भूकंप काय जाहला,
सारा इंडोनेशिया हादरला,
त्सुनामीच्या भीतीने,
जगभरातील मानव शहारला.....!!
भूकंपाचा भयकंप,
उडविल सगळ्यांचा थरकंप,
त्सुनामीची लाट,
लावील सगळ्यांची वाट........!!
असे घडेल आक्रीत,
घडेल एका रात्रीत,
सगळ्यांचा जीव टांगणीला,
असे केले होते भाकीत........!!
-- मयुर तोंडवळकर
मरणाची भिती नाही जगणे कठीण झाले
मोकळ्या या घरात सगळे अबोल झाले ।
मोकळ्या या घराची भिंतही अबोल झाली
आठवण तुझी काढून ती चिंब ओली झाली ।
हवा घरातलीही आजही तशीच कुंद आहे
त्या कुंद हवेतील सुगंध आजही धुंद आहे ।
जाता चार दिवस दूर माझी अशी अवस्था होई
जाशील खरोखर दूर तर मग माझे काय होई ।
जगणे तुझ्याविना ही जाणीवही असह्य आहे
निरोप तुझ्याआधी घ्यावा हेच सुखकर आहे ।
-- सुरेश काळे
मो.9860307752
सातारा.
दि. ६ आक्टोंबर २०१८
ज्या ज्या वेळी येई संकट, धांव घेत असे प्रभूकडे ।
संकट निवारण करण्यासाठीं, घालीत होता सांकडे ।। १
चिंतन पूजन करूनी, करीत होता प्रभू सेवा ।
लाभत होती त्याची दया, त्याला थोडी केव्हां केव्हां ।। २
संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा ।
कामी येईल पुण्य , विचार करीतां भविष्याचा ।। ३
संचित पुण्य आजवरचे, कार्य सिद्धीला लागते ।
सुख दु:खाच्या हर समयीं, ठेवा मुखीं प्रभू नामाते ।। ४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
सकाळच्या या प्रसन्न प्रहरी
सूर्यकिरण पसरले अंबरी ।।
उदर भरण करण्यासाठी
लगबग उडाली ही पक्ष्यांची ।।
कावळे, घारी, साळुंखी ही
पारवे, चिमण्या, बुलबुल संगती ।।
प्रत्येकाचा सूर निराळा
गाऊन सवंगड्या साद घालती ।।
पटकन आला थवा राव्यांचा
मंदिर शिखरी क्षणभर विसावला ।।
घाणेरीच्या झुडुपांमध्ये
क्षणात हा मिसळून गेला ।।
मोबाईल हा गप्प बसेना
मग नजारा हा राव्यांचा ।।
छायाचित्रण करुनी तयांचा
आनंदाचा क्षण साठविला ।।
(रावा=पोपट)
-- मी सदाफुली
संध्या प्रकाश बापट
किती रे खोड्या करिशी कृष्णा
यशोदा तर गेली थकूनी..।।धृ।।
झोपू दे रे तिजला आतां, ती तर गेली खूप दमूनी
दही दुधांनी भांडी भरली,
काही प्याली, काही वाटली,
काही तर ती उपडी झाली,
पिऊनी सांडूनीच सगळे, नासलेस दही दूध लोणी...१,
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी
गणरायाचे पूजन करितां
मग्न झाली यशोदा माता
लक्ष्य तुझे नैवेद्यीं पडतां
फस्त करशी कांहीं मोदक, ताटामधले तूंच खाऊनी....२,
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,
गोपींच्या तूं फोडल्या घागरी,
पळवी त्यांची वस्त्रे सारी,
दुधा तुपाची केली चोरी,
मौज वाटते गोप-गोपींना, नटखटता तुझी बघूनी...४
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी,
खोंड्या नच लीला बघूनी,
प्रेमभावना उचंबळूनी
जाई यशोदा ती बावरूनी
डोळ्यामधले लपवून आश्रू, लटका राग दिसे शब्दानी...५,
किती रे खोड्या करशी कृष्णा, यशोदा तर गेली थकूनी
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क - ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
मुंबईची कथा आणि व्यथा सांगणारी ही कविता श्री द्वारकानाथ शंकर उर्फ जयंत वैद्य यांनी सर्वप्रथम १९८२ साली लिहिली. जसजसा काळ पुढे गेला तसे संदर्भ बदलले, मुंबईसुद्धा बदलली. या कवितेचा पूर्वरंग १९८२ मध्ये तर मध्यरंग १९९५ मध्ये लिहिला गेला. आता लिहिलेला हा उत्तररंग मुंबईची व्यथा जोरकसपणे मांडतो आहे.
सकाळच्या या प्रसन्न प्रहरी
सूर्यकिरण पसरले अंबरी ।।
उदर भरण करण्यासाठी
लगबग उडाली ही पक्ष्यांची ।।
कावळे, घारी, साळुंखी ही
पारवे, चिमण्या, बुलबुल संगती ।।
प्रत्येकाचा सूर निराळा
गाऊन सवंगड्या साद घालती ।।
पटकन आला थवा राव्यांचा
मंदिर शिखरी क्षणभर विसावला ।।
घाणेरीच्या झुडुपांमध्ये
क्षणात हा थवा मिसळून गेला ।।
मोबाईल हा गप्प बसेना
मग नजारा हा राव्यांचा ।।
छायाचित्रण करुनी तयांचा
आनंदाचा क्षण साठविला ।।
(रावा =पोपट)
-- मी सदाफुली
संध्या प्रकाश बापट
03/10/2019
जीवन, जगण्यासाठी
जीव, आतुरलेला आहे
जन्म! हा मानवाचा
विवेकी जगायचाआहे
ऋतूऋतूंचे आविष्कार
निसर्गाचे वरदान आहे
नाती सारी ऋणानुबंधी
भावप्रिती! साक्ष आहे
अंतरी लळा जिव्हाळा
प्रारब्धाचे वरदान आहे
शिरी आभाळ नक्षत्रांचे
मनस्वी सुखशांती आहे
निर्मोही स्पर्श भावनांचे
स्वर्गसुखाची नांदी आहे
जगता जगता जगवावे
मानवी नितीमुल्य आहे
येताजाता रिक्त ओंजळी
अंतिम नग्न सत्य आहे
सदा भजावे अनामिका
तो कृपाळू तारणार आहे
-- वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र.१३६
२१ - १० - २०२१.
आधी ‘पेपर’ होता ‘वीकली’
इलेक्शनआधी बनवला ‘डेऽली’
इलेक्शनसाठी झालं सिलेक्शन
पण डिपॉझिट जप्त, हरला दणक्यानं
नंतर त्यानं प्रिंटिंग-प्रेसच विकली .
- सुभाष स. नाईक
दारु, बिडी-सिगार, अफू, गांजा, त्यांचा राजा गर्द,
लत लागतां, कित्येक संसार, त्याने केले सारे बरबाद ।।१।।
अजगराच्या विळख्याहूनी, महाभयंकर सत्य,
एक नव्हे, अनेक सारे, नष्ट होतील त्यांत ।।२।।
होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी,
नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी ।।३।।
जाणूनी घ्या त्या शत्रुला, छुपा रुस्तूम तो,
प्रवेश एकदा शरिरीं मिळतां, कायमचा तो राहतो ।।४।।
सहज काढून टाकीन त्याला, नका करुं वल्गना,
घेऊन जाईल प्राण तुमचे, हीच त्याची गर्जना ।।५।।
-- डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Copyright © 2025 | Marathisrushti