June 2, 2022
दिलास जन्म मानवी
देवा! काय याचू मी
कृपाळू, तूची दाता
तुलाच काय मागू मी...।।
दिलेस, तू सारे काही
तृप्त, तृप्त कृतार्थ मी
सर्वार्थी तुझ्यात रमता
सांगनां काय मागू मी...।।
अनंता! तूच कृपाळू
तव छायेत नित्य मी
नांदतोस मनहृदयी
देवा! काय मागू मी...।।
तव अदृश्य परिस्पर्शी
सुखावतो अंर्तआत्मा
अमृतयोग अमरत्वाचा
चिरंजीव हा जीवात्मा..।।
– वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. २२२
१/९ /२०२२
October 1, 2022
स्मृतीलहरींच्या झुल्यावरती
मी नित्य सुखात झुलतो आहे
आठव सारेच गगनभारले
भावशब्दातुनी गुंफीत आहे
सुखदुःखांची संमिश्र सावली
अजुनही ती साथसंगती आहे
मनांतर कधी नाही बदलले
संवेदना नैसर्गी तीच आहे
जढणघड़ण सुंदर संस्कारांची
जीवन आज कृतार्थी आहे
मैत्र नात्यांचे छान लाभले
हीच जन्माची श्रीमंती आहे
-- वि.ग.सातपुते (भावकवी)
(9766544908)
रचना क्र. ३०९
२८/११/२०२२
December 8, 2022
ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. ही कविता एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने आणि समाजाच्या अपेक्षांचे दर्शन घडवते. मुलीला तिच्या कृतींमध्ये संतुलन साधावे लागते. जास्त बोलल्यास उद्घट आणि कमी बोलल्यास शांत समजले जाते. हसल्यास उसे अनाड, तर कमी हसल्यास संस्कारी मानले जाते. स्वावलंबी बनल्यास गर्विष्ठ, अवलंबून राहिल्यास अबला म्हणून पाहिले जाते. तिच्या स्वप्नांच्या मागे धावल्यास बंधन आणि पुरुषप्रधानतेला आव्हान दिल्यास अहंकारी समजले जाते. समाजाच्या विविध नियमांनुसार वागले तरी तिला मर्यादित मानले जाते. हे सगळे एकत्र सांभाळून जगणे, मुलीचे जीवन इतके सोपे नाही. एका मुलीच्या जीवनातील विविध आव्हाने, समाजाच्या अपेक्षा आणि तिच्या स्वतंत्रतेच्या संघर्षाचे चित्रण केले आहे. तिच्या प्रत्येक कृतीला समाजाच्या विविध दृष्टिकोनातून कसं पाहिलं जातं, हे स्पष्टपणे व्यक्त केले आहे
May 18, 2025
जगण्या झाले कठीण क्षण,
अन्यायाने सीमा गाठली ।
चक्र आहे दैव गतीचे,
समजूत कुणीतरी मना घातली ।।
जीवन मार्ग सरळ असता,
फेरे पडती नशीबाचे ।
अनेक वाटा दिसून येता,
भटकणे मग होई जीवाचे ।।
विसरूनी जातो मार्ग आपला,
तंद्रीमध्ये भटकत असता ।
बोलफूकाचे देत राही,
नशीब दैव म्हणता म्हणता ।।
असंख्य वाटा अनेक ध्येये,
मिळेल एकची विश्वासानी ।
नशीबाला परी दोष न देता,
चालत राहा एकाग्रतेनी ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
May 24, 2016
गर्दीत माणसांच्या लोटून हाय! मजला
स्वप्नात पाहिलेला माझा गुलाब गेला
त्या मखमली सुखाला मी स्पर्शिले न होते
अजुनी; तरीही त्याच्या का पाकळ्या गळाल्या?
शहरात आज साऱ्या ही 'ईद' चाललेली
त्याच्या स्मृतीत माझा सारा सुना मुहल्ला
त्या जायचेच होते निघुनी नवीन देशा
का शुभ्र हा दुपट्टा इष्कात रंगविला?
-सौ. राजलक्ष्मी देशपांडे
April 10, 2023
March 5, 2022
मम चित्ती तुझे रूप गोपाळा, यशोदानंदन जगत्पालका,
जगदाधिशा प्रतिपाळा,
आठवती किती नावे कृष्णा,---
देवकीनंदना वसुदेवसुता,
राधेच्या कृष्णा, रुक्मिणी- भ्रतारा,
तुझं आठवते मी घननिळा, द्वारकाधीशा,
विष्णू अवतारा मनमोहना तू बाळकृष्णा,--!!!
गोपिकांमधील तू श्रीरंगा,
श्रीहरी तू जगदोद्धारा,
नटवर तू अनादि अनंता,
उभा राहशी प्रसंगी सारथ्या,--!!!
कधी भासशी नुसती कल्पना,
पण विहरशी आत्मी मनोहरा, सत्यभामा तुझीच कांता,
लुब्ध तिच्यावर तू मुरलिधरा,---!!!
सुभद्रावर, तू तिच्यावरी भाळता, सुभद्राहरण करशी नंदकिशोरा,
काय म्हणू तुझ्या स्वरूपा,
असशी, भासशी अनेक रुपा,
वात्सल्यमूर्त तू हे नंदबाळा,
स्मरते मी तुज कितीदा गिरिधरा,--!
हिमगौरी कर्वे ©
August 21, 2019
भविष्यात ‘पाणी’ अमृत ठरणार आहे,
मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे !
आतापासूनच तरतूद करून ठेवावी लागणार आहे,
रेन वॉटर हार्वेस्टिंग उपयोगी पडणार आहे !
शेतकऱ्यांच्या आत्महत्या पॅकेजने सुटतील?
समस्येच्या मुळाशी जाऊन सोडवाव्या लागतील !
कदाचित जलशिवार आणि नद्या जोडणीने
शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या सुटील !
अवर्षणग्रस्तांना ‘अमृता’चे आमिष दाखविले,
बिचारे ‘जलाचे’ दोनथेंब पिऊन जगले !
‘अमृत’ प्राशनाने अमरत्व मिळतं म्हणतात,
‘अमृता’ ऐवजी नशिबी दगडगोटेच आले !
बळीराजा सगळ्या बाजूने गांजला आहे,
अमुतापेक्षा विषाला जवळ करत आहे !
बळीराजाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
वसुंधरेवरील जालामृतात आहे !
वसुंधरेवर पहिले ‘अमृत’ सिंचन
परमेश्वराने केले !
सागराच्या पाण्याचे ढगात रुपपांतर करून
वसुंधरेवर सर्वत्र ‘अमृत’ बरसले !
-- जगदीश पटवर्धन
August 25, 2015
November 14, 2021
Copyright © 2025 | Marathisrushti