पर्वत शिखरीं जाऊन खोदून आणली माती,
हातकौशल्यने केला एक गणपती ।।१।।
मूर्ती बनली सुरेख आनंद देई मनां,
दाम मिळेल ठीक हीच आली भावना ।।२।।
घेऊन गेलो बाजारीं उल्हासाच्या भरांत,
कुणी न त्यासी पसंत करी निराश झालो मनांत ।।३।।
बहूत दिवस प्रयत्न केला कुणी न घेई विकत,
कंटाळून नेऊन दिला गणपती शाळेत ।।४।।
भरले होते भव्य प्रदर्शन हस्तकला कौशल्याचे,
नवल वाटले गणपती बघून दालनातील सुरवातीचे ।।५।।
चकीत झालो जाणूनी मिळाला राष्ट्रीय पुरस्कार,
गणपतीच्या भव्यतेनी मिळविला हा अधिकार ।।६।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रंग भरले जीवनीं, रंगात चालतो खेळ
टप्प्या टप्प्याच्या नादानें, जाई निघूनीया काळ....१,
शिखरावरचे ध्येय, दुरुनी वाटते गोड
लांब लांब वाट दिसे, जाणें तेथे अवघड......२,
ठरलेल्या वेळेमध्ये, जातां योग्य दिशेनें
यश पदरीं येईल, निश्चींच रहा मनानें....३,
रमती गमती कुणी, टप्प्यांत रंगूनी जाती
वेळ सारा दवडूनी, निराशा पदरी येती...४,
जीवनातील अंगाचे, अनूभव घेत जावे
मिळणाऱ्या त्या सुखाला, क्षणीक असे समजावे...५,
रूकू नका एके जागीं, चालणें जीवन होय
प्रभूमय होता येणे, हेच असावे ध्येय....६
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
आई होऊन कळले मजला,
कष्ट आईचे आज खरे ।
स्वानुभवे जे जाणूनी घेई,
तुलना त्याची कोण करे ।।१।।
नऊमास तू जपला उदरी,
क्षणाक्षणाला देऊनी शक्ती ।
बाह्य जगातून शोषून सारे,
सत्व निवडूनी गर्भा देती ।।२।।
देहावरी आघात पडता,
झेलूनी घेई सारे कांहीं ।
बाळ जीवाला बसे न धोका,
हीच काळजी सदैव राही ।।३।।
संगोपन करीता करीता,
हासत होती अर्धपोटी तू ।
सुखी ठेवण्या सोशीली दु:खे,
कधी न कळला उद्दात हेतू ।।४।।
कसे फेडू मी ऋण मातेचे,
पेटविली ज्योत जिने ।
अर्पियले जरी जीवन सारे,
ऋण तिचे न फिटे ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
उत्कट आषाढ ही प्रेम कविता आपल्यासाठी सादर करीत आहे. ही short poem असली तरी त्यातला अर्थ रसिकांना पूर्ण आस्वाद देईल एवढी सार्थ अपेक्षा....
कविता आवडल्यास like करा....नाही आवडल्यास dislike करा...सादरीकरण आणखी सुधारण्यास कृपया आपले मत अवश्य comment box मध्ये लिहा...आणि 'माझी डायरी' चॅनलला अवश्य Subscribe करा.
https://youtu.be/UNnDVjIFG3Y
शरद ऋतूचे आगमन होता ....
झळकत येतो अश्विन मास !!
तरुणाईच्या जल्लोषात अन ....
थोरांचा तो जागरहाट !
घट बसता नवरात्राचे
प्रतिपदा ते नवमीचे !!
सज्ज झाली महिषासुरमर्दिनी...
असुरांचा वध तो करावया
अखंड दीप हे प्रतीक असे .....
शक्ती अन त्या वायूचे !!
लहरी त्याच्या दाही दिशातही .....
घननीळा त्या बरसतात !
नवरात्रीचे नऊ रंग हे ,
बहरत जाती चोहीकडे !
नेवेद्याचा थाटमाट तो ,
पुरणा - वरणाचा
घरोघरी सुटे घमघमाट
पंचपक्वानाचा !!
मान मिळे तो कुमारिकेला ...
नवरात्री ती देवीसम भासे
गरबाचा गजर अन ठेका,
गोलाकार घट मंडल असे
पाठ करुनी सप्तशतीचे ,
करुणा भाकू भक्तीची!!
हे देवी ज्ञान मिळू दे ...
त्या विद्येचे अन विज्ञानाचे
दुःख दूर सार , ......
विनाश अन दारिद्र्याचे
महालक्ष्मी , महासरस्वती , महाकाली
अशी अनेक रुपी तुझी सम भासे !!
दशमीचा तो दिवस उजाडे
दसरा सण मोठा ,
नाही आनंदाला तोटा !!
पूजन करूनी शस्त्र ...व
सरस्वतीचे ....
सीमोल्लंघन अन शमीपूजनाचे !!
सोने लुटूया आपट्याचे ,
आनंदाचे अन एकोप्याचे !
एकच ध्यास तो हिंदुत्वाचा
दरवळ भासे चोहीकडे !!
© ** राज **
सौ . राजश्री भावार्थी
सिंहगड रोड, पुणे
https://www.facebook.com/rajashri.bhavarthi
सरिता ही एक पुण्यप्रदा
अखंडित समांतर किनारा
ध्यास सागरी समर्पणाचा
मोक्षदायीनी ती जलधारा...
झुळझुळते संथ अविरत
प्रवाह निश्चिंती वाहणारा
घेते कवेत, सुखदुःखांना
पापक्षालनी ती जलधारा...
तमा न पर्वा तिला कशाची
फुलवीते, दुतर्फा वसुंधरा
नदिकाठ तो सर्वांगी सुंदर
राऊळमंदिर गोपुर गाभारा...
अध्यात्मी,भक्तीभावरंगला
श्रध्येय, मुक्ती गंगाकिनारा...
भगीरथाच्या गंगेचे गंगोदक
जन्मी आत्मशांतीचा निवारा...
--वि.ग.सातपुते .( भावकवी )
9766544908
रचना क्र.२३५
१५ /९/२०२२
जीवन म्हणजे न संपणारा प्रवास,
प्रत्येक वळणावर नवा सहवास.
कधी आनंदाची पहाट उजाडते,
तर कधी दुःखाची रात्र जागवते.
काही माणसं मनात घर करून जातात,
काही आठवणींच्या धुक्यात हरवून जातात.
पण प्रत्येक भेट आणि प्रत्येक विरह,
आयुष्याला नवा अर्थ देऊन जातो.
ठेच लागल्याशिवाय वाट कळत नाही,
अंधाराशिवाय प्रकाशाचं मोल समजत नाही.
प्रत्येक अश्रू एक शिकवण देतो,
आणि प्रत्येक हसू जगण्याचं बळ देतो.
नाती जपा, मनं जिंका,
शब्दांमध्ये नेहमी प्रेम ठेवा.
कारण आयुष्याची खरी श्रीमंती
पैशात नाही,
तर माणसांच्या विश्वासात असते.
शेवटी उरत नाही
धन, पद, कीर्ती किंवा अभिमान...
उरतो फक्त
आपल्या चांगुलपणाचा सुगंध,
जो काळ सरला तरी
लोकांच्या मनात दरवळत राहतो.
म्हणून असे जगा,
की तुमच्या जाण्याने
लोकांनी फक्त दुःख व्यक्त करू नये,
तर अभिमानाने म्हणावं.
"एक चांगला माणूस आपल्या आयुष्यात येऊन गेला."
•ॲड.कीर्तिराज शैलेंद्र आगलावे, पुणे ✨
मो:- 9011841212
विष्ठा बघूनी थुंकलो,
घाण वाटली मजला,
अमंगल संबोधूनी,
लाखोली देई तिजला ।।१।।
संतापूनी मजवर ,
कान उघडणी केली,
तुझ्याचमुळें मूर्खा मी,
अमंगळ ती ठरली।।२।।
आकर्षक रूप माझे,
लाडू करंज्यानें युक्त
कपाटातूनी काढूनी,
केले सारे तूंच फस्त ।।३।।
परि मिळतां तुझा तो,
अमंगळ सहवास,
रूप माझे पालटूनी,
मिळे हा नरकवास ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
रूप असे देखणेकाळजां भिडले भारी,
डोळे असती लकाकते,
पाणीदार जसे मोती,
काया कशी तुकतुकीत,
नजर फिरता हाले,
सुंदर तांबूस वर्ण,
त्यावर पांढरे ठिपके,
शिंगांची नक्षी डोई,
दिसते वर शोभुनी,
हिंडते बागडते रानी,
कुणी बालिका की हरणी, --??
चपल चंचल वृत्ती,
अचूक आविर्भाव मुखी,
क्षणोक्षणी मान वेळावी,
भय दाटले नयनी,--!!!
पाय मजेदार हलती,
नाजुकसे ते हडकुळे,
पण त्यात ताकद किती,
खुट्ट वाजता वाऱ्यावरती,--!!!
चरत चरत कुरणी,
हिरव्या गवतावर निवांत,
सारखी ही हले डुले ही,
गोजिरवाणी बघा हरिणी,--!!!
भोवती बाळे करिती घोळका त्यांच्याकडेच ना ध्यान,
हलवून इवली शेपूट,
शिकवे जगण्याचे ज्ञान, --!!!
जागरूक राहून सारखी,
भोवती नजर भिरभिरत राहे,
सभोवती हरणें सगळी,
पाहून मग जीव शांतावे,---!!!!
हिमगौरी कर्वे.©
‘माशाचे अश्रू कुणाला दिसत नाहीत,’ बाळासाहेब ठाकरे एकदा उद्वेगाने असे म्हणाले होते. खरेच आहे ते! ज्यांनी देशाला, जगाला आपल्या विचारांनी, आपल्या कर्तृत्वाने भारावून टाकले अशा थोरामोठ्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील यशापयश कधीच समोर येत नाही.
Copyright © 2025 | Marathisrushti