(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • थोड जगलं पाहिजे

    आयुष्याच्या अल्बममध्ये
    आठवणींचे फोटो असतात,
    आणखी एक कॉपी काढायला
    निगेटिव्हज् मात्र शिल्लक नसतात.

    गजर तर रोजचीच आहे
    आळसाने झोपले पाहिजे,
    गोडसर चहाचा घोट घेत
    Tom & Jerry पाहिलं पाहिजे.

    आंघोळ फक्त दहा मिनिटे?
    एखाद्या दिवशी तास घ्या,
    आरशासमोर स्वतःला
    सुंदर म्हणता आलं पाहिजे.

    भसाडा का असेना
    आपल्याच सुरात रमलं पाहिजे,
    वेडेवाकडे अंग हलवत
    नाचण सुध्दा जमलं पाहिजे.

    गीतेचा रस्ता योग्यच आहे
    पण एखादा दिवस पाडगावकराना द्या,
    रामायण मालिका नैतिक थोर
    "बेवॉच" सुध्दा एन्जॉय करता आली पाहिजे.

    कधी तरी एकटे
    उगाचच फिरले पाहिजे,
    तलावाच्या काठावर
    उताणे पडले पाहिजे.

    संध्याकाळी मंदिराबरोबरच
    बागेत सुध्दा फिरलं पाहिजे,
    "फुलपाखराच्या" सौंदर्याला
    कधीतरी भुललं पाहिजे.

    द्यायला कोणी नसलं
    म्हणून काय झालं?
    एक गजरा विकत घ्या
    ओंजळ भरुन फुलांचा नुसता श्वास घ्या.

    रात्री झोपताना मात्र
    दोन मिनिटे देवाला द्या,
    एवढया सुंदर जगण्यासाठी
    नुसतं थँक्स तरी म्हणा..!!

    पाहता पाहता मोठे झालो
    सगळेच गणित बदलत गेले
    छोट्या छोट्या आनंदाचे
    क्षण केव्हाच उडून गेले ।।ध्रु ।।

    आजीने घातलेल्या आंघोळीने
    मन सुद्धा स्वछ होई
    देवपूजा पाहताना तिची
    देव सुद्धा मुग्ध होई

    मायेन भरवलेल्या तिच्या घासांनी
    दिवसभराची भूक भागे
    तिच्या सुंदर गोष्टी-गाण्यांनी
    शांत सुखाची झोप लागे

    पाहता पाहता मोठे झालो
    सगळेच गणित बदलत गेले
    छोट्या छोट्या आनंदाचे
    क्षण केव्हाच उडून गेले || १ ||

    ७ वाजताच्या बातम्या पाहणे
    हा आजोबांचा नियम असे
    'बातम्या नको,कार्टून लावा'
    असा आमचा गलका असे

    बाजारातून घरी आल्यावर आजोबा
    सारे त्यांच्याभोवती जमत असू
    त्यांनी आणलेला खावू
    सारे वाटून खात असू

    आता फक्त आठवणी राहिल्या
    ते दिवस भरभर सरत गेले
    छोट्या छोट्या आनंदाचे
    क्षण केव्हाच उडून गेले || २ ||

    खेळापेक्षा अभ्यास हि गोष्ट
    महत्वाची वाटायची नाही
    'खेळून झाल्यावर अभ्यास'
    हि गोष्ट घरातल्यांना पटायची नाही

    गल्लीमध्ये क्रिकेट खेळणे
    म्हणजे मोठी धमाल असे
    दोन दगडांच्या stumpa मध्ये
    world cup ची मजl असे

    सागरगोटे,पतंग,भोवरे
    सोबती सारेच सोडून गेले
    छोट्या छोट्या आनंदाचे
    क्षण केव्हाच उडून गेले || ३ ||

    शनिवारच्या सकाळी शाळेचे
    आवरताना धांदल होई
    आणि म्हणता म्हणता दंग्यांमध्ये
    रविवार हळूच निघून जाई

    वर्गातील भांडणे सोडवताना
    शिक्षकांच्या नाकी दम येई
    आम्हाला 'वळण' लावायच्या नादात
    शेवटी घरात्ल्यानाच 'बाक' येई !

    आता फक्त वीकेंड आले
    त्यातले निरागसपण संपून गेले
    छोट्या छोट्या आनंदाचे
    क्षण केव्हाच उडून गेले || ४ ||

    स्पर्धेच्या जगातले सर्वात पहिले
    दहावीचे वर्ष आले
    पाहता पाहता सर्व सवंगडी
    अभ्यासाच्या मागे लागले

    क्लासेस, college, tution च्या गडबडीत
    'परीक्षा' हेच उद्देश बनले
    आणि बालपणीचे सुंदर दिवस
    आयुष्याच्या डायरीत मागे पडले

    पाहता पाहता मोठे झालो
    सगळेच गणित बदलत गेले
    छोट्या छोट्या आनंदाचे
    क्षण केवच उडून गेले || ५ ||

    आजच्या मोठ्या पगारामध्ये
    साठवलेल्या भिशी ची मजा नाही
    मधल्या सुट्टीच्या डब्याची चव
    office च्या lunch -break ला नाही

    आजच्या फोर व्हीलर long drive la
    सायकल च्या डब्बल सीटची सर नाही
    रात्रभर मारलेल्या गप्पांची गम्मत
    आजच्या whatsapp chatting ला नाही

    गुंफता गुंफता नात्यांचे बंध
    किस्से सारे आठवत गेले
    आज थोडे थांबून मागे पाहताना
    अश्रू माजे ओघळून गेले || ६

    आयुष्य काय असते पहा...

    चालता बोलता आपल्यातून कोण कधी निघून जाईल याचा काही नेम नाही.जायचे तर सर्वानाच आहे.कोणी आधी जाणार कोणी नंतर .मग या एवढ्याश्या आयुष्यात आपण सर्वांशी प्रेमाने राहू शकत नसू तर या जगण्यात काय अर्थआहे.माझे म्हणणे फक्त एवढेच आहे की आपल्या माणसांना कधीच दुखऊ नका ,कोण केंव्हा आपली साथ सोडून जाईल किवा आपण कोणत्या क्षणी या जगाचा निरोप घेऊ याची शाश्वती नाही म्हणून आनंदाने रहा व सर्वाना भरभरून प्रेम द्या , सर्वांच्या मदतीसाठी कायम उभे रहा.

    -- WhatsApp Forward

  • आठव स्मृतींचे

    कधीतरी बोलना तूं एकदा
    गुज तुझ्या अव्यक्त अंतरीचे
    आता सरला हा जन्म सारा
    गहिवरले हे हुंदके भावनांचे
    गोठले स्नेहार्द भाव अंतरात
    भिजले चिंब पदर पापण्यांचे
    सांग! मनास कसे समजवावे
    दारुण दग्धदुःख या जीवनाचे
    हरविले सारे व्याकुळला जीव
    तरीही लोचनी आठव स्मृतींचे
    रचना क्र. १३४
    / ४ / १० / २०२३
    -वि.ग.सातपुते.(भावकवी )
    9766544908
  • ऋतुचक्र

    यंत्रवत! झाला मानव

  • सत्य, अहिंसा, साधी राहणी

    सत्य, अहिंसा, साधी राहणी,
    महात्मा गांधींची विचारसरणी
    तत्वांची सगळ्या किती हेटाळणी, ‌
    कोण आणतो सांगा आचरणी, --!!!

    असत्याच्या आधाराने,
    हिंसक, मारक, वर्चस्वाने,
    वागतात पोकळ दिमाखाने, राष्ट्रपुरूषाची मनोरथे"च निराळी,-!

    स्वातंत्र्याचा वाईट अर्थ,
    सगळे स्वैराचाराचे भक्त,
    माणसाचे वागणे नि:सत्व,
    गांधींच्या तत्वांना तडा जाई,--!!

    सोदाहरणाने राष्ट्रपित्याने, स्वच्छतेचा मार्ग शिकवला,
    आम्ही घाणीच्या बुजबुजाटाने,
    समतोल निसर्गाचा बिघडवला,-!
    घर , गाव शहर परिसरां,
    "अस्वच्छ" बघा किती ठेविती,--!!!

    बोलू बघू ऐकू नका ,
    असे सांगती तीन माकडे,
    कोण पाळते तत्त्वांना या,
    गिरवती अनिती"चेच धडे,
    माणूस म्हणुनी माणसाला,
    किंमत मुळी ना देती,--!!!

    हिमगौरी कर्वे.

  • राधे, केवढा केशसंभार

    राधे, केवढा केशसंभार,जीव गुंतला त्यात फार,
    का असे ते मोकळे सोडशी,
    केसांची जादू मिरवशी, --!!!

    रक्षक की मी या विश्वाचा,
    दुसरा तिसरा नच" कोणता,
    असे असूनही बघ किती,---
    केशकलापां पडलो फशीं,--!!!

    केस तुझे मानेवरून रुळती,
    बटां -बटां वाऱ्यावर खेळती,
    बघावे तेव्हा मनसोक्त डुलती, ‌ अडके त्यात जीव, हीच भीती--!!!

    सुंदर काळेभोर कुंतल,
    खूप त्यात खोल गुंतती,
    त्यातच सुवासिक तेलगंध, रात्रं-दिन पाडे मोही,--!!!

    तुझ्या गोऱ्या मुखड्यावर,
    केसांची महिरप काळी,
    गोजिरवाणे रूप तुझे,--
    येते त्याला मादक झळाळी,--!!

    जीवघेणा मदनबाण मारा,
    कसे तुझे कुंतल, करिती,
    या माऱ्याने सर्वस्व हरलो
    तुजसाठी क्षणक्षण झुरलो,
    द्वैतातील अद्वैत साधुनी,--
    दोन जीव लागले प्रेमापाठी,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • वि विठ्ठलाचा

    विचा महिमा पाहू ,
    अक्षर मोठे देखणे,
    विलक्षण आहे जादू ,
    त्याचेच "गारुड" पडणे,

    विलोभनीय आहे सृष्टी, विचक्षण तिची शोभा,
    विसंगत बघू रंग संगती, विलोभनीय की पसारा,--!!!

    विशेष कितीतरी गोष्टी,
    विवेचन त्यांचे किती करू,
    विलक्षण विराजमानी,
    आश्चर्यांना किती स्मरू,--!!!

    विकार विवेक विचार, मनात असती भावना छुप्या, त्यातून विपरीत जन्म घेई,
    नि भावनांची विविधता,--!!!

    विनाशकाले विपरीत बुद्धि, विजोड बने हे सारे,
    विदीर्ण आयुष्य होई,
    विकल मानसिकता खरे,--!!!

    विनिमय करत सकलांशी, विसंवादही टाळावा,
    विनम्र राहून नियतीचा,
    फक्त घाव उरी झेलावा,--!!!

    विसरू नये चांगुलपणा,
    विचारांती निर्णय घ्यावा,
    विमुक्त जगण्यात अशा,
    खरा विठ्ठलच बघावा,--!!!

    हिमगौरी कर्वे.©

  • आठवणींची पिसं

    आठवणींचा डोह भासतो वरकरणी शांत नि:संग
    मात्र डुचमळता उठतात भावकल्लोळाचे अनंत तरंग
    वरवर वाटतात साऱ्या एका कुळीच्या एक जशा
    होतात बोलक्या जेव्हा, जाणवे एकमेकींचा अलग ठसा

    काहींचा केवळ नुसताच भास
    जवळून काहींचे जाणवतात श्वास
    काही रांगत्या काही रांगड्या
    मुकाट काही, काही अखंड बडबड्या

    काही गोड बोबड्या दुडदुडताना
    रुणझुणतात मनोपटलावर पुन:पुन्हा
    काही नव्हाळ, गव्हाळ रंगसाजिऱ्या
    कुजबुजती अस्पष्ट लाजऱ्याबुजऱ्या

    काही वृध्द, रुध्द काही विद्ध
    काहीच सुसंगत बाकी असंबद्ध
    लावून पंख काही जाती उडून
    काही शांत करिती संथ रवंथ

    काही निद्रिस्त काही सतत भयग्रस्त
    आनंदमयी मस्त काही संत्रस्त त्रस्त
    नुसतेच काही अवशेष, खंड
    काही धगधगती, तेवती अग्निकुंड

    काही दटावणाऱ्या काही दाटलेल्या
    काही शुष्क, कोरड्या आटलेल्या
    एकलेपणात गुंग शापित काही
    अतिआवेगाने उरी फुटलेल्या

    काही बिचाऱ्या दुखऱ्या हळव्या
    अश्वत्थामाच्या भाळी मिळाव्या
    काही त्रोटक, तुटक हवेत विराव्या
    ऋणबंधाईत काही उरी उराव्या

    काही लाजाळू असतात काही मायाळू
    काही ठुसठुसतात सदैव बनून गळू
    काहींचा सल सतत रुततो मना
    शिकवि काही पोरक्या बापुड्या केविलवाण्या

    काही मानी त्यांचा ताठर बाणा
    लपविती चेहेरा काही लाजिरवाण्या

    चालूनही काळासोबत नाही कालबाह्य
    येऊनही वयात त्या नाही होत वयस्क
    आठवणींच्या वाढतात केवळ सावल्या
    मनाच्या मेणावरच्या अस्पष्ट पाऊलखुणा

    आठवणीच्या पक्ष्याची पिसे विस्कटावी किती
    काहीच पसरतात, विखुरतात, काही गळती
    झाडून पंख, पुन्हा सावरुन झेपावतो जेव्हा
    हाती न आपल्या काही, केवळ गळक्या वेणा

    - यतीन सामंत

  • ग्रह परिणाम

    वळून बघता पूर्व आयुष्यी, प्रखरतेने हेची जाणले

    घडले नाही कधीही ते ते, हवे असूनी मनी योजीले....१

    सभोवतालची देखूनी स्थिती, आखती योजना कल्पकतेने

    खेळामधली चाल नियतीची, ध्यानी न येते दुर्दैवाने.....२

    मार्ग तिचे हे ठरले असूनी, बांधलेले इतर जीवांशी

    अपूर्व योजना निसर्गाची, कळेल कुणाला सहज कशी....३

    जाळीतल्या धाग्याची टोके, गुंतली असती ग्रह गोलाशी

    फिरता फिरता खेच पडे, वा ढीली होवून जाती कशी.....४

    सुख दु:खाचे परिणाम हे, असेच दिसून येती मग

    अनपेक्षीत हे जेव्हा घडते, म्हणती त्यासी दैवी अंग....५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • चेहरा

    चेहरा, बिलोरी आरसा
    अंतरीच्याच भावनांचा

    प्रतिबिंब मनसंवेदनांचे
    सत्य साक्षात्कार मनाचा

    ऋणानुबंध सारे वोखटे
    अंतरात स्वार्थ स्वत:चा

    हीच आजची जगरहाटी
    इथे नाही कुणी कुणाचा

    चेहरा हसरा इथे बेगडी
    सत्य एक आरसा मनाचा

    --वि.ग.सातपुते.(भावकवी )

    9766544908

    रचना क्र.१९३

    ८/८/२०२२

  • सर्वांची काळजी

    मुसळधार ती वर्षा चालली, एक सप्ताह तो होवून गेला

    पडझड दिसली चोहीकडे, दुथडी वाहतो नदी-नाला...१,

    काय प्रयोजन अतिवृष्टीचे ? हानीच दिसली ज्यांत खरी

    निसर्गाच्या लहरीपणानें, चिंतीत झाली अनेक बिचारी....२,

    दृष्टी माझी मर्यादेतच, विचार तिजला अल्प घटकांचा

    विश्वचालक काळजी करि, साऱ्या चौऱ्यांशी लक्ष योनींचा....३

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com