(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • होळी…….

    सत्याचा असत्यावर विजय म्हणजे होळी ..........
    सर्व रंग एकत्र मिसळण्याचा सण म्हणजे होळी ..........
    थंडीला राम राम करण्याचा दिवस म्हणजे होळी..........
    जीवनातील उत्साह म्हणजे होळी ...........
    पुरणपोळी करण्याला कारण म्हणजे होळी........
    मुंबई आणि कोकण यामधील दुवा म्हणजे होळी ........
    देवावरील विश्वास म्हणजे होळी..........
    मनातील पापाला राम राम करण्याची संधी म्हणजे होळी.......
    तरुणांना तारुण्य दाखविण्याचा बहाणा म्हणजे होळी .........
    अंधारमय जीवनातील प्रकाश म्हणजे होळी ...........

    -- निलेश बामणे

  • जीवन आनंद

    ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे, ध्येय कोणते खरे ।

    उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे ।।

    संतसाधू आणि ज्ञानीजन, बहूत ते झाले ।

    समाधानी परि एक मताचे, उत्तर नाही दिले ।।

    खेळखेळणे उड्या मारणे, अन् खाणे पिणे ।

    बालपणीच्या आनंदाला, नव्हते काही उणे ।।

    विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो ।

    यौवनाच्या उंबरठ्यावरी, बहरून गेलो ।।

    संसार करिता कळले आम्हा, जीवन दुजासाठी ।

    प्रौढवयाची वर्षे घालविली, समाज सेवेपोटी ।।

    वृद्धत्वाचा काळ येता, ओढ लाभली प्रभूची ।

    आहिक सुख त्याग करुनी, जीवन मुक्तीची ।।

    एक एक ती पायरी चढलो, जीवन शिडीवरी ।

    शोधीत होतो 'आनंद' तेथे, मिळेल काहीतरी ।।

    हर घडीला रूप निराळे, होते आनंदाचे ।

    गुंतले होते संबंध तेथे, तन मनाचे ।।

    ओढ प्रभूची लागली, जेंव्हां थकूनी गेला देह ।

    संसारातील सर्व सुखाचा, निघून गेला मोह ।।

    मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम ।

    कोठून आला कोठे गेला, याची न येई जाण ।।

    आता त्याचा आनंद कोठे, असेल तो गुंतला ।

    देहमनाचे वेष्टन नव्हते, ज्या घटकेला ।।

    हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही ।

    ‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई ।।

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • खंत मनी ! मी काय प्रार्थू ?

    समजावू कसे या मनाला
    जे शोधिते अजूनही तुला..
    आजही लोचनी रूप तूझे..
    तुझाच ध्यास या जीवाला..
    एकमेकांवरी नि:सिम प्रीती
    तुझी न माझी, जडली होती
    पाहता , पाहताच एकमेकां
    प्रीतीभाव आगळा रुजला..
    नि:शब्दुली ! भाषा मनांची
    अंतरंगी सारीच प्रीतभारली
    कटाक्षी प्रीती, स्मित लाघवी
    जगवित होती तनमनांतराला..
    जरी निर्व्याज ही सत्यप्रीती
    प्रारब्ध्ये दुरावाच हा भाळी
    तुजविण सारे निरर्थ जीवन
    हाच दुर्दैवी शाप जीवाला..
    क्षणक्षण सारे आज हरवले
    त्राणही क्षीण , संथ जाहले
    सांजवेळी साऱ्या आठवणी
    विमनस्क करती जीवाला..
    आज प्रश्न ? मी काय प्रार्थू ?
    ओशाळले जीवन सारे सारे
    घायाळ जाहली जरी स्पंदने
    अंती तुझाच ध्यास जीवाला..

    ©️ वि.ग.सातपुते.(भावकवी)

    रचना क्र. ३७

    दिनांक:- १० - ३ - २०२१

  • नदीवरील बांध

    विषण्यतेने बघत होतो भिंतीवरच्या खुणा
    काळ जाऊन वर्षे लोटली आठवणी देती पुन्हा

    बसत होतो नदीकांठी बालपणीच्या वेळी
    पात्र भरुनी वहात होती गोदावरी त्या काळी

    सदैव पूर येउनी तिजला गावास वेढा पडे
    गांव वेशीच्या घरांना मग पाण्याचे बसती तडे

    चित्र बदलले आज सारे पात्र लहान होई
    बांध घातला धरणावरी पाणी अल्पसे येई

    खिन्नपणे खूप भटकलो भोवतालच्या भागी
    चकित झाले मन बघूनी हिरवळ जागोजागी

    इच्छित दिशेने पाणी वाही बांध घातल्यामुळे
    सारे जीवन प्रफुल्ल करीं आनंदमय सगळे

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • जागतिक पोहे दिवस

    ज्या पोह्यांच्या साक्षीने लग्नगाठी जुळतात, त्या पोह्यांना आपल्या खाद्यसंस्कृतीत विशेष स्थान आहे. सकाळचा नाश्ता पोह्यांशिवाय अधुरा आहे. म्हणूनच पोहेप्रेमी दरवर्षी ७ जून हा ‘विश्व पोहे दिवस’ म्हणून साजरा करतात.

  • मयुरा तूं आहेस गुरु

    मयुरा तूं आहेस गुरु, तुला आम्हीं वंदन करु ।।धृ।।

    नदी कांठच्या वनीं,
    थुई थुई नाचूनी,
    पिसारा फुलवुनी,
    तुझे पाहूनी नृत्य, ताल धरु
    मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु ।।१।।

    मोरपिसे सुंदर,
    रंग बहारदार,
    दिसे चमकदार,
    बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं,
    मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु ।।२।।

    रुप डौलदार,
    चाल ऐटदार,
    भासे रुबाबदार,
    बघुनी तुझा आनंद, सुखी जीवनाची कला अंगीकारुं,
    मयुरा तूं आहेस गुरु तुला आम्हीं वंदन करु ।।३।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • आत्मानंद

    जीवनात अचानक कधी
    असा क्षण येतो ।
    सारे स्तब्ध नीरव शांत होते ।
    ब्रम्हांड गोठल्याचा भास होतो ।

    साऱ्याच संवेदना संपुष्टात येतात ।
    उरतात फक्त निर्विकार स्पंदने ।
    हा जन्म अन मृत्यु मधील
    अंतीम थांबा असतो ।

    हाच शून्यावस्थेतील अचेतन
    अखेरचा जीवन सूर्यास्त ।
    जो शाश्वत मृत्यु, अंत!
    जीवनातील अंतीम अटळ कटुसत्य ।

    जन्मताच मृत्युचही वरदान
    भगवंताच दान असतं ।
    प्रत्येक जीवाला लाभलेलं असतं ।
    सर्वानाच स्विकारावच लागतं ।

    यालाच जीवन असं म्हणतात!
    म्हणून प्रत्येकानं सतर्कतेंन
    विवेके आत्ममुख व्हावं ।
    सातत्यानं सत्कर्म करत रहावं!

    सहृदयतेने निर्मळ निर्व्याज
    निर्मोही प्रेम करीत मने जपावीत!
    त्यामुळे आत्मानंद होतो!
    त्या अनामिकचे स्मरण ठेवावे!
    ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली आहे!

    -- वि.ग.सातपुते. (भावकवी)

    9766544908

    रचना क्र.११८

    १७ - ४ - २०२२

  • जीवन मार्गातील अडसर

    जीवनातील वाटे वरती, कडेकडेने उभे ठाकले

    परि वाटसरूंना सारे ते, यशातील अडसर वाटले...१,

    वाट चालतां क्रमाक्रमानें, बाधा आणून वेग रोकती

    ध्येयावरल्या उच्च स्थळीं, पोहचण्या आडकाठी करिती...२,

    षडरिपूचे टप्पे असूनी, भावनेवर आघांत होतो

    सरळ मार्गाच्या विचाराला, आकर्षणाचा खेंच बसतो...३,

    पवित्र निर्मळ भावनेमध्ये, रंगाच्या त्या छटा उमटती

    गढूळपणाच्या वातावरणीं, सारे कांहीं गमवूनी बसती....४,

    थोडे राहता गाफील तुम्ही, जाळ्यामध्ये अडकून जातां

    जीवनाचे जे साध्य असते, स्वकर्माने गमवून बसतां...५

    डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

  • प्रभूची खंत

    मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी

    झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।।

    शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना,

    लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला तो मनी ।।

    तूच दिसला नयनी, आई-बापा मांडी देऊनी,

    माझे लक्ष तुझकडे, परि तू बघेना थोडे, ।।

    आई – बापाच्या सेवेत, गुंगलास तूं सतत,

    तुझी शक्ति मला छळे, तें तुला कांहीं न कळे, ।।

    थांबव पुंडलिका सेवा, सहन न होई तो ठेवा,

    तुजकडे बघ आलो, मनी समाधानी झालो ।।

    टाकलेल्या विटेवरी, उभा राहिलो मी दूरी,

    परि तू गेला निघूनी, मजला उभा करूनी ।।

    होऊनी गेली अठ्ठावीस युगे,

    आज देखील मी वाट बघे ।।

    -- डॉ. भगवान नागापूरकर

    ९००४०७९८५०

    bknagapurkar@gmail.com

  • आक्रंदन

    काही अटळ गोष्टी कधीच होऊ नयेत असतात आशा वेड्या
    येतात ते क्षण सामोरे जेव्हा उडतात भ्रमाच्या चिंधड्या चिंधड्या

    नसते तयारी मनाची , बीभत्स विद्रुप सत्याला भिडण्याची
    समूळ उन्मळण्याची , उरी फुटण्याची , आत्यंतिक आक्रंदनाची

    धडपड संपण्यापूर्वी , अखंड असहाय तुम्ही धडपडताना
    वाटतं प्रचंड वैषम्य की येऊ शकलो नाही तुमच्या कामाला
    बाळगाव्या उरी बोचणाऱ्या वांझ वेदना की निरंतन घुसमटवणारी जाणीव
    की करावी आपल्याच आपण potent न्यूनतेची उसासून कीव

    If you couldn't be helped in your intensely weak moments When I was around watching , desperately helpless well I guess , I ought to be guilty by choice , for life

    अगतिकतेच्या कडेवरुन भासतो भास्करही तो त्रयस्थ अन् दुबळा
    काळीज चिरीत निघालेला काळोख व्यापुन उरतो विश्वाला सगळ्या
    आसवांच्या साठवांना तेव्हा बांध विवेकाचा नाही पेलत
    येतात अचानक प्रवाहाचा घेऊन वेग प्रचंड , ओसंडत

    सुटला नाही अजून आतड्यांना आतून पडलेला पिळ
    उठवते वारंवार काळजात एक परिचित खोलवर कळ
    जागत्या ठुसठुसणाऱ्या वेदना नि गद्गद्णारे हुंदके
    भळभळणाऱ्या जखमा नि बापुडवाणी पोकळी व्याकुळ

    बऱ्याच झाल्या बेरजा वजाबाक्या तरीही आयुष्यफळा भासतो मोकळा
    त्रैराशिक हुकले जगण्याचे , चुकलाच आमचा वेळेचा ताळा
    काही असतील झाल्या तरीही बऱ्याच उरल्या होत्या गप्पा
    स्पंदनांना काही फुटलेले पाय ; उरल्या होत्या तरीही आंतरिक कळा

    भेटू आपण जेव्हा होऊन एकदा एकदम गोळा
    होऊ या मोकळे मनसोक्त रडून गळ्यात घालून गळा

    घंटेच्या घनगंभीर नादाने भानावर आलो जेव्हा
    रात्र टळून गेली होती .....
    सुकत आलेले जडावलेले डोळे मी उघडले तेव्हा
    कोवळी सूर्यप्रभा नुकती पसरत होती

    खूप काळ उलटून गेला असावा
    कोंबडाही केव्हाचा आरवला असावा
    आता उठायलाच हवे , नाही का ?

    उरलेले अश्रू गोठवून मनाचा दगड करुन उठताना
    मी जेव्हा माझ्या क्षौर केलेल्या डोक्यावरुन हात फिरवला तेव्हा
    छोटे छोटे सफेद केस त्यावर केव्हाचे उगवले होते

    -यतीन सामंत