एकाग्रतेने जगा

जगण्या झाले कठीण क्षण,

अन्यायाने सीमा गाठली ।

चक्र आहे दैव गतीचे,

समजूत कुणीतरी मना घातली ।।

जीवन मार्ग सरळ असता,

फेरे पडती नशीबाचे ।

अनेक वाटा दिसून येता,

भटकणे मग होई जीवाचे ।।

विसरूनी जातो मार्ग आपला,

तंद्रीमध्ये भटकत असता ।

बोलफूकाचे देत राही,

नशीब दैव म्हणता म्हणता ।।

असंख्य वाटा अनेक ध्येये,

मिळेल एकची विश्वासानी ।

नशीबाला परी दोष न देता,

चालत राहा एकाग्रतेनी ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com



जगण्या झाले कठीण क्षण,

अन्यायाने सीमा गाठली ।

चक्र आहे दैव गतीचे,

समजूत कुणीतरी मना घातली ।।

जीवन मार्ग सरळ असता,

फेरे पडती नशीबाचे ।

अनेक वाटा दिसून येता,

भटकणे मग होई जीवाचे ।।

विसरूनी जातो मार्ग आपला,

तंद्रीमध्ये भटकत असता ।

बोलफूकाचे देत राही,

नशीब दैव म्हणता म्हणता ।।

असंख्य वाटा अनेक ध्येये,

मिळेल एकची विश्वासानी ।

नशीबाला परी दोष न देता,

चालत राहा एकाग्रतेनी ।।

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

Author