(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • भोक

    तुझ्या भिंतीवर मारला खिळा
    आणि पडला भोक तिला...
    त्या भोकातून पाहिले तुला
    पण दिसला चंद्र मला...
    त्या भोकाला लावला डोळा
    तेंव्हा दिसला काळोख मला...
    त्या भोकातूनच मग भिडला
    तुझ्या डोळ्याला माझा डोळा...
    त्या भोकातून पाहिले तुला
    तुही मग पाहिले मला...
    त्या भोकावर टांगले मला
    तुही मग टांगलेस तुला...
    त्या भोकातून दिले तुला
    तुही दिले प्रेम मला...
    त्या भोकाने धोका दिला
    एका धक्काने मोकळा झाला...
    प्रेमाचा मार्ग भोकात गेला
    आपले प्रेम इतिहास झाला...

    © कवी – निलेश बामणे (एन.डी.)

  • रसिक हो

    कौतूक करिती प्रियजन आपले ते
    मन तेंव्हा किती हो भरूनी पावते ।।
    नवनिर्मितीस नेहमी प्रेरणा मिळता
    मनात नवी उमेद सतत जागते ।।
    सभोवती आपल्या असणे पारखी
    या सारखी समाधानाची गोष्ट नसते।।
    रसिकांच्या कौतुकाची पावती ही तर
    कलावंत मनास नेहमी हवी असते ।।
    नशीबवान असतात कलाकार असे
    ज्यांचे रसिकांशी नाते जुळत असते ।।
    शब्द -सूर जुळता संगीत रचना होते
    रसिक मनासाठी ही अनुभूती असते
    -- अरुण वि. देशपांडे
  • तुला जमलं नाही सहज

    तुला जमलं नाही सहज
    नाजूक भावनांना फुलवणे
    जमलं फक्त तुला सहज
    रागाने अवचित मला बोलणे..
    मिठीतल्या गोड भावना
    तुला कळल्या नाही
    रागाच्या बोलण्यावर तुला
    दुसरं काही दिसलं नाही..
    तुला सोडवता आला नाही
    मधुर नाजूक मनाचा गुंता
    मला मात्र मिळाला अलगद
    वेदनेचा काटेरी ओला कोपरा..
    हवे तेव्हा मी समीप हवे तेव्हा लांब
    तुला सगळं सहज सार हे जमलं
    मनाचा विचार न करता तुला
    ब्लॉक करणं ही हलकेच जमलं..
    भावनासाहित मात्रेचा गंध
    तुला कळला कधीच नाही
    नाजूक गुंता झाला मोहाचा
    कोष हा गुंतलेला तुला सुटला नाही..
    हवे तेव्हा बोलून तोडले
    हवे तेव्हा रागाचे शब्द दिले
    अलवार तरल हळुवार अर्थांचे
    शब्द तुला न कधी समजले..
    झटकून टाकावे झटक्यात
    तसे तू दूर दूर झटकले
    दुःख एकच उरले अंतरी
    घाव वर्मी नाहक मिळाले..
    गोड नाजूक भावनांची
    ओढ तुला कळली नाही
    वेदना मिळाल्या बोलून
    तरी वीण तुला कळली नाही..
    खेळच झाला भावनांचा
    मनही तुला कळले नाही
    सगळे खोटे वाटले तुला
    मोहक गुंतणे तुला कळले नाही..
    शांत ओढ प्रीत सरितेची
    सागरास न खुणा कळल्या
    केशरी सांज सरणारी मधुर
    बंध मोहक तू अलवार तोडला..

    -- स्वाती ठोंबरे.

  • सोनं येचितो मातीत….

    सोनं येचीतो मातीतं....

    सोनं येचतो मातीतं...
    संगणीच्या संगतीतं...
    मोती घामाचे पिकवितो...
    काळी मायच्या कुशीतं....

    पशु पक्षी वृक्षवल्ली
    काळ्या मायची लेकरं
    सार तिच गणगोतं
    तिलं सृष्टीचा संसारं....

    पिकं शेतात डोलते
    पाना फुलांनी सजते
    फुले काळीज बळीचं
    मनं हारखुन जाते.....

    मका पोटुशी पोटुशी...
    डोकं जवारी काढते...
    गहु मिशांना ताविते...
    फुलं सुर्याच डोलते...

    पक्षी झाडाशी बोलती,
    गाय गोठ्यात हंबरी,
    मह्या शेतातली शाळा,
    मलं ईथच पंढरी........!!!

    ©गोडाती बबनराव काळे
    लातुर
    ९४०५८०७०७९

  • आम्ही कायस्थ

    आम्हास नाही तमा,
    संपत्तीची अन सत्तेची
    जोपासली आहेत आम्ही,
    नाती निष्ठेची अन् भक्तीची

    शिवरायांचा जाज्वल्य अभिमान,
    पाहिला अन् अनुभवलाही
    म्हणूनच आमच्यातही आम्ही जसाच्या तसा
    भिनवलाही अन् जपलाही

    कुलदैवतांच्या कृपेने आणि बुद्धीच्या जोरावर
    आम्ही अनेक अवघड गणिते
    सोडविली
    सत्तेची, राजेशाहीची धुरा
    आम्हीही सांभाळली

    इतिहास घडविला आम्ही
    तेजस्वी लेखणीने आणि तलवारीनेही
    विविधरंगी कलांनी
    जीवनेही रंगविली आम्ही

    आमचे शौर्य, स्वाभिमान, बुद्धीमत्ता
    आणि हो आमची खाद्यसंस्कृती
    सारेच कसे भारदस्त,
    आणि आगळेवेगळे मस्त !

    काय वर्णावी चव
    खिचडीची
    बिरठ्याची अन् कोलंबीच्या
    आजही चवीने मजा लुटतो आम्ही
    निनाव्याची अन् कानवल्यांची !

    आम्हास अभिमान आहे
    आमच्या जातीचा अन् मातीचा
    आमचे अस्तित्व अबाधित आहेच
    हा दावा आहे आम्हा कायस्थांचा !
    हा दावा आहे आम्हा कायस्थांचा !!

    सौ. मृणाल महागांवकर, महाड

  • मेघ गर्व हारण

    अंहकाराचा पेटून वणवा, थैमान घातिले त्या मेघांनी

    तांडव नृत्यापरि भासली, पाऊले त्यांची दाही दिशांनी...१,

    अक्राळ विक्राळ घन दाट, नी रंग काळाभोर दिसला

    सूर्यालाही लाजवित असता, गर्वपणाचा भाव चमकला...२,

    पृथ्वीवरती छाया पसरवूनी, चाहूल देई आगमनाची

    तोफेसम गडगडाट करूनी, चमक दाखवी दिव्यत्वाची...३,

    मानवप्राणी तसेच जीवाणे, टक लावती नभाकडे

    रूप भयानक बघून सारे, कंपीत त्यांची मने धडधडे...४,

    त्याच वेळी वादळ सुटूनी, देह घनाचा टाकी विखरूनी

    गर्व हरण होऊन जाता, अश्रू पडती नयनामधूनी....५

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • अहंकार

    लाभले असता सर्व काही..
    त्याची कधी मोजदाद केली नाही..
    जे थोडेसे काही मिळाले नाही..
    त्याची मात्र मोजणी थांबली नाही..।।..१

    मन मोकळे कधी ठेवले नाही..
    फक्त स्वानंदात रमलो..
    मी , फक्त मीच एकटा सर्वज्ञ..
    हा अहंकार कधी सोडला नाही..।।..२

    काय म्हणावे अशा प्रवृत्तीला ?..
    अरे झाडा सारखे जीवन असावे..
    जे जे आहे , ते ते सर्व देत रहावे..
    सर्वांती उमजावे , इथे आपुले काही नाही..।।..३

    ©️वि.ग.सातपुते.( भावकवी)

    9766544908

    रचना क्र.५२ / ६-४-२०२१.

  • अदुबाळा

    ये अदुबाळा ये लडिवाळा
    माझ्या प्राजक्ताच्या फुला
    आसुसतो मी, आतुरतो मी
    तुझ्या गोड, बोबड्या बोला

    लावतात लळा मला
    तुझ्या लडिवाळ लीला
    पाहून तुझा गोजिरवाणा चाळा
    ओंजारण्या तुला, गोंजारण्या तुला
    उचंबळून येतो जीवाचा जिव्हाळा

    नाजूक साजूक मोहक क्षणांचा
    या भरवावा आनंदमेळा
    उधळावे आयुष्याचे संचित
    त्यावरुन ओवाळून गोळा

    - यतीन सामंत

  • संगीत सुर्य

    गदीमा आणी बाबुजींनंतर
    रामायणातील गीत संपले
    भावमधुर त्या भावगीतातील
    भावनांचे अस्तित्व संपले ।

    बाबुजीं नंतर पुन्हा एकदा
    भावगीत ते स्तब्ध जाहले
    देण्या संगीत स्वर्गलोकी
    संगीतसुर्य यशवंत निघाले ।

    संवादिनी ती तानपुऱ्यासह
    आज अश्रु ढाळीत आहे
    ताल हरवलाय आज तबल्याचा
    विणा सरस्वतीची अबोल आहे ।

    भाव मराठी भावगीतातील
    आज गेले आहेत हरवूनी
    गायकांच्या मधूर गळ्यातील
    सूरही आज बसले रुसूनी ।

    वाटते त्या संगीत सुर्यांनी
    जन्म घ्यावा येथे फिरुनी
    पुन्हा एकदा सजवावी मैफील
    गंधर्व लोकीच्या त्या सप्तस्वरांनी ।

    -- सुरेश काळे
    मो. 9860307752
    सातारा.
    ३० आक्टोंबर २०१८

  • नाम मार्ग

    ईश्वर आहे नामांत परि, नाम कुणाचे घेता?

    विठ्ठल हरि पांडूरंग वा अल्ला येशू असतां ।।

    असंख्य त्याची नामे असतां एकच आहे भगवान ।

    कांहीही म्हणता येईल तो, त्याची करीतां आठवण ।।

    आठवणीतच तो लपला आहे, दिसत नाही कुणा ।

    रुप कुठलेही स्मरा, दिसेल तुमच्या नयना ।।

    रंग रूप आणि आकार देणे, असते सोई साठी ।

    एकाग्र करण्या चंचल चित्ता, सारे कामी येती ।।

    निर्गुण निराकार भासतो, एकाग्र होता चित्त ।

    नाम मार्ग हे लय आणूनी, हेच असते साधीत ।।

    डॉ. भगवान नागापूरकर