(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

  • येतात तुझे आठव

    येतात तुझे आठव,
    डोळ्यांत काळे ढग,
    उरांत फक्त पाझर,
    शिवाय नुसते रौरव ,--!!!

    येतात तुझे आठव ,
    होते सरींची बरसात,
    चित्तात उठे तूफान",
    मनात चालते तांडव,--!!!

    येतात तुझे आठव,
    प्रीतीचे हे संजीवन ,
    स्मृतींचे मोठे आवर्तन,
    त्यांचे लागती न थांग,---!!!

    येतात तुझे आठव,
    सरींची त्या उधळण,
    शब्दांचे पोकळ वाद,
    कल्पनांचे नुसतेच डाव,--!!!

    येतात तुझे आठव,
    अश्रू असूनही शुष्क,
    मन मात्र पाणथळ,
    कसानुसा होई जीव,--!!!

    येतात तुझे आठव,
    भोवती दुःखाची पाचर,
    सहवासाचे अमृतथेंब
    , कधी बनती विष:कण,--!!!

    येतात तुझे आठव,
    प्रेमाचे निव्वळ भास,
    आत्म्यात फक्त उलघाल,
    काट्यांची बनते शेज,--!!!

    येतात तुझे आठव,
    कधी येईल राघववेळ,
    कुशीत तुझ्या शिरून,
    संपवेन दुर्भाग्याचा खेळ,--!!!!

    ©️ हिमगौरी कर्वे.

  • वेडी

    रस्त्यावरती उभी राहूनी, हातवारे ती करित होती

    मध्येच हसते केंव्हां रडते, चकरा मारीत बसे खालती...१,

    गर्दी जमली खूप बघ्यांची, कुत्सीतपणे न्याहळू लागली,

    'शिपाई आणा जावूनी कुणी', ठाण्यात नेण्यास सांगू लागली...२

    जीवनातील दु:खी चटका, सहनशक्तीचा अंत पाहतो,

    मनावरील तो ताबा सुटूनी, वेडेपणा हा दिसून येतो...३

    इतकी गर्दी जमून कुणीही, तिच्या मनीचा ठाव न जाणला

    रूख रुख वाटली ती बघोनी, सहानूभुती शून्य समाजाला...४

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • सदैव नामस्मरण

    प्रभूनाम मुखीं होते रामतिर्थांच्या सदा ।

    ऐकू आले तेच निद्रेत असता एकदा ।।

    चमत्कार दिसून आला एके दिवशी ।

    राम नामाचे ध्वनी उमटती देहापाशी ।।

    विज्ञानाने उकल केली या घटनेची ।

    खात्री करिता सत्यता पटली याची ।।

    चेतना मिळता स्वर यंत्रात ध्वनी उमटे ।

    त्याच ध्वनीच्या विद्युत लहरींनी शब्द फुटे ।।

    शब्दांचे वलय फिरती देहाभोवती ।

    शरीरासाठी तेच शब्द कवच बनती ।।

    जेव्हां होते नामस्मरण प्रभूंचे सतत ।

    शब्द ध्वनी लहरी निघत असे अविरत ।।

    हुंकार तसाची ऐकू येई देहां जवळी ।

    निद्रेमध्ये जरी असला मेंदू त्या वेळी ।।

    सदैव नामस्मरण चेतना देत राहतो ।

    रामतिर्थांच्या अनुभवांनी हेच अनुभवतो ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५९

  • भोग प्रारब्धाचे

    सारेच भरभरून आहे
    हवे तेच लाभले नाही
    जीव हा व्याकुळलेला
    जीवास स्वास्थ्य नाही।।१।।

    श्रद्धेत विश्वास नाही
    दगडातही, देव नाही
    वेड्याच साऱ्या आशा
    जीवनास अर्थ नाही।।२।।

    अस्तित्व! सारेच शून्य
    असे जगणेच विमनस्क
    कितीदा ? कसे सावरावे
    हवे तेच लाभले नाही।।३।।

    हव्यास हा जगण्याचा
    आज सारा व्यर्थ आहे
    निष्ठुर भोगणे प्रारब्धाचे
    त्याविण मुक्तता नाही।।४।।

    मनेच आज दुभंगलेली
    वोखट्याच प्रीतभावनां
    स्वार्थात, गुरफटलेल्या
    निस्वार्थ प्रीतभाव नाही।।५।।

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908.

    रचना क्र. ६.

    ६ - १ - २०२२.

  • खरेखुरे समाधान

    मी, मीच एक, सारेच माझे
    मीच आहे म्हणुनी सारे आहे

    मी सर्वज्ञ,सारेच मला कळते
    मीच फक्त जगी प्रज्ञावंत आहे

    हाच अहंभाव कशाला फुका
    जिथे मीत्व ते सारे व्यर्थ आहे

    चौदा चौकडयाचेही राज्य गेले
    उमज मनी, तूच रे कोण आहे

    सोडूनी द्यावे, मनीचे हेवे दावे
    त्यातची खरेखुरे समाधन आहे

    वाचे नम्रत्वे वदुनी जगी जगावे
    कृतज्ञता! जगतीच श्रेष्ठ आहे

    जपावीत मने सर्वांचीच संसारी
    हाच मोक्षानंदाचा मूलमंत्र आहे

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. ९४.

    २६ - ३ - २०२२.

  • दुष्टपणा

    दगड टाकतां पाण्यावरी, तरंगे त्याची दिसून आली

    दगड होई स्थीर तळाशी, बराच वेळ लाट राहीली...१,

    जेव्हा कुणीतरी क्रोध करी, वातावरण दूषित होते

    क्रोध जातो त्वरीत निघूनी, दूषितपणा कांहीं काळ राहते...२,

    निर्मळपणा दिसून येई, स्थिर होवून जातां जल

    पुनरपि पडता खडा क्रोधाचा, सारे होवून जाते गढूळ...३,

    स्थिर होण्यास वेळ लागतो, गढूळ होई क्षणांत

    मन जिंकणे कठीण असता, वैमनस्य ते सहज होत...४

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • सलामी

    कोण भोंगळा,कोण वंगळा,
    कुणी कुणाला हिन लेखे,
    माळेमध्ये एकशे आठ मनी,
    एकशे नववा कुठं बसे....!!!

    गोड कडुनिंब,रेशमी बाभळी,
    आम्रवृक्षाला कोण पुसे,
    अनैतीक मितही नैतीक बनती,
    डोळ्यापुढे जेंव्हा सत्ता दिसे....!!!

    विचारधारा, विवेक विवेक,
    राततुनं तं,बापय नं दिसे,
    विवेक,विचार,विकास,प्रकाश
    सत्तेपुढे ते उणे असे..!!!

    आधी धर्म मग जाती पाती,
    पाहुणे राव्हुणेबी ईथे चालती,
    विवेक लपतोय निबीडं अंधारी
    लबाडं ढोंगी थयथय करती...!!!

    सत्तासुंदरी बनली बंदरी ,
    मदारीचं मदारी,चोहिकडे,
    छाताडावरं पाय ठेऊनी,
    थयथय नाचतं,खेळ चले...!!!

    उठ गड्या तु जाग झोपेतुनी
    फेक झुगारूनी पाश गुलामी
    समता,बंधुता,विवेक,जागवूनं,
    नव्या युगाला दे सलामी......!!!

    ©गोडाती बबनराव काळे
    9405807079

  • सागर- किनारा

    सागर किनाऱ्याच्या नात्यामध्ये ,
    एकदा झाला मोठा वाद,
    सागराचे रौद्र रूप पाहूनी,
    किनाऱ्याने दिलीच नाही साद…

    फेसाळलेल्या लहरी मधुन,
    तो ओकत होता आग,
    सूर्य गेला समजवण्यास ,
    पण तोही झाला बाद…

    खवळलेल्या लाटांनी मग,
    मस्तक आपटले किनाऱ्यावर,
    हळूच वरती पाहुनी,
    शिंपडले पाणी सूर्यावर…

    शेवटी चमचमत्या चांदण्यांचं,
    आकाश आले भेटीला,
    सुंदर शांत संध्या,
    होती त्यांच्या जोडीला…

    आक्रोश करून सागराने ,
    शेवटी स्मित हास्य केलेच,
    दूर दृष्टीस गाभाऱ्यातील,
    प्रीत मंदिर दिसले,
    प्रीत मंदिर दिसले…

    – श्र्वेता संकपाळ

  • सुरां – सुरांचे गीत व्हावे

    सुरां - सुरांचे गीत व्हावे,
    अर्थवाही शब्दातुनी,
    भावनांची गोड पखरण,
    मंजुळ तराणे नादातुनी,--!!!

    काळजाचा ठांव घेत असे, स्वाभाविक त्या गानातुनी, आलापातुनी अगदी अल्लद ,
    स्वर्गीय गान निर्मितसे,--!!!

    शब्द होती जिवंत केवढे,
    संगीत वाहते निर्झरापरी,
    सुरेल बनत आरोह अवरोह,
    अंतिम ते हृदयस्पर्शी गाणे,--;!!

    सूर लागता भान हरपतसे
    डोहातून त्या तरंग उठती ,
    स्वरमयी ती विलक्षण थरथर,
    अंतरातुनी अगदी पार जातसे,--!!!

    ताल-नादांच्या विश्वामध्ये, सुखदुःखे मागेच पडती,
    आनंदाचे अविरत निधान,
    थेट आत्म्याशी संवाद साधे,--!!!

    माना -पानाच्या कल्पनांचे,
    बुडबुडे आत आत विरती,
    अहमभावाचे मोठे अडसर,
    गानकला धुळीस मिळवती,--!!!

    जसे सापडती मार्ग सुरांचे,
    असुरी* भावना नाहीशा होती, आपल्यासाठी उघडे स्वर्ग ,
    समोर ते गंधर्वच गाती,--!!!

    © हिमगौरी कर्वे.

  • नामस्मरणाचे कोडे

    मनी वाटते नाम तुझे, सदैव मुखी यावे,
    कर्तव्या माजी एकाग्र असतां, कसे बरे हे व्हावे ?
    कोडे हे उकलून घ्यावे......।। धृ ।।

    श्वास चालतो रात्रदिनीं,
    लक्ष्य न घेई खेचूनी,
    ऊर्जा मिळते देहातूनी,
    परि मनास बंधन नसावे....१, कोडे हे उकलून घ्यावे

    एकचि कार्य एके क्षणी,
    एकाग्रता येई दिसूनी,
    अवसर मिळे मग कोठूनी,
    त्याच घडीला कसे नाम घ्यावे......२, कोडे हे उकलून घ्यावे,

    संसाराचे ‘जू’ मानेवर,
    ओढण्यासांगे ईश्वर,
    मार्ग सारे असता खडतर,
    कसे त्यास वळवावे पाहावे......३, कोडे हे उकलून घ्यावे.

    डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०