(User Level: User is not logged in.)

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आम्ही धरित्रीच्या लेकी

    माझी दुसरी नात सानिका उच्च शिक्षण घेऊनही नोकरीच्या मागे न लागता. सायलीची लहान बहिण आईच्या शाळेत मुलांना शिकवत आहे. आणि आता तर घरच्या शेतात लिंबाची दिडशे रोपे लावून या क्षेत्रातही आवडीने लक्ष घातले आहे. त्यामुळे तिचे मला खूप खूप कौतुक वाटले म्हणून...
    लिंबलोण उतरते...
    हिरव्या साडीस पिवळी किनार ग.
    सानु लिंबास येईल बहार ग....
    पिवळी पिवळी मोठी लिंबे येतील रसरशीत.
    पाहूनच आईबाबा तेंव्हा येतील नक्कीच खुषीत...
    आबंट गोड चवीचे घरोघरी होईल छान सरबत.
    सगळे गावच देईल तुला मोठ्या आदराने मान.
    उच्चशिक्षित असूनही तू घातलेस काळ्या रानी लक्ष.
    निश्चितच लिंबाचेच मिळतील रुपये तुला लक्ष लक्ष..
    कौतुक आहे ग तुझे कोणाला सांगू किती..
    आज्जी भरल्या डोळ्याने तुझ्या वरुन लिंबलोण उतरती
    मुलामुलीत नका करू कसलाही भेदभाव.
    सानिका दाखवून दिले आहेस आम्हीही धावू शकतो भरधाव....
    -- सौ कुमुद ढवळेकर.
  • नको राजसा अंत पाहू

    नको राजसा अंत पाहू ,
    डोळे वाटेकडे लागले,
    किती रात्रंदिन साहू ,
    विरहव्यथेने तळमळले,--!!!

    अजून नाही आलास तू ,
    संजीवनही आता संपले,
    कोरडा होईल ना रे ऋतू ,
    जरी हिरवेपण ते दाटले,--!!!

    अंगप्रत्यंगी चिंब भिजू ,
    स्वप्न डोळियांनी पाहिले,
    तव स्पर्शाची जादू ,--
    तनमन किती लालसावले,--!!!

    मिलन आपुले किती योजू ,
    दिन - रात कमी पडले,
    अपार ते प्रेम लुटू,
    काळजांचे धागे विणले,--!!!

    प्रीत मुसमुसतांना तू ,
    जवळ हवा, मज वाटले,
    नवथर आपुली जोड
    लाजरी कळी बघ उमले,--!!!

    शहारते आज तनू ,
    कल्पनेचे तिला हिंदोळे,
    प्रियाला लागे कवटाळू ,
    एकांताची वाट चाले,--!!!

    सुगंध लागे दरवळू ,
    प्रेमप्रीत कशी हाकारे ,
    तू असा दूर की परंतू ,
    जिवाला वेधही लागले,--!!!

    © हिमगौरी कर्वे .

  • शब्द

    वाक्य हे आयुष्य मानल्यास, शब्द हे व्यक्तींसारखे असतात

  • बालपणीची भांडणें

    मजेदार वाटत असती, भावंडांची बघून भांडणें

    'मला पाहीजे जास्त', हेच मुख्य मागणें

    इजा नाही धोका नाहीं, नसतो तेथे तिरस्कार

    दांत ओठ खाऊनी, रागव्यक्त होणार

    क्षणांत भांडती, क्षणात हसती, सारे होते प्रेमानें

    दूर जाऊन जवळ येती, विसरुन जाती लोभानें

    राग लोभ अहंकार, नसती असल्या भांडणीं

    स्वार्थतेचा अभाव दिसे, शत्रु येथे नसे कुणी

    बालपणीच्या प्रेमामध्यें, थोडे भांडणें परवडते

    चव येण्या पदार्थाला, तिखटमिठ लागते

    लहान असतां भांडून घ्या, तेच वय भांडणाचे

    मोठे होऊन आठवाल, रम्य दिवस ते बालपणाचे

    -- डॉ. भगवान नागापूरकर
    ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कवच

    आघात होऊनी परिस्थितीचे,
    सही सलामत सुटत असे,
    संकटाची चाहूल लागूनी,
    परिणाम शून्य ठरत असे ।।१।।

    दु:खाची चटकती उन्हे,
    संरक्षणाची छत्री येई,
    कोणती तरी अदृष्य शक्ती,
    त्यास वाचवोनी निघून जाई ।।३।।

    दूर सारूनी षडरिपूला,
    मनावरती ताबा मिळवी,
    प्रेमभाव अंगी करूनी,
    तपशक्तीला सतत वाढवी ।।३।।

    तपोबलाचे बनूनी कवच,
    फिरत होते अवती भवती,
    दु:खाचे वार झेलुनी,
    रक्षण त्याचे सदैव करीती ।।४।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • गोड स्वप्नं 

    अजुनही एकांतात
    कधी तिला आठवते
    कोवळ्या त्या मनाचे
    सुंदर गोड स्वप्न ते...

    त्याला पाहुन
    तिचं मन झुरलं होतं
    कळलं नव्हतं तिला
    पण ह्रुदय हरवलं होतं

    बसल्या बसल्या बोटानं
    वहीत रेषा ओढत होती
    स्वतःच्या नावापुढे
    त्याच नाव जोडत होती

    झुरलेल मन तिचं
    शब्द शोधत होतं
    भावनां व्यक्त करण्यास
    बळ शोधत होतं

    ओठांवरच्या शब्दांना
    कंठ नाहीच फूटला
    हळुहळू मोगऱ्याचा
    तो बहरही ओसरला

    अल्पायुषी भावना ती
    अशी झुरता मेली
    रेंगाळलेल्या पावलांनी
    बोहल्यावर ती चढली

    दूर राहिलेल्या वाटेसाठी
    मन नाही अडखळलं
    वास्तवाच्या हिरवळीवर
    अगदी आनंदान रमलं...

    अजूनही एकांतात
    कधी तिला आठवते
    पडलेले गोड स्वप्न ते
    हसुन झटकून टाकते.

    - डॉ.सुभाष कटकदौंड

  • शोधूं कोठें त्यास ?

    शोधत होतो रुप प्रभूचे, एक चित्त लावूनी ।
    अवंती भवंती नजर फिरवी, श्वास रोखूनी ।।

    शांत झाले चंचल चित्त, शांत झाला श्वास ।
    ह्रदयनाडी मंद होऊनी, चाले सावकाश ।।

    पचन शक्ती हलकी झाली, जठराग्नीची ।
    शिथील झाली गात्रे सारी, देह चैतन्याची ।।

    देहक्रियांतील प्राणबिंदू , असे ईश्वर ।
    समरस होतां त्याच शक्तिशीं, होई स्थिर ।।

    शोधामध्यें चिंतन करतां, ध्यान परी लागते ।
    समाधी स्थितीत येतां प्राण, अनंतात मिसळते ।।

    नाही दिसले रुप ईश्वरीं, आगळे एकटे ।
    विश्वमंडळ तोच असतां, शोधू तयास कोठे ? ।।

    डॉ. भगवान नागापूरकर
    संपर्क - ९००४०७९८५०
    bknagapurkar@gmail.com

  • कोणास ठावूक ?

    कधी तू ‘शिक्षक ‘असतेस ,
    तर कधी तू ‘शिक्षा ‘ असतेस !
    कधी तू खूप ‘दूरची’ भासतेस,
    तर कधी तू ‘जवळची’ असतेस!
    बरेचदा तू ‘आई ‘असतेस,
    पण प्रसंगी तू ‘बाप’ होतेस !
    कधी तू ‘असतानाही’ नसतेस,
    तर कधी ‘नसतानाही’ असतेस !
    मला हवी तशी ‘तू’ कधीच नसतेस,
    म्हणून मग तू फक्त ‘बायको’ होऊन रहातेस !
    कधी कळेल तुला, कोणास ठाऊक ?
    मला तू ‘मैत्रीण’ म्हणून हवी असतेस !
    -- सुरेश कुलकर्णी
  • सांत्वनी दुःखहारी

    दुःखवेदनाच ! सखी खरी ।
    आठवांतुनी झुळझुळणारी ।
    मुक्त हृदयांतरी बिलगणारी ।
    सत्य ! स्वसांत्वनी दुःखहारी ।।१।।

    दुःखाचे पावित्र्य ! आगळे ।
    ते कां? सहचजी, उमगते ।
    सुखदु:खाचे दान भाळीचे ।
    भोग भोगणेच ! जन्मांतरी ।।२।।

    अनाहत लाठी भगवंताची ।
    ऋणानुबंधीच साऱ्या गाठी ।
    तोच जोडितो,तोच तोडितो ।
    जपुया ! सत्कर्माची शिदोरी ।।३।।

    जन्मा ! येताजाता बंद मुठी
    सत्ता ! सारी त्या दयाघनाची
    क्षणाक्षणाला तो एक सावरी
    सत्कर्माचीच साक्ष सरणावरी ।।४।।

    मनामना नित्य सावरीत जावे
    सुखदा ! ती निर्मळ भावप्रीती
    आत्मानंदी क्षण ते कृतार्थतेचे
    कृपाळू भाग्य भाळीचेच ईश्वरी ।।५।।

    -- वि.ग.सातपुते (भावकवी)

    9766544908

    रचना क्र. १३८

    २६ - १० - २०२१.

  • जागतिक आणि भारतीय जनतेची भ्रष्टाचार बद्दलची मते व आलेख ( 2013 )…!!

    ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनल ह्या जागतिक कीर्तीच्या कंपनीने जगातील १०७ देशांचा भ्रष्टाचारा संबधी विचारलेल्या प्रश्नाच्या आधारे एक जागतिक आलेख आणि रिपोर्ट सदर केला .ते प्रश्न असे होते. भारतीय जनतेची मते टक्केवारीत दर्शविली आहेत..