भविष्यात ‘पाणी’ अमृत ठरणार आहे,
मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे !
आतापासूनच तरतूद करून ठेवावी लागणार आहे,
रेन वॉटर हार्वेस्टिंग उपयोगी पडणार आहे !
शेतकऱ्यांच्या आत्महत्या पॅकेजने सुटतील?
समस्येच्या मुळाशी जाऊन सोडवाव्या लागतील !
कदाचित जलशिवार आणि नद्या जोडणीने
शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या सुटील !
बळीराजा सगळ्या बाजूने गांजला आहे,
अमुतापेक्षा विषाला जवळ करत आहे !
बळीराजाच्या सर्व प्रश्नांची उत्तरे
वसुंधरेवरील जालामृतात आहे !
वसुंधरेवर पहिले ‘अमृत’ सिंचन
परमेश्वराने केले !
सागराच्या पाण्याचे ढगात रुपपांतर करून
वसुंधरेवर सर्वत्र ‘अमृत’ बरसले !
-- जगदीश पटवर्धन
भविष्यात ‘पाणी’ अमृत ठरणार आहे,
मिळविण्यासाठी झगडावे लागणार आहे !
आतापासूनच तरतूद करून ठेवावी लागणार आहे,
रेन वॉटर हार्वेस्टिंग उपयोगी पडणार आहे !
शेतकऱ्यांच्या आत्महत्या पॅकेजने सुटतील?
समस्येच्या मुळाशी जाऊन सोडवाव्या लागतील !
कदाचित जलशिवार आणि नद्या जोडणीने
शेतकरी आणि नागरिकांच्या समस्या सुटील !