक्ती वाढूनी ।।
    सामान्य जनाला जर्जर करुनी ।
    हा हाः कार तो माजविला ।।२।।
    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला

    परिस्थितीला जाणून घेतां ।
    केवळ चौदा वर्षाकरीता ।।
    राम वनी तो पाठवी माता ।
    तोड नसे त्या दूरदृष्टीला ।।३।।
    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्हीं राजमातेला

    माता आणि राजधुरंदर ।
    दुहेरी भूमिका ही शिरावर ।।
    निर्णय घेऊनी अतिशय खडतर ।
    इतिहास जिने घडविला ।।४।।
    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला

    रावणवृत्ती महा असूरी ।
    नष्ट केली तिनेच खरी ।।
    मार्ग निवडले जरी कांटेरी ।
    यशस्वी केले रामप्रभुला ।।५।।
    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला

    धाडीला नसतां राम वनीं ।
    मारीला असता रावण कुणी ?
    स्वतःचे शिरीं कलंक घेवूनी ।।
    धरणीवरचा पाप भार रोकला ।।६।।
    चित्त देवूनी समजूनी घ्या तुम्ही राजमातेला

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • देख तो दिल कि जाँ से उठता है

    प्रेम आणि जळण्याचे एक जळजळीत नाते उर्दू गझलांमध्ये वारंवार दिसून येते. प्रेम म्हणजे उजळणे आणि उजळण्यामध्ये जळणे आलेच. अशा प्रेमात जळून उजळलेल्या व्यक्तींपैकी एक म्हणजे मीर तकी मीर. मीर तकी मीर हा अतिशय दर्दीला शायर म्हणून विख्यात आहे. प्रेमविव्हल जिवांचे वर्णन करण्यात त्याचा हात कुणी धरू शकत नाही. प्रेमात जळालेल्या एका जिवाची कथा मीर या नग्म्यातून मांडतो.

  • प्रेमाचा निर्मळ झरा

    शब्दांच्या मायावी सागरात
    मुक्त पणे विहरावे...
    उपहासाच्या लाटांना
    हलकेच शिताफीने चुकवावे
    अंतर्मनी विश्वासाचा
    रहावा कायम खोलावा
    विरहाचा खोल भोवरा...
    अलगद पणे चुकवावा
    आनंदाच्या तुषारांनी
    रोमांचित होउन उठावे
    अपमानाचे ते शिंतोडे...
    अलगद पुसून काढावे
    उन्मादाच्या फेसाळ बुडबुड्यास
    व्यर्थ हवा नाही द्यायची
    अहंकाराच्या दगडाची ठेच...
    तटस्थ पणे चुकवायची
    कौतुकाच्या वर्षावांनी
    हर खुन बहकुन नाही जायचं
    वादळी आरोपांच्या कणांनी
    घायाळ नाही व्हायचं
    दुःखाच्या ओल्या वाटांवर
    जरा सावरुन चालायचं...
    वैफल्याच्या शेवाळावरुन
    घसरून नाही पडायचं
    संतापाच्या त्या महापुरानं
    विध्वंस न करता सरावे
    अन् भावनांच्या धबधब्याने
    जख्मी न होता पडावे
    मुक्त बेधुंद वाहताना
    वसा शिस्तीचा नाही सोडायचा
    काठावरचा मायेचा ओलावा...
    नाही कधी वाळु द्यायचा
    मनातील कपटाचा
    सद्-भावनांनी निचरा व्हावा
    अंतरी सदैव प्रेमाचा
    निर्मळ झरा वाहत रहावा...

    - डॉ. सुभाष कटकदौंड

  • मन भारावते

    पाऊस येता मन जाते भाराऊनी
    सृष्टीचे रुप जाते हिरवेगार होऊनी
    अनेकांच्या मनातले विचार पाऊस घेतो जाणूनी
    म्हणूनच ती गाणे गाते संगीतमय होऊनी

    तृप्त होते जीवसृष्टी मातीचा गंध घेऊनी
    पण हाच पाऊस कधी कधी जातो काळ बनूनी
    चातकालाही आवडे पाऊस भारी
    तो थकतो पावसाची वाट बघूनी

    समुद्र जातो खवळूनी
    किनाऱ्यावरील लोक जीव मुठीत बसतात धरुनी
    लहान मुले लुटतात मजा पावसात खेळूनी
    धबधबाही खेळतो हिरव्यागार सृष्टीतूनी

    वाट पाहते तुझी डोळे भरुनी
    पण जीवसृष्टीला नको टाकू रडवूनी

    - भाग्यश्री सतीश प्रधान

  • पराधिनता

    अटळ दान, जीवा मृत्यूचे
    त्याला कधीच घाबरू नये

    सात्विक, वात्सल्यामृताचे
    कधीच विस्मरण होऊ नये

    प्रीतभाव! उर्मी स्पंदनांना
    त्याचा तिरस्कार करू नये

    भोग भाळीच्या दुष्टचक्रांचे
    भोगता, ईश्वरा विसरु नये

    जन्ममरण! सत्य चराचराचे
    असत्य! कधीच समजू नये

    पराधिनता, हा जन्म मानवी
    देह! अमर्त्य कधी समजू नये

    विवेकी! सदा सत्कर्म करावे
    आविचार, मनांतरी करू नये

    स्मरावे! कृपावंती दयाघनाला
    अश्रद्धा! त्यावर कधी ठेवू नये

    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)

    9766544908

    रचना क्र. २७.

    २७ - १ - २०२१.

  • पाऊस

    पाऊस असा हा पडताना
    वर्षाव, आठवांचा होतो
    बरसणाऱ्या सरिसरितूनी
    तू बिलगल्याचा भास होतो
    स्मरते, अजुनही ती पिंपर्णी
    अंतरी मी चिंब भिजुनी जातो
    पाऊस असा हा पडताना
    तुझा, गंध बकुळी दरवळतो
    रिमझिमता भावनांच्या स्मृती
    अंतरास, आजही मोहर येतो
    पाऊस असा हा पडताना
    तुझ्याच, आठवात मी दंगतो
    पाऊस,असा हा पडताना
    गड़गडाट, गतस्मृतींचा होतो
    मनभावनांची, ओढ़ अनावर
    जीव, व्याकुळ होवूनी जातो
    -- वि.ग.सातपुते.(भावकवी)
    9766544908
    रचना क्र.१२६.
    २९ - ४ - २०२२.
  • ये ज़वळ बस (स्मृतिकाव्य)

    ‘ये, जवळ बस’ म्हणालीस तूं,
    मी बसलोही
    क्षीण तुझा कर करीं घेउनी
    सुखावलोही .
    नव्हतें माहित, ‘उद्या’ परंतू
    काय व्हायचें होतें
    ‘उद्या’च येथुन कायमचें तुज
    दूर ज़ायचें होतें.

    - - -
    ( दिवंगत प्रियपत्नी डॉ. स्नेहलता
    हिच्या आठवणीत )

    -- सुभाष स. नाईक

  • पुण्ण्याचा साठा

    खिशांत माझ्या पडली होती,
    सुटी नाणी काही,
    वस्तूंची ती खरेदी करण्या,
    सर्व बाजार पाही ।।१।।

    सराफ्याच्या दुकानी दिसला,
    एक हिऱ्याचा हार,
    डोळे माझे चमकूनी गेले,
    फिरती गरगर ।।२।।

    दाम विक्रीचे जाणूनी घेता,
    हताश मी झालो,
    हातातील धनाचे मोजमाप,
    करू मी न शकलो ।।३।।

    दोन वेळची पूजा करूनी,
    जप माळ जपती,
    खूप साचले पुण्य आपले,
    हे कांहीं समजती ।।४।।

    कसा मिळेल ईश्वर त्यांना,
    तपोबलाच्या अभावी,
    जन्मोजन्मीचे पुण्य साचता,
    दर्शन मिळे प्रभावी ।।५।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • काहीही झालं तरीही….

    काहीही झालं तरीही....
    लोकलची गर्दी कमी होणार नाही....,.

    कितीही कायदा कडक केला तरी.....
    सरकारी कर्मचाऱ्यांच लाच घ्यायच कमी होणार नाही...

    कितीही जागृती अभियान राबवले तरीही...
    सुशिक्षितांचा मतदानाचा "आळस" कमी होणार नाही....

    प्रामाणिकपणे भरगच्च कर भरला तरीही ...,,
    सरकारकडुन करांचा छळ कमी होणार नाही...

    कितीही लांब जायच झाला तरीही.., .,,
    स्त्रियांच्या मेकअपची वेळ कमी होणार नाही..

    लग्न होऊन भरपुर वर्षे झाले तरीही....
    पत्नींशी खोट बोलायची सवय पतीची कमी होणार नाही...

    सत्ताधारींनी कितीही राज्यात विकास केला तरी.....
    विरोधकांचे जातीय राजकारण कमी होणार नाही..

    भारतीय आर्मीने मुस्लिम दहशतवाद्यांना ठेचुन कंठस्नास घातले तरीही.....
    पाकिस्तान दहशतवाद्यांच्या भारतातील कारवाया कमी होणार नाहीत.....

    R.T.O कडे रिक्षाचालकांच्या कितीही तक्रारी केल्या तरीही..
    या रिक्षाचालकांची मस्ती व मुजोरपणा कमी होणार नाही.....

    बघाना....
    आपले कितीही कामे अडली असले तरीसुद्धा ...
    सतत "अॉनलाईन" राहणे कमी होणार नाहीच...

    -- विवेक जोशी

  • दुःख कसे विसरलो

    काय केले दुःख विसरण्याला
    मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला ।।धृ।।

    निराशेच्या काळांत
    दुःख होते मनांत
    हार झाली जीवनांत
    शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला ।।१।।

    मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला
    चूक राई एवढे
    दुःखाचा पर्वत पडे
    मनीं पश्चाताप घडे
    भोग भोगण्या, झालो तयार ।।२।।

    मुक्ति जमली नामीं आनंद आणण्याला

    एकाग्र चित्तांत
    जातां ध्यानांत
    डूबता आनंदात
    विसरुन गेलो जगाला ।।३।।

    मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला

    सारी ऊर्जा जाई
    ध्यानांत एकरुप होई
    त्यांत ईश्वर पाही
    ऊर्जा शिल्लक न राही, दुःख भावनेला ।।४।।

    मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com